Sunday, March 31, 2019

ग्रंथालये दुर्बल झाली तर देशाला भवितव्य नाही----देविदास फुलारी.

ग्रंथालये दुर्बल   झाली तर देशाला  भवितव्य नाही----देविदास फुलारी.



बिलोली. (ता.प्र)ग्रंथालये  वाचकांना निरनिराळे ग्रंथ  ऊपल्ब्ध  करुन देतात.  वाचकांची मानसिकता तयार करण्याचे कार्य ग्रंथपाल करतात. ग्रंथालयाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ग्रंथालये  दुर्बल झाली तर  देशाला भवितव्य नाही. असे मत प्रसिध्द साहीत्यीक  देविदास फुलारी यांनी व्यक्त केले.

ते बिलोली  येथे 30 मार्च रोजी जनक्रांती वाचनालायात आयोजीत  जिल्हा ग्रंथालय  सम्मेलनांत बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाअध्यक्ष माजी आमदार  गंगाधर पटने होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन निवृत्त  सहायक ग्रंथालय संचालक रा. श. बालेकर  जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशीश ढोक   प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवशी अॕड. डि.एम. कुंचेलीकर  निरीक्षक प्रताप सुर्यवंशी आदि उपस्थीत होते.

साहीत्यीक फुलारी पुढे म्हाणाले की  पुस्तके संस्कृतीचे  मस्तक आहेत. ग्रंथालयाचे अडचणी अनेक आहेत. तरी पण  वाचकाला त्याचे आवडीचे पुस्तक ग्रंथालायात मिळतात. हे कमी नाही.
कराडच्या प्रीतीसगंमावर रवींद्र कामत यानी केलेल्या उपोषणाला शुभेच्छा दिल्या. ग्रंथालय चालकाना शासनाकडुन  न्याय मिळाला पाहीजे असे सांगीतले.
ते पुढे म्हणाले की मराठी वाडंमय आले. दलीत साहीत्य आले. मुस्लीम साहित्य आले. परंतु बाल साहीत्याकडे दुर्लक्ष झाले. बाल  साहीत्य   मोठ्या प्रमाणात उपल्ब्ध  करून  देण्याची गरज असल्याचे साँगीतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण  गंगाधरराव पटने यानी केले.  ते म्हणाले की ग्रंथालया बाबत शासनाचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. शासना कडे ग्रंथालयाच्या विवीध मागण्या व कर्मचारी वेतनश्रेणी, बाबत असंख्य निवेदने उपोषण आंदोलने करण्यात आली. परंतु   राज्य सरकार ने आश्वासना शिवाय काहीच दिले नाही. साडेचार वर्षात कुंभकर्णी  सरकारने एक रुपयाचे अनुदान वाढ केले नाही.
ग्रंथालय कायदा १९६७ ला झाला . त्याला ५०  वर्ष झाली. कायद्यात सुधारणा करणेसाठी  समिती स्थापन करण्यात आली, केवळ सरकारने चालढकल केली.अशी  टिका केली.
गृथालयाचे कर्मचारी तुटपुन्ज्या वेतनात  ज्ञान दानाचे काम करतात. सरकार मात्र अंगणवाडी  गृहरक्षक दलाचे वेतन वाढविले.ग्रंथालय सेवकाचे वेतनाबाबत  दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली.
 गृबथालयाचेजनक डाॕ. एस.आर. रगँनाथन यांचा प्रतिमेस पुष्पहार व  दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. व्यासपिठ वर उपस्थित मान्यवराचा शाल पुष्पहार व पुस्तक भेट देवुन करण्यात आली.
कार्यकृमाचे सुत्रसचालन लगडापुरे सर यानी केले तर आभार सुभाष पाटील यानी मानले. अधिवेशनास जिल्ह्यातिला शभर  चे वर प्रतिनिधी उपस्थित होते.




परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या

: परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या



परभणी येथे किरकोळ कारणावरूनशिवसेना नगरसेवकाची हत्या
झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

अमरदीप यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी हल्ला केला. रविवारी सकाळची ही घटना आहे. रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावं आहेत. अमरदीप यांची हत्या केल्यानंतर आरोपी रवी गायकवाड आणि किरण ढाके हे थेट पोलीस स्टेशनला हजर झाले. हत्येचं नेमंक कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अमरदीप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला होता  शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते अत्ता तणावपूर्ण शांत वातावरण आहे

Friday, March 29, 2019

निवडणूक निरीक्षक हरदीप सिंग व जिल्हाधिकारी डोंगरे यांच्‍या हस्‍ते नांदेड लोकसभा निवडणूक संदर्भिकेचे प्रकाशन

निवडणूक निरीक्षक हरदीप सिंग  व जिल्हाधिकारी डोंगरे यांच्‍या हस्‍ते
नांदेड लोकसभा निवडणूक संदर्भिकेचे प्रकाशन 




नांदेड, दि. 29:-१६-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या माहितीच्‍या संदर्भिकेचे प्रकाशन निवडणूक निरीक्षक (जनरल) हरदीप सिंग  व जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरेयांच्‍या हस्‍ते  जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या पत्रकार परिषदेत  जिल्‍हाधिकारी यांच्‍या बैठक कक्षात  करण्‍यात आले. 
प्रसार माध्‍यमांना विश्‍लेषणासाठी तसेच अभ्‍यासकांना उपयुक्‍त ठरेल अशी माहिती या संदर्भिकेतून देण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्‍हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्‍यक्ष राम गगराणी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण,जिल्‍हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्‍हाण, डॉ. दिपक शिंदे,  जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, विविध प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी, आदिंची यावेळी उपस्थिती होती.

जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी या पुस्तिकेचे संपादन केले असून माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास, मिलिंद व्यवहारे,विवेक डावरे, काशिनाथ आरेवार यांनी सहाय्य केले आहे.
जिल्‍हा माहिती कार्यालयाच्‍यावतीने काढण्‍यात आलेल्‍या संदर्भिकेमध्‍ये नांदेड लोकसभा मतदार संघाचा नकाशा,  निवडणूक आचारसंहिता, पेडन्‍युजचे निकष,सोशल मिडिया, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र, व्‍हीव्‍हीपॅट,निवडणूक आयोग तसेच प्रमुख अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, मतदान केंद्र संख्‍या, मतदारांची संख्‍या तसेच नांदेड लोकसभा निवडणूकीतील १९५१ ते २०१४ पर्यंतचे निकाल, निवडणूक कार्यक्रमासह आदि माहिती संदर्भिका पुस्तिकेत देण्‍यात आली आहे.

Thursday, March 28, 2019

जिल्ह्यात ८७ उमेदवाराच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी एकूण५५ उमेदवारांचे अर्ज वैध , तर चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले

जिल्ह्यात ८७ उमेदवाराच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी एकूण५५ उमेदवारांचे अर्ज वैध , तर चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले



(एजास कुरेशी)
नांदेड, दि. २८ :-   १६- नांदेड लोकसभा निवडणूक-२०१९ मतदारसंघासाठी एकूण ८७ अर्ज प्राप्त झाले असून ५५ अर्ज वैध ठरले असून चार अर्ज अवैध ठरले आहेत. १६- नांदेड लोकसभा निवडणूक२०१९मतदारसंघासाठी दिनांक २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांच्या नियंत्रणाखाली उमेदवारांच्‍या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात ८७ उमेदवाराच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी  करण्यात आली. यात  एकूण५५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. वैध अर्जामध्ये अशोक शंकरराव चव्हाण - इंडियन नॅशनल काँगेस,. चिखलीकर प्रतापराव गोविंदराव - भारतीय जनता पार्टी, अब्दुल रईस अहेमद अब्‍दुल जब्‍बार - आंबेडकर नॅशनल काँग्रेस,  अब्दुल समद अब्‍दुल करीम - समाजवादी पार्टी,  अल्ताफ अहमद इक्बाल अहमद - इंडियन युनियन मुस्लिम लीग, अंकुशराव शिवाजीराव पाटील - राष्ट्रीय मराठा पार्टी, पाटील संभाजी वामनराव- क्रांतिकारी जय हिंद सेना, भिंगे यशपाल नरसिंगराव -वंचित बहुजन आघाडी, मोहन आनंदराव वाघमारे- बहुजन मुक्ती पार्टी, विजय भीमराव कांबळे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), शिवानंद दत्तात्रय पांचाळ-बळीराजा पार्टी, शेख अफजलोद्दीन अजमोद्दीन- बहुजन महा पार्टी, श्रीकांत लक्ष्मणराव गायकवाड - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, अ. सल्फी अ. सलाम -अपक्ष,  अहमद अ. खादर नईम- अपक्ष, अरिफ अहमद शेख - अपक्ष, इक्बाल अहमद फकीर अहमद -अपक्ष, कदम श्रीरंग उत्तमराव- अपक्ष, चव्हाण अशोक शंकरराव- अपक्ष, झुल्फेखान जिलानी सय्यद- अपक्ष,तुकाराम गणपत बिराजदार- अपक्ष , थोरात रवींद्र गणपतराव- अपक्ष, नवघरे आनंद पांडुरंग- अपक्ष,  नविद युनूस खान – अपक्ष, पठाण जफर अली खॉं- अपक्ष,  प्रकाश विठ्ठलराव गुन्नर- अपक्ष, प्रमोदकुमार किशनराव कामठेकर –अपक्ष, मनीष दत्तात्रय वडजे- अपक्ष,मोहम्मद तौफीक मोहम्मद युसूफ- अपक्ष, महम्मद सलीम ममद इकबाल – अपक्ष, महेश प्रकाशराव तळेगावकर -अपक्ष , माधवराव संभाजी गायकवाड -अपक्ष, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील- अपक्ष,मो.मोहीजोद्दीन मो. वहिजोद्दीन -अपक्ष,  मोहम्मद वसीम मोहम्मद इकबाल-अपक्ष,  रंजीत गंगाधरराव देशमुख -अपक्ष,  राहुल सिताराम साळवे -अपक्ष, लता गौतम कांबळे -अपक्ष , लतीफ उल जफर कुरेशी- अपक्ष,लतीफखाँ पीरखाँ पठाण- अपक्ष, विजयमाला गजानन गायकवाड- अपक्ष, शफी शेख अमीर शेख- अपक्ष,  शिवानंद अशोकराव देशमुख -अपक्ष, शेख असलम इब्राहीम- अपक्ष, शेख इमरान शेख मस्‍तान -अपक्ष,  शेख मुनीर शेख युसूफ -अपक्ष, स. अलिमोद्दीन मोहमोद्दीन- अपक्ष,  सचिन उत्तमराव नवघरे- अपक्ष,  सय्यद तन्वीर सय्यद हमजा - अपक्ष,  सय्यद मोईन सय्यद मुख्‍तार - अपक्ष,  साहेबराव भिवा गजभारे- अपक्ष, अॅड.  सुभाष खेम्मा जाधव- अपक्ष,  सुरेश दिगंबरराव कांबळे -अपक्ष,  सुनील मनोहर सोनसळे- अपक्ष, यूसूफ नबी खान- अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

अमिता अशोकराव चव्‍हाण – इंडियन नॅशनल कॉंग्रेस, धनाजीराव व्‍यंकटराव देशमुख-भारतीय जनता पार्टी, बापुराव विठ्ठलराव कल्‍याणकर-अपक्ष,बालाजी दिगंबरराव कोटगिरे-अपक्ष यांची नांदेड लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक -२०१९ छाननीअंती उमेदवार अपात्र ठरविण्‍यात आले आहेत.

००००

लोकसभेला संधी दिल्यास भोकर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलुन टाकु-- प्रतापराव पाटील चिखलीकर

लोकसभेला संधी दिल्यास भोकर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलुन टाकु-- प्रतापराव पाटील चिखलीकर



बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क

(एजास कुरेशी)
नांदेड लोकसभा मतदारसंघात विकास करण्यासाठी व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघात मला संधी दिल्यास भोकर तालुक्याचा चेहरामोहरा बदलून टाकु व सामान्य शेतकरी बेरोजगार युवक यांच्या समस्या सोडण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी  केले

भोकर तालुक्यातील सुरूगऋषी येथील पौराणिक मंदिरात  माजी मंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर, प्रा सुनिल नेरळकर ,
नागनाथ घिसेवाड ,किशोर पाटील लगळुदकर,  सेनेचे माधव पावडे, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी , दिलीप सोनटक्के  गणपत पिठ्ठेवाड
 देविदास राठोड, शिवाजी पाटील किन्हाकर , यांच्या प्रमुख उपस्थित
नारळ फोडून भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला



यावेळी पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले की भोकर तालुक्याच्या विकासासाठी खासदार अशोकराव चव्हाण यांनी काहीही केले नसून केवळ सामान्य जनतेचा आता पुरता वापर केला भोकर तालुक्यातील ग्रामीण भागात युवकांना आताही रोजगार उपलब्ध नाही येथील शेतकरी बांधवांना पिक विमा मेळावा यासाठी पत्नी आमदार स्वतः खासदार असून सुद्धा त्यांनी काहीही केले नाही भोकर शहराला पाणीपुरवठा करणारा एकमेव सुद्धा प्रकल्प यांची यांची उंची वाढविण्याचे आश्वासन गेल्या लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये दिले होते ते आतापर्यंत पूर्ण केले नाही जर आम्ही तुमच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये गेलो तर सर्वात पहिले सुधा प्रकल्पाची उंची वाढण्याचे काम करू असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे नांदेड लोकसभा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले
यावेळी   माजी मंत्री डॉक्टर माधव पाटील किन्हाळकर सुभाष पाटील किन्हाकर यांनी आपले विचार मांडले
 याप्रसंगी


गणेश पाटील कापसे     बाळासाहेब साकाळकर हरिभाऊ चाटलावार  प्रशात पोपशेटवार  राजेश करपे  सतीश देशमुख  धनराज पवार  संतोष मारकवार माधव वडगावकर राजु अंगरवार  प्रशांत कानडे  अर्शद अहेमद ईस्माईल मिस्त्री  राजू वाघमारे  निशाद ईनामदार  सहित
 परिसरातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते

Monday, March 25, 2019

सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रावर कर्मचारी करत आहे रूग्णांची आरोग्य तपासणी१५ दिवसांपासुन वैद्यकिय अधिका-यांची अनुपस्थिती

सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रावर कर्मचारी करत आहे रूग्णांची आरोग्य तपासणी१५ दिवसांपासुन वैद्यकिय अधिका-यांची अनुपस्थिती



रूग्णांसह नातेवाईकांचा संताप व्यक्त केला जात आहे

लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष


बिलोली प्रतिनिधी  : (ए जी कुरेशी)
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या पंधरा दिवसांपासुन वैद्यकीय अधिकारी येत नसल्यामुळे या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांकडून रूग्णांची तपासणी केली जात आहे. या गंभीर घटनेचे रूग्णांसह नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात असताना, ही बाब तालुका आरोग्य अधिका-यांना माहितीच नसल्याचे समजते, यामुळे या आरोग्य केंद्राच्या समस्येकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
बिलोली तालुक्यातील मोठे गाव आहे. याबरोबरच सगरोळी या गावात मोठी बाजारपेठे असल्याने परिसरातील व्यापाऱ्यांची नेहमीच येथे वर्दळ असते याची दखल घेऊन परिसारातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सुटावेत या उद्देशाने सगरोळी येथे
ब-याच वर्षापुर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. या आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी गट अ व गट ब ही दोन्ही पदे मंजूर आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासुन या आरोग्य केंद्रातील गट अ हे व गट ब ही दोन्ही पद रिक्त असल्याने या आरोग्य केंद्रातील कर्मचारी आरोग्य सहाय्यक कौशल्य हे रूग्णांची तपासणी करत आहेत. यामुळे या आरोग्य केंद्रात दोन दोन आरोग्य अधिकारी पद असताना एकही अधिकारी उपलब्ध असू नये ही शोकांतीकाच म्हणावी लागेल. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सदर बाबीची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वाडेकर यांना पत्रकारांनी भ्रमणध्वनी वरून विचारणा केली असता सदर बाबीची मला कुणीही कल्पना दिली नसल्याचे सांगितले. एकंदरीत सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी या पदाबरोबरच एमपीडब्ल्यु २ , कंपाउंडर १ , जीएनएम २ व सेवक १ आदी पदे रिक्त आहेत.  या रिक्त पदामुळे आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांसह औषधांचा तुटवडा जाणवत असून रूग्णांची हेळसांड होत आहे, तरी स्थानिक लोकप्रतिनिधी नी व वरिष्ठांनी या बाबीचा गांभिर्याने विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिका-यांची तात्काळ नियुक्ती करावी व रूग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागाणी तालुक्यातील गरीब जणता करत आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी इतिहास घडवणार. -- प्रा.डाॅ .यशपाल भिंगे

नांदेड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी इतिहास घडवणार.     -- प्रा.डाॅ .यशपाल भिंगे



नांदेड प्रतिनिधी
   दि.२६मार्च२०१९रोजी छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून रॅली काढून फार्म भरणार.
   श्रध्देय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी ४जानेवारी माळेगावच्या ओबीसी परिषदेत वंचीत बहुजन आघाडीचा नांदेड लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले.दि.१७ जानेवारी नांदेड नवा मोंढा येथे झालेल्या विराट सभेत.खा.असदोद्दिन ओवैसी व ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब करुन मला बळ अवसान दिलं.
  मी त्या बळ ताकदीवर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने दोन महिने झाले लोकांच्या भेटी घेत कामाला सुरुवात केली.
  प्रतिस्पर्धी प्रस्थापित पक्षांना हा आपला झंझावात पाहून उमेदवार कोण द्यावा ? याचेच कोडे सुटले नसतांना आपण आज सर्व सामान्य लोकांच्या प्रश्न समस्या जाणून घेऊन तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचलो असुन या लोकसभा निवडणुकीत निश्र्चित यशस्वी होऊन इतिहास घडवणार या ध्येय धोरणात्मक उद्देशाने गाव खेड्यातील कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने एकवटून काम करत आहेत.
  दि.२६ मार्च रोजी माझ्या उमेदवारीचा फार्म वंचित बहुजन आघाडीचे पक्षनिरीक्षक .हरिदास भदे व भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश सहसचीव प्रा. डॉ.सुरेशजी शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत भरण्यात येणार आहे.                 तरी जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन ओबीसी बांधव सर्व मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन मा.फेरोज लाला मराठवाडा अध्यक्ष एम आय एम, डॉ.संघरत्न कुऱ्हे जि.अध्यक्ष सय्यद इलियास राजुरकर,जि.महासचीव,प्रवक्ता सुरेश रावणगावकर,जि.उपाध्यक्ष के.एच.हसनाळकर भिमराव बेंद्रीकर,दिलीप जोंधळे, रविंद्र वाघमारे,टोपाजी काकडे,रवि चित्ते आय टी.प्रमुख,सचीन नवघडे,बालाजी खरडे जि.अध्यक्ष (उत्तर)वं.ब.आ. बाळासाहेब सोनकांबळे महासचीव भारिप (उतर) श्याम कांबळे,  शिवाजी गेडेवाड (दक्षिण) वं.ब.आ.अध्यक्ष साहेबराव बेळे, महेंद्र देमगुंडे,पंढरी जायनापुरे,माधवदादा जमदाडे, नितीन बनसोडे,अनिल सिरसे, नागोराव शेंडगे, राहुल प्रधान, रामचंद्र येईलवाड,जाकेर चाऊस,प्रा.रामचंद्र भरांडे ,कुमार कुर्तडीकर,देवानंद सरोदे,अशोक कापसीकर,प्रा. राजू सोनसळे,संदिप वन्ने,कैलास वाघमारे, गयाबाई कोकरे,प्रशांत इंगोले,ॲड.यशोनिल मोगले, आदींनी केले आहे.
  तरी सर्व जिल्ह्यातील ता.कार्यकर्ता पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे

Sunday, March 24, 2019

स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची कन्या खा.डॉ.प्रितमताई मुंडेंचा महायुतीच्या अधिकृत लोकसभा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा―ऋषिकेश विघ्ने

स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची कन्या खा.डॉ.प्रितमताई मुंडेंचा महायुतीच्या अधिकृत लोकसभा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा―ऋषिकेश विघ्ने



पाटोदा (प्रतिनिधी):
बीड लोकसभा मतदारसंघातील 'भाजपा-शिवसेना-रासपा-रिपाई' महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे उमेदवारी अर्ज भरणार असुन त्यांना आशिर्वाद देण्यासाठी आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या राजकिय नकाशावर विजयाची गुढी उभारण्यासाठी जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ता बंधु आणि जनतेने बीडला यावे असे आवाहन भाजपाचे ऋषिकेश विघ्ने यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील जनतेने लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांवर भरभरून प्रेम केलं आहे. त्याचप्रमाणे पंकजाताई मुंडे व डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पाठिशी उभा राहून सतत आशीर्वाद या बीड जिल्ह्यातील जनतेनं दिलेले आहेत.
ना.पंकजाताई व खा.डॉ.प्रितमताईंनी बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणली.सर्वदूर विकास केला.सर्वसामान्य माणूस सत्तेचा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी सत्तेचा उपयोग या मुंडे भगिनींकडून केला गेला.रेल्वे,रस्तेविकास करून दळणवळणाच्या सोयी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिल्या व विविध क्षेत्रात जिल्हा प्रगतीवर नेला.
दि.२५ मार्च रोजी दुपारी २ वाजता बीड जिल्ह्याच्या विद्यमान खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथजी मुंडे यांचा महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.बीड जिल्ह्याचा अधिक विकास करण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या या नेतृत्वाचा अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून खा.डॉ.प्रितमताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे असे आवाहन पाटोदा भारतीय जनता पार्टीचे ऋषिकेश विघ्ने यांनी केले आहे.

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी बैतुल माल कमेटी कडून १४ जोडप्याचे विवाह सोहळा संपन्न

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी बैतुल माल कमेटी कडून १४ जोडप्याचे विवाह सोहळा संपन्न



भोकर (एजास कुरेशी)
दर वर्षी प्रमाणे बैतुल माल कमेटी यांच्या कडून भोकर शहरात दरवर्षी गोरगरिबांचे मोफत विवाह करण्यात येतात त्यांच्या कडून कुठल्याही प्रकारचे पैसे न आकारता कमिटीचे अध्यक्ष शेख लतीफ खैराती यांच्या नेतृत्वाखाली अनेक जणांचे विवाह सोहळा नोंद करतात.
 व त्या विवाह  सोहळ्यास भोकर तालुक्यातील लोक राजकीय पुढारी जेष्ठ नागरीक,व पत्रकार बंधू , उपस्थित राहून त्या विवाहबद्ध जोडप्यास शुभ आशिर्वाद देण्यासाठी गर्दी करतात ही आलोट गर्दी पाहून सर्वच लोक अगदी मनसोक्त पणे आपली कार्य कर्तव्य मदत ह्या कार्यक्रमात करत असतात व तसेच बैतुल माल कमेटी भोकर कडून  पलंग ,गादि , कपाट,विवाह उपयोगी सर्व साहित्य विवाह बध्द झालेल्या जोडप्यास संप्रेम भेट म्हणून देण्यात आले.

 त्याच बरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांचे बैतुल माल कमेटी अंतर्गत सुपर गार्डन येथे विवाह मंडपाच्या मध्ये जेवणासाठी मोठया प्रमाणात सोय देखील या वेळी करण्यात आली या वेळी या कार्यक्रमात वंचीत बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार प्रा.यशपाल भिंगे व एम आय एम चे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला भोकर पोलीस निरीक्षक विकास पाटील व तसेच सर्व पक्षातील कार्यकर्ते , पदअधिकारी, या कार्यक्रमात आपली हजेरी लावली.
बैतुल माल कमेटी कडून सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुछ देऊन करण्यात आले  अनेक लोकांनी शुभ आशीर्वाद देऊन त्या वेळी अनेक जणांच्या भेटी घेतलेले दिसून आले व तसेच या विवाह सोहळ्यामध्ये ५००० लोक उपस्थित होते असे बैतुल माल कमेटी चे अध्यक्ष शेख लतीफ खैराती यांनी सांगितले .

Saturday, March 23, 2019

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह सोई-सुविधा देऊ - प्राचार्य सौ.मेरगु

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह सोई-सुविधा देऊ  -   प्राचार्य  सौ.मेरगु




बिलोली ता.प्रतिनिधी (ए जी कुरेशी)
.दि.23 मार्च

आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह विविध शैक्षणिक सोयी-सुविधा देऊन त्या  विद्यार्थ्यांच्या  भावी जिवनातील  उज्जवल भविष्य घडविण्याचे प्रामाणिक पणे प्रयत्न करु असे प्रतिपादन तालुक्यातील  कार्ला खु.येथिल सनशाईन इंटरनॅशनल इंग्लिश  स्कुलच्या प्राचार्य  सौ.प्रेमा मेरगु यानी दि.22 मार्च रोजी  आयोजित विद्यार्थी  व पालक मेळाव्यात उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते.
    या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपिठावर मा.आ,गंगारामजी ठक्करवाड तर प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेडचे  जेष्ठ विधीतज्ञ शंकररावजी बोटलावार, चेअरमन सत्यनारायण मेरगु , पञकार राजु पाटिल शिंपाळकर कार्ला खु.संरपंच सौ.अल्का  देशमुख ,गजानन दावलशेटे आदि प्रमुख  मान्यवरांची उपस्थिती होती.या वेळी सर्वप्रथम  मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्वलीत करुन पुढिल कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.या पुढे बोलताना मेरगु  म्हणाल्या की आमच्या या शैक्षणिक संस्थेच  यंदाच प्रथम वार्षिक महोत्सवी वर्षे आसुन सदर शैक्षणिक वर्षात शाळेनी विद्यार्थ्यांच्या गुणवतेसह कला, क्रीडा व विविध  सांस्कृतिक  कार्यक्रमात सहभाग घेऊन यंदाच्या  तालुका स्थरावरील प्रजासत्ताक दिनाच्या आयोजित  स्पर्धात्मक कार्यक्रमात सह भाग घेऊन चिमुकल्या कलाकारानी प्रथम पारीतोषिक पटकाऊन शाळेच नाव लौकिक केल्याच या वेळी आवर्जून ऊल्लेख करीत आगामी कार्यकाळात  आम्हि आमच्या विद्यार्थ्यांना यापुढे हि जाऊन  दर्जेदार शिक्षणासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचअभिवचन हि या वेळी दिल.  तर संचालक सत्यनारायण मेरगु यांचही विविध विषयावर सविस्तर अस मौलाच मार्गदर्शन लाभल.तसेच या वेळी सायंकाळच्या विद्युत रोषनाईत शालेय मैदानावर चिमुकल्या बालकलाकारानी उत्कृष्ट असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.या कार्यक्रमास उपस्थितानी टाळ्याच्या गजरात उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत कार्यक्रमाचा चांगलाच आस्वाद घेतला,य कार्यक्रमास परीसरातील प्रतिष्ठित नागरिक ,विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मेरी मँडम तर सुञसंचलन अनिल तमलुरे यानी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मु.अ.हेमा मँडम , व्यंकटराव सुरकुटलावार ,शिवकन्या  सुरकुटलावार ,इस्तर मँडम ,राहुल सर आदि शिक्षक वृदानी प्रयत्न केले.

सगरोळी येथे रोबोटिक्स कार्यशाळेचे आयोजन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन यासंधीचा फायादा घ्यावा;अमोल घोगरे

सगरोळी येथे रोबोटिक्स कार्यशाळेचे आयोजन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन यासंधीचा फायादा घ्यावा;अमोल घोगरे







बिलोली प्रतिनिधी(ए जी कुरेशी)
 सगरोळी येथील श्री छञपती शिवाजी हायस्कूल अटल लॕब टिंकरिंग च्या  वतीने रोबोटिक्स वर्कशाॕप चे आयोजन दि.२३ ते २४ मार्च दरम्यान करण्यात आले आहे असून,इंडियन इन्स्टीट्युट आॕफ टेक्नालाॕजी व नॕशनल रिसर्च सेंटर मुंबई यांचे यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन लाभणार आहे,
अटल टिंकरिंग लॕबचा उद्देश बदलत्या काळातनुसार विद्यार्थांना विज्ञानाबरोबर तंञज्ञानाची माहीती मिळाली तर विद्यार्थांच्या सुप्तगुणांना वाव मिळवून दिल्यास कल्पकता व चिकित्सकता वाढून नविन शास्त्रज्ञ उदयास येउन नवनवे संशोधन होईल.
हे दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याने,जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होउन यासंधीचा फायादा घ्यावा.प्रवेश शुल्क रुपये ९००(किटसह) व बिगर किटसह रूपये ५०० भरुन लाभ घ्यावा असे आहवान अटल टिंकरिंग लॕबचे संयोजक अमोल घोगरे यांनी केले आहे.संपर्क(७७०९३८६१२५)

Friday, March 22, 2019

कचऱ्याची होळी.. गरीबाला पोळी.. कासरळी मध्ये पर्यावरणपुरक होळी साजरी

कचऱ्याची होळी.. गरीबाला पोळी..
कासरळी मध्ये पर्यावरणपुरक होळी साजरी




बिलोली प्रतिनिधी (ए जी कुरेशी)
कासरळी ता. बिलोली अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बिलोली यांच्यावतीने कासरळी यथे आज होळी सणानिमित्त पर्यावरणपुरक होळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाखेचे कार्यकर्ते व युवकांनी कासराळी बाजार पेट परिसराची स्वच्छता केली. सुका कचरा गोळा करून, कचऱ्याची होळी केली. यावेळी युवतींना खोबरांचे हार भेट देण्यात आले. युवतींच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी कर्णकर्कश शिव्यांऐवजी कचऱ्याची होळी.. गरीबाला पोळी.., होळी लहान करा.. पोळी दान करा.., शिव्या देऊ नका.. कटूता घेऊ नका.. यासारख्या नाऱ्यांनी  निवेदनात पर्यावरण संवर्यांनी दिला.
यावेळी अंनिस कार्यकर्ते कमलाकर जमदाडे,ऋतुजा जमदाडे, क्षितिजा जमदाडे यांच्यासह गावातील युवक,बळीराम गजलोड,
चंद्रशेखर ईबितवर,
नवनाथ सोमासे,
सतीश मुंगडे,आनंद म्हैसकर,
अविनाश म्हैसकर,
आकाश म्हैसकर,
सोमसे अविनाश,
फैजान शेख, उपस्थित होते. शेवटी आभार गजानन मैष्कर यांनी व्यक्त केले.

Thursday, March 21, 2019

बिलोली तालुक्यातील या आंगणवाड़ीच्या मुख्य रस्त्यावर खड्डे ग्रामपंचायत चा मनमानी कारभार

बिलोली तालुक्यातील या आंगणवाड़ीच्या मुख्य रस्त्यावर खड्डे ग्रामपंचायत चा  मनमानी कारभार..






वेळोवळी तक्रार करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही ;

बिलोली प्रतिनिधी (ए जी कुरेशी)

तालुक्यातील मौजे हिप्परगा (थडी) येथील आंगनवाड़ी व ग्रामपंचायत कडे जाणाऱ्या मुख्य रसत्यावर प्रशासनाच्या दुर्लक्षाने मोठ मोठे खड्डे खंदुन ठेल्यामुळे गावातील ये जा करणाऱ्या नागरीकांना व आंगणवाडीला जाणाऱ्या लहाण बालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यमान सरपंच व ग्रामसेविका यन्नावार यांना गावातील नागरिकांनी वेळोवेळी या संदर्भात तक्रार करुन सुद्धा यावर कोणतेही उपाय योजना न करता खड्डे उघड्यावर सोडून त्यात विषारी काटेरी झुडुप टाकणाऱ्यास पाठिशी राखुन बघ्याची भुमिका घेत आसल्याचे चित्र गावातील नागरिकांना बघावयास मिळत आहे.
विषेश,लहान चिमुकल्या बालकांना आई-वडीलांनी आपल्या मुला-मुलींना आंगणवाडीत पाठवतात व लहान बालकांना आंगणवाडीकडे जाण्यासाठी खुप मोठी जिवाची कसरत तर करावीच लागत आहे व तेथील आंगणवाडी सेविकांच्या वेळकाढू  कारभारामुळे बालकांसाठी कोणतेही जबाबदारी युक्त सेवा पुरवित नसल्याचेही चित्र दिसत आहे तसेच आंगणवाडी पर्यवेक्षिका यांना ही या अनुपस्थितीचे कारण विचारण्यास व शासकीय मागणी प्रमाणे कोणतेच मासिक सर्वेक्षण आद्यवत आहे का नाही
 हे पाहण्यास सवडसुद्धा नाही.
आंगणवाडीचे  नसून आडचन,असून खोलंबा चे द्श्य पाहवयास मिळत आहे.
या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लहांन बालकांची व नागरिकांची  या खड्ड्यामुळे काही दुरदैवी घटना घडल्यास संबधीत विद्यमान सरपंच व ग्रामसेवक आंगणवाडी सेविका जबाबदार आसणार आसल्याचे गावातील नागरिकांच्या तोंडातुन तीव्र संताप ऐकावयास मिळत आहे.

Wednesday, March 20, 2019

माणुसकी अजून संपलेली नाही बिलोली तालुक्यातील अर्जापुर येथील शाळेचा आगळा वेगळा उपकृम.

माणुसकी अजून संपलेली नाही बिलोली तालुक्यातील अर्जापुर येथील शाळेचा आगळा वेगळा उपकृम.




बिलोली प्रतिनिधी (ए जी कुरेशी)
 शाळा हे संस्काराचे केंद्र आहे. यातून देशाची पिढी घडत असते. चिमूकल्यांना जसे घडविले तसे ते घडत असतात. निव्वळ पुस्तकी ज्ञान देणे म्हणजे शिक्षण नव्हे. पुस्तकी ज्ञानासोबतच नैतिक मूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी रुजविण्यासाठी काही सामाजिक उपक्रम शाळेत राबविले जातात. गत महिन्यातच *अंध निधीचे संकलन करण्यात आले* व ती रक्कम नाशिक येथील कार्यालयाला सर्वप्रथम आमच्या शाळेने पाठविले. 
किरण व कोमल नेहमीप्रमाणे शाळेला आलेत.पण शाळेचा गणवेश घातला नसल्याने विचारण्यात आले. तेव्हा जे कळाले ते खूपच ह्रदयद्रावक होते. ती घटना म्हणजे,
 *अर्जापूर येथील श्रीमती शांताबाई केशव कांबळे* यांच्या घराला आग लागली व त्या आगीत त्याचे घर जळून खाक झाले असे त्यांच्या मुलांकडून कळाले. ही माहिती  विद्यार्थ्यांना सांगितली व मदतीसाठी आव्हान करण्यात आले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने, आज होळीच्या सणाला त्यांना सण साजरा करता यावं या उद्देशाने १७०१/ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. विशेष म्हणजे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी, सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी काही पैसे जमा केले होते. ती रक्कम खर्च न करता मदत निधीसाठी जमा केले. या साठी शाळेतील शिक्षक श्री नवाथे सर, श्रीमती गायकवाड मॅडम, सौ.खिसे मॅडम, सौ.सोमपूरे मॅडम, श्री साजिद सर, सौ.जाधव मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री गेंदेवाड सर इत्यादींनी प्रयत्न केले.

नांदेड जिल्ह्यातील या तालुक्यात गुटखा विक्रीचा खुलेआम भरला बाजार

नांदेड जिल्ह्यातील या तालुक्यात गुटखा विक्रीचा खुलेआम भरला बाजार


हाॕटेल्स , पानठेले ,  किराणा दुकानातुन खुल्लमखुल्ला विक्री



ए जी कुरेशी
बिलोली -( ता.प्र.) मागच्या दोन वर्षाअगोदर बंद झालेला आणि कायद्याने  बंदी आणलेल्या गुटखा विक्रीला कायद्याचे भय राहीले नाही . कार्यवाहीचा कठोर बडग्याची भितीच नसल्याने बिलोली तालुक्यात गुटख्याची चोरुन नाही तर सर्रास पणे खुलेआम विक्री करण्यात येत आहे.
  महाराष्ट्र शासनाने मागे  गुटखा , खर्रा  विक्रीवर बंदी आणली .कायद्याच्या वाटा पळवाटा शोधुन कायद्याला कुचकामी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो.ज्या हेतुने असे निर्णय होतात माञ त्या हेतुलाच हरताळ फासण्यात येते.असेच गुटख्याच्या बाबतीत बिलोली तालुक्यातले चिञ आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात हा गुटखा चालु आहे .तेलंगणा आणि बिलोली शहरापर्यंत चे अवघे 12 किलो मिटर इतके अंतर आहे. त्यामुळे तेलंगणातील गुटख्याच्या मोठ्या व्यापा-यांचे डोळे बिलोली तालुक्याकडे वळले आहेत.मोठ्या वाहनांद्वारे गुटख्याने भरलेल्या गाड्या बिलोली तालुक्यात खाली करण्यात येतात.लाखो रुपयांचा गुटख्याचा मोठा  साठा केला जातो.हाच गुटखा सगरोळी , केसराळी , बडुर , आदमपुर अशा ठिकाणी किराणा दुकान ,हाॕटेल , पानटप-यावर पुरवठा केल्या जात आहे.गुटखाबंदी असतांना बिलोली तालुक्यात माञ गुटख्याची खुल्लमखुल्ला विक्री करण्यात येत आहे.यामुळे आरोग्याचा प्रश्न आहेच त्याचबरोबर प्रशासनाकडुन न होणा-या कार्यवाहीचेही नवल वाटते.या गुटखा विक्री करणा-या तेलंगणाच्या व्यापा-यांचा बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरुन  बिलोली तालुक्यात गुटखा विक्रीला आळा बसेल अशी चर्चा सध्या बिलोली तालुक्यात होत आहे.

चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने च बहुजनाची तहान भागवली. शारदा माळे

चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने च बहुजनाची तहान भागवली. शारदा माळे     





  बिलोली  ता प्र( ए जी कुरेशी)       
 जनावरांना पाणी पिण्याची मुभा होती पण बहुजनांना मनाई होती तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहाने तहान भागवली असे प्रतीपादन समतादुत शारदा माळे यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना केले.           डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने महाड चवदार तळे सत्याग्रह आणी बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान यावर प्रबोधन कार्यक्रम जि.प.प्रा.शाळा कार्ला येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक होते.               समाजातील जाती व्यवस्था कायम संपल्या शीवाय माणूस माणसाशी समतेने वागणार नाही अशी खंत हि त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.      सदर कार्यक्रमास बार्टी पुणे च्या मुख्य संचालीका श्रीमती प्रज्ञा वाघमारे मॅडम आणि लातूर विभागाच्या सहाय्यक प्रकल्प संचालीका श्रीमती सुजाता पोहरे यांच्ये मार्गदर्शन लाभले.

विधुत तारेला स्पर्ष झाल्याने तीन गायी व एक वासरु दगावल्याची घटना महााावितरनाा चे भोंंगळे कारभार


 विधुत तारेला  स्पर्ष झाल्याने तीन गायी व एक वासरु दगावल्याची घटना महााावितरनाा चे भोंंगळे कारभार





बिलोली प्रतिनिधी ए जी कुरेशी
 गुराखी  जनावराना चारवित असताना खाली पडलेल्या विधुत तारेला  स्पर्ष झाल्याने तीन गायी व एक वासरु दगावल्याची घटना बिलोली शहरापासुन जवळच असलेल्या  बावलगाव शिवारात घडली. बिलोली चे विठ्ठल उत्तरवाड शिवारात  सोमवारी दुपारी ४  वाजता घडली.
सुदैवाने गुराखी बालबाल बचावला आहे.
शहरापासुन जवळच आसलेल्या बावलगाव  रोड जवळ विधुत प्रवाह चालु असलेल्या तारा खाली पडल्या आहेत. तार केव्हा  कशी तुटली  माहीत नाही. महावितरण च्या  निष्काळजी पणा मुळे  ही घटना घडली.गुराखी सय्यद आलीम जनावरे चारवित आसताना मागे होता. पुढे जनावरे विधुत तार चिटकल्याने  दिसले.
यात भुमेश करोड याची एक गाय जयराम ठकरोड याची एक गाय व वासरु व  मुन्ना नाईकवाडे याची एक गाय विजे च्या शाक लागुन चार जनावरे दगावली,
गुराखी सय्यद आलीम चे दैव बलवत्तर होते म्हणुन तो वाचला. याघटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त  होत आहे. याजागी माणसे राहीली तर फार मोठी दुर्घटना  घडली असती. याला  विधुत
 मडळ जवाबदार आहे. चार गायीची अन्दाजे  दोन लाख  रुपये किम्मत आहे. नुकसान भरपाई ची मागणी होत असुन पोलीस तपास करीत आहे.

Monday, March 18, 2019

मौजे गंजगाव येथे निराधार महीलाना साड्याचे वाटप. निराधार महीलेना मिळाला माणुसकीचा आधार

मौजे गंजगाव येथे निराधार महीलाना साड्याचे वाटप.
निराधार महीलेना मिळाला माणुसकीचा आधार



 संस्थेचे कौतुकस्पाद कार्य*


बिलोली प्रतिनिधी (ए जी कुरेशी)

बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे दि. 18 मार्च रोजी सकाळी ठिक  10 वाजता ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आमा नाना सेवाभावी चरीटेबल ट्रस्ट बोधन च्या संचालकाकडुन साडी व चोळीचे वाटप करण्यात आले आहे हे संस्था गेल्या दहा वर्षापासुन समाजातील गरिब निराधार महीलाना मदतीचा हात देत आनेक महीलान संस्थेने आधार दिला आहे . संस्थेच्या माध्यमातुन आनेक लोकभिमुख कार्य करत महाराष्ट्र तेलगांणा राज्यात आनेक कार्य चालु आहेत. संस्थेचे संचालक श्रीनिवास येलुरी यांच्या हस्ते साड्याचे वाटप करण्यात आले आहे . या कार्यक्रमाला सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे , ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे , पो.पा. रामराव हिवराळे सोसायटी चेअरमन एम.बी. बासरे.बसवंत पाटील माधवराव घाटे ग्रामसेवक पि.डी.वाघमारे  इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सेवक परिश्रम घेतले आहे .

Sunday, March 17, 2019

संत सेवालालजयंती निमित्त आमठाणा येथे गोर बंजारा लेंगी स्पर्धाचे आयोजन

संत सेवालालजयंती निमित्त आमठाणा येथे गोर बंजारा लेंगी स्पर्धाचे आयोजन



भोकर:-(एजास कुरेशी)
भोकर शहरापासून जवळ असलेले आमठाणा हे ग्रामीण भागातील प्रसिद्ध असेलेले  तांडावस्ती गाव आहे गावाची लोकसंख्या पाहता खूप कमी आहे पण बंजारा समाजाच्या या आयोजीत लेंगी स्पर्धाने संपूर्ण जिल्हात प्रसिद्ध अली आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत सेवालाल जयंती निमित्त गोर बंजारा लेंगी स्पर्धेचे कार्यक्रम दि.१८ मार्च २०१९ सोमवार व दि.१९ मार्च २०१९ रोज मंगळवार लेंगी कार्यक्रम सकाळी 11 वाजता पासून ठेवण्यात आले आहे
कार्यक्रमाचे आयोजन दत्ता रामू जाधव बंजारा क्रांती दल तालुकाअध्यक्ष भोकर हे आहेत व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष  व उदघाटक लक्षमनराव नरसीमलू उर्फ बुचेना सेठ चाटलवार पालज हे आहेत
तसेच प्रमुख पाहुणे जि.प.सदस्य नांदेड रोहिदास जाधव व सभापती प.स.भोकर झिमाबई गुलाबराव नाईक कैलास राठोड ,पंचफुला राठोड,डॉ राम नाईक,आमठाण सरपंच सुभाष चव्हाण,पो.पा.आमठाना,मोहण जाधव,
व तसेच पाहिले बक्षिस ७०५१ शंकर राठोड यांच्या कडून
दुसरे बक्षीस ७००१ लक्षमणराव चटलावर यांच्या कडून
तिसरे बक्षीस ६०५१ झिमाबाई चव्हाण यांच्या कडून
चौथे बक्षिस४०५१ पंचफुला राठोड  यांच्या कडून
पाचवे बक्षीस३०५१ बालाजी पुपलवर यांच्या कडून
सहावे बक्षीस२१५१ हिरालाल जाधव  यांच्या कडून
सातवे बक्षीस २१००मनोहर राठोड यांच्या कडून
आठवे बक्षीस ११००सुभाष चटलवार यांच्या कडून
असे आहेत तरी आमठाना तांडा येथिल सर्व बंजारा समाज बांधवांनी आवाहन केले आहे या कार्यक्रमात सर्वानी आवर्जून यावे अशी विनंती केली आहे

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा:- पोलीस निरीक्षक विकास पाटील

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा:- पोलीस निरीक्षक विकास पाटील




भोकर (एजास कुरेशी)
लोकसभा निवडणूकाच्या अनुषंगाने आचारसहिते मध्ये निवडणूक आयोगाकडून  अनेक नियम लागू करण्यात आले आहे त्या मध्ये रात्रपाळी करणारे सर्वच पोटभरू धंद्यावर शासनाची टांगती तलवार असल्याने पोलीस  प्रशासन हे सज्ज झाले आहेत जो कोणी नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास त्यास पुनर्व गय केली जाणार नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल अशी रोखठोक  भाषेत नवीन रुज झालेले पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी रात्रपाळी वेवसाय करणाऱ्या सर्वच होटेल मालक ,पानपट्टी मालक, बार,बियर शॉपी, ज्युस सेंटर,यांच्या मालक वर्गांना सहकार्यांची असे सांगितले .
कोणी आंचारसाहिते चा भंग करत  असल्यास  तो पुढारी असो का कार्यकर्ता  त्याची कुठली ही दयामया केली जाणार नाही त्यांच्यावर शंभर मिनिटाच्या आत कार्यवाही करण्याचे आश्वासन या बैठकीत  पोलीस निरीक्षक  विकास पाटील यांनी दिले आहे





Saturday, March 16, 2019

बिलोलीच्या नगरपालीकेने दिव्याग लाभार्थीना केले अनुदान वाटप.

बिलोलीच्या नगरपालीकेने दिव्याग लाभार्थीना  केले अनुदान वाटप.






बिलोली..प्रतिनिधी( ए.जी.कुरेशी.)
बिलोली नगरपालीकेने दिव्यान्ग लाभार्थी  ना ध्यावयाचे अनुदानाची  रक्कम  वाटप करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.
दिव्याग अनुदान वाटप करण्याची मागणी लेखी पत्रकाद्वारे  बिलोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी याचे कडे केली होती. त्या अनुषगाने पात्र लाभार्थी कडुन अर्ज मागविण्यात आले.  व अपंग दिव्याग लाभार्थीनी  वैधकीय प्रमाणपत्र आधारकार्ड ची प्रत व भारतीय स्टेट बकेंंत खाते असल्याचे व फोटोसह  ५८  लाभार्थीनी अर्ज  दाखल केले होते त्या पैकी  ५० पात्र लाभार्थीना प्रत्येकी  ५ हजार रुपये प्रमाणे २.५० लाख  अनुदान लाभार्थीच्या खात्यात बकेंंत जमा करण्यात आले आहे रक्कम उचल केलेल्या लाभार्थीनी पेढे वाटुन आनंद व्यक्त केले.
सदर अनुदान वाटप करण्या बाबत नगरपालीका सभागृहात मान्यता  घेण्यात आली होती. दिव्याग लाभार्थीना त्यान्च्या हक्काची रक्कम  वाटप करण्यात आल्याची माहीती नगराध्यक्षा सौ. मैथीली कुलकर्णी यांनी दिली. व तसेच मुख्याधिकारी टी. डी .कांबळे  लेखाअधिकारी माधव कदरेकर अधिक्षक एस.  एन. चौहान यानी दिली.

खुनी त्याआरोपीस अटक करा:-बिलोली कलाल समाज विचारमन्च ची मागणी.

खुनी त्याआरोपीस अटक करा:-बिलोली कलाल समाज विचारमन्च ची मागणी.

                             विडिओ बातमीसह


बिलोली.ए.जी.कुरेशी.
नाथा पिता विठ्ठल  तेलग वय ३५ वर्ष रा.खालापुरी जि.जालना या युवकाचा अज्ञात आरोपी ने  विनाकारण हत्या केली. २ मार्च २०१९ रोजी हत्या करण्यात आली होती अत्यविधी वेळी आठ्ठेचाळीस तासात अटक करण्याचे आष्वासन पोलीस प्रशासनाणी देण्यात आले होते. पण अध्याप पोलीसानी  आरोपीस अटक केले नाही .  आरोपी  मोकाट फिरत आहे. निषेधार्थ व आरोपीस अटक करण्याच्या मागणीचे निवेदन बिलोली येथील तहसिलदार तथा  तालूका दाण्डाधिकारी याना निवेदन देण्यात आले.यावेळी  तालूक्यातील कलाल समाजाचे प्रमुख  सायलु लक्शमण गौड अन्गावार  चन्द्रकान्त  गौड'',  गगाधर लीगा गौड  ,महेश बालागौड,  राजा गौड बाला गौड  नारायण  बाला गौड , शेषराव राजेश्वर गौड अन्जया गौड साया गौड प्रकाशगौड गन्गा गौड सह अनेक   कलाल समाजाचे  कार्याकर्ते उपस्थीत होते.अन्यथा आन्दोलन करण्याचा ईशारा  निवेदनाद्वारे देण्यात आल आहे

सामाजिक कार्यकर्ते माधव मेकेवाड यांची रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा संघटक व प्रसिद्धी प्रमुख पदी निवड

सामाजिक कार्यकर्ते माधव मेकेवाड यांची रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा संघटक व प्रसिद्धी प्रमुख पदी निवड




नांदेड:- (प्रतिनिधी)
तरुण मनांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हात रिक्त पद काहींना सक्रिय कार्यकर्त्यास देण्यात आले बहुजन नेते
इंदू मिल चे प्रणेते सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चालणारी रिपब्लिकन सेना यांच्या या सामाजिक सेने मध्ये  नांदेड जिल्हा संघटक म्हणून माधव नरसिंग मेकेवाड यांची  माधव दादा जमदाडे ,अनिल शिरसे यांनी आज रोजी निवड नियुक्ती पत्र देऊन केली ही निवड प्रक्रिया नांदेड येथे पार पडली यावेळी अनेक जण उपस्थित होते पोलीस टाइम्स चे बेग,डी डी वाघमारे,महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा गौतमी कावळे,सचिव संजय निळेकर, संतोष साळवे(युवा जिल्हा अध्यक्ष),एस आर नवले यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या या रिपब्लिकन सेनेची माहिती सविस्तर असे की,राजकीय आरक्षणाचा समाजाला काहीच फायदा होत नाही. मागासवर्गीय समाजासाठी राजकीय आरक्षणे असूनही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून समाजाचे प्रश्न सभागृहात मांडले जात नाहीत, त्यामुळे देशातील राजकीय आरक्षण बंद करण्यात यावे', अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर एकमेव यांनीच केली होती.देशातील अनुसुचित जाती-जमाती, ओबीसी आणि अन्य मागासवर्गीय समाजासाठी राजकीय आरक्षणाची घटनेत तरतूद आहे. ज्या समाजासाठी राजकीय आरक्षणे देण्यात आली आहेत. त्या समाजातील निवडून आलेली व्यक्ती समाजाचे प्रश्न सभागृहात मांडत नाहीत. लोकप्रतिनिधी हे पक्षाच्या भूमिकेला बांधिल असतात. ते समाजापेक्षा पक्षाची भूमिका मांडत असल्याने त्याचा समाजाला काहीच फायदा होत नाही. हीच भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही मांडली होती, असे आनंदराज आंबेडकर भाषणा वेळी बोलून दाखवतात म्हणून बाबासाहेबांचे आंबेडकरी वादळ घेऊन आनंदराज आंबेडकर चर्चेत आले आहेत त्यांची रिपब्लिकन सेना आज रोजी भरभक्कम कार्यकर्ते जोडून वंचित बहुजनांना एकत्र करण्याचं काम जोमाने सुरू आहे नांदेड येथे मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे (रिपब्लिकन सेनेचे ,मराठवाडा अध्यक्ष) या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे यांनी अनेक कार्यकर्ते जोडले आहे.

शीख समाजाने बहिष्कारा एवजी इतर पर्यायांचा विचार करावा :- रवींद्र सिंघ मोदी यांचे मत

शीख समाजाने बहिष्कारा एवजी इतर पर्यायांचा विचार करावा :-
रवींद्र सिंघ मोदी यांचे मत




नांदेड, विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुद्वाराच्या अध्यक्ष पदावरून शीख समाजावर मोठा अन्याय केलेला आहे. पण शीख समाजाने निवडणुकांवर बहिष्कार न टाकता इतर पर्यायवर विचार करणे देखील गरजेचे आहे. असे मत गुरुद्वारा कायदा संशोधन विरोधी आन्दोलनाचे प्रमुख कार्यकर्ता आणि पत्रकार रवींद्र सिंघ मोदी यांनी एका प्रसिद्धि पत्रकात मांडले आहे.
सदर पत्रकात रवींद्र सिंघ मोदी यांनी पुढे म्हंटले आहे की महाराष्ट्र शासनाने शीख समाजाच्या  जनान्दोलनाची उपेक्षा करत मुंबईच्या एका उद्योगपतिला गुरुद्वाराचा अध्यक्ष म्हणुन आमच्यावर थोपला. गुरुद्वारा कायद्यातील शासनाने केलेले संशोधन रद्द करावे म्हणुन स्थानीक  समाजाने अनेक वेळा आंदोलन केले. संशोधन रद्द ना करता शीख समाजाच्या संस्थेवर शासनाने आपला ताबा कायम ठेवला.  त्यामुळे वर्तमान पत्रातुन या लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्यात यावे असे आवाहन समाजातील काही प्रमुख व्यक्तींकडून केले जात आहे. त्यावरून शासन आणि भारतीय जनता पक्षावर असलेल्या समाजाच्या नाराजीचे चित्र पुढे येत आहे. पण बहिष्कार टकल्याने भाजपाला व इतर पक्षांना " ना नफा - ना टोटा " सारखे समीकरण प्रस्तुत होईल. त्या एवजी सत्ताधारी पक्षाला आव्हान देण्यासारख्या पर्यायवर शीख समाजाने विचार करायला हवे.
राजकारणातील सर्वच पक्ष सारखेच आहेत. सत्ता हाती आली की शीख समाजावर अन्याय करण्यासाठी सर्वच पक्ष सरसवतात. शीख समाजाला न्याय मिळवण्यासाठी वर्षोंवर्षे झगड़ावे लागत आहे. म्हणुन शीख समाजाने भावनात्मक नव्हे तर परिपक्व असा राजकीय निर्णय घ्यावा असे ही रवींद्र सिंघ मोदी यांनी विचार मांडले आहे.
.......

Thursday, March 14, 2019

सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदी पांडुरंग शिंदे मांजरमकर यांची सदाभाऊ खोत यांच्या


   सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदी पांडुरंग शिंदे मांजरमकर यांची सदाभाऊ खोत यांच्या हस्ते नियुक्ती





बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नांदेड;-
   कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदी पांडुरंग शिंदे मांजरमकर यांची सदाभाऊ खोत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
     सदाभाऊ खोत यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणुन अशी ओळख असणारे पांडुरंग शिंदे हे अनेक वर्षे झाले शेतकरी चळवळीत कार्य करत आहेत. यापुर्वी स्वाभिमानी विध्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थी चळवळ वाढविली होती याकाळात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा वाढीचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारला घेण्यास भाग पाडण्यात शिंदे यांचा महत्वाची भूमिका होती.
  सध्या रयत क्रांती संघटनेच्या राज्य प्रवक्ते पदांवर पांडुरंग शिंदे कार्यरत असताना नांदेड जिल्ह्यात अल्प काळातच विविध सामाजिक कार्य,विविध आंदोलनच्या माध्यमातून संघटनेची ताकत निर्माण केली. या कार्याची पावती म्हणून संघटनेची महत्वाची जबाबदारी पांडुरंग शिंदे यांच्यावर संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.
  येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा राज्यात युवकांचे संघटन बांधणी करण्यासाठी एका लढवय्या कार्यकर्ता म्हणून पांडुरंग शिंदे यांची युवा प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 यावेळी शिवनाथ जाधव (प्रदेशाध्यक्ष,रयत क्रांती संघटना), दीपक भोसले (कार्याध्यक्ष), अच्युत गंगने (सदस्य,राज्य कृषी मूल्य आयोग),प्रा.सुहास पाटील (सदस्य,राज्य कृषी मूल्य आयोग),राहुल मोरे (प्रदेश उपाध्यक्ष),जितू अडेलकर (प्रदेश प्रवक्ते),भानुदास शिंदे (सदस्य, ऊस नियंत्रण समिती)संजय भगत,रविकांत खोत (राज्य उपाध्यक्ष युवा), श्री लोखंडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

MIM सोडून अपक्ष लोकसभा लढवणार नाही ती बातमी चुकीची.....आ.इम्तियाज जलील

MIM सोडून अपक्ष लोकसभा लढवणार नाही ती बातमी चुकीची.....आ.इम्तियाज जलील



-बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

औरंगाबाद;-   लोकसभा मतदार संघातून एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील एमआयएम पक्षाला आणि एम आय एम चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांना खुदा हाफिज़ म्हणत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याच्या चर्चेला उदान आले होते व सर्वत्र बातमी पसलली होती पण इम्तियाज जलील यांनी ही चुकीची  बातमी आहे मी एम आय एम  सोडणार नाही असे एम आय एम चे औरंगाबाद चे प्रसिद्ध आमदार इम्तियाज जलील यांनी  बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधीशी असे आज रोजी दूरध्वनी वरून कळवले आहे

     गेल्या आठवड्यात इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील एम आय एम चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा घेऊन लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असावी, स्वतंत्र लढावे की वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा द्यावा, स्वतंत्र लढल्यास उमेदवार कोण असावा, इत्यादी बाबीवर चर्चा करून चाचपणी केली होती. त्यात आमदार इम्तियाज जलील त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा एकंदरीत सूर निघाला होता. तरी ती बातमी खोटी ठरल्याने एम आय एम आमदारांची बदनामी करत आसल्याचे समजले आहे 
     असदुद्दीन ओवैसी यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यात व आमदार इम्तियाज जलील यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा एमआयएमच्या गटात सुरू आहे. असे खोटे वृत्त प्रसारित झाल्याने सक्रिय एम आय एम मात्र नाराज झालेले दिसत होते. वंचित बहुजन आघाडी ने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी न्यायाधीश कोळसे पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे.पक्षाच्या निर्णयाचे पालन आमदार इम्तियाज जलील हे करतील अशी चर्चा सध्या कार्यकर्ते मध्ये सुरू आहे.

Wednesday, March 13, 2019

या गावात साडेचार वर्षांपासून मतदानावर होता बहिष्कार आता लोकसभा निवडणुकीत होणार मतदान

या गावात साडेचार वर्षांपासून मतदानावर होता बहिष्कार आता लोकसभा निवडणुकीत होणार मतदान..




भोकर:-(एजास कुरेशी)
मौ. दिवशी बु., ता. भोकर येथील ग्रामस्थांचा निर्णय साडेचार वर्षांनंतर अत्ता होणार मतदान येथील मतदारांनी लोकसभा निवडणूक २०१९ करिता मतदान करावे याबाबत चर्चा व मार्गदर्शन पवन चांडक (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, ८५-भोकर तथा उपविभागीय अधिकारी भोकर), सिद्धेश्वर भोरे (उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर), भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर),  एच. एम. गोपुलवाड (उपविभागीय जलसंधारण अधिकारी, भोकर),  विकास पाटील (पोलीस निरीक्षक भोकर), ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. कांबळे व इतर.ग्रामस्थामार्फत श्री. नरसय्या मेंडेवाड यांनी बाजू मांडली.
मौ. दिवशी (बु )इथे साडेचार वर्षांपासून मतदानावर बहिष्का।र होता.* मतदारांनी जिल्हापरिषद/ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेले नव्हते. सदरील ग्रामपंचायतसाठी सरपंचाची निवड न झालेल्या प्रशासकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत.बैठकी मध्ये प्रशासनातर्फे एच. एम. गोपुलवाड (उपविभागीय जलसंधारण अधिकारी, भोकर) यांनी सिंचन तलावाची मागणी मान्य झाल्याचे जाहीर केले. तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरणचे काम, पांदण रस्त्याबाबतचे काम व तसेच बंधाऱ्यास ऑटोमॅटिक गेट बसविण्याचे कामाबाबत प्रशासकीय अधिकारी यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला व तसेच  लोकसभा निवडणुक हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण असल्यानेव उपस्थित वरिष्ठ अधिकारी आणि मौ. दिवशी बु. येथील मतदारांत सकारात्मक संवाद झाल्याने मतदारांनी एकमताने मतदानाचा हक्क बजाविण्याचे ठरविले आहे.

कुठलेच क्लासेस न करता लक्ष्मी डाकेवाड बनली पी.एस.आय. बिलोलीत भव्य सत्कार

कुठलेच क्लासेस न करता लक्ष्मी डाकेवाड बनली पी.एस.आय. बिलोलीत भव्य सत्कार   




  बिलोली प्रतिनिधी ए जी कुरेशी
एम.पी.एस.सी.परिक्षेसाठी कुठेही क्लासेस न लावता परिस्थितीची जाणीव ठेवून प्रचंड आत्मविश्वास जिद व चिकाटीच्या जोरावर  अभ्यास करुन बेळकोणी ( बु) ता.बिलोली येथिल लक्ष्मी प्रल्हाद डाकेवाड हीने एम.पी.एस.सी.परिक्षेत पि.एस.आय.पदासाठी ओ.बि.सि.प्रवर्गातुन राज्यात दुसऱ्या क्रमांकाने ऊत्तीर्ण होवुन यश मिळविल्याने बिलोलीत भव्य असा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील या विद्यार्थीनीने प्रशासकीय सेवेचे हे घवघवीत यश संपादन केल्याने  बिलोली पोलिस स्टेशन येथे पुरोगामी पञकार संघ व शहर वासीयांच्या वतीने लक्ष्मी डाकेवाड हिचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी पोलिस निरीक्षक भगवान धबडगे,पुरोगामी पञकार संघाचे अध्यक्ष मारोती भालेराव,कार्याध्यक्ष सुनिल कदम,माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, नगरसेवक प्रकाश पोवाडे,पञकार रत्नाकर जाधव,संजय जाधव, शेख पाशाभाई,अबरारबेग,यांच्यासह अनेकांनी शाल पुष्पहार देऊन डाकेवाड हीचा सन्मान केला.यावेळी  मारोती भदरगे,सुनिल जेठाळकर,शेख रियाज,पोलिस कर्मचारी सोनकांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

बिलोलीतील माझ्या मुलींचा केलेला हा सन्मान पाहून अगदी भारावुन गेलो.- मुलीचे वडील प्रल्हाद डाकेवाड

कासराळी च्या सरपंच सौ.हायगले वर अविश्वास ठराव पारीत

कासराळी च्या  सरपंच सौ.हायगले वर अविश्वास  ठराव पारीत -
   




बिलोली प्रतिनिधी  :(ए जी कुरेशी)
कासराळी चे सरपंच सौ.ललिता संग्राम हायगले यांच्या वर बुधवारी दहा ग्राम पंचायत सदस्यानी अविश्वास ठराव पारीत केला आहे,शुक्रवारी सौ.हायगले वर अविश्वास दाखल करण्यात आला होता.
तालुक्यातील मोठी ग्राप पंचायत म्हणून ओळख असलेल्या कासराळी ग्रा.प.चा कारभार लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी माजी जि.प.सदस्य संग्राम हायगले यांच्या पत्नी ललिता हायगले यांना सरपंच पद बहाल केले होते.पंरतु सरपंचाचे पती संग्राम हायगले यांचा ग्रा.प.मध्ये मोठ्या प्रमाणात ढवळा ढवळ सुरु केल्याने या दोन नेत्यात बिनसले होते.म्हणून शुक्रवारी सात ग्रा.प.सदस्यानी सरपंचा वर  अविश्वास आनला होता, सरपंच सौ.हायगले वर बि.आ.जि.एफ.मध्ये,पाणी प्लेन्ट मध्ये,  भ्रष्टाचार केल्याचे व सदस्यांना विश्वासात न घेणे,गावात स्वच्छता न ठेवने,घरपट्टी वसुल न करणे आदीचा ठपका ठेवण्यात आला होता.तहसिल प्रशासना  कडुन दिनांक १३ मार्च ची तारीख पारीत करण्यासाठी दिली त्या नुसार दहा सदस्य हे एका बाजुने राहुन पारित केले तर सरपंचाच्या बाजुने सरपंच ही हजर राहीले नाहीत या मुळे सरपंच सौ.ललिता हायगले हे पायउतार व्हावे लागले.तर काँग्रेस चे दोन सदस्य हे तटस्थ राहीले,निवडणुक अधिकारी म्हणून नायब तहसिलदार संजय नागमवाड हे काम पाहीले.हा अविश्वास पारीत करण्यासाठी माजी सरपंच अरविंद ठक्करवाड,उपसरपंच शेषराव लंके यांनी महत्त्वाची भुमिका राहीली आहे,ठराव पारीत होताच ठक्करवाड समर्थकामध्ये जल्लोश करण्यात आला.

Tuesday, March 12, 2019

बिलोलीमध्ये प्लास्टीक दुकानावर नगर परिषदेचे धाडी व दन्डात्मक कारवाईला सुरवात.

बिलोलीमध्ये प्लास्टीक दुकानावर नगर परिषदेचे धाडी व दन्डात्मक कारवाईला सुरवात.


 किराणा दुकाना वर धाड टाकुन दण्ड वसुल करताना  न.प..चे पथक


बिलोली. ए.जी.कुरेशी
शासनाने प्लास्टीक वापरावर बन्दी घातली असता राज्यात सर्वत्र कडक अमलबजावणी केली जात आहे. परन्तु बिलोली शहरात किराणा दुकान मिठाई दुकान कापड दुकान  बाजारात  प्लास्टीक  चा खुलेआम वापर केला जात असल्याचे तक्रारी वरुन  बिलोली नगरपालीकेचे मुख्याधिकारी .टी.डी.काम्बळे यान्च्या आदेशावरुन  नगरपालीकेचे अधिक्षक एस.एन. चौहान याचा नेत्तृत्वाखाली  सफाई विभागातील कर्मचार्यानी शहरातील  मिठाई  दुकान व किराना दुकानावर धाडी टाकुन  प्लास्टीक साठा जप्त करून कारवाही करण्यात आली असून कुन्डलवाडी रोड लगत गल्लीत हीना किराणा दुकानवर धाड टाकुन  ३० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या व १५ हजार रुपये दण्ड आकारुन न.प.फन्डात जमा करण्यात आले.अधिक्षक चौहान यानी माहीती  दिली.  पथकात गुलाम यजदानी करण गीरी माधव पाटील  गोविन्द शिन्दे ईदरीस सिध्दीखी प्रदीप डिलोड लईख सिध्दिकखी आदि चा समावेश होता. प्लास्टीक वापरा विरुध्द कारवाई चालुच राहील आसे सागण्यात आले.त्यामुळे व्यापारी वर्गात  चर्चेचे वातावरण पसरलेआहे

फोटो. किराणा दुकाना वर धाड टाकुन दण्ड वसुल करताना  न.प..चे पथकबिलोलीत प्लास्टीक दुकानावर धाडी व दन्डात्मक कारवाई.

बिलोली. प्रतिनिधी.
शासनाने प्लास्टीक वापरावर बन्दी घातली, राज्यात सर्वत्र कडक अमलबजावणी केली जात आहे. परन्तु बिलोली शहरात किराणा दुकान मिठाई दुकान कापड दुकान  बाजारात  प्लास्टीक  चा वापर केला जात असल्याचे तक्रारी वरुन  बिलोली नगरपालीकेचे मुख्याधिकारी ष्री .टी.डी.काम्बळे यान्च्या आदेशावरुन  नगरपालीकेचे अधिक्षक एस.एन. चौहान याचा नेत्तृत्वाखाली  सफाई विभागातील कर्मचार्यानी शहरातील  मिठाई  दुकान व किराना दुकानावर धाडी टाकुन  प्लास्टीक साठा जप्त करण्यात आला.   कुन्डलवाडी रोड लगत गल्लीत हीना किराणा दुकानवर धाड टाकुन  ३० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आली . १५ हजार रुपये दण्ड आकारुन न.प.फन्डात जमा करण्यात आले.अधिक्षक चौहान यानी माहीती  दिली.  पथकात गुलाम यजदानी करण गीरी माधव पाटील  गोविन्द शिन्दे ईदरीस सिध्दीखी प्रदीप डिलोड लईख सिध्दिकखी आदि चा समावेश होता. प्लास्टीक वापरा विरुध्द कारवाई चालुच राहील आसे सागण्यात आले.त्यामुळे व्यापारी वर्गात   भितीचे वातावरण पसरले.

फोटो. किराणा दुकाना वर धाड टाकुन दण्ड वसुल करताना  न.प..चे पथक

Monday, March 11, 2019

नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार



मनीध्यानी आलेले नम्बर टाकून केले  महिला आरोग्य सेविकाचे काही महिने निलंबन

नांदेड:-(प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यातील अनेक आरोग्य सेविकांना नाहक त्रास अधिकारी वर्ग व गावातील नागरिकांकडून होत असतानाच्या तक्रारीने  केराची टोपली भरलेली असताना आशा आरोग्य सेविकानाच मोठे अधिकारी जाणून बुजून चुकीचे निलंबन करून नंतर कामावर घेतल्याची घटना नांदेड जिल्हात घडली आहे त्या विषयाच्या अनुषणगाने उपोषण कर्त्या दोन महिले सह अनेक जणांचे आमरण उपोषण सुरू आहे त्यांनी कार्यलयापुढे काही रास्त मागण्या घेऊन उपोषण करत आहेत
अस्तित्वात नसलेल्या बोगस चौकशी अहवाल जा क्रमांक 4065 दि 18/08/2017 या द्वारे तालुका अधिकारी अर्धापुर यांचा चौकशी अहवालाद्वारे निलंबन संचिका सादर करणाऱ्या तत्कालीन आस्थापना कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी दि 05 मार्च 2019 पासून जिल्हा परिषद कार्यलय नांदेड समोर आमरण उपोषण सुरू आहे
या उपोषणाचे संबंधित आरोग्य विभागाने कोणतीही दखल घेतलेली नसून महिला कर्मचारी उपोषणास बसलेल्या असताना सुद्धा प्रशासन निर्णघट पणे संबंधीताना पाठीशी घालत आहेत संबंधित तत्कालीन असस्थापना कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्याच्या जिल्हापरिषद मुख्यालयातील एकूण चौकशी करण्यात यावी.निलंबित झालेल्या आरोग्य सेविकेने महिती अधिकारांनव्ये माहिती टाकून जा क्रमांक 4065 या पत्र क्रमांक बद्दल कुठलीही माहिती कार्यलयात उपलब्ध नसलेले आहे व तुमचे नावे कुठलेही ह्या क्रमांकाचे जावक 18/08/2017 रोजी झालेले नसल्याने त्या आरोग्य सेविकांनी आपली झालेली बदनामी मानहानी लक्षात घेऊन त्यांनी थेट जिल्हा परिषद दालना समोर आमरण उपोषण मांडले आहे अधिकारी वर्ग अजून देखील त्या उपोषणास कानाडोळा करत असल्याने आज रोजी वेगळ्याच चर्चेला उत आला आहे.उपोषणास ,श्रीमती कोल्हेवाड एन जी,श्रीमती मगरे एस एम बसलेल्या आहेत सोबत महाराष्ट्र राज्य कास्ट्रइब कर्मचारी कल्याण महासंघ,पुणे(आरोग्य विभाग) ह्या संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

*जिल्हा आरोग्य अधिकारी(DHO) यांच्याशी संपर्क दूरध्वनी वरून साधला असता त्यांनी त्या  अधिकाऱ्याचे इन्क्रीमेट बंद करण्याची अगोदरच कार्यवाही केली आहे त्यांची मागणी निलंबित करण्याची असली तरी दुसऱ्यांदा त्यावर कार्यवाही करणे शक्य नसल्याचे ते सांगितले आहे.

*अशोक काकडे मुख्याधिकारी,नांदेड* यांचे म्हणणे असे की,चुकीबद्दल त्या कर्मचाऱ्यास सज्जा मिळाली आहे उपोषण कर्ते समजून घेण्याची तयारी ठेवत नाही त्यामुळे त्यांनी सद्या आमरण उपोषण सोडावे आणि उच्चीत कार्यवाहीच आश्वासन दिले आहे

एम आय एम च्या तालुका अध्यक्ष पदी साजीद कुरेशी यांची फेर निवड

एम आय एम च्या तालुका अध्यक्ष पदी साजीद कुरेशी यांची फेर निवड



बिलोली .(ए जी कुरेशी)
 मजलीस इत्ताहुदीन मुस्लीमन (AMIM)च्या बिलोली तालुका अध्यक्षपदी फेर निवड जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे .
सत्तत चार वर्षापासुन एम. आय. एम.पक्षाचे वाढविण्याचे काम  तालुक्यात केले.तसेच हुंनगुंदा.मुतन्याळ .कार्ला (बु).कार्ला (खुर्द) सावळी .अर्जापुर .केसराळी.आळंदी.येथे एम. आय. एम.ची शाखा स्थापना करण्यात आले.पक्षाचे ध्येय धोरणानुसार विविध सामाजिक उपक्रम राबिवले आहे.
बिलोली कामाची दखल घेवुन जिल्हाध्यक्ष फेरोज लाला यांनी साजीद कुरेशी यांची बिलोली तालुका अध्यक्षपदी फेर निवड केल्याची नियुक्ती पञक 9 मार्चे रोजी नांदेड येथे कार्यालात देण्यात आले.फेरनिवड झाल्याबद्दल तालुक्यातील सर्व एम.आय एम चे पदाधिकारी व मिञ परीवाराकडुन अभिनंदन होत आहे.

सौ.रुक्मिणीबाई सुरेश माने(रेणापूर) यांचं अल्पशा आजाराने निधन

सौ.रुक्मिणीबाई सुरेश माने(रेणापूर) यांचं अल्पशा आजाराने निधन



भोकर:-(प्रतिनिधी)

रेणापूर येथील  रुक्मिणबाई सुरेश पा.माने वय 40 वर्ष यांचे अल्पशा .आजाराने आज दि 11.03.2019रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता  निधन झाले आहे तरी त्यांच्या अंत्यसंस्कार दि12.03.2019.रोजी यांचे राहते घर रेणापूर येथे ठिक 11 वाजता करण्यात येत आहे रेणापूर ता.भोकर जि.नांदेड येथे आहे
कै कोडीबा पा ढवळे चिंचाळकर यांची मुलगी आहे. सौ.रुक्मिणी बाई सुरेश माने यांच्या पशच्यात दोन मुली ,एक मुलगा आहे.माने परिवारातील कर्त्या असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोकांवर शोककळा पसरली आहे.

सर्व मानवजातीचा ईश्वर एकच आहे :अमजद खान

सर्व मानवजातीचा  ईश्वर एकच आहे :अमजद खान


बिलोली:(ए जी कुरेशी):
सर्व मानव जातीचा ईश्वर एकच आहे असे विचार नांदेड़चे प्रसिद्ध वक्ते अमजद खान यांनी बिलोली येथील आयोजीत इस्लाम परिचय मेळाव्यात व्यक्त केले.

दि.१० मार्च रोज रविवारी बिलोली येथील शौकत फंक्शन हॉल येथे आयोजीत "इस्लाम परिचय" मेळाव्यात बोलताना पुढे म्हणाले  की मोहम्मद सल्ल.(अलै.)हे इस्लाम धर्माचे संस्थापक नसून शेवटचे प्रेषित होते पवित्र  कुरआन हे फक्त मुस्लिम समाजाचे ग्रंथ नसून जगाचे सर्व मानव जातीसाठी ईश्वराने निर्मिति केली आहे.पवित्र कुरान असे सांगतो की प्रत्येकाचा मृत्यु हे अटळ आहे मृत्यु नंतर अजुन एक जीवन आहे त्या जीवना मध्ये चागले व वाइट कर्म तपासले जाईल चागले कर्म करणारा स्वर्गात जाईल व वाइट कर्म करणारे हे नरक  मध्ये जाईल असे अमजद खान यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष  स्थानी  बिलोली न. प.माजी  अध्यक्ष यादवराव तुड़मे,वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार,पोलीस निरीक्षक भगवान धबगड़े,लक्ष्मराव जाधव गुरुजी,माधव जाधव तलाठी आदि मान्यवराची उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरूवात हाफीज  जफर यांनी पवित्र कुरआन मधील आयताचे पठन केले यावेळी डॉ. सलाउद्दीन नादेड़कर पोलीस निरीक्षक भगवान धबगड़े यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक शकील अहेमद यांनी केले तर आभार शेख फारुख अहेमद यांनी  मांडले या कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एजाज फारुखी,मौलाना अहेमद बेग ईनामदार,ए. जी.क़ुरैशी,शेख फारुख अहेमद,मुकर्रम फारुखी,शौकत बेग ईनामदार,शेख मुस्ताक,शेख वाजिद आदिनी केले.

Sunday, March 10, 2019

11 एप्रिल ते 19 मे... 'असे' आहेत लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे

11 एप्रिल ते 19 मे... 'असे' आहेत लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे




बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणूक कधी होणार?, या देशवासीयांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर आज मिळालं आहे. लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असून मतदान 11 एप्रिल ते 19 मे या काळात सात टप्प्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 23 मे रोजी निकाल जाहीर होईल. 16व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून रोजी संपणार आहे. त्यामुळे त्याआधी देशात नवं सरकार स्थापन होईल. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांत 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्याला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांचा पहिला टप्पाही 11 एप्रिल पासूनच सुरू होईल. तर, 19 मे रोजी निवडणुकांच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यामुळे 39 दिवसांत निवडणुक आटोपली जाणार आहे. त्यानंतर, 4 दिवसांनी मतदानाचा निकाल जाहीर होईल.

*पहिला टप्पा - 11 एप्रिल - 20 राज्यांतील 91 मतदारसंघ

*दुसरा टप्पा - 18 एप्रिल - 13 राज्यांतील 97 मतदारसंघ

*तिसरा टप्पा - 23 एप्रिल - 14 राज्यांतील 115 मतदारसंघ

*चौथा टप्पा - 29 एप्रिल - नऊ राज्यांतील 71 मतदारसंघ

*पाचवा टप्पा - 6 मे - सात राज्यांतील 51 मतदारसंघ 

*सहावा टप्पा - 12 मे - सात राज्यांतील 59 मतदारसंघ 

*सातवा टप्पा - 19 मे - आठ राज्यांतील 59 मतदार संघ 

* निकाल - 23 मे

 दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. गेल्या 8 दिवसांपासून उत्कंठा लागलेली घटिका समिप आली असून निवडणुकांचा बिगुल वाजला. देशातील 543 लोकसभा मतदार संघासाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी केली. त्यामुळे, दिल्लीत असणारे नेते आता गल्लीकडे वळणार आहेत. तर, आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी विद्यमान खासदार आणि उच्छुक उमेदवारांची कसरत पाहायला मिळणार आहे.

बिलोली येथील ग्रामीण रूगणालयाच्या वतीने पल्स पोलीओ लसीकरण ९१% टक्के

बिलोली येथील ग्रामीण रूगणालयाच्या वतीने पल्स पोलीओ लसीकरण ९१% टक्के

बिलोली प्रतिनिधी(ए.जी.कुरेशी)
दिनाक १० मार्च रविवारी झालेल्या विशेष मोहीमेत  ३७०० उध्दिष्ट होते. पैकी ३५८९   बालकाना पोलीओ लसिकरण डोस पाजवण्यात आल्याची माहीती वैधकीय अधिक्षक डा.नागेश लखमावार यानी दिली.

शहरात खालील प्रमाणे दहा ठिकाणी पोलीओ डोस पाजण्याचे बुथ होते.ग्रामीण रूग्णालय बिलोली. कन्या शिळा . पचायत समिती कार्यालय. डा.आम्बेडकर नगर .  जनक्रान्ती वाचनालय . जुने बसस्थानक  नविन बसस्थानक. फीरते  पथक स्थापन करण्यात आले.
० ते ५ वयोगटातील . नुकतेच जन्मलेले व यापूर्वी पाजण्यात आले  आशा बालकाना लस पाजण्यात आली .
पल्स  पोलीओ   
 लसिकरण  मोहीमेचा  शुभारभ सकाळी  ११ वाजता   वैधकीय आधिकारी डा . तोटावर 
एम. आय एम. चे तालुका अध्यक्ष  साजीद कुरेशी  मौलाना  अहेमद बेग  पत्रकार सिध्दार्थ  तलवारे  सचालक साई आरगुलवार यानी बालकाना डोस पाजवुन शुभारभ करण्यात आले .






शिंपाळा येथिल त्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुंटुबियांचे आ.साबणे कडुन सात्वंन

शिंपाळा येथिल त्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुंटुबियांचे आ.साबणे कडुन सात्वंन




बिलोली प्रतिनिधी ए.जी.कुरेशी

तालुक्यातील मौ.शिपाळा येथिल कै.देविदास परशुराम शिंदे वय ४० वर्षे या तरुण अल्पभुधारक  शेतक-यांने सततच्या नापिकीमुळे  कर्जाला कंटाळुन दि.८ मार्च रोजी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.त्या आत्महत्याग्रस्स शेतक-यांच्या कुंटुबियांचे आ.सुभाष साबणे यानी दि.९ मार्च रोजी शिंपाळा येथे भेट देऊन सात्वंन केले.व कुंटुबियांच्या समस्या जानुन घेउन धिर दिले.तसेच या वेळी अर्थिक मदतही देऊ केली.
या वेळी जि.प.सदस्य प्रतिनिधी गणेशराव पाटिल,शिवसेना जिल्हाउपप्रमुख विश्वनाथ पाटील समन, पञकार राजु पाटिल शिंपाळकर ,छावा ता.अध्यक्ष साहेबराव शिंदे ,शंकरराव मावलगे ,भाऊसाहेब बनबरे ,सरपंच बापुराव पा.शिंदे ,राम पा.बावने,बस्वराज मुंगडे ,दिलीप शिंदे,माधवराव शिंदे,शिवाजी शिंदे ,याच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Saturday, March 9, 2019

रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा सचिव पदी -संजय निळेकर



नांदेड  : (एजास कुरेशी)
 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्ष व संघटनांनी पक्षातील  जुन्या व नवीन ना पदाची संधी नांदेड मध्ये दिसून येत आहे. समाजातील अंधश्रध्दा,अज्ञान समुळ नष्ट व्हावं. त्याचबरोबर समाजातील प्राचीन काळातील ज्या अनिष्ठ परंपरा आहेत त्यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी स्वत: प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष पणे गेल्या अनेक वर्षांपासून  झटणारे त्याचबरोबर शासनमान्य या साप्ताहिकाच्या माध्यमातून वंचित समाजावरील अन्यायाला वाचा फाेडणारे संपादक संजय निळेकर यांची माधवदादा जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे यांनी रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा सचिवपदी निवड केली. त्याबद्दल त्यांचे सामाजिक कार्यकर्ते प्रीतम जाेंधळे,पत्रकार नवनाथ भद्रे,स्तंभलेखक कुलदीप सुर्यवंशी, श्रीधर हाळदेकर, सतिश पाईकराव ,माधव मेकेवाड(पोलीस नामा, पत्रकार नांदेड)यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे

Friday, March 8, 2019

कर्जबाजारी पणास कंटाळून शिंपाळा येथिल तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारी पणास कंटाळून शिंपाळा येथिल तरुण शेतकऱ्याची आत्महत्या



बिलोली प्रतीनिधी ए.जी.कुरेशी
तालुक्यातील शिंपाळा येथील रहिवासीअसलेले देविदास परसराम शिंदे वय ४० वर्ष या तरुण शेतकऱ्यांने सततची नापिकी डोक्यावर बँकेच्या कर्जाचे ओझे यास कंटाळून दि.८ मे रोजी सकाळी ७ ते ८ च्या सुमारास एकांतपणी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे.
सदर मयत तरुण शेतक-यांच्या  नावे बँक आँफ महाराष्ट्र या बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईका कडुन सांगण्यात आले.सकाळी अचानकपणे
उलट्या होण्यास सुरवात होताच सगरोळी येथे प्रार्थमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक  उपचार करुन डाँक्टरांच्या सल्ल्या नुसार पुढिल उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय  बिलोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.या वेळी डाँक्टरांनी विषारी औषध प्राषण केल्यामुळे मयत झाल्याचे घोषित करुन वैद्यकीय अधिकारी डाँ.प्रदिप ठक्करवाड  यानी मयतांचे शेव विच्छेद करुन नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बिलोली येथे महीला दिना निमित्त भटक्या जातीतील महीलाचा सन्मान -

बिलोली येथे महीला दिना निमित्त भटक्या जातीतील महीलाचा सन्मान -



बिलोली प्रतिनिधी :(ए.जी.कुरेशी)
जागतिक महीला दिना निमित्त शहरात राहणाऱ्या शांताबाई माधवराव सोळंके या महीलेचा आर्ट आँफ लिव्हिंग व तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साईनाथ सावकार आरगुलवार यांच्या संकल्पनेतून या महिलेच्या सन्मान साेहळ्याचे आयाेजन केले त्यात शांताबाई साेळंके यांना साडी,चोळी ,पुष्पहाराने सन्मानीत करण्यात आले आहे.

बिलाेली सारख्या सीमावर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असून स्वतः अशिक्षित असून देखील स्वतः कठीण परिश्रमाचे घाम गाळत मुलांना शिक्षण देणा-या घिसाडी समाजाच्या शांताबाई माधवराव साेळंके या पाेलादी महिलेचा आर्ट आॅफ लिव्हिंग परिवार आणि तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय गाेणार यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे आैचित्य साधून सदरील महिलेच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या निवासस्थानी तहसिलदार विक्रम राजपूत, प्रतिभा तुडमे,लक्ष्मणराव ठक्करवाड,साै,रेखा ठक्करवाड इंद्रजीत तुडमे,हाजप्पा पा.सुंकलोड,यांच्या प्रमुख उपस्थितीत साडी चाेळी देऊन सन्मान करण्यात आला. तद्वतच सामान्य ज्ञान परिक्षेत तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल सुरज सुर्यकांत गायकवाड यांचा वडील सुर्यकांत नामदेवराव गायकवाड व आई साै. रंजना सुर्यकांत गायकवाड यांचा लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्तंभलेखक कुलदीप सुर्यवंशी यांनी केले.

Tuesday, March 5, 2019

अमन आरोग्य सवलत कार्ड चे उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कौतुक

अमन आरोग्य सवलत कार्ड चे उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कौतुक



आरोग्य सेवेसाठी संस्थेला आवश्यक मदतीसाठी सदैव तत्पर असल्याची दिली ग्वाही

वसमत (प्रतिनिधी)
डॉक्टर्स वसमत यांच्या सहकार्याने अमन सेवाभावी संस्थे मार्फत गरजू रुग्णांसाठी बनवण्यात आलेल्या आरोग्य सवलत कार्ड चे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कौतुक केले आहे

 वसमत तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्णांसाठी अमन सेवाभावी संस्थेमार्फत शहर पेठ येथे  अमन आरोग्यसेवा मदत केंद्र उभारण्यात आले असून या ठिकाणी गरजूंना आरोग्य साहित्य व मोफत औषध पुरवठा केला जात आहे

यात भर म्हणजे वसमत येथील 17 डॉक्टर्स यांच्या मदतीने संस्थेमार्फत आरोग्य सवलत कार्ड बनवण्यात आले असून रुग्णांना ओपीडीमध्ये 30% तर आयपीडी मध्ये 20 टक्के सौलत सदर रुग्णालयात देण्यात येत आहे

संस्थेचे अध्यक्ष फेरोज पठाण यांनी सोमवारी तालुका टास्कफोर्स समिती चे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी वसमत श्री प्रवीण फुलारी यांची भेट घेऊन कार्ड भेट देऊन माहिती दिली असता त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले तसेच गरजू रुग्णांना याचा चांगला फायदा होणार असुन त्यांची आर्थिक बचत होणार आहे भविष्यात संस्थेला आवश्यक ती मदत करण्यास आपन सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल देशमुख यांची उपस्थिति होती

Monday, March 4, 2019

२० वर्षाच्या प्रतिक्षे नंतर 'हम दिल दे चुके सनम 2’ ऐश्वर्या राय बनणार का सलमान खानची हिरोईन?

२० वर्षाच्या प्रतिक्षे नंतर 'हम दिल दे चुके सनम 2’ ऐश्वर्या राय बनणार का सलमान खानची हिरोईन?


बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
‘हम दिल दे चुके सनम 2’ बद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात सलमानच्या अपोझिट ऐश्वर्या राय हिला घेण्याची भन्साळींची इच्छा आहे.

सन १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ने बॉक्स आॅफिसवर प्रचंड धूम केली. या चित्रपटानंतर सलमान खानला संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आसूसले. २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गोड बातमी आली आणि ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्याच सीक्वलमध्ये सलमानची वर्णी लागली. आता ‘हम दिल दे चुके सनम 2’ बद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात सलमानच्या अपोझिट ऐश्वर्या राय हिला घेण्याची भन्साळींची इच्छा आहे. केवळ इतकेच नाही तर, लवकरच भन्साळी ही आॅफर घेऊन ऐश्वर्याला भेटणार असल्याचेही कळतेय.
खरे तर भन्साळींनी याआधीही सलमान-ऐश्वर्याला आॅनस्क्रीन एकत्र आणण्याचे प्रयत्न केले होते. होय, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात भन्साळींना सलमान व ऐश्वर्या या जोडीला कास्ट करायचे होते. पण ऐश्वर्याने ही आॅफर त्यावेळी धुडकावून लावली होती. ऐश्वर्याने नकार दिल्यानंतर सलमानही या प्रोजेक्टमधून बाहेर झाला होता. यानंतर भन्साळींनी रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांना पसंती दिली होती. आता पुन्हा एकदा भन्साळी सलमान व ऐश्वर्याला आॅनस्क्रीन एकत्र आणू इच्छित आहेत. सध्या ऐश्वर्यालाही एका दमदार चित्रपटाची गरज आहे. अशात ऐश्वर्या भन्साळींची ही आॅफर स्वीकारते की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवरचं सलमान व ऐश्वर्याची लव्हस्टोरी बहरली होती. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि तेव्हापासून ऐश्वर्या कायम सलमानला टाळताना दिसली.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...