Thursday, January 31, 2019

राज्यात कुठेही वाहतुकीचे नियम मोडलेत... तर सावधान!

राज्यात कुठेही वाहतुकीचे नियम मोडलेत... तर सावधान!

बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र

मुंबईसह राज्यभरातील पोलिसांकडून कडक कारवाई सुरू असतानाच मुंबई वाहतूक पोलीस दलात अद्ययावत ई चलान मशीन दाखल झाल्या आहेत. यामुळे शहरात वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणार्या पोलिसांना नव्या मशिन्समुळे राज्यात कोणत्या ठिकाणी, कोणत्या नियमाचाभंग केला तसेच कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच वाहन चोरीचे असल्यास, त्याचाही लेखाजोखा उपलब्ध होणार असल्याने राज्यात कुठेही वाहतुकीचे नियम मोडले असतील तरी मुंबईत वाहन चालविताना सावधानता बाळगावी लागणार आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहनचालकांवर कारवाईसाठी वापरण्यात येणार्या ई चलान प्रणालीला अद्ययावत यंत्रणेची जोड देत हा नवा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या मशिन्स हाताळण्याचे प्रशिक्षण वाहतूक पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात आले असून, शहरातील ३४ वाहतूक पोलीस विभागांमध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागात २० ते २५ मशिन्स देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकारी आणि अंमलदारांनी या नव्या मशिन्सचा बुधवारपासून कारवाईसाठी वापर सुरूकेला आहे. येत्या काळात तब्बल १ हजार १०० मशिन्स वाहतूक पोलिसांना देण्यात येणार आहेत. नव्या ई चलान प्रणालीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांचे छायाचित्र काढले जाते आणि स्वाक्षरी घेतली जाते. वाहनचालकाचा परवाना क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल पत्ता नोंदविण्यात येतो. त्यानंतर संबंधित वाहनचालकाला त्याने कोणता गुन्हा केला आणि दंडाच्या रकमेची माहिती लघुसंदेशाद्वारे दिली जाते. शिवाय, मेलद्वारे चलन पावती पाठविण्यात येते. नियम मोडणार्याचा वाहन क्रमांक, वाहन परवाना क्रमांक आणि वाहतूक नियम कितीदा मोडले, याचीही संपूर्ण नोंद होते. ही माहिती आता मुंबई पुरती मर्यादित न राहता यामध्ये राज्यभरातील माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच संबंधित वाहनावर कुठे काय गुन्हा आहे? ते वाहन चोरीचे आहे का? शिवाय राज्यात कुठेही कारवाई केली असल्यास, त्याची सर्व माहिती ई चलान मशीनमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईत हा प्रयोग यशस्वी होताच, त्याची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे वारंवार नियम मोडणार्यांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो. 

मुंबईत ११०० मशिनचे नियोजन -

 मुंबईत अकराशे अद्ययावत मशिन्स दाखल होणार आहेत. टप्प्याटप्प्याने हा प्रयोग राबविण्यात येत असून त्यानुसार, त्यांचे नियोजन सुरू आहे. प्रयत्न यशस्वी होताच, लवकरच याची माहिती देण्यात येईल. 

- अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, मुंबई.

सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला पाठवले जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अश्लील संदेश, त्या शिक्षकविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.

सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला पाठवले जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अश्लील संदेश,
त्या शिक्षकविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.

बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

बीड:-प्रतिनिधी
गेवराई जवळील रोहीतळच्या जि.प. शाळेत एका शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थिनीला अश्‍लील एसएमएस पाठविल्याने एकच खळबळ .
   शिक्षकाविरोधात तलवाडा पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कलमा नुसार गुन्हा दाखल झालाआहे. गुन्हा दाखल होताच हा शिक्षक फरार झाला असल्याचे सांगण्यात येते. .
एक महिन्यापूर्वीही या शिक्षकाने एका मुलीला अश्‍लील भाषा वापरली होती, तेव्हा सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्यात आले होते. या घटनेने जिल्हा परिषद शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी एस.टी. बनसोडे हा शिक्षक रोहीतळच्या जि.प. शाळेमध्ये रुजु झाले. या शिक्षकाने सहावी वर्गात शिकणार्‍या  विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्‍लील एसएमएस पाठवला. हा मोबाईल विद्यार्थिनीच्या पित्याचा आहे .मात्र तो मुलीकडे असायचा. पिता आडाणी असल्यामुळे मुलगी मोबाईल बाळगत होती. याच संधीचा फायदा बनसोडे याने उचलला आणि त्याने सदरील विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्‍लील भाषेत एसएमएस पाठविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी विद्यार्थिनीच्या पित्याने तलवाडा पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी शिक्षक बनसोडे याच्याविरोधात कलम ३५४ (अ), ३५४ (ड), ५०९, ११, १२ बाललैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
     गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरील हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न तलवाडा पोलिस करत होते. गुन्हा दाखल होताच शिक्षक फरार झाला. यापूर्वीही या शिक्षकाने एका मुलीला अश्‍लील भाषा वापरली होती त्यामुळे या शिक्षकाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती मात्र त्यावेळी हे प्रकरण मध्यस्थी करून मिटविण्यात आले होते. पुन्हा या शिक्षकाने सहावीच्या वर्गात शिकणार्‍या मुलीला अश्‍लील एसएमएस पाठवून गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम केल्याने जि.प. शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Wednesday, January 30, 2019

तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात होतील दंगली; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा दावा.

तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात होतील दंगली; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा दावा.


(File photo)

बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधि महाराष्ट्र
भारतात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीलाही काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पूर्ण जगाचं लक्ष भारतातल्या लोकसभा निवडणुकांवर राहणार आहे. अशात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं एक खळबळजनक दावा केलाआहे. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएनं केला आहे. अमेरिकी सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भाजपानं निवडणुकीपूर्वी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर जोर दिल्यास देशात सांप्रदायिक दंगली भडकतील, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला आहे. जो सीआयए या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी तयार केला आहे. रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर पुढे गेल्यास भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दंगली होतील. अमेरिका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हा अहवाल प्रसिद्ध करते. ज्यात देशभरातील घटनांचं मूल्यांकन केलेलं असतं. कोट्स म्हणाले, मोदींच्या कार्यकाळात भाजपाशासित राज्यांमध्ये सांप्रदायिक वाद विकोपाला केला आहे. भाजपा सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांनी हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर जोर देत हिंसाचार केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचा हिंसाचार झाल्यास दहशतवादी संघटनांना दृष्कृत्य करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

Tuesday, January 22, 2019

या भाजपा आमदारचा शिर कापून आणणाऱ्यास 50 लाखांचे बक्षीस.

या भाजपा आमदारचा शिर कापून आणणाऱ्यास 50 लाखांचे बक्षीस.


       भाजपा आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे.मायावती यांच्यावर साधना सिंह यांनी आक्षेपार्ह टीका केल्यांनतर येथील बसपा नेते संतप्त झाले आहेत. बसपाचे माजी आमदार विजय यादव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साधना सिंह यांचे शीर कापून घेऊन येईल, त्याला 50 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा विजय यादव यांनी केली आहे. चंदोलीमधील मुगलसराय मतदार संघातील आमदार असलेल्या साधना सिंह गेल्या दोन दिवसांपूर्वी परनपुरा गावातील किसान कुंभ अभियान कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मायावतींवर टीका केली.  त्या म्हणाल्या, ''जेव्हा द्रौपदीचे वस्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. मात्र सपाने मायावतींचे वस्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपासोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला आहे.''  मात्र, साधना सिंह एवढ्यावरच थांबल्या नाहीत. मायावती या ना पुरुष दिसतात ना स्त्री, असे अत्यंत आक्षेपार्ह  वक्तव्य त्यांनी केले.
दरम्यान, साधना सिंह यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी माफीनामा सादर केला आहे. यामध्ये साधना सिंह यांनी असे म्हटले आहे की, मला कुणाला दुखवायचे नव्हते. मात्र, माझ्या भाषणातून कुणाला ठेच पोहोचली असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करते, अशा शब्दांत साधना सिंह यांनी माफी मागितली आहे.
तसेच, 
याप्रकरणी चंदोली येथील बबुरी पोलीस स्टेशनमध्ये बसपा नेता रामचंद्र गौतम यांनी साधना सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Thursday, January 17, 2019

एम.आय.एम. पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवक सय्यद मतीन विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल.

एम.आय.एम.पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवक सय्यद मतीन विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल.


विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र
औरंगाबाद – औरंगाबाद येथील बहुचरचित नगरसेवक महापालिकेत वंदे मातरमचा अपमान, सतत वादग्रस्त वक्तव्य करणे , महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ घालणे तसेच पक्षातील वरिष्ठांच्या आदेशांना डावलण्याबाबद एमआयएम पक्षातून निलंबित करण्यात आलेले नगरसेवक सय्यद मतीन याच्याविरुद्ध रशीदपुरा भागात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहित महिलेने नोकरी, आणि लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी १५ जानेवारीला फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पीडित महिला आधार कार्ड काढण्यासाठी गेली असता मतीनची आणि तिची ओळख झाली. त्यानंतर मतीनने तिच्याशी जवळीक निर्माण केली. आणि तिला चांगल्या ठिकाणी नौकरीला लावून देतो. त्याचबरोबर तुझ्याशी लग्न देखील करतो असे आश्वासन दिले. त्यांनतर त्याने टाऊनहॉल परिसरात असणाऱ्या एका घरात या महिलेला बोलावून घेतले आणि तिच्यावर अत्याचार केले. घडलेला हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकेल. अशी धमकी देखील दिली. पीडित महिलेने लग्नाबाबद विचारपूस केली असता त्याने तिला स्पष्टपणे नकार दिला.

नकार देताच महिलेने आयुक्तालय गाठले तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मतीनविरोधात  सिटीचौक पोलिसठाण्यात फिर्याद दाखल करण्यात अली असून पुढील तपास सुरु आहे. पीडित महिला दोन मुलांची आई असून. पतीने सोडून दिल्याने ती तिच्या आईसोबत राहते. तर काही महिन्यांपासून मतीन शहराबाहेर वास्तव्यास असल्याची चर्चा देखील होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असताना नगरसेवक मतीन बेपत्ता झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Saturday, January 12, 2019

भूकेने व्याकुळ झालेल्या गाईच्या वासराला कुत्रीने पाजले दूध.

भूकेने व्याकुळ झालेल्या गाईच्या वासराला कुत्रीने पाजले दूध.


(ता.प्रतिनिधी)
पुणे : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भूकेने व्याकुळ झालेल्या गाईच्या वासराला चक्क कुत्रीने दूध पाजले आहे. शिरुर येथील एका भटक्या गाईने प्लास्टीक गिळले होते. त्यामुळे ही गाई फुगल्याने जीवाच्या आकांताने ओरडत होती आणि एका ठिकाणी तडफडत पडली होती. तर याच गाईचे वासरू भूकेने व्याकुळ होवून ओरडत असताना चक्क या वासराला कुत्रीने दूध पाजल्याने शिरुर शहरातील नागरिकांना आश्चर्य वाटले. त्यामुळे मुक्या प्राण्यांमध्ये ही मातृत्वाची आई ममता म्हणजे काय असते याची आदर्श घटना पाहायला मिळाली आहे.

◆ प्लास्टिकची शिकार झाली वासराची माता ◆
दरम्यान, राज्यात प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली
मात्र, आजही राजरोस या बंदीचे उल्लंघन होताना दिसत आहे. बंदी घालल्यानंतर तात्काळ कारवाई करण्याचा दिखावा प्रशासन अधिकाऱ्यांनी दाखवला. मात्र, आता तसे काही होताना दिसत नाही. प्लास्टिक वापरामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. तसेच त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. प्लास्टिक गिळल्यामुळे शिरुर येथे एका गायीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे ती मदतीसाठी ओरड असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच तिच्यावर तिचे अवलंबून असणारे पाडसंही भूकेळे व्याकुळ झाले. हे दृष्य बघणारेही हेलावून गेलेत. मात्र, घातक प्लास्टिकची बंदी कायमची कधी होणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
मुक्या प्राण्यांमधील ही ममता पाहून अनेकांना नवल वाटले. याचा व्हिडिओ काहींनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातबद्ध केला.

भोकर येथील महावितरणाचे भोंगळे कारभारा विरोधात ग्राहकाचे २५ जानेवारीला आमरण उपोषण.

भोकर येथील महावितरणाचे भोंगळे कारभारा विरोधात ग्राहकाचे २५ जानेवारीला आमरण उपोषण.


भोकर : - (एजास कुरेशी)
भोकर येथील महावितरणाचे बरेच भ्रष्ट्राचाराचे प्रकरण ताजे असताना सुद्धा अजुन तसाच बेजबाबदार पणे हाताळलेले प्रकरण समोर आले आहे 
सविस्तर माहिती अशी की भोकर येथील हातावरचे पोट असलेला सुशिक्षित बेरोजगार पिठाची गिरणी चालवणारा युवक जे की महावितरणाचा ग्राहक मो. आतीखोद्दिन मो. कलिमोद्दीन हे १० वर्षा पासून पीठाची छोटी गिरणी  चालवतो त्याचे सर्व कुटुंब ह्याच व्यवसायावर अवलंबून आहे तो ग्राहक विज वितरण कंपनी चा थकित बिल कधीच आज पर्यंत नव्हता दि.२२ अगस्ट रोजी ज्या खांबावरुण कनेक्शन जोड़लेले होते त्या खांबाला आज्ञात ट्रक ने धड़क मारून विद्युत खांबाचे नुकसान केले त्यामुळे वायर तुटले व पीठाची गिरणी बंद पडली सदरील प्रकार विज वितरण कंपनी चे कर्मचारी यांना सांगून सुद्धा वायर जोडून नाही दिले व कोणत्याच प्रकार ची माहिती न देता मीटर ची पी.डी.करण्यात आली. त्याची माहिती गिरणी चालकाला तब्बल 6 महिन्या नंतर देण्यात आली व विज वितरण कंपनी चे दोन कर्मचारी मिटरचे कनेक्शन दूसरी कडून जोडून देण्यासाठी तब्बल २००००  हज़ार रूपयांची लाच मागितली व न दिल्यामुळे व वेळो वेळी चकरा मारून तोंडी विंनती केल्या मुळे दोघांनी ११००० रूपयांचा विज बिल दिला व वेगळे कोटेशन ११००० भरन्यास सांगितले व २०००० रूपयांची लाच मागितली पन वारवार तक्रार देऊन सुद्धा कोणतीच कार्यवाही केली नाही म्हणून संतप्त झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकाने दि२५.१.२०१९ रोजी महावितरण कार्यालय भोकर येथे आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे व न्याय नाही मिळाल्यास आत्मदहन करनार असे लेखी तक्रार भोकर येथील महावितरण शाखा कार्यालय, व उप कार्यकारी अभियंता ,व तसेच जिल्हा अधिकारी नांदेड़ व  जिल्हा अधीक्षक अभियंता नांदेड़, व पोलीस अधिक्षक नांदेड़ व पोलिस निरीक्षक भोकर यांना देण्यात आला आहे.प्रशासन ह्या संदर्भात काय दखल घेईल ह्या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Wednesday, January 9, 2019

हळदा येथे झालेल्या अपघातात त्या आरोपीची निर्दोष मुक्तता.

हळदा येथे झालेल्या अपघातात त्या आरोपीची निर्दोष मुक्तता.


भोकर (एजास कुरेशी)
भोकर तालुक्यतील हाळदा येथे २०१० मध्ये झालेल्या अपघातात ६ लोकांना गंभीर दु:खापत झाली होती गेले ८ वर्षाच्या कालावधीत सरकार तर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले सदर प्रकरणात आरोपी शेख अर्शद शेख खुर्शीद यांच्या विरुद्ध सन्माननीय फौजदारी न्यायालय भोकर येथे दि१७-२-२०१० रोजी कलम २७९,३३७,३३८,४२७ भा.द.वी.  दोषारोप ठेवण्यात आले होते वरील गुन्ह्यातुन आरोपी शेख अर्शद यांची भोकर प्रथम न्यायालय श्रेणी ह्यांनी  निर्दोष मुक्तता केली आहे आरोपीच्या वतीने अॅड.रवि खाडे यानी काम पाहिले दि ८ जानेवारी २०१८ रोजी शेवटची हेरिंग ठेवली गेली त्यावेळी त्या सबळ पुरावे,साक्षीदार तपासून झाल्यावर शे अर्षद याची निर्दोष मुक्तता करण्यात आली हे सर्व काम श्री खाडे यानी आरोपीची बाजू न्यायालयात मांडले.त्यानंतर त्या आरोपीला निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अॅड खाडे हे गेली अनेक वर्षापासून भोकर न्यायालया मध्ये काम करत आहे सर्व गोरगरीब लोकांचे निःस्वार्थ पने त्यांची बाजू मांडण्याची कामें करतात व गरीबांच्या मदतीसाठी अहो रात्र दिवस धाऊन येतात
त्यामुळे भोकर तालुक्यामध्ये गरीबांच्या पाठीशी नि:स्वार्थ पणाने खंबिर पने उभे राहनारे गरीबांचे वकील म्हणून तालुक्यामध्ये अॅड रवि खाड़े यांची ओळख झाली आहे

पत्रकार रमेश गंगासागरे गुरु रविदास समता पुरस्काराने सन्मानीत.

पत्रकार रमेश गंगासागरे गुरु रविदास समता पुरस्काराने सन्मानीत.


भोकर : (प्रतिनिधि) भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रमेश गंगासागरे यांना बुलढाणा येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात गुरू रविदास समता पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
       पत्रकार रमेश गंगासागरे हे मागील सोळा ते सतरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक समाज उपयोगी लिखाण केले आहे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून गंगासागरे यांनी तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचे कामही केले आहे, या त्यांच्या कार्याची दखल घेत बुलढाणा येथे झालेल्या पाचव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात दिनांक ६ जानेवारी २०१९ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांना प्राध्यापक लक्ष्मण शिराळे अध्यक्ष संयोजन समिती, इंजिनीयर डी.टी. शिपणे प्रदेशाध्यक्ष, इंजिनिअर चंद्रप्रकाश देगलूरकर संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद, संमेलनाध्यक्ष डॉक्टर सतनाम सिंह प्रख्यात साहित्यिक तथा लेखक नवी दिल्ली, बाबुरावजी माने अध्यक्ष चर्मकार ऐक्य परिषद, आमदार शशिकांत खेडेकर, खासदार प्रताप जाधव, रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष, यांच्या हस्ते शाल, हार आणि मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. सलमान पत्रात म्हटले आहे की, माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता आले पाहिजे त्यासाठी समतावादी गुरू रविदास व सर्व क्रांतिकारी महामानवांनी अथक परिश्रम घेऊन भारतात सामाजिक परिवर्तन घडवून आणले, या परिवर्तनाचे आपण एक पाईक आहात आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत नावलौकिक मिळवून इतरांपुढे आदर्श निर्माण केल्याबद्दल आपणास गुरु रविदास समता पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार देऊन या संमेलनात आपला सन्मान करण्यात येत असल्याचे त्यांनी दिलेल्या गौरव सन्मान पत्रात लिहिले आहे.

Sunday, January 6, 2019

पत्रकारांला चाकूचा धाक दाखवून लुबाडले दोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल.

पत्रकारांला चाकूचा धाक दाखवून लुबाडले
दोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल.


नांदेड:-(एजास कुरेशी)
नांदेड़ येथील मामा चौक परिसरामध्ये फिरायला गेलेल्या एकट्या दुकट्या ना लुटण्याच्या घटना अनेक घडल्या आहेत. काही दिवसने पोलिसांनी परिसरात गस्त  घालण्यास सुरुवात केल्यानंतर हा प्रकार काहीप्रमाणात थांबला होता. मात्र, पुन्हा मामा चौक पासून बाबाजी एरिया परिसरात चोरट्यांनी कमजोर,नविन पुरुषांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी (दि.५) दुपारी तीनच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवक तथा तरुण तरुणीला चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून बऱ्याच वेळा लुटल्याची घटना खुप वेळा घडली आहे. असाच प्रकार शानिवारी घडला आहे  फिर्यादी माधव मेकेवाड महाविद्यालयी युवक(पत्रकार) वय-२८ यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात घड़लेल्या प्रकाराची रीतसर फिर्याद दिली आहे.
बाँम्ब शोधक पथक ,मामा चौक परिसरात फिरायला गेलेल्या त्या  महाविद्यालयीन युवक तथा पत्रकारास चाकूचा धाक दाखऊन व धमकावून त्यांच्याकडील  ३ हजार २०० रुपयांची नगद लुटून नेल्याची शनिवारी रात्री ८:३० ते ९:०० दरम्यान घडली. चोरट्यांनी गुप्ती सारख्या धारदार शस्त्र ने धमकवल्याने त्यांना लुटण्यास यश मिळाले ही घटना घडून  आल्यानंतर फिर्यादी ने फोन द्वारे कळवले असता तात्काळ  पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला पण स्थानिक ठिकाणचे रहिवासी असल्याने दडपले असल्याची चर्चा यावेळी सुरू होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी  शनिवारी रात्री साडे आठ ते नऊ च्या सुमारास कौठा भागात फिरायला गेले होते. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि धमकावण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.  ३ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यानंतर चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. घाबरलेल्या युवकाने रविवारी (दि.6) मध्यरात्री नांदेड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली.
यापूर्वी तेथील आजू बाजूला  फिरायला येणाऱ्या युगलांना धाक दाखवून लुबाडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा बाबाजी का एरिया च्या भागात रात्री ८ पासून मध्यरात्री ला फिरायला गेलेल्यांना लुबाडण्याची घटना घडली आहे़. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. एल.घाटे अधिक तपास करीत आहेत.

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून ; 10 जानेवारीला सुनावणी.

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून ; 10 जानेवारीला सुनावणी.

विशेष प्रतिनिधि 
अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाची नियुक्ती होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 10 जानेवारी रोजी नव्या पीठाची नियुक्ती होणार असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सध्या जे पीठ या प्रकरणाची सुनावणी घेत होतं, त्यातील एक न्यायमूर्ती निवृत्त झाल्याने नव्या पीठाची नियुक्ती करणं आवश्यक आहे, यामुळेच या प्रकरणाची सुनावणी 10 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अवघ्या 1 मिनिटात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोर्टाकडे सध्य अन्य प्रकरणेही असल्याचे सांगितले होते. अलाहाबाद हायकोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 30 सप्टेंबर 2010 मध्ये 2.77 एकर जमीन तीन पक्षकारांमध्ये म्हणजेच सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये समान वाटण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात 14 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने 9 मे 2011 मध्ये या निर्णयाला स्थिगिती दिली होती.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...