Thursday, April 30, 2020

ब्रेकिंग न्यूज़ नांदेडमध्ये कोरोनाचे नवीन तीन रुग्ण

ब्रेकिंग न्यूज़ नांदेडमध्ये कोरोनाचे नवीन तीन रुग्ण




नांदेड: प्रतिनिधि
नांदेडमध्ये गुरुवारी एकाच दिवशी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूने खळबळ उडवून दिल्यानंतर शुक्रवार दि. 1 मे रोजी सकाळी नव्या तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे तिन्ही जण ड्रायव्हर असून पंजाब येथून यात्रेकरूंना सोडून नांदेडकडे परतले होते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नांदेड शहरात कोरोनाच्या रुग्णांचे तीन रिपोर्ट पॉझिटीव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी नांदेड शहरात पहिला रुग्ण 22 एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर दुसरा रुग्ण अबचल नगर येथील 44 वर्षीय रुग्ण सापडला होता. त्यानंतर सेलू येथून उपचारास आलेली महिला 29 कोरोनाबाधित झाली होती. यातील दोन पीरबुर्‍हाण येथे राहणार्‍या व सेलू येथून उपचार घेत असलेल्या महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला.

नांदेड येथून पहिल्या टप्यात यात्रेकरूंना घेऊन खुराणा ट्रॅव्हल्स पंजाबकडे रवाना झाल्या होत्या. यात सतरा चालकांचा समावेश होता. हे चालक पंजाब येथून परतल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. यातील सतरा जणांपैकी तीन ट्रॅव्हल्स चालकांचे अहवाल पोझिटीव्ह आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून ते चारला चार जण हे ड्रायव्हर आहेत. नव्याने पॉझिटीव्ह झालेले रुग्ण यामध्ये एक जण लोहा तालुक्यातील किवळा, एक जण कंधार व नांदेड शहरातील सांगवी परिसरातील आंबा नगर येथील असल्याचे समजते.

नांदेड़ मध्ये बाहेरुन आलेल्या त्या कोरोना ग्रस्त महिलाचा मृत्यु

नांदेड़ मध्ये बाहेरुन आलेल्या त्या कोरोना ग्रस्त महिलाचा मृत्यु

फाइल फोटो


नांदेड़| प्रतिनिधी
नांदेड़मध्ये तीसरी  कोरोना पाॅझिटिव्ह  महिला रुग्ण आढळून आली आली होती. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीनवर पोहोचली होती. याबाबची माहिती अशी की नांदेड येथे दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्या एका  महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सांयकाळी उघडकीस होते.ही महिला सेलूची जिल्हा परभणी येथील रहिवासी असून ती नांदेडमध्ये आपल्या दोन मुलांसोबत आली होती ती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर
त्या महिलावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले होते

पन त्या महिलाची उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. ती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या दोन्ही मुलांना कारन्टाईन करण्यात होते.

सेलू येथील ६० वर्षीय महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात  काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. 26 एप्रिल रोजी ती महिला सेलूस आली. दोन दिवस कुटुंबियाबरोबर राहिल्यानंतर तेथून उपचारानिमित्त ती महिला दि.28 एप्रिल रोजी नांदेडला रवाना झाली. शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथील रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु असतांना तेथील वैद्यकीय अधिका-यांनी कोरोना तपासणी संदर्भात स्वॅब घेतला असता, अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. तेंव्हा ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. नांदेड मध्ये सेलू वरून आलेल्या कोरोना बाधित महिलेचा आज उपचार दरम्यानGMC रुग्णालयात मृत्यू झाला, आरोग्य विभागाने दिली माहिती
 नांदेडला एकाच दिवसात कोरोनाचे दोन बळी!
आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. या बातमीस नांदेड जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दुजोरा दिला आहे.

नांदेड़च्या त्या कोरोनाबाधित व्यक्तीचा अखेर मृत्यू !

नांदेड़च्या त्या कोरोनाबाधित व्यक्तीचा अखेर मृत्यू !


                                   फाईल फोटो

पिरबुऱ्हाणनगर भागातील त्या 64 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा अखेर मृत्यू झाला आहे.वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.पण दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत होती.मधुमेह,अस्थमा यासह अनेक आजार असल्याने तो उपचाराला प्रतिसाद देत नव्हता आणि शेवटी गुरुवारी दुपारी त्याने आपले प्राण सोडले.

पिरबुराहणनगर येथील 64 वर्षीय कोरोना बाधीत रूग्णाचा दुसरा अहवाल नुकताच निगेटिव्ह आला होता,त्या रूग्णाचा मृत्यू झाला असल्याचे  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दुजोरा दिला आहे.
पिरबुऱ्हाणनगर भागातील त्या कोरोनाग्रस्त व्यक्तीचा  मृत्यू झाला असुन .वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.पण दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती.मधुमेह,अस्थमा यासह अनेक आजार असल्याने तो उपचाराला प्रतिसाद देत नव्हते  आणि शेवटी गुरुवारी दुपारी त्याने आपले प्राण सोडले

Wednesday, April 29, 2020

नांदेड़ मध्ये कोरोना रुग्ण वाढले अत्ता एक महिला रुग्ण संख्या झाली तीन

नांदेड़ मध्ये कोरोना रुग्ण वाढले अत्ता एक महिला रुग्ण संख्या झाली तीन 



नांदेड़| प्रतिनिधी
नांदेड़मध्ये तीसरी  कोरोना पाॅझिटिव्ह  महिला रुग्ण आढळून आली आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. याबाबची माहिती अशी की नांदेड येथे दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्या एका  महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सांयकाळी उघडकीस आले.ही महिला सेलूची जिल्हा परभणी येथील रहिवासी असून ती नांदेडमध्ये आपल्या दोन मुलांसोबत आली होती ती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या दोन्ही मुलांना कारन्टाईन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
त्या महिलावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले आहेत 


सेलू येथील रहिवाशी महिला नांदेडला उपचारादरम्यान कोरानाबाधित झाली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनास कोरोनाग्रस्त  त्या महिले संदर्भात माहिती प्राप्त झाली असून त्या आधारेच प्रशासनाद्वारे आता त्या महिलेच्या संपर्कात सेलूतील कोणी कुटूंबिय किंवा अन्य व्यक्ती आल्या का, या संदर्भात तपासणी केली जाणार आहे.
सेलू येथील महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात  काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. 28 तारखेस ती महिला सेलूत आली. तेथून उपचारानिमित्त पुन्हा नांदेडला रवाना झाली. तेथील रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु असतांना तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोरोना तपासणी संदर्भात स्वॅब घेतला. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. तेंव्हा ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने तातडीने त्या महिलेच्या कुटूबियांसह परभणी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास माहिती कळविली.
दरम्यान, प्रशासनाद्वारे ती महिला नेमकी कोणत्या रुग्णालयात उपचार घेत आहे, तीचे कुटूबिय कुठे आहेत, ती कोणा कोणाच्या संपर्कात आली. या संदर्भात नांदेड पाठोपाठ परभणी जिल्हा प्रशासनानेही माहिती घ्यावयास सुरुवात केली आहे.
  त्या महिलाच्या संप्रकात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करून घ्यावयाची आहे असे आवाहन पुन्हा एकदा जिल्हा नांदेड़ व परभनीचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

लॉकडाऊन काळात या तालुक्यात २५ हजाराचा गुटखा जप्त

लॉकडाऊन काळात या तालुक्यात २५ हजाराचा गुटखा जप्त


कालिदास अनतोजी 
धर्माबाद : कोरोना सारख्या महामारीने सबंध मानवी जनजीवन विस्कळीत झालेले असतांना दुसरीकडे मात्र दारु,गुटखा, तंबाखू विक्री करणा-या तस्करांचं चांगभलं होत आहे.सध्या देशात लॉकडाऊन सुरू असल्याने महसूल विभागाचे भरारी पथक हे निश्चित वेळेत दुकाने बंद न करणारे व वीना परवाना सुरु ठेवणा-या दुकानांवर प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करत आहे तसेच एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना धर्माबाद शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. लॉकडाऊनमध्ये तालुक्यातील करखेली येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांच्या घरावर पोलिसांनी मंगळवारी (ता.२८) रात्री छापा टाकून अंदाजित २५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यानच्या एकवेळ पोटाला भाकरी मिळणे कठीण,परंतू व्यसनी लोकांना अवैधमार्गे दारु,गुटखा मात्र अवैध विक्रेते हे चढ्या दराने व सहज उपलब्ध करुन देतांना पहावयास मिळत आहेत.कारण होम लॉकडाऊन,संचारबंदी व आदी प्रकारचा अधिकचा कर्तव्यभार पोलीसांवर पडलेला असल्याचा गैर फायदा घेऊन ते लोक हा अवैध धंदा करत आहेत.

कोरोना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र जीवनावश्यक वस्तू सोडून इतर व्यवसाय बंद आहेत. त्यात सर्वच प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. लॉकडाऊन दरम्यान तंबाखूजन्य पदार्थाचा तुटवडा असल्याने त्याची चढ्या भावाने धर्माबाद शहरासह तालुक्यात अवैध गुटखा विक्री होत आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली येथे अवैध गुटखा विक्री जोमाने होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांना मिळाली व त्यांनी सर्व माल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे 

Monday, April 27, 2020

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे 9 लक्ष 75 हजार रुपये मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे  9 लक्ष 75 हजार रुपये मदत



नांदेड ,(कालिदास अनतोजी)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  यांचे  एक दिवसाचे वेतन  9 लक्ष 75 हजार 136 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता  निधी करिता आज कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. 
   कोविड -19 कोरोना साथ रोग नियंत्रण कामात मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता  निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकराव चव्हाण यांनी केले होते.
     त्यास प्रतिसाद देत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी  यांना निधी देण्याचे आवाहन केले होते.
     त्या नुसार विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांच्या मार्च महिन्याच्या वेतनातील  एका दिवसाचे वेतनाचा  9लक्ष 75हजार 136 रुपयांचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा धनादेश आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड चे  पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्याकडे  कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी  सुपूर्द केला. या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांची उपस्थिती होती. 
    पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या वेळी विद्यापीठात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहीती घेतली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयातील शिक्षक व शक्षकेत्तर कर्मचारी यांनी ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले आहे.

Sunday, April 26, 2020

नांदेड़ मध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण ; जिल्हा शाल्यचिकित्सक नीलकंठ भोसिकर

नांदेड़ मध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण ; जिल्हा शाल्यचिकित्सक नीलकंठ भोसिकर


                             फाइल फोटो



नांदेड़| प्रतिनिधी
नांदेड़मध्ये दुसरा कोरोना पाॅझिटिव्ह  रुग्ण आढळून आला आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.  याबाबची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक नीलकंठ भोसिकर  यांनी दिली आहे.
 एकूण 962 संशयिताची नोंद झाली होती त्यांपैकि 688 नमुने तपासणीसाठी पाठवले होते,तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यातील 629 अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. व तसेच 53 चाचणी अहवाल प्रलंबित आहेत अत्ता पर्यत 5 चाचणी चा आवशकता नसल्याची माहिती दिली आहे व तसेच त्या व्यक्तीवर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात कोण-कोण आले आहेत याबाबची माहिती मिळविणे सुरूं आहे.त्या व्यक्तीच्या संप्रकात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करून घ्यावयाची आहे असे आवाहन पुन्हा एकदा जिल्हा शल्यचिकित्सक नीलकंठ भोसिकर यांनी केले आहे.

खळबळजनक:- 49 वर्षीय इसमाने झाडाला गळफास लावून केली आत्महत्या

खळबळजनक :- 49 वर्षीय इसमाने झाडाला गळफास लावून केली आत्महत्या



भोकर (प्रतिनिधी)
49 वर्षीय इसमाने वन वन विभागाच्या जमिनीवर असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोकर तालुक्यातील भोसी अंतर्गत रामनगर टांडा येथे ही घटना घडली आहे

 छगन देऊ राठोड असे त्या इसमाचे नाव आहे घरातील कर्ता व्यक्तीने आत्महत्या केल्याने राठोड कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
भोकर तालुक्यातील भोसी भागातील रामनगर टांडा परिसरात वन विभागाच्या जागेवर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन छगन देऊ चव्हाण (49, रा. रामनगर टांडा भोकर) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता घडली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही बँकेचा कर्ज नव्हता तसेच व शेतकरी पण नव्हता
त्याने ही आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हा मृतदेह  पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी भोकर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तो पाठविला. त्याच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले छगन राठोड च्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

राज्यस्तरीय भीमगीत स्पर्धेत भोकरचा धम्मानंद जाधव ठरला मानकरी

राज्यस्तरीय भीमगीत स्पर्धेत भोकरचा
धम्मानंद जाधव ठरला मानकरी.


भोकर.(प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती यंदा  सार्वजनिकरीत्या साजरी करता आली नाही. यावर उपाय म्हणून हिंगोली  येथील ऊपासकानी मोबाईलवर  राज्यस्तरीय भीमगीत स्पर्धा घेतली . महाराष्ट्रासह अन्य राज्यातील सुमारे पावणेतीन हजार स्पर्धेकानी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेचा निकाल शनिवारी ( ता.२५) जाहीर करण्यात आला असून भोकर येथील भीम शाहिर  धम्मानंद जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावून मानकरी ठरला आहे.
#यावर्षी देशात कोरोना विषाणूंमुळे हाहाकार उडाला असून अनेकांना जीव गमावावा लागला आहे.यावर उपाय म्हणून देशात मागील महिन्यापासून "लाॅकडाऊन" करण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाली आहेत.अनेक महापुरुषांच्या जयंतीला फाटा द्यावा लागल्याने घरात बसूनच सण उत्सव साजरे करावे लागलेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सूध्दा यंदा घरात बसूनच साजरी करण्यात आली.सार्वजनिक ठिकाणी कूठलाही कार्यक्रम आयोजित करता आला नाही.शासनाचे आदेश पाळून मराठवाड्यातील हिंगोली येथील काही आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक बापूराव घोंगडे.शिवाजी गावडे.अभिनंदन घोंगडे यांनी भीमजंयती निमित्ताने राज्यस्तरीय भीम गीत स्पर्धा आयोजित केली होती.स्पर्धेकानी मोबाईलवर गीताची व्हिडिओ क्लिप करून आयोजकांकडे पाठवली होती.यात महाराष्ट्र.तेलगंणा.कर्नाटक.गोवा.मध्यप्रदेश.गूजरात राज्यातील सुमारे दोन हजार सातसे त्र्येचाळीस बांधवांनी सहभाग नोंदविला होता.परिक्षक म्हणून संतोष खिल्लारे   व पत्रकार प्रकाश इंगोले (हिंगोली) यानी काम पाहील . स्पर्धेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला असून  सांगली येथील पृथ्वीराज देवानंद माळी (प्रथम). आकाश गायकवाड यळवत मंडळ तानूर जिल्हा निर्मल तेलंगणा (व्दितीय).भोकर जिल्हा नांदेड येथील भीम शाहिर धम्मानंद जाधव (तृतीय) पारितोषीकाचे मानकरी ठरले आहेत. गायक श्री. जाधव यांना तबल्याची साथ भोकर येथील  बातमीदार बाबूराव पाटील तर आॅर्गनची साथ प्रवचन लोखंडे यांनी केली आहे. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम  लवकरच देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Thursday, April 23, 2020

भारत लोक सेवक पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिजेश तिवारी(मुंबई) यांचा भारत प्रभात पार्टी मध्ये प्रवेश

भारत लोक सेवक पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिजेश तिवारी(मुंबई) यांचा भारत प्रभात पार्टी मध्ये प्रवेश





मुंबई:-(प्रतिनिधी)
भारत प्रभात पार्टी अर्चना सिंह बहनजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात माधव मेकेवाड यांची संपूर्ण टीम कार्य उत्कृष्ट करत आहे त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास करून ब्रिजेश तिवारी यांची भारत लोक सेवक पार्टी मधून तात्काळ राजीनामा देऊन भारत प्रभात पार्टी मध्ये आपला प्रवेश केला आहे पक्ष कमिटीने सुद्धा त्यांना युवक आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव पदी नियुक्ती देऊन महत्वाची जबाबदारी दिली आहे.ब्रिजेश तिवारी यांचं वास्तव्य मुंबई येथे आहे .ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा पूर्वी सांभाळल्या मुळे त्यांचा निश्चित भारत प्रभात पार्टीला फायदा होणार असल्याचे पक्ष कमिटीच्या पदाधिकारी यांनी कळविले आहे.डॉ.नितीन पवार(महासचिव),डॉ.रेखा पाटील(राज्य महासचिव),हेमंत खरात मुंबई(राज्य उपाध्यक्ष),दिपा आवळे(महिला आघाडी,प्रदेश अध्यक्ष),सोमनाथ साधू(युवक आघाडी,प्रदेश अध्यक्ष),विजय घाडगे(युवक आघाडी,राज्य उपाध्यक्ष) आदींनी  त्यांच्या निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या आहे.
महाराष्ट्र काँग्रेस,भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी ह्या प्रमुख राजकीय पार्टी आहेत त्यात पुढील महत्वाच्या निवडणुकीत केवळ भारत प्रभात पार्टी जनतेच्या मनात असणार असल्याचा विश्वास ब्रिजेश यांनी दिला आहे.युवक हा देशाचा कणा असतो म्हणून देश पातळीवर राजकीय कार्य करून युवकांना न्याय देणारी पार्टी म्हणून महाराष्ट्र मध्ये मी ओळख निर्माण करेन आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका मुंबई सह भारत प्रभात पार्टी लढवणार आहे म्हणून मी ह्या राजकीय पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी कळविले आहे.


                                 जाहिरात👇



Wednesday, April 22, 2020

अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनच्या वतीने मौ.मांगदरा येथील गरजूंना मदतीचा एक हात!

अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनच्या वतीने मौ.मांगदरा येथील गरजूंना मदतीचा एक हात!



अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती ता.भोकर व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अन्न व धान्याचे करण्यात आले वाटप

भोकर प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या असंख्य गरीब व गरजूंची उपासमार होत आहे.सामाजिक जाणिवेतून अनेक सामाजिक संस्था,संघटना व दानशूरांकडून सर्वत्र मदतीचा ओघ सुरु आहे.विशेषत: शहरी भागात याचे प्रमाण अधिकचे आहे.परंतू ग्रामीण भागातही अशा प्रकारे मदतीची अत्यंत आवश्यकता आहे.याची जान ठेऊन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे यांच्याकडून १ महिन्याचे धान्य व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती ता.भोकर आणि भोकर तालुका मराठी पत्ररार संघाच्या वतीने जेवन असे ४०० गरजूंना दि.२० एप्रिल २०२० रोजी मौ.मांगदरा ता.भोकर येथील ४०० गरजूंना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले आहे.




ग्रामीण भागातही अनेकांचा उपासमार होत आहे. शासनाकडून स्वस्त धान्याचे वितरण होत आहे. धान्य मिळत आहे परंतू ते खायचे कशा सोबत ? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.दाळ,तिखट,मीठ, साखर, तेल आदी काही लागते.त्यासाठी पैसे कुठून आणायचे ? हा प्रश्न देखील आहेच.याची जान असलेल्या अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,मराहाष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने असे ठरविले की,शासनाचे धान्य खरेदीसाठी या गरीब गरजूंना जे पैसे दुकानदारास द्यावे लागतात,ते त्यांनी द्यायचे नाहीत,तर ते पैसे संघटनेच्या वतीने द्यायचे व त्या गरजूंनी धान्य खरेदीपोटीचे जमा राहणा-या पैशातून उपरोक्त जीवनावश्यक वस्तू खरेदीवर खर्च करावा.

याच अनुशंगाने अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे यांनी त्या धान्याचे एकूण शुल्क दिले.तर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती ता.भोकर व भोकर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने जेवन दिले.अशा प्रकारे मौ.मांगदरा (सिद्धार्थ नगर)ता.भोकर येथील ४०० गरीब,गरजूंना दि.२० एप्रिल २०२० रोजी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती ता.भोकर व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत Social Distancin चे नियम पाळून अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.तसेच सदरील धान्य शुल्काच्या रक्कमेचा धनादेश उत्तम बाबळे यांच्या हस्ते स्वस्त धान्य दुकानदारास देण्यात आला.

सदरील मदत ही मोठी नसली तरी किमान दोन घास भरविणारी नक्कीच आहे.समाजात पैशेवाले व सरकारी नौकरीवाले मोठे पदस्त लोक आहेत.परंतू ते ग्रामीण भागातल्या गरजूंकडे फिरुनही पाहत नाहीत.यामुळे हा उपक्रम पाहणा-यास लहान जरी दिसत असला तरी गरजूंच्या पदरी काहीतरी टाकणारा अभिनव उपक्रम नक्कीच आहे.या सेवाभावी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते सखाराम मोरे,नामदेव वाघमारे,पत्रकार सिद्धार्थ जाधव, गंगाधर पडवळे,राजन्ना माहूरकर, गोणेकर,देवराव मनपुर्वे, शिवकुमार गाडेकर,दत्ता आष्टीकर,राहूल कदम,पांडूरंग सुर्यवंशी,श्रीकांत बाबळे,साई मोरे यांसह आदींनी प्रयत्न,परिश्रम व सहकार्य केले आहे.

दोन दुचाकी समोरा समोर भिडल्याने एक युवक ठार तर चार जखमी

 दोन दुचाकी समोरा समोर भिडल्याने एक युवक ठार तर चार जखमी

 गंभीर पैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक ,



जिंतूर प्रतिनिधी/सय्यद नसीर
 जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे हद्दीतील बामणी फाट्या जवळ झालेल्या दुचाकी  अपघातात एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले या जखमी पैकी दोन जणांना परभणी येथील सामान्य  रुग्णालयात हलवण्यात आले आहे 
   याबाबत अधिक वृत्त असे कि जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाणे हद्दीतील कोळपा येथील युवक रवी सातपुते व त्याचा मित्र  बाबु सखाराम गिरी हे कोळप्याहुन ( MH 22 0625 ) या दुचाकीवरुन बामणी कडे येत होते तर सिध्दार्थ नामदेव अंभुरे व त्याचे दोन मिञ हे (MH 22 AF~8145) या दुचाकीवरुन अंबरवाडीहुन बामणी कडे जात असतांना या दोन वाहनांची बामणी फाट्या जवळ दि 22 एप्रिल बुधवार रोजी सकाळी 9;30 च्या सुमारास एकमेकांच्या विरुद्ध दिशेने भरधाव वेगात असल्याने समोरसमोरून भिडल्यामुळे हे अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे ,तर या झालेल्या दुचाकी अपघातातील अपघातग्रस्तांना जिंतूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी प्रथम उपचारा दरम्यान त्यातील रवि पंजाब सातपुते वय 25 वर्ष, ( रा. कोळपा ता जिंतूर) यास मृत घोषित केले तर बाबु सखाराम गिरी वय 25 वर्ष,(संक्राळा,जिंतूर),सिध्दार्थ नामदेव अंभुरे वय 25 वर्ष,विकास शिवाजी भुतेकर वय 20 वर्ष दोघेही (रा. केलसुला ता सेनगाव जि हिगोली),मिलिंद बबन दुजाकर वय 32 वर्ष (रा. बोरी जिंतूर) हे चार जण गंभीर जखमी झाले असल्याचे कळविले आहे यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना पुढिल उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे तर मृतक व्यक्तीवर  शवविच्छेदन प्रक्रिया जिंतूर शासकीय रूग्णालयात सुरू असून या प्रकरणात बातमी लिहीपर्यंत बामणी पोलीसांत  अपघाताची नोंद  झाली नव्होती, तर या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे ,

भोकर वासियानो बीन कामी बाहेर निघाल तर 500 रु दंड भराल

भोकर वासियानो बीन कामी बाहेर निघाल तर 500 रु दंड भराल





प्रशासनाने  उचलली कठोर पावले विनाकारण फिरणाऱ्यांना लागणार दंड

भोकर( प्रतिनिधी )
देशासह टाळेबंदी लागू असतानासुद्धा काहीही कारण सांगून बिनधास्तपणे फिरणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली असून तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी आदेश काढत भोकर शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील कोरेना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतीबंधात्मक उपाययोजना म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 साथ प्रतिबंधात मग कायदा 1882 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संचारबंदी लागू केली असून भोकर शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात कोरेणा विषाणु चा प्रादुर्भाव  रोखण्याकरिता संचारबंदी लागू असून अनेक नागरिक विनाकारण खासगी दुचाकी वाहने कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही म्हणून महसूल प्रशासनाने सकाळी सात ते एक वाजेपर्यंत विनाकारन पाई फिरणे  व  दुचाकीवर विनाकारण डबलसीट फिरणे अशांना पाचशे रुपये दंड मास्क न लावता फिरणाऱ्यांना दोनशे रुपये दंड विनापरवानगी (पास न घेता) आस्थापना अशा दुकानदारास पाचशे रुपये दंड आणि आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणे असे आदेश पोलीस प्रशासन नगरपालिकेला दिले आहे

जिंतुर नगर पालिकेच्या वतीने विलगिकरण कक्षाची स्वच्छता

जिंतुर नगर पालिकेच्या वतीने विलगिकरण कक्षाची स्वच्छता



जिंतुर/प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील अकोली येथील वसतिगृहामधील  विलगिकरण कक्ष असल्यामुळे त्याची  सफाई करण्यात आली आहे


याबाबत अधिक माहिती अशी की जिंतुर शहरापासून ३ कि.मि.अंतरावर असलेल्या अकोली येथील वसतिगृहमध्ये विलगिकरण कक्ष असुन त्यामुळे त्या वसतिगृहाची दि .२२/०४/२०२०बुधवार रोजी सफाई करण्यात आली आहे सदर सफाई काम नगर पालिकेच्या स्वच्छता निरिक्षक सालेह चाऊश  व नागराल इंडिया प्रा.लि.चे महेश सुरवसे यांच्या उपस्थितीत स्वच्छता कामगारांनी सफाई केली आहे

पीर बुऱ्हाण चे सर्व रास्ते सील प्रशासनाला सहकार्य करा पोलीस निरीक्षक कदम

पीर बुऱ्हाण चे सर्व रास्ते सील प्रशासनाला सहकार्य करा पोलीस निरीक्षक कदम



नांदेड -- पीर बुऱ्हाण नगर कडे जाणारे सर्व रस्ते पोलीस अधीक्षक विजय मगर  यांनी दिलेल्या आदेशानुसार बंद करण्यात आले असून नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊन कायदा मोडू नये असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे. 
     कोरोना साथ रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश  लागू आहे त्यात साथ रोग कायदा लागू करण्यात आला आहे.  शहरातील पिरबुऱ्हान नगर भागात एक रुग्ण आढळून आल्या नंतर मा. पोलीस अधीक्षक मगर यांना प्राप्त अधिकारानुसार व त्यांनी दिलेल्या  आदेशानुसार वर्कशॉप कॉर्नर ते आनंद नगर व राज कॉर्नर ते शिव मंदिर या मार्गावरून पीर बुऱ्हाण नगर कडे जाणारे सर्व रस्ते कोणतीही वाहतूक करण्यास बंद करण्यात आले आहेत. 
   जिल्ह्यात 144 कलम लागू असल्यामुळे नागरिकांनी काम नसेल तर रस्त्यावर येऊ नये असे आवाहनही  कदम यांनी केले आहे.  पोलीस कर्मचारी ऊन व कसल्याही संकटाची तमा न बाळगता रस्त्यावर सेवा बजावत आहेत त्या मुळे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

विविध विषयांवर तहसीलदार यांच्याशी केली चर्चा !

विविध विषयांवर तहसीलदार यांच्याशी केली चर्चा !



धर्माबाद-(प्रतिनिधी) देशावर महामारी च्या माध्यमातून कोरोना च्या रूपाने एक भयानक संकट कोसळले असुन या रोगाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ात पाय पसरलेले आहे.
सुदैवाने आजपर्यंत नांदेड जिल्ह्य़ात एक ही रूग्ण पॉझिटिव्ह  मिळाला नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांचे व जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर ,पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर ,व जिल्हाची आरोग्य यत्रंना यांच्या नेतृत्वाखालील सर्व टिमचे पक्षाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. तहसिल कार्यालय येथे तहसीलदार दतात्रय शिंदे  यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आसून मागील अनेक महिन्यापासून विविध योजना तील निराधार व्यक्तींना मानधन वाटप झालेले नव्हते त्यामुळे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मागच्या आठवड्यात त्वरित आदेश दिले व मानधन वाटपाला सुरवात झाली. धर्माबाद शहरातील व तालुक्यातील एकुण ४०३० लाभार्थी पैकी ३८०० लाभार्थी यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून २३० लाभार्थी शिल्लक आहेत एकुण एक कोटी तीस लाख लाभार्थी यांच्या   खात्यात जमा झाल्याची माहिती तहसीलदार दतात्रय शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिली.
अनेक लाभार्थी यांचे फिंगरप्रिंट येत नसल्याने वयोवृद्ध लोकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी कॉग्रेस कमिटी तर्फे करण्यात आली.
तालुक्यातील व शहरातील स्वस्त धान्य दुकान मार्फत वाटप होणाऱ्या धान्य संदर्भात व्यवस्थितपणे व योग्य नियमानुसार वाटप करण्याची
मागणी करण्यात आली.ऑनलाईन नसलेल्या शिधापत्रिका धारक कुटुंबाना अॅपद्वारे आधार नोदणी करून अन्नधान्य देण्यात येईल असे तहसीलदार  यांनी सांगितले.
तेलंगणा राज्यामधील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहती खबरदारी चा उपाय म्हणून दररोज शेजारच्या राज्यातुन येणारे दुधवाले,मालवाहतूक, सकाळी पहाटेच्या सुमारास येणारे पदयात्री,पायोनियर कंपनी ला येणारी वाहतूक ईत्यादी पुर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली.  ग्रामीण रुग्णालय संर्दभातही सविस्तर माहिती घेऊन किरकोळ त्रुटी बद्दल सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
शहरात माहेश्वरी भवन येथे सी. सी. सी. सेंटर, संस्पेक्टीव्ह सेंटर, लेबर रूम,तसेच टेंम्परेचर मशीन-०५ अशी व्यवस्था करण्यात आल्याचे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण  व मा. आ. वसंतराव चव्हाण यांनी धर्माबाद शहरातील प्रत्येक कॉग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब माणसाच्या सुख दुखात जाऊन मदत करण्याच्या सूचना करून कॉग्रेस पक्षाचे हेच ध्येय असल्याचे म्हटले आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण  यांच्या सुचनेनुसार येणाऱ्या काळात रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबाना सुद्धा धान्य वाटप करण्यात येणार आहे.
धर्माबाद तालुका व शहराच्या परिस्थिती वर  लवकरच धर्माबाद कॉग्रेस कमिटी मा. पालकमंत्री यांची भेट घेणार आहे.
सदरील  बाबतीत तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा करतेवेळी तालुकाध्यक्ष दत्ताहरी पाटील चाेळाखेकर, बुथ कमिटी अध्यक्ष गोविंद पाटील रोषनगावकर,  शहराध्यक्ष ताहेर पठाण, न पा सभापती निलेश पाटील बाळापुरकर,नगरसेवक प्रतिनिधी राजु सुरकुटवार,डॉ अनिलकुमार रत्नाळीकर, नगरसेवक सायारेड्डी गंगाधरोड,हानमंत नरवाडे,विठ्ठल कोडंलवाडे,मारोती डेबेकर,मार्केट संचालक शेख गौससाब, अल्पसंख्याक चे शेख माजीद, इंजि मोसिनखान,ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

मस्जिद कमेटी तर्फे क्वारंटाईनमधील नागरिकांच्या नाष्ट्याची व्यवस्था ,

मस्जिद कमेटी तर्फे क्वारंटाईनमधील नागरिकांच्या नाष्ट्याची व्यवस्था ,




जिंतूर प्रतिनिधी/ 
कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने 14 दिवसासाठी  क्वारंटाईन मध्ये ठेवलेले आहे.ह्या क्वारंटाईन मधील नागरिकांना शासन प्रशासन मदत करत असून सुद्धा या कार्यासाठी मुस्लिम समाजातील नागरिकांच्या वतीने त्यांच्या नाष्ट्याची व्यवसथा करण्यात येत आहे
याबाबत अधिक माहिती अशी की कोरोना महामारीमुळे राज्यातील जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात आले आहे, या बंदीत जिल्हा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना जिल्ह्याच्या सीमेवरच विचारपूस केल्यानंतर  त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना थेट १४ दिवसासाठी क्वारंटाईन कक्षा मध्ये ठेवण्यात येत आहे ,त्या क्वारंटाईन मध्ये ठेवलेल्या नागरिकांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था शासनाकडून केली जात आहे तरीही जिंतूर शहरातील काली मस्जिद कमिटीच्या वतीने माणुसकीच्या नात्याने त्यांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती कमिटीचे अध्यक्ष मसूद पठाण यांनी सांगितले आहे  कमिटी चे अध्यक्ष मसूद पठाण यांच्या ममार्गदर्शनाखाली दिनांक.१७ एप्रिल शनिवार पासून दररोज सकाळी 8 वाजता क्वारंटाईनमधील नागरिकांना ते जिथे जिथे क्वारंटाईन केलेले आहे म्हणजे ,शासकीय रूग्णालय,पोलीस स्टेशनला, वसतिगृह आदी ठिकाणी जाऊन फळ,चिवडा,बिस्कीट,खारी सह वसतिगृह परिसरात जागेवरच गरमागरम चहा करून देण्यात येत आहे,सदर व्यवस्था हा जो पर्यंत क्वारंटाईनमध्ये  नागरिक राहतील तो पर्यंत ही वयवस्था सुरूच राहणार असल्याची माहिती मसूद खान पठाण यांनी एका लेखी निवेदनासह तहसीलदार सुरेश शेजूळ यांना दिली असून तहसीलदारांनी कमिटीच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या या मदतकार्याची प्रशंसा करून अभिनंदन केले आहे या मदतीच्या उपक्रमसाठी शेख  अखील,नवाज कुरेशी,शेख मुहम्मद ईलीयास,शेख अब्दुल  बारी,रियाज खान उर्फ बब्बू भाई,साजीद ठेकीया,पञकार शेख अलीमसह कमेटीच्या सदस्य परिश्रम घेत आहे




अडचणीत असलेल्यांच्या मदतीसाठी आम्ही पुढाकार घेतला तुम्ही पण घ्या ::=  मसुद पठाण
 सध्या कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झालेले आहे , त्यामुळे प्रत्यक समाजातील नागरिक जे रोजनदारीवर काम करणारे आणि रोज कमवून खाणारे रोजगार आहे बेरोजगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आल्याने ते हतबल झाले आहे म्हणून या सर्वांची काळजी घेऊन सर्व जाती धर्मातील प्रतिष्ठित मान्यवरांनी आप आपल्या परिसरातील गोरगरिब उपाशी राहू नये यासाठी सढ्ळ मदतीसाठी पुढाकार घ्यावे  असे आव्हान काली मस्जिद कमिटीचे अध्यक्ष मसुद पठाण यांनी केले आहे

Tuesday, April 21, 2020

धक्कादायक ;-नांदेड पिर बुऱ्हाणनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

धक्कादायक ;-नांदेड पिर बुऱ्हाणनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
 



कालिदास अनतोजी
नांदेड दि.२२ एप्रिल: नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन च्या काळात प्रशासनाने प्रचंड काळजी घेतली होती.
 जिल्ह्यात काल कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने नांदेड जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती होती. बुधवारी मात्र नांदेड शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णाचे वय 64 असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्यांदा लॉकडाऊन घोषित केल्यापासून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी जिल्ह्यातील परिस्थितीही आखून दिलेल्या नियमांप्रमाणे काटेकोर पद्धतीने हाताळली होती त्यामुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.

आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 683 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 222 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 89 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 70 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 613 अशी संख्या आहे.

दि. २१ एप्रिल रोजी  तपासणीसाठी 66 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 449 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 378 नमुने निगेटीव्ह आले असून 66 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी होते. नांदेड जिल्ह्यात काल पर्यंत कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने दिलासादायक परिस्थिती होती. काल पाठवलेले 66 संशयिताचे तपासणी अहवालातील उर्वरित 9 लोकांपैकी 8 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते तसेच 1 संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजते. बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 77 हजार 676 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले होते.

मंगळवारी रात्री नांदेड जिल्ह्यातून 8 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राहात असलेला संपूर्ण परिसर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण नाही घरी 591 जण क्वारंटाईमध्ये

जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण नाही घरी 591 जण क्वारंटाईमध्ये


कालिदास अनतोजी
  नांदेड :- जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 664 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 218 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 37 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 73 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 591 अशी संख्या आहे.
आज तपासणीसाठी 10 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 383 नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी 368 नमुने निगेटीव्ह आले असून 10 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 76 हजार 917 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.

भोकर मधून पंतप्रधान सहायता निधीसाठी एक लाखाची मदत ; खा चिखलीकर यांच्यसकडे धनादेश सुपूर्द

भोकर मधून पंतप्रधान सहायता निधीसाठी एक लाखाची मदत ; खा चिखलीकर यांच्यसकडे धनादेश सुपूर्द 



भोकर(प्रतिनिधी )लाॅकडाऊनमुळे    जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे अडचणीत सापडलेल्या गोरगरीब गरजवंत लोकाच्या  मदतीला धावून जात आहेत त्यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अशा अडचणीच्या  काळात लोकांना मदत करत आहेत२२लाख रुपयांचा पीएम सहाय्यता निधी देण्यात आला त्यानंतरही  कार्यकर्ते देणगीदार पुढे येत आहेत भोकर तालुक्याच्या वतीने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी १ लाख ५ हजार रुपये रुपयाचा धनादेश खा. प्रतापराव पाटील  यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आला आहे व तसेच भोकर येथील सामाजिक कार्यकर्ता दिलीप सोनटक्के यांनी 11 हज़ार रुपयाचा धनादेश पीएम सहय्यता निधिसाठी दिले आहे.



भोकर येथील  दिलीप सोनटक्के
गणेशराव पाटील कापसे बटाळकर, रावसाहेब पाटील लामकाणीकर, विशाल माने, शिवाजी जाधव, अजित पाटील, अनिल अंगदेगावे, राजू अंगरवार देवठाणकर, दिनेश लक्षटवार यांनी १लाख ५ हजार रुपयांचा धनादेश जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्या नंतर जिल्ह्यातील भाजपा च्या वतीने कार्यकर्त्यांना  'पीएम' फंडा साठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला भोकरच्या कार्यकर्त्यांनी हा फंड दिला
     देशात व राज्यात टाळेबंदी झाल्यानंतर सर्वसामान्य माणसांची परवर होऊ होऊ नये यासाठी जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर स्वतः जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांच्या  व गावांच्या ठिकाणी जाऊन लोकांच्या  समस्या अडचणी जाणून घेत आहेत त्यांची सोडवणूक करीत आहेत शिवाय भारतीय  जनता पार्टीचे जिल्ह्यातील सर्व आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष महानगराध्यक्ष, तालुका अध्यक्ष बूथप्रमुख कार्यकर्ते  अशी  सर्वांची टीम  अडचणीत सापडलेल्या लोकांच्या सेवेत अहोरात्र  गेल्या अनेक दिवसापासून कार्यरत आहेत शिवाय त्यांना मदतिला धावत  आहेत .खासदार प्रतापराव पाटील स्वतः जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत .. कोरोना सारख्या  अडचणीच्या काळात आपला "हक्काचा माणूस ' कठीण प्रसंगात धावून येता आहेत .खासदार असावे तर असे प्रतापराव पाटील  यांच्या सारखे असे  लोकभावना व्यक्त होत आहे   खा.चिखलीकर आणि  त्यांच्या टीम करीत असलेले  काम  संपूर्ण जिल्ह्यात  होत लक्ष्यवेधी ठरले आहे  काहीजणांना द्वेषाचा संसर्ग कायम दिसतो आहे

Sunday, April 19, 2020

दिलासादायक! ‘त्या’ कोरोनाग्रस्त ट्रक ड्राइवर च्या संपर्कात आलेले 18 जणांचे टेस्ट निगेटिव्ह

दिलासादायक!  ‘त्या’ कोरोनाग्रस्त ट्रक ड्राइवर च्या संपर्कात आलेले 18 जणांचे टेस्ट निगेटिव्ह


त्या सर्व पोलिस व आरटीओ एकूण 18 ची घबरदारी म्हणून केली होती तपासणी



नांदेड़ (प्रतिनिधि)
 दोन दिवसा अगोदर भोकर तालुक्यातील  महाराष्ट्र तेलंगणा सीमेजवळ असलेल्या चेक पोस्ट वरुण आम्बे भरलेला ट्रक घेऊन बुलढाना जिल्ह्यामध्ये एक ट्रक गेला होता तो कोरोना पॉझिटिव्ह होता दि.16 ते 18 एप्रिल दरम्यान कर्तव्यावर असलेल्या 3 पोलीस अधिकारी,9 पोलीस कर्मचारी,2 होमगार्ड व 1 स्वयंपाकी,तर आर.टी.ओ. विभागाचे 1 अधिकारी व 2 कर्मचारी अशा एकूण 18 जणांचा कोरोना पॉजिटिवच्या  संपर्कात आले नाही तरी पण संभाव्य संपर्क संशयावरुन खबरदारी म्हणून प्रथम भोकर ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली व पुढील तपासणीसाठी सायंकाळी नांदेड येथील स्व.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय,विष्णूपुरी येथे पाठविण्यात आले होते. सदरील सर्वांना कोरोना तपासणीस सामोरे जावे लागले होते  त्यांचे स्कॅब नमुने घेण्यात आले होते अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निलकंठ भोसिकर यांनी दिल होती आज रोजी त्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची दिलासादायक माहिती भोकर तालुका आरोग्य अधिकारी राहुल वाघमारे यांनी दिली आहे


सविस्तर बातमी अशी की विभाग तपासणी नाक्यावरील अधिकारी आणि कर्मचा-यांना ही कागदपत्रे दाखऊन आंब्याने भरलेला  ट्रक घेऊन ते बुलढाणा जिल्ह्यात गेला होता सदरील होम क्वॉरंटाईन ट्रक चालकाचे स्कॅब तपासणीसाठी तेलंगणाच्या संबंधीत कोरोना यंत्रणेने पाठविले होते.त्या तपासणीत तेलंगणा राज्य कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक यंत्रणेस तो ट्रक चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला. त्यामुळे तेथील यंत्रणा खडबडून जागी झाली व त्याच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो घरी नव्हता तर आंबे घेऊन महाराष्ट्रात गेला असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.यावरुन तेलंगणा पोलीसांनी महाराष्ट्र यंत्रणेस संपर्क साधला व त्या व्यक्तीपासून सतर्क राहण्याबाबद माहिती दिली होती.


.दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ७:०० वाजता तो ट्रक भोकर तालुक्यात येत आल्याचे समजल्यावरुन तेलंगणा पोलीसांनी नांदेड व भोकर पोलीसांना ही माहिती दिली.या माहिती नुसार सदरील तपासणी नाक्यावर तो ट्रक सकाळी अडविण्यात आला होता.यावेळी भोकरचे पो.नि. विकास पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहूल वाघमारे हे तात्काळ तपासणी नाक्यावर गेले आणि त्या ट्रक चालकाची,त्याच्या सहाय्यकाची चौकशी केली. यावेळी तो ट्रक चालक व त्याचा सहाय्यक या दोघांनी ट्रकमध्ये नाशिक जिल्ह्यातून कांदे आणल्याचे तपासात निदर्शनास आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले होते.

रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 18 जणांचे तपासणी अहवाल स्व.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय,विष्णूपुरी प्रयोगशाळेमध्ये पाठवले असता त्या सर्व 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहीती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच चेक पोस्टवर कसून तपासणी करण्यात येत आहे .जिल्ह्यात चोरून लपून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून अशा व्यक्तींना आश्रय देणाऱ्या लोकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले

एक हात मदतीचा संवेदनेच्या जागृतीचा या उपक्रमा खाली गरजूंना जेवणाचा डब्बा व धान्य वाटप

एक हात मदतीचा संवेदनेच्या जागृतीचा या उपक्रमा खाली गरजूंना जेवणाचा डब्बा व धान्य वाटप

भोकर प्रतिनिधी
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे.
याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरावर उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनटक्के यांच्या पुढाकाराने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होऊन एक हात मदतीचा संवेदनेच्या जागृतीचा या उपक्रमाखाली  २५ मार्च पासुन सलग तालुक्यातील   ४०० गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले व लाॅकडाऊनमुळे   शहराच्या विविध ठिकाणी पाल मध्ये अडकून  राहिलेले परप्रांतीय मजूर   त्यांना दोन टाइम  डब्बा देण्याचे उपक्रम राबवले असून त्यांच्या या उपक्रमांची दखल स्वता खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतली असून व पाठ थोपटत  असत कार्य करावे असे आवाहन पण केले आहे



या उपक्रमांला शहरातील प्रसिध्द व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते  देवानंद धुत,प्रा व्यंक्ट माने,नारायन सादुलवार, अनिल आंदेगाये,चंदु चक्रावार,विशाल माने,अजित पाटील, साईदास माळवंतकर, शिवा जाधव,



Saturday, April 18, 2020

पोलिस व आरटीओ असे एकूण 18 जन आले कोरोना पॉजिटिव च्या संपर्काता

पोलिस व आरटीओ असे एकूण 18 जन आले कोरोना पॉजिटिव च्या संपर्काता



संपर्कात आलेल्या पोलिस व आरटीओ एकूण 18 ची होणार कोरोना तपासणी


नांदेड़ (प्रतिनिधि)
भोकर तालुक्यातील  महाराष्ट्र तेलंगणा सीमेजवळ असलेल्या चेक पोस्ट वरुण आम्बे भरलेला ट्रक घेऊन बुलढाना जिल्ह्यामध्ये गेला होता तो कोरोना पॉझिटिव्ह होता दि.16 ते 18 एप्रिल दरम्यान कर्तव्यावर असलेल्या 3 पोलीस अधिकारी,9 पोलीस कर्मचारी,2 होमगार्ड व 1 स्वयंपाकी,तर आर.टी.ओ. विभागाचे 1 अधिकारी व 2 कर्मचारी अशा एकूण 18 जणांचा कोरोना पॉजिटिवच्या  संपर्कात आले नाही तरी पण संभाव्य संपर्क संशयावरुन खबरदारी म्हणून प्रथम भोकर ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली व पुढील तपासणीसाठी सायंकाळी नांदेड येथील स्व.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय,विष्णूपुरी येथे पाठविण्यात आले आहे. सदरील सर्वांना कोरोना तपासणीस सामोरे जावे लागणार असून त्यांचे स्कॅब नमुने घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निलकंठ भोसिकर यांनी दिली

सविस्तर बातमी अशी की विभाग तपासणी नाक्यावरील अधिकारी आणि कर्मचा-यांना ही कागदपत्रे दाखऊन आंब्याने भरलेला  ट्रक घेऊन ते बुलढाणा जिल्ह्यात गेला सदरील होम क्वॉरंटाईन ट्रक चालकाचे स्कॅब तपासणीसाठी तेलंगणाच्या संबंधीत कोरोना यंत्रणेने पाठविले होते.त्या तपासणीत तेलंगणा राज्य कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक यंत्रणेस तो ट्रक चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला. त्यामुळे तेथील यंत्रणा खडबडून जागी झाली व त्याच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो घरी नव्हता तर आंबे घेऊन महाराष्ट्रात गेला असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.यावरुन तेलंगणा पोलीसांनी महाराष्ट्र यंत्रणेस संपर्क साधला व त्या व्यक्तीपासून सतर्क राहण्याबाबद माहिती दिली.


.दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ७:०० वाजता तो ट्रक भोकर तालुक्यात येत आल्याचे समजल्यावरुन तेलंगणा पोलीसांनी नांदेड व भोकर पोलीसांना ही माहिती दिली.या माहिती नुसार सदरील तपासणी नाक्यावर तो ट्रक सकाळी अडविण्यात आला.यावेळी भोकरचे पो.नि. विकास पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहूल वाघमारे हे तात्काळ तपासणी नाक्यावर गेले आणि त्या ट्रक चालकाची,त्याच्या सहाय्यकाची चौकशी केली. यावेळी तो ट्रक चालक व त्याचा सहाय्यक या दोघांनी ट्रकमध्ये नाशिक जिल्ह्यातून कांदे आणल्याचे तपासात निदर्शनास आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

Monday, April 13, 2020

बाबांनो जीव महत्त्वाचा की पाचशे रुपये भोकरच्या बँकेसमोर तोबा गर्दी...

बाबांनो जीव महत्त्वाचा की पाचशे रुपये भोकरच्या बँकेसमोर तोबा गर्दी...



भोकर (एजास कुरेशी)
कोरोना व्हायरस वेगात पसरत असल्याने, शासनाच्या आदेशाने (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्वाना घरी थांबणे बाबत जन जागृती सध्या चालू आहे. परुंतु सदर आदेशाचे  उल्लंघन होत असताना चित्र सध्या भोकर शहराततील एस.बी.आय. बँकेसमोर दिसत आहे

  घराबाहेर पडू नका सोशल डिस्टन्स चा पालन करा असे ओरडून ओरडून सांगून राहिलो काही ऐकायला तयार नाही आता हे भोकर च्या एस. बी. आय.  बँकांमधील चित्र पहा जिकडे-तिकडे लोकांची तोबा गर्दी का करत आहेत बरं हे सगळं कशासाठी तर अवघे पाचशे रुपये मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या बचत खात्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये जमा करण्यात आलेले पैसे काढण्यासाठी



सध्या देशात कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर शासना कडुन कलम १४४ लागु करण्यात आलेले आहे, दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेशीत केलेली संचारबंदी सुरू आहे, बंद काळात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने खुली ठेवतांना सोशल डिस्ट्ंस पाळण्याचे सक्त आदेश आहेत, भोकर येथिल बाजार समिती कडुन शेतकर्यांचा माल खरेदी करण्याची प्रक्रीया सुरू आहे, समिती कडुन सोशल डिस्टंस पाळण्याचे ध्वनिक्षेपका वर वारंवार सांगितले जात असतांना येथे येणारा शेतकरी वर्ग सामाजीक अंतर न पाळता तोंडाला मास्क देखिल लावत नाही,  यामुळे नागरीकां कडुन चिंता व्यक्त केली जात आहे.

पुणे येथून परतलेल्या त्या ५ महिलांना होम कोरोंनटाइन

पुणे येथून परतलेल्या  त्या ५ महिलांना होम कोरोंनटाइन




भोकर (एजास कुरेशी)  देशभरात कोरोनाची लागण  होऊन दुसरा टप्पा सुरु झाल्याने प्रशासन कडक भुमीका घेत असून  विणकामी फिरणाऱ्याला लाठीचा प्रसाद देत आहे ग्रामीण भागातील रहिवाशांनी  यांच्यात कोरोना या विषाणू बाबत मोठी दहशत निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील लोक देखील बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना प्रवेश नाकारत आहेत तर आपल्याच गावातील बाहेर कामासाठी गेलेल्या युवकांना परत आल्यास प्रशासनाला कळविण्यात धाडस दाखवत आहेत . भोकर तालुक्यातील सावरगाव येथील   ५ महिला लॉक डाऊनवाढल्यांने पुणे येथून आपले गाव जवळ करावे या उद्देशांनी  परत सावरगाव येथे येताच गावकऱ्यांनी सतर्कता दाखवत त्वरित प्रशासनाला कळविले त्या पाच महिलांची  भोकर आरोग्य विभाग मार्फत तपासणी करून   त्या महिलांना १४ दिवस कोरोंटाईमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.देण्यात आले गावातील एका घरात त्यांना होम कोरोंटाईन करण्यात आले


Sunday, April 12, 2020

खळबळजनक लॉकडाऊनदरम्यान अल्पवयीन मुलीला बाहेर बोलवले अन केला तिच्यावर बलात्कार

खळबळजनक... लॉकडाऊनदरम्यान
अल्पवयीन मुलीला बाहेर बोलवले अन केला तिच्यावर बलात्कार



भोकर तालुक्यातील थेरबन येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार  केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी बलात्कार  केलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.


 आजोळी आलेल्या एका अल्पवयीन मुलीस घरुन बोलाऊन नेऊन एका तरुणाने बळजबरीने दोन वेळेस शारिरीक संबंध केले.या प्रकणी त्या तरुणा विरुद्ध बलात्कार व बाल लैंगीक अत्त्याचार प्रतिबंधक कायदा नुसार भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाहिले दोघे एकाच गावात (किनी) राहत असल्यामुळे जुनी ओळख असलेला बालाजी बाबुराव चव्हाण रा.डौर ता.भोकर ह.मु.किनी ता.भोकर हा तरुण दि.11 एप्रिल 2020 रोजी रात्री मौ.थेरबन ता.भोकर येथे गेला व तिला आजूळच्या घरुन बाहेर बोलाऊन घेतले.जुनी वळख असल्यामुळे त्याला बोलायला ती आली असता त्याने बोलायचे आहे चल म्हणून तिला गावच्या खालच्या बाजूस असलेल्या पडीत शेतात नेले.तसेच ती अल्पवयीन आहे हे माहित असतांना देखील दि.12 एप्रिल 2020 रोजी रात्री 12:20 वाजताच्या दरम्याने त्याने बळजबरीने तिच्या सोबत दोन वेळा शारिरीक संबंध केले


रात्री घरी न आल्याने आजूळच्यांनी तिच्या आई वडीलांना सांगितले असता ते तात्काळ  आले व त्या मुलीचा  शोध घेणे सुरु असतांना सकाळी थेरबन शिवारात ती त्यांना भेटली असता.घडलेल्या प्रकाराची माहिती तिने कुटूंबीयांना सांगीतली.तसेच आई वडीलां सोबत येऊन या पीडित मुलीने भोकर पोलीसात रितसर जबाब दिला.


बालाजी बाबुराव चव्हाण या तरुणा विरुद्ध बलात्कार व बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा(पोस्को अॅक्ट) नुसार भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या तरुणास पोलीसांनी अटक केली आहे.तर पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.शालीनी गजभारे या पुढील तपास करत आहेत.

समाजकल्याण विभागाकडून शेंद्रीय भाजीपाल्यांच्या किटचे वाटप,

समाजकल्याण विभागाकडून शेंद्रीय भाजीपाल्यांच्या किटचे वाटप,




धर्माबाद (कलदास अनंतोजी)कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच जेष्ठ नागरिक,माजी सैनिक , पत्रकार ,शहीद वीर पत्नी व दिव्यांगाना समाजकल्याण विभागाच्या वतीने शे़द्रीय भाजीपालांच्या किटचे वाटप करण्यात आले. 

पत्रकार बांधवांसाठी आलेला १० किलो भाजीपाल्याचे किट सफाई कामगारांना देऊन पत्रकारांनी मनाचा मोठेपणा दाखविला आहे.

         कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी येथील प्रशासन उत्कृष्ट कार्य करीत आहे.परंतु यात डाॅक्टर,पारीचारीका, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन,नगरपरीषद,पत्रकार बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत आहेत.त्यांचे आरोग्य व रोग प्रतिकारक शक्ती बळकट राहण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून वरील सर्वाना १० किलो शेंद्रीय भाजीपाल्याचे किटचे वाटप शनिवारी दुपारी करण्यात आले आहे.धर्माबाद तालुक्यातील डॉक्टर,पारीचारीका, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन,पत्रकार, जेष्ठ नागरिक,माजी सैनिक,शहीद वीर पत्नी,दिव्यांगासाठी १०० किट १० किलो प्रमाणे आले आहेत.सदरील शेंद्रीय भाजीपाल्याच्या किटचे वाटप येथील अंपग, मतिमंद, कर्णबधिर व मुकबधीर शाळेतील

मुख्याध्यापक देवीदास जोशी, शिक्षक दिपक चवरे, हनमंत धुन्दें,

देवके व इतर शिक्षकांनी सदरील किटचे वाटप करीत आहेत.

यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, जेष्ठ पत्रकार जी.पी.मिसाळे,माधव हानमंते,कृष्णा तिम्मापुरे, महेश जोशी, संजय कदम, सुरेश घाळे, सुदर्शन वाघमारे,पोतन्ना लखमावाड यांची उपस्थिती होती.

तेलंगानातुन महाराष्ट्रात केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीलाच प्रवेश

तेलंगानातुन महाराष्ट्रात केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीलाच प्रवेश


भोकर (प्रतिनिधी ) तेलंगणा राज्यात कामासाठी गेलेले तेथील कामगार छुप्या रस्त्याने सीमा ओंडाळून महाराष्ट्रात प्रवेश करू शकते अशा वेळी ते महाराष्ट्रात प्रवेश करू नये म्हणून प्रशासनाने काय व्यवस्था केली हे पाहण्यासाठी गेलो
असतांना माहिती देतांना पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे म्हणाले की नांदेड जिल्ह्यात एकही  कोरेनाचा रुग्ण सापडला  नसला तरिही आनंदित न होता होता आतातरी घरातच थांबाने विनाकारण घराबाहेर निघू नये, असे आवाहन जिल्हा व पोलिस विभागाकडून केले जात आहे.




 सर्व ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे .


  जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व भोकरचे पोलिस निरीक्षक  विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  काटेकोरपणे सिमा बंदीकेली असून केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहन ज्यामध्ये भाजीपाला किराणा साहित्य फळे अशा परवानाधारक वाहनलाच आम्ही रीतसर तपासणी करून महाराष्ट्रात प्रवेश देत आहोत आणि विनाकारण काहीही हिला हवाला करून याचं त्याचं कागद आणून प्रवेशाची मागणी करणाऱ्याला आम्ही तेथूनच माघारी पाठवून देत आहोत व तसेच तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश करण्याचे सर्व मार्ग केले असून तेलंगणा जवळील गावे मौजे आमठाणा, मौजे दिवशी, मौजे लगळुद, येथील पोलीस पाटील व गावकऱ्यांना निर्देशीत केल्याने गावकऱ्यांनी सुद्धा कठोर मेहनत घेत कोणालाही तेलंगणा येथून  महाराष्ट्रात प्रवेश करू न देण्याचं कार्य  सुरु केले असून ते  नजर ठेवूनच आहेत म्हणुन
तेलंगणा  महाराष्ट्र सीमाबंदी  रस्ते बंद केल्याने महाराष्ट्रात प्रवेश   बंद आहे.




असे मत पोउनि,अनिल कांबळे यांनी आम्हाला बोलतांना मांडले यांवेळी पोहेका,डि एस केद्रे,बि आर सोनकाबळे,पि एन मुधोळ नागरगोजे आदि उपस्थित होते व तसेच महाराष्ट्र सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मास्क ची गरज आहे प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना मास्क व   सॅनिटायझर ची वेवस्था उपलब्द करून द्यावि अशी मागणी तेथील पोलीस कर्मचाऱ्यां कडून होत आहे.

Wednesday, April 8, 2020

आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे, रोज एक हजार गरजू लोकांना जेवण मोफत

आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे, रोज एक हजार गरजू लोकांना जेवण मोफत वाटप
 

   


भोकर (एजास कुरेशी)
आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे, रोज एक हजार गरजू लोकांना मोफत जेवण वाटप कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राहणीमान कोलमडून गेले आहे. देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र दुकाने बंद आहेत. या कालावधीत ज्यांना रोज कष्ट करून दररोज आपल्या कुटूंबाचे पोट भरावे लागते अश्या गरीब व गरजू नागरिकांची जेवणाची गैरसोय होत आहे. अशा गरजू, गरीब नागरिकांसाठी आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे, रोज एक हजार गरजू लोकांना मोफत जेवण वाटप ,एक हात मदतीचा – एक हात माणुसकीचा उपक्रमा’ द्वारे जेवण वाटप करण्यात येत आहे.




गरीब व गरजू नागरिकांची लॉक डाऊनमुळे जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे रोज एक हजार गरजू लोकांना जेवण वाटप करण्याचा उपक्रम हे देशात लॉक डाऊन सुरू झाल्या पासून ते आज पर्यंत सुरू आहे व तसेच लॉक डाऊन संपेल तो पर्यंत सुरू राहील असे आश्वासन आसिफ भाई मित्रमंडळ तर्फे देण्यात आले आहे
हा उपक्रम भोकर शहरातील युवा कार्यकर्ते आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे गरजू लोकांना जेवण मिळावे यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. संपूर्ण देशात संचारबंदी असताना गरजू लोकांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी सामाजिक भावनेतून हा उपक्रम आसिफ भाई  ग्रुप तर्फे राबवण्यात येत  आहे…..



Monday, April 6, 2020

तबलीग जमात प्रकरणी झी, एबीपी,आज तक, इंडिया टीव्ही विरोधात तक्रार दाखल

तबलीग जमात प्रकरणी झी, एबीपी,आज तक, इंडिया टीव्ही विरोधात तक्रार दाखल




(बेधडक महाराष्ट्रा न्युज नेटवर्क)
गेल्या एक आठवड्यापासून तबलीग जमात आणि मुस्लिमांची बदनामी केली जात आहे आणि त्यांच्याविरूद्ध देशातील हिंदूंच्या मनात द्वेषाचे विष पसरले आहे. यामुळे, महमूद नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली कारण त्याचे शेजारी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहेत, तो कोरोनाचा साथीचा रोग पसरवत आहे. अशी आणखी एक घटना घडली आहे ज्यात दिलशाद नावाच्या व्यक्तीला काही हिंदू कट्टरपंथीयांनी मारहाण केली कारण तो तबलीग जमातशी संबंधित होता. एनडी टीव्हीच्या अहवालानुसार दिलशादने सुरू केलेली परिस्थिती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्ये प्रदेशच्या अनेक ग्रामीण भागात मुस्लिम वास्तव्य करीत आहेत. लोक मुस्लिमांना रेशन विकून सार्वजनिक बोअरवेलमधून पाणी घेतात असेही मानले जाते. असे दिसते की आधुनिक काळात मुस्लिमांना अस्पृश्य म्हणून घोषित केले गेले की काय . तेलंगणात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


हे सर्व देशद्रोही मीडियाद्वारे पसरलेल्या दहशतीमुळे घडत आहे. विशेष म्हणजे कोणतीही घटना घडल्यास त्याचा संबंध मुस्लिमांशी जोडून दहशती केली जात आहे. या संदर्भात, आम्ही या चोक्षि केलो असता सत्य उघड केले आहे. आणि संबंधित घटनांविषयीच्या पोलिसात झी न्यूज आणि सुदर्शन न्यूजने त्यांना खोट्या बातम्यांबद्दल फटकारले आहे आणि ट्विट आणि लिंक हटवण्यास सांगितले. असे असूनही, ईस्लाम विरोधात विषबाधा होण्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी थांबविल्या नाहीत. तर देशाची एकता, अखंडता आणि सुव्यवस्थेसाठी मोठा धोका दर्शवू शकते.

व्हायरस मिडिया खोटारडेपणा दर्शवितो आणि आपला देश "विविधतेत एकता" असणारी भारताची परस्पर बंधुता ओळखतो, तो आपणा सर्वांद्वारे एकता निर्माण करण्याचा आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा किती प्रयत्न करीत आहे. तबलीकी जमातविरोधात व्हायरस मीडियाच्या खोट्या बातम्या चालविण्याच्या बातम्यांना फिरोजाबाद पोलिसांनी फटकार  द्यावा लागला, त्यानंतर झी न्यूज उत्तराखंडने आपले ट्विट डिलीट केले स्क्रीनशॉटमध्ये 'ट्वीट उपलब्ध'आहे. पण आता तो ट्विट नाही)

धर्माबाद शहरातील गरजू, गरीब कुटुंबाना सिंहनाद प्रतीष्टानकडून अन्नधान्याचे 151 किट वाटप.

धर्माबाद शहरातील गरजू, गरीब कुटुंबाना सिंहनाद प्रतीष्टानकडून अन्नधान्याचे  151 किट वाटप.




धर्माबाद प्रतिनिधी:- लॉक डाऊनच्या कार्यकाळात गरजू व गरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये यासाठी सिंहनाद युवक प्रतिष्टान धर्माबाद अनुपसेठ कासलीवाल यांच्या माध्यमातून धर्माबाद शहरातील   गरीब व गरजू 151 कुटुंबांना  अन्नधान्याचे किट वाटप केले.
   मागील गेल्या चौदा दिवसापासून संबंध भारतभर केंद्रसरकारने कोरोना सारखा महाभयंकर विषाणू नागरिकांत पसरू नये म्हणून लॉक डाऊनची घोषणा केली. त्यामुळे मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या धर्माबाद शहरातील अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे. धर्माबाद शहरातील अनेक सामाजिक संघटना, मा.न्यायालय,पत्रकार, दानशूर नागरिक याच बरोबर सिंहनाद युवक प्रतिष्टान धर्माबाद यांनी
 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे किट पाकिटे पुरवून, हातभार लावल्याने अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. शहरातील फुलेनगर, शास्त्रीनगर, रामनगर, देवी गल्ली, सरस्वती नगर.शंकर गंज .वडार गल्ली या भागात असणाऱ्या व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना गहू, तांदूळ, साबण, तोंडावर लावण्याचा मास्क, डाळ, तेल आदी वस्तू देण्यात आल्या,





यावेळी तहसिलदार दत्तात्रय शिंदे मुख्याधिकारी मंगेश देवरे पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे पो उपनिरीक्षक नागनाथ सनगले सहाय्यक पोलीस निरीक्षक उजगरे. कराड .मुंबई पोलीस निरीक्षक रवि अण्णा बोलमवार अनुपसेठ कासलीवाल.नरेश शिरलावार.बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव हानमंते सचिव सुरेश घाळे पोलीस हेड काँ.शबीर शेख.चेतन सोनी.संतोष येरावार.राजु गोडगुलवार मनोज काले राजु वानखेडे साईनाथ सिरपूरे छोटु पाटील.शेख लाल सुर्यकांत राखोंडे
 जैन युवा संघटनेचे महाविरसेठ लोहाडे.अनुपसेठ कासलीवाल.प्रणय पहाडे अंकीत गोधा अमन पाडें लोकेश गोधा अमीत कासलीवाल व ईतर पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.महावीर जयंती निमित्ताने
 जैन युवा सघटना यांच्या परिवाराकडून 300 सनिटायझर चे 200 एम एल च्या बाटल व  300 मास वाटप केले.
 वैद्यकीय सेवा व पोलीस यांना 100 बाधंवाना जेवन दिले  आहे . यामुळे सिंहनाद युवक प्रतिष्टान धर्माबाद यांचे शहरातून कौतुक होत आहे

भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या कामगिरीने मोकाट फिरणाऱ्यांची होतेय 'दांडी गुल'

भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या कामगिरीने मोकाट फिरणाऱ्यांची होतेय 'दांडी गुल'





 संचार बंदीत सैराट होवून फिरणाऱ्याची वाहने होणार अत्ता"लॉक डाऊन"पो.हे.साहेबराव सगरोळीकर

लॉक डाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नका अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल--पो.नि. विकास पाटील


 भोकर (एजास कुरेशी):-
 सध्या जग कोरोना या विषाणूच्या प्रचंड सावटाखाली आहे.दिवसेंदिवस महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. या मुळे एका बाजूला प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना भोकर तालुक्यातील नागरिक मात्र या आजाराची गंभीरता न जाणून घेता,बिनधास्तपणे वागताना दिसत आहेत,देश लॉक डॉऊन मध्ये असताना आणि राज्यात संचार बंदी असताना विनाकारण,आणि मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना,वाहन चालकांना भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी केलेल्या कारवाईमुळे चांगलाच धसका घेतल्याचे चित्र भोकर शहर आणि तालुक्यात दिसू लागले आहे.

पोलीस निरीक्षक विकास पाटील करीत असलेल्या सिंघम कामगिरीने मोकाट,विनाकारण,दुचाकी आणि चारचाकी वाहनातून सैर मारणाऱ्याची चांगलीच दांडी गुल होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे,  महाराष्ट्रात संचारबंदी कायदा लागू असताना आणि भोकर नगरपरिषद,पोलीस स्टेशन,तहसिल कार्यालय,आरोग्य विभागाने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आवश्यक ती सर्व जनजागृती करून "Stay Home चा सल्ला देत असताना वरील सर्व प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून विनाकारण आणि दुचाकी चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना नसताना मोकाट फिरणाऱ्याची वाहनेच पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लॉक डॉउन करणार असल्याने अनेक वाहनधारकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

कोरोना व्हायरस वेगात पसरत असल्याने, शासनाच्या आदेशाने (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्वाना घरी थांबणे बाबत जन जागृती सध्या चालू आहे. परुंतु सदर आदेशाचे जो उल्लंघन करील त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे भोकर चे पोलीस निरीक्षक विकास पाटील  यांनी सांगितले आहे.

Sunday, April 5, 2020

सोशल मीडियावर फवाह पसरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्यास कारवाही करू:- जिल्हाधीकारी डॉ. विपीन इटनकर

सोशल मीडियावर फवाह पसरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्यास कारवाही करू:- जिल्हाधीकारी डॉ. विपीन इटनकर





नांदेड : प्रतिनिधी
कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत (सोशल मिडीया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवक्रींगद्वारे जातीय / धार्मिक तेढ वरील आक्षेपार्ह मजकूर, चित्रफीत इत्यादी तसेच अवैध सिमकार्ड वापरावर मनाई करण्यात आल्याचा आदेश नांदेड जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात लागू केला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे की, कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. या काळात काही समाज विघातक / गुन्हेगारी वृत्तीचे लोक दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे संदेश अथवा लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल अशा अफवा  कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या त्यांच्यावरील उपचार व त्यात बळी पडलेल्या रुग्णांची संख्या तसेच या विषाणुचा प्रादुर्भाव झालेला परिसर या संशयित कोरोना बाधित व्यक्ती याबाबत कोणतीही खातरजमा खात्री न करता माहिती, बातमी सोशल मिडिया, विविध प्रसारमाध्यमांमध्ये पसरवत आहेत. त्यामुळे समाजात अकारण भिती उत्पन्न होत असल्याचे जाणवत आहे.

अशा संदेश, अफवा व बातमीमध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्याची शक्यता आहे. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने अशी उपाययोजना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 खालील तरतुदींच्या अनुषंगाने जनतेस उद्देशून काढणे आवश्यक असल्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन नांदेड जिल्ह्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 अन्वये रविवार 5 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2 ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.

या आदेशात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जातीय वैमनस्य, धर्मीक तेढ, समाजात तिरस्कार निर्माण करणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या अनाधिकृत, खोट्या बातम्या तसेच कोरोना संबंधी अंधश्रद्धा आणि निराधार माहिती कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह प्रसारीत करणार नाही.

सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही डिजीटल माध्यमांद्वारे दोन समाजात जातीय तेढ / धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपाई संदेश, साहित्य, चित्रफीत इत्यादी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह प्रसारित करणार नाही.

सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवक्रींग प्लॉटफॉर्मचे ग्रुप ॲडमीन हे आपल्या ग्रुप मधील कोणत्याही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफीत इत्यादी प्रसारणासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार राहतील.

अवैध, अनाधिकृत सिमकार्ड वापर व बाळगण्यावर पाबंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती अथवा समुह भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे तसेच इतर प्रचलित कायदयांतील तरतुदीनुसा शिक्षेस पात्र राहील.

सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवक्रींग प्लॉटफॉर्मचे ग्रुप ॲडमीन तसेच वैयक्तिकरित्या सोशल मिडीया वापरणारे व्यक्ती यांना प्रत्येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन हा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपनी इटनकर यांनी काढला आहे.

याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे, सर्व शासकीय कार्यालय, सर्व पोलीस स्टेशन, सर्व सार्वजनिक ठिकाणच्या नोटीस बोर्डावर नागरिकांच्या सुविधेसाठी पोलीस विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
हा आदेशात 5 एप्रिल 2020 रोजी निर्गमीत करण्यात आला असून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Saturday, April 4, 2020

मुखेड येथील कोरोना रुग्णालयास जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट

मुखेड येथील कोरोना रुग्णालयास जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट




 नांदेड दि: 4  जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी मुखेड व नांदेड रुग्णालय येथे 50 बेड चे विशेष कोरोना रुग्णालय सुरु केले असुन यात मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यासह  देगलुर, नायगाव , कंधार,बिलोली येथील कोरोना रुग्णास आणण्यात येणार आहे. येथील सुविधा सोई - सुविधा पाहण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांनी उपजिल्हा रुग्णालय भेट दिली.
      या भेटीत आ.डॉ. तुषार राठोड यांच्यासह
उपविभागीय अधिकारी शक्ती कदम,तहसिलदार काशिनाथ पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर,कोरोना विभागाचे नोडल ऑफिसर डॉ नागेश लखमावर ,वैद्यकिय अधिक्षक डॉ. आनंद पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, तलाठी बि.आर. बोरसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.



          या भेटीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून कोरोनाच्या रुग्णासाठी लागेल ते साहित्य खरेदी करावे यासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही सांगितले . येथील सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. तर आ.डॉ.तुषार राठोड यांनी रुग्णालयाच्या साहित्य खरेदी साठी 25 लक्ष रुपये निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला.
     जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांनी शहरातील खाजगी दवाखाने डॉक्टरांनी चालु करावीत अन्यथा त्यांच्या योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी निर्देश दिले आहेत. खाजगी दवाखाने बंद असल्याने अनेक रुग्णाचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात कसल्याच सुविधा नसल्याने नागरीक शहरात येत आहेत पण शहरातील दवाखाने बंद असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.यामुळे
  जिल्हाधिकारी यांनी दवाखाने चालु करण्यात यावे असे निर्देश दिले, यावेळी जिल्हाधिकारी डॉ. वीपीन इटनकर यांच्या हस्ते गोर गरीब, हातावरचे पोट असणाऱ्यास धान्यही वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची नायगाव कापूस खरेदी केंद्रास भेट

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची नायगाव कापूस खरेदी केंद्रास भेट




 नांदेड, दि 4  जिल्हाधिकारी यांनी नायगाव येथील कापूस खरेदी केंद्रामध्ये भेट देऊन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी श्री शरद झाडके,  नायगाव कापूस खरेदी केंद्राचे मालक संचालक श्री डी बी पाटील होटाळकर, कुंटूर येथील येथील कापूस खरेदी केंद्राचे संचालक श्री राजेश कुंटूरकर रुपेश कुंटूरकर तसेच सीसीसी आय चे अधिकारी श्री सोनवणे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव चे सचिव श्री कदम यांची बैठक घेतली.



 या बैठकीमध्ये गाव निहाय कापूस खरेदी करण्यासाठी शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी तलाठी यांना सुचित करण्यात आले तसेच कापूस खरेदी केंद्र सुरू करण्या संदर्भामध्ये बीसीसीआयचे खरेदी अधिकारी श्री सोनवणे यांनी सद्यस्थितीत कोरोना संदर्भात उपस्थित झालेल्या परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी  जिल्हाधिकारी यांना सांगितल्या यावर जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी  सर्व समस्या सोडविल्या जातील ,आपण कापूस खरेदी करण्याची तयारी  करावी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाहीअसे नियोजन करावे, अडचणी आल्यास पोलीस व महसूल प्रशासन आपणास सर्वतोपरी सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...