Wednesday, June 24, 2020

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

               

भोकर (प्रतिनिधी)
  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या भोकर येथील ६ दुकाने सील केल्याची मंगळवारची बातमी ताजी असताना परत  ५ दुकाने व  हॉटेल व्यावसायिक लॉक डाऊनचे नियम पायदळी तुडवून ५ वाजताच्या नंतर व्यवसाय करत असल्याचे आढळून आले यावरून महसूल विभाग आणि नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने आज सामूहिक दंडात्मक कारवाई करून सील केले आहे. या कारवाईमुळे हॉटेल वेवसायक व दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच प्रत्येकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र, या नियमाला हरताळ फसला जात असल्याचे चित्र सध्या भोकर शहरात सर्वत्र दिसत आहे. विशेष म्हणजे दुकानदारही नियम पाळत नसून लॉक डाऊन नियमाचे उल्लंघन होत आहे. नियमा बाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. तसेच प्रशासनाने घाऊक व्यापाऱ्यांना ऑनलाईन तसेच फोनवरुन मालाची मागणी स्वीकारुन ती पुरवावी. जेणेकरुन बाजारात ग्राहकांची एकच गर्दी न होता ही रोखले जाईल. तसेच दुकान सुरू करण्यासाठी ठराविक वेळही दिली आहे. परंतु, नियमाचे पालन न केल्यामुळे ५ वाजता च्या नंतर पण आपला वेवसाय चालू ठेवल्यामुळे भोकर येथील  व्यवसाय करणाऱ्या आंबेडकर चौक मधील १)मराठवाडा बिर्याणी हॉटेल  २) एव्हर ग्रीन चिकन बिर्याणी हॉटेल ३) बासस्टँड जवळील नृसिंह टी हाऊस,४) श्री. साईकृपा हेअर स्टाईल,५)भवानी हेअर सलून
 असे एकूण ५ दुकाने व हॉटेल दिनांक  २४जून रोजी महसूल प्रशासन व नगरपरिषद व पोलीस  प्रशासन भोकर यांच्या वतीने सामूहिक कारवाई करत एकूण ५  दुकाने व  हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करून ५ दुकाने सील  करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचा भंग करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

  या कार्यवाही पथकात भोकर तहसिल महसूल प्रशासनच्या वतीने पथक प्रमुख नायब तहसिलदार सतीश जोहरे,
यांचे सोबत श्री. बी. के. राऊत, श्री. गोविंद राचेवाड
नगर परिषद तर्फे श्री. सचिन वैष्णव व पोलीस प्रशासन तर्फे श्री. बिरकलवाड व आदि उपस्थित होते व तसेच सर्व  व्यापाऱ्यांनी ५ वाजता दुकान बंद करावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे

Tuesday, June 23, 2020

नियमांचे ऊल्लंघन करणाऱ्या सहा दुकानांना महसूल व पोलीस प्रशासनाने ठोकले सील.

नियमांचे ऊल्लंघन करणाऱ्या सहा दुकानांना महसूल व पोलीस प्रशासनाने ठोकले सील.



भोकर/प्रतिनिधी
नांदेड जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी गर्दी न करण्याच्या अटीवर दुकाने व इतर व्यवसाय सुरु करण्यासाठी वेळेचे बंधन घालून दिलेले असतांना देखील भोकर शहरात नियमांचे उल्लंघन करीत अनेक दुकानदार आपले व्यवसाय बिनधास्तपणे वेळ संपल्यानंतर देखील सुरु ठेवत असल्याने तहसिल महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने आज सहा दुकाने सील केले आहे
त्यात 1)विलास कृषीसेवा किनवट रोड 2)बालाजी स्टील दुकान आंबेडकर चौक 3) ताज मोबाईल शॉप नांदेड रोड 4) राजधानी फर्निचर मार्ट 5) श्रीराम ऑटोमोबाईल नांदेड रोड 6) राजेश कृषी सेवा तहसील समोर  असे एकूण सहा दुकाने सील करण्यात आलीआहे.
 भोकर च्या व्यवसायांकाना सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत नियम व अटींच्या अधीन राहून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे त्या नुसार 1 जून पासून अनेक व्यवसायांना सूट मिळाली परंतु भोकर शहरात जिल्हाधिकारी आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसत असून काही दुकानदार वेळेचे बंधन न पाळता आपला व्यवसाय बिनधास्तपणे करीत आहे तर काही दुकानांवर ग्राहकांची गर्दी होत आहे

त्यामुळे शहरातील  6 दुकाने  प्रशासनाने  सील केले आहे. ठरलेल्या वेळेनंतरही दुकान चालू ठेवण्याची कारण आहे. दुकान सील करुन लॉकडाऊन उल्लंघन केल्याची कार्यवाही केली आहे. संध्याकाळी 5 नंतरही दुकानदाराने चालू ठेवल्यामुळे भोकर चे उपजिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार पथक प्रमुख सतिश जोहर, सोबत बी.के.राऊत,गोविंद राचेवाड,नगर परिषद तर्फे सचिन वैष्णव,व पोलीस प्रशासन तर्फे बिरकलवाड, यांची पथक घटनास्थळी जाऊन तपास केला असता प्रकरण योग्य असल्याचे समजले. गांभीर्य पाहून दुकान लगेचच सील केले. लॉक डाऊन चा काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. आपण सवलत देत असल्यास, त्याचा फायदा घेऊ नका. जिथे असे दुर्लक्ष होईल तेथेही कारवाई केली जाईल.असे निर्देश नायब तहसीलदार सतिश जोहर यांनी दिले आहे

दिव्याग वृध्द निराधाराचे एका दिवसाचे घरीच तोंडावर काळि पट्टी थालीनांद करून मेसेज भेजो आंदोलन करणार

दिव्याग वृध्द निराधाराचे एका दिवसाचे घरीच तोंडावर काळि पट्टी थालीनांद करून मेसेज भेजो आंदोलन करणार

     

         
नांदेड (प्रतिनिधी)
जागतिक करोना संकट काळी दिव्यांग,वृध्द,निराधार बांधवाना खालील संदर्भातील शासन आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने दि.३० जुन २०२० रोजी घरोघरी तोंडावर काळि पट्टी व हातात थालीनांद मेसेज भेजो आंदोलन करीत आहेत

अति.मुख्यसचिव, व.ऊपसचिव महाराष्ट्र शासन,  दिव्यांग आयुक्त पुणे,यांचे तिन वेळा लेखी आदेश,  मुख्य कार्यकारी अधिकारी जी प नांदेड यांचे लेखी आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी होत नसल्या मुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक घरोघरी मेसेज भेजो आंदोलन करणार आहे
 जागतिक करोना संकटकाळी दिव्यांग वृध्द निराधार यांना शासनाने अनेक योजना जाहीर करून महाराष्ट्र शासन आदेश दिव्याग आयुक्त पुणे यांचे लेखी आदेश दि.२६ मार्च २०२०च्या लेखी  आदेशात दिव्यांगाना एक महिन्याचे धान्य किट /आरोग्य किट दिव्यांगाना घरपोच देण्यात यावे व ज्या दिव्यांगाना अन्न शिजवता येत नसलेल्याना नास्टा/जेवन/डबे देण्याचे आदेश देऊन तिन महिन्यात अंमल बजावणी होत नाही.
   मुख्य कार्यकारी अधिकारी जी प नांदेड दि ११ एप्रिल २०२०ला लेखी आदेश देऊन  दिव्यांग आयुक्त  यांच्या संदर्भात सर्व गटविकास अधिकारी यांना लेखी आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी केली जात नाही.
  ऊप सचिव साहेब यांचे क्र विसयो २०२०/प्र. क्र७०/दि. २३एप्रिल २०२० यांच्या लेखी आदेशातुन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याचे आदेश देऊन सुध्दा अद्याप दिव्यांग. वृध्द निराधार याना मिळणाऱ्या वाढीव अनुदान मिळत नाहि.
 दिव्यांग आयुक्त पुणे यांनी  दि ८मे ला लेखी आदेश देऊन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये दिव्यांगाना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा असे पर क्र. दिकआ/को१९/प्रस्ताव /२०२०/११२५ दि८मे २०२० ला लेखी आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी होत नाही.
दिव्यांग आयुक्त पुणे प्रक्र११२६ दि ८मे २०२०ला लेखी आदेश देऊन म. रा. ग्रामीण जीवनोन्नति अभियान द्रारेद्र निरमुलनाच्या कार्यक्रमामध्ये ५ टक्के स्वत  सहाय्यता गट दिव्यांग व्यक्ती करिता राखीव ठेवण्यात यावा असे लेखी आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी होत नाही.
 अति. मुख्य सचिव  महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय
जिल्हापरिषद/पंचायत समिती यांच्या उत्पन्नातुन ५टक्के निधीतुन दिव्यांंगासाठि राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या योजना संदर्भात शासन निर्णय क्र. ११मधील परिछेद १ मधील वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये ३६ वर खालील प्रमाणे  वाढ करुन अन्न व खाद्य पदार्थ या जिवनाश्यक वस्तूचा धान्य किट देण्यासाठी आदेश दिल्यानंतर सुध्दा अंमलबजावणी  होत नाही
 दिव्याग बांधवांना जिल्हा परिषद नांदेड याचा २०१६ ते २०२० पर्यत दिव्यांची निधी दरवर्षी वाटप करण्यात यावा असे शासन निर्णय असताना फक्त एकच वर्षाचा निधी वाटप करण्यात आला ते दिव्यांग बांधवांनी अनेक आंदोलने केल्यामुळे बाकी तिन वर्ष निधी का मिळत नाही   दिव्याग निधी पंचायत समिती  चा निधी अध्याप का वाटप होत नाही पंचायत समिती व जिल्हा परिषद निधी वाटप होत नसेल तर ग्रामपंचायत चा निधी  मिळेल काय?
  नगरपंचायत,नगरपालिका,  महानगरपालिका दिव्यांग निधी दरवर्षी वाटप केले जात नाही
 खासदार आमदार यांच्या विकास निधीतून त्यांच्या मतदारसंघात दिव्यांग बांधवाना निधी देण्याचा आदेश असताना अद्याप दिव्यांगाना निधी मिळत नाही
  दिव्यांग वृध्द निराधार याना मिळणाऱ्या अनेक योजनेची मिटिंग चार ते सहा महिने होत नाहि व त्यांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नाही
  दिव्यांग बांधवाना आपल्या हक्काची जाणिव शासन प्रशासनास कळावी म्हणून  त्यांना प्रत्येक कमिटीत अशासकीय सदस्य म्हणुन त्यांची निवड करण्यात यावी असे शासन आदेश असुन त्यांची अंमलबजावणी केली जात नाहि
अशा अनेक प्रश्नाबाबत शासन प्रशासनास निवेदन आपले सरकार पोर्टलवर देऊन सुध्दा शासन प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांगानी दि २२ मे २० ला नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरोघरी एका दिवसाचे उपोषण करुन शासन प्रशासन साधी दखलही घेतली नसल्यामुळे  दिनांक ३० मे २०२० रोजी सर्व दिव्यांग वृध्द निराधार हे आपल्या घरीच तोंडावर काळि पटि बांधुन थालीनांद ,सकाळि १०ते सायं ६ वाजेपर्यंत करित असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका झाल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाचि राहिल असे अर्ज देण्यात आहे आहे.

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे सांगत अल्पवयीन मुलीवर ऊसाच्या शेतात रात्रभर केला अत्याचार.!!

नांदेड:मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे सांगत अल्पवयीन मुलीवर ऊसाच्या शेतात रात्रभर केला अत्याचार.!!



नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड येथील नायगांव तालूक्यातील एका गावातील राजू उर्फ छोटू धोंडीबा उर्फ पांडूरंग भदरगे (२२) या युवकाने २१ जूनच्या रात्री अंदाजे १ वाजता गावात राहणाऱ्या एका  अल्पवयीन १४ वर्षाच्या बालीकेला पळवून नेले. व तिला पटवून सांगितले "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो" असे सांगत तीच्यावर रात्रभर ऊसाच्या शेतात अत्याचार केला. तीला २२ जून २०२० रोजी सकाळी ५ वाजता सोडले. तीने घडलेली धक्कादायक हकीकत आपल्या पालकांना सांगीतली. त्यानंतर कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन बालीकेवर ऊसाच्या शेतात रात्रभर अनेकदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक १०८ /२०२० कलम भारतीय दंड विधानातील कलमे ३६३,36 ३६६(अ),३७६(३) आणि पोक्सो कायदा कलम ४ आणि ६ नूसार दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक दिनेश येवले यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांना पोलीस हवालदार अशोक दामोदर आणि पोलीस शिपाई साई सांगवीकर मदत करीत आहेत अल्पवयीन बालीकेवर रात्रभर अन्याय करणारा गुन्हेगार राजू उर्फ छोटू धोंडीबा उर्फ पांडूरंग भदरगे (22) यास ताब्यात घेतले आहे.

Monday, June 22, 2020

शेतातून रस्ता देण्यास नकाश्या नकार दिल्याने पिता पुत्रास मारहाण

शेतातून रस्ता देण्यास नकाश्या नकार दिल्याने पिता पुत्रास मारहाण



नांदेड़ (एजास कुरेशी)
जिल्ह्यातील  पांगरी ता, जि, नांदेड येथील गट क्रमांक ४ मधील  वडिलोपार्जित  शेत जमिनीत पीक घेऊन आपल्या परिवाराचा गाडा हाकणाऱ्या बिपाशा बेगम हमीद खान पठाण रा पागरी ता जी नांदेड ह्या शेतकरी कुटुंबास नांदेड येथील इसरार अहमद खान रा, देगलूर नाका नांदेड व त्याच्या मुलांनी गाव गुंडा मार्फत त्या शेतकरी कुटुंबास नाहक त्रास देत असतील शिवीगाळ देत गट क्रमांक ४ मधील तुझ्या शेतातून आम्हाला रास्ता दे नाहीतर तुला खतम करतो तुझ्यावर खोटा केस करून तुझे नोकरी घालतो अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत आमच्याकडे तुझ्या शेतातून जाण्यासाठी कोर्टाची ऑर्डर आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतातून आम्हाला रस्ता द्यावाच लागेल वास्तविक पाहता सदर 400 जमिनीचा कुठलाही प्रकारचा रस्ता विषयी वाद न्यायालयात प्रलंबित नाही अशा प्रकारचे वक्तव्य करून मला व माझ्या पती पिता अजमत खान पठाण व माझे दोन मुले हाजीमुसा फिर्दोष यांना अशलील शिवीगाळ देऊन  लाथा  बुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली या बाबत पोलिस महानिरीक्षक साहेबानी घटनेची गंभीरता पाहून  संबधित गावगुंडावर कार्यवाही करावी अशी मागणी  बिपाशा बेगम हमीद खान यांनी पोलिस महानिरीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारा केली आहे

धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण कलावंतांवर उपासमारीची वेळ

धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण कलावंतांवर उपासमारीची वेळ



धर्माबाद (ता. प्रतिनिधी)
 : कोरोना व्हायरसचा धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण कलावंतांना फटका बसला असून,  चार महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने लग्न, जंयती,कव्वाली, लोकनाट्य, भजन,सप्ते, , यात्रा  इत्यादी रद्द झाल्या आहेत. धर्माबाद तालुक्यातील   गेल्या चार महिन्यात  भिमजंयती शिवजयंती, लग्न मध्ये मंगल अस्टकाचे आँरकेस्ट्रा व बँन्ड पथकाचे वाजयंत्री बंद आसुन 
आजही लग्नात व कोणत्याही शुभ कार्यात ग्रामस्थांचे मनोरंजन करणे आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून उदरनिर्वाह करणे हे चक्र अनेक वर्षापासून चालू आहे,  काही मंगल आस्टका व बँन्ड पथक मालकांनी मात्र  काही कलावंतांना कामासाठी  कलाकाराला दिलेली उचल, त्यांचा रोजचा खर्च, गुंतवलेले भांडवल, मालक आणि कलाकार दोन्ही अडचणीत सापडले आहे तेव्हा शासनाने अशा परिस्थितीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलाकाराकडून केली जात आहे.

कोरोना महामारी च्या काळात एकही कार्यक्रम झाला नाही.२२मार्च नंतर कोरोनाचे संकट आले
 कोरोनामुळे या ग्रामीण कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे कलावंतांना कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नाही या चार महिन्यात पुर्णपणे वर्षाची होनारी आर्थिक परिस्थिती बिकट आसुन कलाकार आर्थिक संकटात सापडला आहे करिता शासनाने ग्रामीणव शहरी कलवंताना आर्थिक मदत द्यावी म्हणून धर्माबाद तहसीलदार दत्तात्रय शिन्दे यांना निवेदन देण्यात आले यावर  भीमशाहीर नारायण सोनटक्के ,प्रकाश खंडेलोटे,विजय हातागळे,राज मिसाळे,चंद्रकांत आमिठवाड,भिमराव खंडेलोटे वैभव हानंमते,शंकर जिवालकर इत्यादी कलाकारांच्या  सह्या आहेत.

  

दिव्यांग सिद्धार्थला जेंव्हा समाजाचा घटक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करावा वाटतो !

दिव्यांग सिद्धार्थला जेंव्हा समाजाचा घटक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करावा वाटतो !



नांदेड (प्रतिनिधी)
 दि. 22 :- सर्व जिल्ह्यांसाठी कोरोनाचे संकट हे अतिशय आव्हानात्मक ठरले आहे. नांदेड जिल्हा प्रशासन याला अपवाद कसे असणार. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या कोविड 19 संदर्भातील दक्ष प्रशासन कौशल्याला भारावून नांदेडच्या बळीरामपूर येथील दिव्यांग सिद्धार्थ याला समाजाच्यावतीने जिल्हा प्रशासनाचा गौरव करावा वाटला.

आपल्याजवळ जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विशेष काही नाही याचे मनात कुठलेही शल्य न बाळगता त्याने डॉ. विपीन यांचे एक स्केच रेखाटले. या स्केचला घेऊन तो आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. ऐंशी टक्के दिव्यांग असल्याकारणाने त्याला जिल्हाधिकारी यांच्या दालनात पोहचणे शक्य नव्हते.



आपल्याला भेटायला एक दिव्यांग आला आहे आणि तो प्रवेशद्वाराजवळ असल्याचा निरोप जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना जेंव्हा कळाला तेंव्हा ते कॅबीन सोडून त्याला भेटायला प्रवेशद्वाराजवळ पोहचले. त्याने काढलेल्या स्केचचा नम्रतेने स्विकार करत आस्थेने विचारपूस केली. “साहेब तुम्ही कोविड 19 च्या या काळात प्रशासनाचे प्रमुख म्हणून जी काळजी घेत आहात, गोरगरिबांच्या रोजगाराला आता अधिक बाधा पोहोचू नये म्हणून प्रयत्न करत आहात त्याबद्दल समाजाचा घटक म्हणून मला तुमची भेट घेऊन धन्यवाद दयावे वाटले” असा कृतज्ञता भाव सिद्धार्थने व्यक्त केला. या अनौपचारिक भेटीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर भारावून गेले.

“जनतेच्या हिताची योग्य ती दक्षता घेणे, सर्वसामान्यांचे प्रतिबिंब प्रशासनात बिंबवणे, शासनाच्या उपक्रमात लोकांचा सहभाग अधिक चांगला असणे हे सशक्त समाजाचे लक्षण आहे. या कोविड 19 च्या या आव्हानात्मक काळात नांदेडकर आपली नागरिक म्हणून असलेली जबाबदारी चांगली निभावत आहेत.” सिद्धार्थ याच्या भावना याच नम्रतेने मी स्विकारत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

सिद्धार्थ शेषेराव जमदाडे हा बळिरामपूर येथे छोटे किराणा दुकान चालवतो. लॉकडाऊनमध्ये त्याने त्याच्यापरिने व समाजातील काही लोकांना घेऊन गरजूंना मोफत अन्नधान्याच्या किट वितरीत केले. दिव्यांगाच्या प्रहार संघटनेमार्फतही त्याने प्रशासनाला केलेल्या सहाकार्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...