Wednesday, June 24, 2020

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

               

भोकर (प्रतिनिधी)
  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या भोकर येथील ६ दुकाने सील केल्याची मंगळवारची बातमी ताजी असताना परत  ५ दुकाने व  हॉटेल व्यावसायिक लॉक डाऊनचे नियम पायदळी तुडवून ५ वाजताच्या नंतर व्यवसाय करत असल्याचे आढळून आले यावरून महसूल विभाग आणि नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने आज सामूहिक दंडात्मक कारवाई करून सील केले आहे. या कारवाईमुळे हॉटेल वेवसायक व दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच प्रत्येकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र, या नियमाला हरताळ फसला जात असल्याचे चित्र सध्या भोकर शहरात सर्वत्र दिसत आहे. विशेष म्हणजे दुकानदारही नियम पाळत नसून लॉक डाऊन नियमाचे उल्लंघन होत आहे. नियमा बाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. तसेच प्रशासनाने घाऊक व्यापाऱ्यांना ऑनलाईन तसेच फोनवरुन मालाची मागणी स्वीकारुन ती पुरवावी. जेणेकरुन बाजारात ग्राहकांची एकच गर्दी न होता ही रोखले जाईल. तसेच दुकान सुरू करण्यासाठी ठराविक वेळही दिली आहे. परंतु, नियमाचे पालन न केल्यामुळे ५ वाजता च्या नंतर पण आपला वेवसाय चालू ठेवल्यामुळे भोकर येथील  व्यवसाय करणाऱ्या आंबेडकर चौक मधील १)मराठवाडा बिर्याणी हॉटेल  २) एव्हर ग्रीन चिकन बिर्याणी हॉटेल ३) बासस्टँड जवळील नृसिंह टी हाऊस,४) श्री. साईकृपा हेअर स्टाईल,५)भवानी हेअर सलून
 असे एकूण ५ दुकाने व हॉटेल दिनांक  २४जून रोजी महसूल प्रशासन व नगरपरिषद व पोलीस  प्रशासन भोकर यांच्या वतीने सामूहिक कारवाई करत एकूण ५  दुकाने व  हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करून ५ दुकाने सील  करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचा भंग करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

  या कार्यवाही पथकात भोकर तहसिल महसूल प्रशासनच्या वतीने पथक प्रमुख नायब तहसिलदार सतीश जोहरे,
यांचे सोबत श्री. बी. के. राऊत, श्री. गोविंद राचेवाड
नगर परिषद तर्फे श्री. सचिन वैष्णव व पोलीस प्रशासन तर्फे श्री. बिरकलवाड व आदि उपस्थित होते व तसेच सर्व  व्यापाऱ्यांनी ५ वाजता दुकान बंद करावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे

Tuesday, June 23, 2020

नियमांचे ऊल्लंघन करणाऱ्या सहा दुकानांना महसूल व पोलीस प्रशासनाने ठोकले सील.

नियमांचे ऊल्लंघन करणाऱ्या सहा दुकानांना महसूल व पोलीस प्रशासनाने ठोकले सील.



भोकर/प्रतिनिधी
नांदेड जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी गर्दी न करण्याच्या अटीवर दुकाने व इतर व्यवसाय सुरु करण्यासाठी वेळेचे बंधन घालून दिलेले असतांना देखील भोकर शहरात नियमांचे उल्लंघन करीत अनेक दुकानदार आपले व्यवसाय बिनधास्तपणे वेळ संपल्यानंतर देखील सुरु ठेवत असल्याने तहसिल महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने आज सहा दुकाने सील केले आहे
त्यात 1)विलास कृषीसेवा किनवट रोड 2)बालाजी स्टील दुकान आंबेडकर चौक 3) ताज मोबाईल शॉप नांदेड रोड 4) राजधानी फर्निचर मार्ट 5) श्रीराम ऑटोमोबाईल नांदेड रोड 6) राजेश कृषी सेवा तहसील समोर  असे एकूण सहा दुकाने सील करण्यात आलीआहे.
 भोकर च्या व्यवसायांकाना सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत नियम व अटींच्या अधीन राहून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे त्या नुसार 1 जून पासून अनेक व्यवसायांना सूट मिळाली परंतु भोकर शहरात जिल्हाधिकारी आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसत असून काही दुकानदार वेळेचे बंधन न पाळता आपला व्यवसाय बिनधास्तपणे करीत आहे तर काही दुकानांवर ग्राहकांची गर्दी होत आहे

त्यामुळे शहरातील  6 दुकाने  प्रशासनाने  सील केले आहे. ठरलेल्या वेळेनंतरही दुकान चालू ठेवण्याची कारण आहे. दुकान सील करुन लॉकडाऊन उल्लंघन केल्याची कार्यवाही केली आहे. संध्याकाळी 5 नंतरही दुकानदाराने चालू ठेवल्यामुळे भोकर चे उपजिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार पथक प्रमुख सतिश जोहर, सोबत बी.के.राऊत,गोविंद राचेवाड,नगर परिषद तर्फे सचिन वैष्णव,व पोलीस प्रशासन तर्फे बिरकलवाड, यांची पथक घटनास्थळी जाऊन तपास केला असता प्रकरण योग्य असल्याचे समजले. गांभीर्य पाहून दुकान लगेचच सील केले. लॉक डाऊन चा काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. आपण सवलत देत असल्यास, त्याचा फायदा घेऊ नका. जिथे असे दुर्लक्ष होईल तेथेही कारवाई केली जाईल.असे निर्देश नायब तहसीलदार सतिश जोहर यांनी दिले आहे

दिव्याग वृध्द निराधाराचे एका दिवसाचे घरीच तोंडावर काळि पट्टी थालीनांद करून मेसेज भेजो आंदोलन करणार

दिव्याग वृध्द निराधाराचे एका दिवसाचे घरीच तोंडावर काळि पट्टी थालीनांद करून मेसेज भेजो आंदोलन करणार

     

         
नांदेड (प्रतिनिधी)
जागतिक करोना संकट काळी दिव्यांग,वृध्द,निराधार बांधवाना खालील संदर्भातील शासन आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने दि.३० जुन २०२० रोजी घरोघरी तोंडावर काळि पट्टी व हातात थालीनांद मेसेज भेजो आंदोलन करीत आहेत

अति.मुख्यसचिव, व.ऊपसचिव महाराष्ट्र शासन,  दिव्यांग आयुक्त पुणे,यांचे तिन वेळा लेखी आदेश,  मुख्य कार्यकारी अधिकारी जी प नांदेड यांचे लेखी आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी होत नसल्या मुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक घरोघरी मेसेज भेजो आंदोलन करणार आहे
 जागतिक करोना संकटकाळी दिव्यांग वृध्द निराधार यांना शासनाने अनेक योजना जाहीर करून महाराष्ट्र शासन आदेश दिव्याग आयुक्त पुणे यांचे लेखी आदेश दि.२६ मार्च २०२०च्या लेखी  आदेशात दिव्यांगाना एक महिन्याचे धान्य किट /आरोग्य किट दिव्यांगाना घरपोच देण्यात यावे व ज्या दिव्यांगाना अन्न शिजवता येत नसलेल्याना नास्टा/जेवन/डबे देण्याचे आदेश देऊन तिन महिन्यात अंमल बजावणी होत नाही.
   मुख्य कार्यकारी अधिकारी जी प नांदेड दि ११ एप्रिल २०२०ला लेखी आदेश देऊन  दिव्यांग आयुक्त  यांच्या संदर्भात सर्व गटविकास अधिकारी यांना लेखी आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी केली जात नाही.
  ऊप सचिव साहेब यांचे क्र विसयो २०२०/प्र. क्र७०/दि. २३एप्रिल २०२० यांच्या लेखी आदेशातुन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याचे आदेश देऊन सुध्दा अद्याप दिव्यांग. वृध्द निराधार याना मिळणाऱ्या वाढीव अनुदान मिळत नाहि.
 दिव्यांग आयुक्त पुणे यांनी  दि ८मे ला लेखी आदेश देऊन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये दिव्यांगाना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा असे पर क्र. दिकआ/को१९/प्रस्ताव /२०२०/११२५ दि८मे २०२० ला लेखी आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी होत नाही.
दिव्यांग आयुक्त पुणे प्रक्र११२६ दि ८मे २०२०ला लेखी आदेश देऊन म. रा. ग्रामीण जीवनोन्नति अभियान द्रारेद्र निरमुलनाच्या कार्यक्रमामध्ये ५ टक्के स्वत  सहाय्यता गट दिव्यांग व्यक्ती करिता राखीव ठेवण्यात यावा असे लेखी आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी होत नाही.
 अति. मुख्य सचिव  महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय
जिल्हापरिषद/पंचायत समिती यांच्या उत्पन्नातुन ५टक्के निधीतुन दिव्यांंगासाठि राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या योजना संदर्भात शासन निर्णय क्र. ११मधील परिछेद १ मधील वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये ३६ वर खालील प्रमाणे  वाढ करुन अन्न व खाद्य पदार्थ या जिवनाश्यक वस्तूचा धान्य किट देण्यासाठी आदेश दिल्यानंतर सुध्दा अंमलबजावणी  होत नाही
 दिव्याग बांधवांना जिल्हा परिषद नांदेड याचा २०१६ ते २०२० पर्यत दिव्यांची निधी दरवर्षी वाटप करण्यात यावा असे शासन निर्णय असताना फक्त एकच वर्षाचा निधी वाटप करण्यात आला ते दिव्यांग बांधवांनी अनेक आंदोलने केल्यामुळे बाकी तिन वर्ष निधी का मिळत नाही   दिव्याग निधी पंचायत समिती  चा निधी अध्याप का वाटप होत नाही पंचायत समिती व जिल्हा परिषद निधी वाटप होत नसेल तर ग्रामपंचायत चा निधी  मिळेल काय?
  नगरपंचायत,नगरपालिका,  महानगरपालिका दिव्यांग निधी दरवर्षी वाटप केले जात नाही
 खासदार आमदार यांच्या विकास निधीतून त्यांच्या मतदारसंघात दिव्यांग बांधवाना निधी देण्याचा आदेश असताना अद्याप दिव्यांगाना निधी मिळत नाही
  दिव्यांग वृध्द निराधार याना मिळणाऱ्या अनेक योजनेची मिटिंग चार ते सहा महिने होत नाहि व त्यांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नाही
  दिव्यांग बांधवाना आपल्या हक्काची जाणिव शासन प्रशासनास कळावी म्हणून  त्यांना प्रत्येक कमिटीत अशासकीय सदस्य म्हणुन त्यांची निवड करण्यात यावी असे शासन आदेश असुन त्यांची अंमलबजावणी केली जात नाहि
अशा अनेक प्रश्नाबाबत शासन प्रशासनास निवेदन आपले सरकार पोर्टलवर देऊन सुध्दा शासन प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांगानी दि २२ मे २० ला नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरोघरी एका दिवसाचे उपोषण करुन शासन प्रशासन साधी दखलही घेतली नसल्यामुळे  दिनांक ३० मे २०२० रोजी सर्व दिव्यांग वृध्द निराधार हे आपल्या घरीच तोंडावर काळि पटि बांधुन थालीनांद ,सकाळि १०ते सायं ६ वाजेपर्यंत करित असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका झाल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाचि राहिल असे अर्ज देण्यात आहे आहे.

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे सांगत अल्पवयीन मुलीवर ऊसाच्या शेतात रात्रभर केला अत्याचार.!!

नांदेड:मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे सांगत अल्पवयीन मुलीवर ऊसाच्या शेतात रात्रभर केला अत्याचार.!!



नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड येथील नायगांव तालूक्यातील एका गावातील राजू उर्फ छोटू धोंडीबा उर्फ पांडूरंग भदरगे (२२) या युवकाने २१ जूनच्या रात्री अंदाजे १ वाजता गावात राहणाऱ्या एका  अल्पवयीन १४ वर्षाच्या बालीकेला पळवून नेले. व तिला पटवून सांगितले "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो" असे सांगत तीच्यावर रात्रभर ऊसाच्या शेतात अत्याचार केला. तीला २२ जून २०२० रोजी सकाळी ५ वाजता सोडले. तीने घडलेली धक्कादायक हकीकत आपल्या पालकांना सांगीतली. त्यानंतर कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन बालीकेवर ऊसाच्या शेतात रात्रभर अनेकदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक १०८ /२०२० कलम भारतीय दंड विधानातील कलमे ३६३,36 ३६६(अ),३७६(३) आणि पोक्सो कायदा कलम ४ आणि ६ नूसार दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक दिनेश येवले यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांना पोलीस हवालदार अशोक दामोदर आणि पोलीस शिपाई साई सांगवीकर मदत करीत आहेत अल्पवयीन बालीकेवर रात्रभर अन्याय करणारा गुन्हेगार राजू उर्फ छोटू धोंडीबा उर्फ पांडूरंग भदरगे (22) यास ताब्यात घेतले आहे.

Monday, June 22, 2020

शेतातून रस्ता देण्यास नकाश्या नकार दिल्याने पिता पुत्रास मारहाण

शेतातून रस्ता देण्यास नकाश्या नकार दिल्याने पिता पुत्रास मारहाण



नांदेड़ (एजास कुरेशी)
जिल्ह्यातील  पांगरी ता, जि, नांदेड येथील गट क्रमांक ४ मधील  वडिलोपार्जित  शेत जमिनीत पीक घेऊन आपल्या परिवाराचा गाडा हाकणाऱ्या बिपाशा बेगम हमीद खान पठाण रा पागरी ता जी नांदेड ह्या शेतकरी कुटुंबास नांदेड येथील इसरार अहमद खान रा, देगलूर नाका नांदेड व त्याच्या मुलांनी गाव गुंडा मार्फत त्या शेतकरी कुटुंबास नाहक त्रास देत असतील शिवीगाळ देत गट क्रमांक ४ मधील तुझ्या शेतातून आम्हाला रास्ता दे नाहीतर तुला खतम करतो तुझ्यावर खोटा केस करून तुझे नोकरी घालतो अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत आमच्याकडे तुझ्या शेतातून जाण्यासाठी कोर्टाची ऑर्डर आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतातून आम्हाला रस्ता द्यावाच लागेल वास्तविक पाहता सदर 400 जमिनीचा कुठलाही प्रकारचा रस्ता विषयी वाद न्यायालयात प्रलंबित नाही अशा प्रकारचे वक्तव्य करून मला व माझ्या पती पिता अजमत खान पठाण व माझे दोन मुले हाजीमुसा फिर्दोष यांना अशलील शिवीगाळ देऊन  लाथा  बुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली या बाबत पोलिस महानिरीक्षक साहेबानी घटनेची गंभीरता पाहून  संबधित गावगुंडावर कार्यवाही करावी अशी मागणी  बिपाशा बेगम हमीद खान यांनी पोलिस महानिरीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारा केली आहे

धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण कलावंतांवर उपासमारीची वेळ

धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण कलावंतांवर उपासमारीची वेळ



धर्माबाद (ता. प्रतिनिधी)
 : कोरोना व्हायरसचा धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण कलावंतांना फटका बसला असून,  चार महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने लग्न, जंयती,कव्वाली, लोकनाट्य, भजन,सप्ते, , यात्रा  इत्यादी रद्द झाल्या आहेत. धर्माबाद तालुक्यातील   गेल्या चार महिन्यात  भिमजंयती शिवजयंती, लग्न मध्ये मंगल अस्टकाचे आँरकेस्ट्रा व बँन्ड पथकाचे वाजयंत्री बंद आसुन 
आजही लग्नात व कोणत्याही शुभ कार्यात ग्रामस्थांचे मनोरंजन करणे आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून उदरनिर्वाह करणे हे चक्र अनेक वर्षापासून चालू आहे,  काही मंगल आस्टका व बँन्ड पथक मालकांनी मात्र  काही कलावंतांना कामासाठी  कलाकाराला दिलेली उचल, त्यांचा रोजचा खर्च, गुंतवलेले भांडवल, मालक आणि कलाकार दोन्ही अडचणीत सापडले आहे तेव्हा शासनाने अशा परिस्थितीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलाकाराकडून केली जात आहे.

कोरोना महामारी च्या काळात एकही कार्यक्रम झाला नाही.२२मार्च नंतर कोरोनाचे संकट आले
 कोरोनामुळे या ग्रामीण कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे कलावंतांना कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नाही या चार महिन्यात पुर्णपणे वर्षाची होनारी आर्थिक परिस्थिती बिकट आसुन कलाकार आर्थिक संकटात सापडला आहे करिता शासनाने ग्रामीणव शहरी कलवंताना आर्थिक मदत द्यावी म्हणून धर्माबाद तहसीलदार दत्तात्रय शिन्दे यांना निवेदन देण्यात आले यावर  भीमशाहीर नारायण सोनटक्के ,प्रकाश खंडेलोटे,विजय हातागळे,राज मिसाळे,चंद्रकांत आमिठवाड,भिमराव खंडेलोटे वैभव हानंमते,शंकर जिवालकर इत्यादी कलाकारांच्या  सह्या आहेत.

  

दिव्यांग सिद्धार्थला जेंव्हा समाजाचा घटक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करावा वाटतो !

दिव्यांग सिद्धार्थला जेंव्हा समाजाचा घटक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करावा वाटतो !



नांदेड (प्रतिनिधी)
 दि. 22 :- सर्व जिल्ह्यांसाठी कोरोनाचे संकट हे अतिशय आव्हानात्मक ठरले आहे. नांदेड जिल्हा प्रशासन याला अपवाद कसे असणार. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या कोविड 19 संदर्भातील दक्ष प्रशासन कौशल्याला भारावून नांदेडच्या बळीरामपूर येथील दिव्यांग सिद्धार्थ याला समाजाच्यावतीने जिल्हा प्रशासनाचा गौरव करावा वाटला.

आपल्याजवळ जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विशेष काही नाही याचे मनात कुठलेही शल्य न बाळगता त्याने डॉ. विपीन यांचे एक स्केच रेखाटले. या स्केचला घेऊन तो आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. ऐंशी टक्के दिव्यांग असल्याकारणाने त्याला जिल्हाधिकारी यांच्या दालनात पोहचणे शक्य नव्हते.



आपल्याला भेटायला एक दिव्यांग आला आहे आणि तो प्रवेशद्वाराजवळ असल्याचा निरोप जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना जेंव्हा कळाला तेंव्हा ते कॅबीन सोडून त्याला भेटायला प्रवेशद्वाराजवळ पोहचले. त्याने काढलेल्या स्केचचा नम्रतेने स्विकार करत आस्थेने विचारपूस केली. “साहेब तुम्ही कोविड 19 च्या या काळात प्रशासनाचे प्रमुख म्हणून जी काळजी घेत आहात, गोरगरिबांच्या रोजगाराला आता अधिक बाधा पोहोचू नये म्हणून प्रयत्न करत आहात त्याबद्दल समाजाचा घटक म्हणून मला तुमची भेट घेऊन धन्यवाद दयावे वाटले” असा कृतज्ञता भाव सिद्धार्थने व्यक्त केला. या अनौपचारिक भेटीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर भारावून गेले.

“जनतेच्या हिताची योग्य ती दक्षता घेणे, सर्वसामान्यांचे प्रतिबिंब प्रशासनात बिंबवणे, शासनाच्या उपक्रमात लोकांचा सहभाग अधिक चांगला असणे हे सशक्त समाजाचे लक्षण आहे. या कोविड 19 च्या या आव्हानात्मक काळात नांदेडकर आपली नागरिक म्हणून असलेली जबाबदारी चांगली निभावत आहेत.” सिद्धार्थ याच्या भावना याच नम्रतेने मी स्विकारत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

सिद्धार्थ शेषेराव जमदाडे हा बळिरामपूर येथे छोटे किराणा दुकान चालवतो. लॉकडाऊनमध्ये त्याने त्याच्यापरिने व समाजातील काही लोकांना घेऊन गरजूंना मोफत अन्नधान्याच्या किट वितरीत केले. दिव्यांगाच्या प्रहार संघटनेमार्फतही त्याने प्रशासनाला केलेल्या सहाकार्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

नांदेड च्या पिपळागावा सहित ग्रामीण भागात कोरोना पोहचला आज परत नवीन १२ व्यक्ती पॉझिटिव्ह १९ कोरोनातून मुक्त

 नांदेड च्या पिपळागावा सहित ग्रामीण भागात कोरोना पोहचला आज परत नवीन १२ व्यक्ती पॉझिटिव्ह १९ कोरोनातून मुक्त



नांदेड (प्रतिनिधी)
 दि. 22 :- कोरोना आजारातून आज 19 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 14 व मुखेड कोविड केअर सेंटर येथील 5 बाधित व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 238  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. सोमवार 22 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 59 अहवालापैकी सर्वच्या सर्व 45 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात नवीन 12 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले तसेच आदिलाबाद येथून 1 बाधित व्यक्ती हा नांदेड येथे संदर्भित करण्यात आला आहे. त्यामुळे‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 317 एवढी झाली आहे.

नवीन बाधितांमध्ये धोबी गल्ली गाडीपुरा येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, रहेमतनगर येथील 22 वर्षाचा 1 पुरुष, विलालनगर येथील 37 व 57 वर्षाचे 2 पुरुष, पिरबुऱ्हानगर येथील 26, 29, 31 वर्षाचे 3 पुरुष आणि भगतसिंग रोड येथील 58 वर्षाचा 1 पुरुष तसेच नांदेड तालुक्यातील पिंपळगाव येथील 18 व 38 वर्षाचा 2 महिला, चिखलभोसी 45 वर्षाची 1 महिला आणि रिसनगाव येथील 19 वर्षाची 1 महिला यांचा समावेश आहे. हे सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे. 

आतापर्यंत 317 बाधितांपैकी 238 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 65 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 4 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. वय 50 व 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 व 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यात 65 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 14, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 42, लोहा कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 7 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. सोमवार 22 जून रोजी 59 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 127,

घेतलेले स्वॅब- 5 हजार 747,

निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 30,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 12,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 317,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 02,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,

मृत्यू संख्या- 14,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 238,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 65,

स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 59 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

Sunday, June 21, 2020

ब्रेकिंग:.कोरोना पोहचला महापालिकेत! माजी महापौर व नगरसेवकासह चार जण कोरोनाग्रस्त

ब्रेकिंग:.कोरोना पोहचला महापालिकेत!
माजी महापौर व नगरसेवकासह चार जण कोरोनाग्रस्त


नांदेड (प्रतिनिधी)
नांदेडचे माजी महापौर आणि त्यांचे नगरसेवक पूत्र दोघांसह एकूण 4 जण कोरोना बाधीत झाले  आहे.
- नांदेडच्या बिलालनगर भागातील ५७ व ३७ वर्षीय पुरुष
- धोत्री गल्ली, गाडीपुरा, नांदेड येथील ४० वर्षीय पुरुष
- रहेमतनगर येथील २२ वर्षीय तरुण

आज च्या माहितीनूसार 14 स्वँब अहवाल प्राप्त झाले.त्यात 4 कोरोना बाधीत आहेत.9 अहवाल निगेटीव्ह आहेत.एक अहवाल अनिर्णित आहे.पाँझीटिव्ह लोकांमध्ये सर्व 4 पुरुष आहेत. एक रहमतनगर- 22 वर्ष,एक धोत्री गल्ली – 40 आणि बिलालनगरचे 57 आणि 36 वर्षीय दोन पुरुष आहेत.आता एकूण कोरोना बाधीत रुग्ण संख्या 308 झाली आहे

+नगरसेवक व अधिकाऱ्यांना क्वारंटाईन होण्याची वेळ

या चौघांमध्ये माजी महापौर आणि आजचे नगरसेवक सोबत त्यांचे नगरसेवक पूत्र सहभागी आहेत.त्यांनी आपल्या भागातील कंटेंनमेंट झोन मध्ये खूप मेहनत घेतलेली आहे.त्यामूळे सेवा करतांना कोरानाशी त्यांची कुठेतरी भेट झालीच असणार.आता मनपा सुध्दा कोरोना बाधेत आली आहे.आता मनपाच्या अनेक नगरसेवक,अधिकारी व कर्मचारी कोरोना संशयीत होणार आहेत.

+ जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या : ३०८
+ बरे करून घरी सोडले: २१९
+ उपचार सुरू: ७५
+ मृत्यू: १४

नांदेड: दहा व्यक्ती कोरोनातून झाले बरे आज नवीन एकही व्यक्ती पॉझिटिव्ह नाही

नांदेड: दहा व्यक्ती कोरोनातून झाले बरे आज नवीन एकही व्यक्ती पॉझिटिव्ह नाही



नांदेड (प्रतिनिधि) दि. 21 :- कोरोना आजारातून आज दहा व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील सहा व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील चार असे एकुण 10 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 219  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. रविवार 21 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 35 अहवालापैकी सर्वच्या सर्व  35 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. एकही नवीन पॉझिटिव्ह बाधित न आढळल्याने‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 304 एवढी आहे.
आतापर्यंत 304 बाधितांपैकी 219 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 71 रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 50 व 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 व 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात 71 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 14, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 46, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 5 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 6 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवार 21 जून रोजी 79 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 830,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 708,
निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 985,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 304,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 14,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 219,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 71,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 79 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Saturday, June 20, 2020

नांदेड:- ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी वाढली पंडित कच्छवे यांना बोलवा:-बजरंग भेंडेकर

नांदेड:- ग्रामीण पोलिस स्टेशन  अंतर्गत गुन्हेगारी वाढली पंडित कच्छवे यांना बोलवा:-बजरंग भेंडेकर




नांदेड: (एजास कुरेशी)
नांदेड येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे सुट्टीवर गेले तेव्हापासून सिडको भागात गुंडाने थैमान घातले आहे म्हणून पंडित कच्छवे यांना लवकरात लवकर सेवेवर कार्यरत करा अशी मागणी नांदेड येथील बजरंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग भेंडेकर, यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे

सिडको येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे जेव्हा  कार्यरत होते तेव्हा गुंडगिरीला आळा बसला होता. परंतु ते जेव्हापासून सुट्टीवर गेले आहेत तेव्हापासून सिडको ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी वाढली आहे व तसेच तसेच महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व तसेच गुंड प्रवृत्तीचे लोक तलवारीने मारामारी करत आहेत आणि खुलेआम अवैध धंदे, सुरू झाले आहेत मटका, गुटखा, जुगार अड्डे, चालू झाले आहेत व तसेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ असताना सुद्धा गुन्हेगार प्रतीचे लोक वाढलेले आहेत व तसेच पुरुष व महिलांसाठी भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे असे निवेदन बजरंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग भेंडेकर, यांनी बजरंग सेनाच्या  लेटरपॅडवर निवेदन दिले आहे त्यामध्ये
भास्कर हंबर्डे, बजरंग सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, व गजानन कहाळेकर, बजरंग सेनेचे जिल्हाध्यक्ष ांचे स्वाक्षर्‍या आहेत.

Friday, June 19, 2020

माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे 14 जुलै रोजी वितरण

माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे 14 जुलै रोजी वितरण




▪️पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित
▪️प्रथम विजेत्यास पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह



मुंबई दि. 19-  भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येत्या 14 जुलै रोजी जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून राज्यस्तरावर एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह दिले जाईल.

           'पाणी अडवा, पाणी जिरवा'ची संकल्पना अंमलात आणणारे तसेच जलसंस्कृतीचे जनक म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येणाऱ्या माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने जलसंधारण, जलसंपदा व पाणी पुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्व. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाला 5 लाख रूपये व प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख, प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह तर तृतीय क्रमांकासाठी 2 लाख, प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह असे स्वरुप आहे.  या पुरस्काराचे वितरण माजी मुख्यमंत्री स्व. चव्हाण यांच्या जन्मदिनी येत्या 14 जुलै, 2020 रोजी करण्यात येणार आहे.

            या पुरस्काराच्या निवडीसाठी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाचे प्रधान सचिव, लाभक्षेत्र विकासचे सचिव, यशदामधील जलसाक्षरता केंद्राचे संचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (पा.), जलसाक्षरता केंद्राने निवडलेले दोन जलनायक यांचा समावेश असून जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकासचे उपसचिव हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.

            या पुरस्कार समारंभाचे आयोजन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीतील जलसाक्षरता केंद्राच्या मार्फत होणार असून त्यांच्यामार्फत पुरस्काराची नामांकने मागविण्यात येणार आहेत. या संबंधीचा शासन निर्णय 12 जून रोजी काढण्यात आला आहे.

नांदेड़ जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड़ जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

                            फाइल फोटो

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  जिल्ह्यात शुक्रवार 3 जुलै 2020 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 19 जून 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 3 जुलै 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

तपासणी मोहिमेत पाचशे वाहनधारकांवर कारवाई

तपासणी मोहिमेत पाचशे वाहनधारकांवर कारवाई



नांदेड़ (प्रतिनिधि)
नांदेड, दि. 18:- जिल्ह्यात वाहनांची तपासणी मोहिम राबविण्यात येत असून तीन पथकांमार्फत सोमवार 15 जून पर्यत पाचशे वाहनधारकांवर परवानगी पेक्षा जास्त व्यक्तीची वाहतूक केल्याने त्यांच्या विरुध्द दंडात्मक कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आली आहे. परवानगीपेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक केल्यास ही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

नांदेड जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतुकीस अटी व नियमाच्या अधिन राहून मुभा देण्यात आली आहे. दोन चाकी वाहनावर एक व्यक्ती, तीन चाकी वाहनात  एक अधिक दोन व्यक्ती, चार चाकी वाहनामध्ये एक अधिक तीन व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावावे. सार्वजनिक वाहतूकीच्या वेळी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत 21 मे रोजी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. जनतेने कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही प्रकारची शंका, भिती न बाळगता सुरक्षिततेची अधिक काळजी घ्यावी. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता घरीच सुरक्षित रहावे, असेही आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी नांदेड जिल्ह्याचा लवकरच मास्टर प्लॅन:-पालकमंत्री अशोक चव्हाण

सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी नांदेड जिल्ह्याचा लवकरच मास्टर प्लॅन:-पालकमंत्री अशोक चव्हाण



नांदेड ( नांदेड़) दि. 19 :-  जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील कुठलाही गोरगरिब अन्न धान्यावाचून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम झाली पाहिजे. शासनातर्फे यासाठी लागणाऱ्या अन्न-धान्याचा मुबलक प्रमाणात जो पुरवठा  झाला आहे त्याची गुणवत्ता टिकून राहण्याकरीता गोदाम व्यवस्थाही अधिक परिपूर्ण कशी करता येईल याचा तालुकानिहाय समतोल आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची आढावा बैठक आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाली. याबैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी आर. के. परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या लक्षात घेता अन्न-धान्य पुरवठा व सुरक्षिततेच्यादृष्टिने शासकीय गोदामे तेवढीच समतोल असली पाहिजेत. एकाच तालुक्यात शासकीय गोदामांची संख्या जर अधिक झाली तर अन्न-धान्याच्या वाहतुकीसह अनेक प्रश्न निर्माण होतील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. आजच्या घडीला जिल्ह्यात गोदामाची असलेली संख्या व प्रत्येक तालुक्यातील समतोल यादृष्टिने जिल्ह्याला एका परिपूर्ण मास्टर प्लॅनची गरज आहे. भविष्यातील प्रश्नाचा वेध घेऊन याचे अधिक चांगले नियोजन करा. साखरेच्या भावाबाबतही मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. ही तफावत दूर झाली पाहिजे, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अनेक गैरप्रकार निर्माण झाले. गोरगरिबांच्या तोंडाचा घास जर कोणी हिरावून घेत असेल तर दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.

जिल्ह्यातील काही तालुक्यात मका आणि हरभरा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याच्या साठवणुकीसाठी तेवढीच सक्षम गरज आहे. भोकर तालुक्यात मक्याच्या साठवणुकीसाठी गोदामची गरज असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. 


दृष्टिपथात योजना निहाय लाभार्थी

जिल्ह्यात सद्यस्थितीत पाच योजना कार्यान्वित आहेत. यात प्राधान्य कुटूंब योजनेचे 4 लाख 9 हजार 188 संख्या असून 18 लाख 32 हजार 869 लोकसंख्या आहे. अंत्योदय अन्न योजनामध्ये 78 हजार 388 कार्ड संख्या असून यातील 3 लाख 36 हजार 583 लोकसंख्या आहे. या दोन्ही योजनेतील कार्डधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू आहे. एपीएल शेतकरी योजनेत 98 हजार 500 कार्डधारकांची संख्या असून यातील 4 लाख 23 हजार 560 लोकसंख्या आहे. एपीएल (एनपीएच) मध्ये 41 हजार 612 कार्डसंख्या असून यातील लोकसंख्या 2 लाख 22 हजार 950 एवढी आहे. आत्मनिर्भर भारत शिधापत्रिका धारक लाभार्थीमध्ये कार्डधारकांची संख्या 42 हजार 55 असून यातील लोकसंख्या 2 लाख 24 हजार 528 एवढी आहे.

"या सर्व लाभार्थींना त्यांना प्रतिव्यक्ती मंजूर असलेल्या धान्याचे वाटप वेळेत झाले पाहिजे. यात जर कोणी स्वस्तधान्य दुकानदार चुकत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांना दिल्या.

Thursday, June 18, 2020

न्युज 18 चा अँकर अमिश देवगण वर गुन्हा दाखल करून कार्यवाही करा:- हर-दम हर-पल ग्रुप भोकर

न्युज 18 चा अँकर अमिश देवगण वर गुन्हा दाखल करून कार्यवाही करा:- हर-दम हर-पल ग्रुप भोकर


भोकर (एजास कुरेशी)
इस्लामचे उपदेशक व सूफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांना कोण ओळखत नाही? त्यांना ख्वाजा गरीब नवाज आणि अजमेर वाले बाबा इत्यादी, राजस्थानची दर्गा हजरत मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी, ख्वाजा गरीब नवाझ म्हणून ओळखले जाते. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे इस्लामचे महान सुफी संत आहेत. ज्याने इस्लामचे झाड हिरवे केले.

तो गरिबांचे मसीहा होते. स्वता उपाशी राहून ते इतरांना खायला घालत असे. ज्यांनी शोषितांच्या कष्टांवर मात केली. ज्यांनी पापाचे पुण्य केले. तो अल्लाचे खरे बंदे होते.

ज्यांच्यावर विश्वास ठेवणारे खूप मोठी संख्या,मध्ये फक्त इस्लाम धर्माचे लोकच नाही तर हिंदू शिखांसारख्या इतर सर्व धर्माचे लोक देखील आहेत. ज्यांचे अनुयायी राजा ते रंका नेता ते अभिनेता पर्यंत आहेत, जे ख्वाजा गरीब नवाज यांच्या जियारतसाठी नेहमी उत्सुक असतात. ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गा येथे देशातील बड्या सेलिब्रिटी प्रार्थना करण्यासाठी परदेशातुन पोहोचतात, तर देशाचे पंतप्रधान दरवर्षी उर्सच्या निमित्ताने चादर पाठवतात पण आज सोशल मीडियावर त्यांच्याविषयी गोंधळ उडाला आहे.

एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये न्यूज 18 चा अँकर अमीश देवगन यांनी सूफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्याविषयीच्या एका चर्चेत अपशब्द वापरताना दिसत आहे. ज्यानंतर अमीश देवगन यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे,  डिबेटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि याबद्दल मुस्लिम समाजात तीव्र संताप आहे.

 व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अमीश देवगन यांने सूफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांना परकीय आक्रमण करणारा म्हणून संबोधले आणि त्यांच्यावर भारत परिवर्तनाचा आरोप केला.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुस्लिम समाजात प्रचंड संताप आहे, मुस्लिम समुदायाने असा दावा केला आहे की अमीश देवगण यांनी  सूफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्याबद्दल राष्ट्रीय टीव्हीवर अश्‍लील टिप्पण्या देऊन त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. न्यूज 18 अँकर अमीश देवगन याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली जात आहे.

व तसेच भोकर मध्ये हर-पल हर-दम ग्रुपच्यावतीने भोकर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना तक्रारी निवेदन देण्यात आले आहे अमिश देवगन वर कारवाई करण्याची मागणी केली आहे यामध्ये भोकर येथील हर-दम हर-पल ग्रुप मधील उपस्थित युनूस लाला, नयूम करखेलीकर, प्रदीप गायकवाड, जुनेद एस.आर.के., शारूख एस.आर.के., मिस्टर ईनामदार,पत्रकार अहमद करखेलीकर, सलमान खान, व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची पॉझिटिव्ह बाधितांशी विचारपूस ; कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची पॉझिटिव्ह बाधितांशी विचारपूस ; कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी




नांदेड (प्रतिनिधी)
दि. 18 :- वेळ दुपारी तीनची. पावसाची रीमझीम जोर धरुन सुरु झालेली. अशा या वातावरणात जिल्हाधिकारी डॉ. विपीन हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड डेडिकेटेड सेंटरला पोहचतात. अगोदर सर्व बाहेरील परिस्थितीची पाहणी करतात. त्यांच्या समवेत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, वैद्यकीय अधीक्षक वाय. एच. चव्हाण, बालरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद चव्हाण, औषध वैद्यक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. भुरके, सहयोगी प्राध्यापक डॉ. शितल राठोड हेही असतात. संपूर्ण परिसराची पाहणी करुन ते एका-एका गोष्टीचा आढावा घेतात. याठिकाणी पाणी पुरवठ्याची सुविधा अधिक परिपूर्ण व्हावी यासाठी महानगरपालिकाअंतर्गत स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था तात्काळ कशी करता येईल याचे नियोजन सुरु असते. याच नियोजनात प्रत्यक्ष विष्णुपुरी प्रकल्पाला जावून तेथील प्रत्यक्ष पाहणी करण्याचे त्यांचे नियोजन होते.



तथापि कोविड डेडिकेटेड सेंटरला आपण आलोच आहोत तर प्रत्यक्ष बाधित पेशंट यांच्याशी चर्चा केल्यास नेमकी माहिती आपल्याला मिळेल म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन त्यांना भेटण्याचा निर्णय घेतात. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टरांची काळजीवजा धांदल उडते. पीपीईकीट घालून सुरक्षिततेचे जे नियम आहेत त्याचे पालन करुन ते सरळ कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन पॉझिटिव्ह पेशंटशी चर्चा करतात. या वार्डात असलेल्या सर्व 17 बाधितांबरोबर ते मनमोकळ्या गप्पा मारतात. स्वत: जिल्हाधिकारी येथे येवून प्रत्यक्ष पाहणी करुन सुविधा कशा मिळतात याची सहानुभूतीने चौकशी करीत असल्याने काही पेशंटचे हात नकळत जोडले जातात. “इथल्या सुविधा तुम्हाला चांगल्या वाटतात का ? काही अडचणी आहेत का ? आहार चांगला मिळतो का ?” अशी ते पेशंटला सरळ विचारणी करतात. उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा उत्तम असल्याचे सांगत कोविड पेशंट आपला कृतज्ञता भाव व्यक्त करतात. “घाबरु नका, यातून तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल” असा विश्वास डॉ. विपीन प्रत्येकाच्या मनात पेरत सरळ शौचालयाच्या पाहणीसाठी वळतात. सोबत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देवून जिल्हाधिकारी डॉ. विपीन विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाहणीसाठी रवाना होतात.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; आरोग्य सेवेवर होणार परिणाम

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; आरोग्य सेवेवर होणार परिणाम



शासकीय सेवेत समायोजन करू घेण्याची मागणी

भोकर:-(एजास कुरेशी)
तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कंत्राटी तत्वावर असलेल्या कर्मचारीना कायमस्वरूपी करा म्हणून मागणी करत काम आंदोलन केले आहे.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.याचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य विभागावर झाला आहे.आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मागील १२  ते १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर व कमी मानधनावर काम करत आहेत पण आद्यपर्यंत त्यांचे समायोजन झाले नाही.कोव्हिडं 19 मध्ये या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे व मानधन मात्र अल्प प्रमाणात मिळत आहे.वैद्यकीय अधिकारी यांचे मानधन मात्र मुख्यमंत्री यांनी वाढवले असून कंत्राटी लोकांकडे दुर्लक्ष केले आहे,तसेच कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मागणी कडे दुर्लक्ष केले आहे शासनाला आमची गरज नसल्यास,आम्हालाही त्यांची गरज नसल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचार्यांमध्ये दिसुन येत आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रता पडताळून त्यांचे सम कक्ष रिक्त असलेल्या पदावर त्वरित समायोजन करावे अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.


तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर जाधव सुधाकर,बंडावार अंजना सह अनेक आरोग्य सेविका आदीच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे.भोकर तालुक्यातील एकूण ३२ आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर असल्याने याचा परिणाम आरोग्य सेवेवर होऊ शकतो. 

Wednesday, June 17, 2020

कावीळच्या आजारामुळे पोलीस कर्मचारी अडबलवार यांचा मृत्यू

कावीळच्या आजारामुळे पोलीस कर्मचारी अडबलवार यांचा मृत्यू




नांदेड (प्रतिनिधी)
 नांदेड : कावीळ आणि लिव्हरच्या आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून आजारी असलेल्या एका ५३ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू झाला. ही घटना बुधवार १७ जून रोजी सकाळी नांदेडच्या 'हडको' परिसरात घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बिलोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले नाईक पोलीस कॉन्स्टेबल मारोती राजबा अडबलवार-उंद्रीकर हे गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वीपासून कावीळ आणि लिव्हरच्या त्रासाने आजारी होते. दरम्यान, नाईक पो. कॉ. मारोती अडबलवार यांचा १७ जून रोजी सकाळी सव्वासहा वाजेदरम्यान, नवीन नांदेड परीसरातील हडको भागातील श्रीराम मंदिराजवळील त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार सपोउपनि. सय्यद महेमुद व मदतनीस पो. कॉ. नितीन धुळगंडे यांनी दिली आहे.
दिवंगत नाईक पो. कॉ. मारोती अडबलवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, दोन मुले, एक भाऊ, भावजय, पुतणी आणि पुतण्या असा मोठा परिवार आहे.
याप्रकरणी राहूल मारोतीराव अडबलवार यांनी दिलेल्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. प्रभारी पो. नि. प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक पो. कॉ. महेंद्र कौठेकर व त्यांचे सहकारी कर्मचारी हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Monday, June 15, 2020

नियमांचा उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व दुकानांवर कार्यवाही ३७०० दंड वसुल

नियमांचा उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व दुकानांवर कार्यवाही ३७०० दंड वसुल
                 

भोकर (प्रतिनिधी)
  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या भोकर येथील आठ हॉटेल व्यावसायिक लॉक डाऊनचे नियम पायदळी तुडवून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले यावरून महसूल विभाग आणि नगरपरिषदेने आज सामूहिक दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे हॉटेल वेवसायक व दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच प्रत्येकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र, या नियमाला हरताळ फसला जात असल्याचे चित्र सध्या भोकर शहरात सर्वत्र दिसत आहे. विशेष म्हणजे दुकानदारही नियम पाळत नसून लॉक डाऊन नियमाचे उल्लंघन होत आहे. नियमा बाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. तसेच प्रशासनाने घाऊक व्यापाऱ्यांना ऑनलाईन तसेच फोनवरुन मालाची मागणी स्वीकारुन ती पुरवावी. जेणेकरुन बाजारात ग्राहकांची एकच गर्दी न होता ही रोखले जाईल. तसेच दुकान सुरू करण्यासाठी ठराविक वेळही दिली आहे. परंतु, नियमाचे पालन न केल्यामुळे भोकर येथील  व्यवसाय करणाऱ्या बायपास रोड वरील डोंगरे हॉटेल, नगर परिषद समोरील चंदा हॉटेल, बस स्टॅंड जवळील नरसिंह हॉटेल, आंबेडकर चौक येथील मराठवाडा चिकन बिर्याणी, यांच्यासह वडापाव विकणाऱ्या हात गाड्यावर सुद्धा आज दिनांक १५ जून रोजी महसूल प्रशासन व नगरपरिषद कार्यालय भोकर यांच्या वतीने सामूहिक कारवाई करत एकूण ८ हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ हजार ७०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचा भंग करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

  या कार्यवाही मध्ये भोकर नगर परिषद येथील मुख्याधिकारी प्रियंका टोंगे,नायब तहसीलदार पोहरे,व लिपिक राऊत, व वैष्णव,  आदि उपस्थित होते व तसेच सर्व  व्यापाऱ्यांनी ५ वाजता दुकान बंद करावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे

Saturday, June 13, 2020

शनिवारी 22 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह बाधितांमध्ये 13 पुरुषतर 9 महिलांचा समावेश आठ बाधितांना बरे झाल्याने सुट्टी

शनिवारी 22 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
बाधितांमध्ये 13 पुरुषतर  9 महिलांचा समावेश
आठ बाधितांना बरे झाल्याने सुट्टी



 
नांदेड () दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 22 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 256 वर पोहचली आहे. एकाबाजुला बाधितांची संख्या वाढली असली तरी दुसऱ्या बाजूला पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 5 व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 3 बाधित असे 8 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आल्याने मोठा दिलासाही मिळाला.
बावीस बाधितांपैकी 13 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 25,28, 29, 30 (2), 31, 34, 35 (2), 49, 51, 55 व 67 वर्षाचे 13 पुरुष तर महिलांमध्ये अनुक्रमे 31, 36, 43, 45, 47, 48 (2), 49 व 55 अशी आहेत. या सर्व बाधितांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे. आतापर्यंत एकुण 168 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एकुण 13 आहे.
शनिवार 13 जून रोजी 22 कोरोना बाधितांमध्ये चिखलवाडी परिसरातील 1 पुरुष वय वर्षे 55 व 1 महिला वय वर्षे 48, विजय कॉलनी 1 महिला वय वर्षे 55, दीपनगर 1 पुरुष वय 49 वर्षे, एचआयजी कॉलनी 1 महिला वय वर्षे 48, झेंडा चौक 1 महिला वय वर्षे 45, स्वामी विवेकानंदनगर 1 पुरुष वय वर्षे 34, सोमेश कॉलनी 1 पुरुष वय वर्षे 51 व 1 महिला वय वर्षे 49, पद्माजा सिटी 1 महिला वय वर्षे 43, सिडको 1 महिला वय वर्षे 47, यशवंतनगर 1 पुरुष वय वर्षे 35, विणकर कॉलनी 1 पुरुष वय वर्षे 30, भाग्यनगर रोड 1 महिला वय वर्षे 31, संत ज्ञानेश्वरनगर 1 पुरुष वय वर्षे 35, न्यायनगर 1 पुरुष वय वर्षे 28, श्रीकृष्णनगर तरोडा (बु) 1 पुरुष वय वर्षे 31, विश्वदीपनगर 1 पुरुष 25, महावीर चौक 1 पुरुष वय वर्षे 67, इतवारा 1 पुरुष वय वर्षे 30, चैतन्यनगर 1 महिला वय वर्षे 36 व अर्धापूर तालुक्याती कामठा बु. येथील 1 पुरुष वय वर्षे 29 एवढे आहे.
शनिवारी प्राप्त झालेल्या 97 अहवालापैकी 62 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत 75 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि  52 व 54 वर्षाचे दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड जिल्ह्यात 75 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 15, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 52, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 13 जून रोजी 163 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 44 हजार 880,
घेतलेले स्वॅब 4 हजार 949,
निगेटिव्ह स्वॅब 4 हजार 253,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 22,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 256,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 187,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-83,
मृत्यू संख्या- 13,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 168,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 75,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 163 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतात युवा सेनेने केली पेरणी

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतात युवा सेनेने केली पेरणी




नांदेड :  युवा सेनेचे प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी खुरगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतात बि-बियाणे, खतासह पेरणी करून दिली.
नांदेड तालुक्यातील खुरगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी रमाकांत लेंंंडाळे यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटूंबियांना दिलासा मिळावा व पेरणीसाठी मदत व्हावी, यासाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी पुढाकार घेत लेंडाळे यांच्या शेतात पेरणी करून दिली.



 यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याचे वडील जयराम लेंडाळे, सरपंच संतोष लेंडाळे, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख बळवंत तेलंग, शहर प्रमुख नवज्योतसिंग गाडीवाले, उपतालुका प्रमुख संतोष पावडे, प्रल्हाद पावडे, उपशहर प्रमुख अभिजित भालके, विश्वास मोरे, शाखा प्रमुख श्याम लेंडाळे, पुरभाजी जाधव, गजानन लेंडाळे, सोनाजी जाधव, केशव रासे, बाबूराव गुंजकर, रामराव पाटणे, करण इटकर, रवि नागरगोजे, रामा कडेकर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Friday, June 12, 2020

अत्ता वजीर लागला हाताला १९ लाख ४४ हजार किंमतीचा वजीर गुटखा जप्त

अत्ता वजीर लागला हाताला १९ लाख ४४ हजार किंमतीचा वजीर गुटखा जप्त






प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री केल्यास कारवाई 


नांदेड (प्रतिनिधि)
 दि. १२ :- देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये वजीर गुटखा ४० बोरी प्रत्येक बोरीमध्ये ६ छोटया बॅग, बॅगमध्ये ५४ पॅकेट असे एकत्रीत १२ हजार ९६० पॅकेट किंमत एकुण  १९ लाख ४४ हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र. एमएच १८- अेअे १६६६ या वाहनातील प्रतिबंधित अन्न पदार्थाची १२ जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर यांनी ही तपासणी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोमीनपुरा येथील आरोपी वाहन मालक गुलामखान गौसाखान व कंधार तालुक्यातील गउफळ आंबुलगा येथील वाहन चालक बालाजी नागोराव श्रीमंगले वय वर्षे ५० यांच्याविरुद्ध देगलूर पोलीस स्टेशन देगलूर येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मा. न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यास संबंधितास आजीवन तुरुंगवास आणि १० लाख रुपये पर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर व संतोष कनकावाड तसेच नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी पोलिस निरीक्षक बी.एम. धबडगे, पोलिस उपनिरीक्षक एम.एस. ठाकूर तसेच पो. कॉ. श्री. लुंगारे,श्री. यमलवाड यांचे सहकार्याने केली आहे.

लॉकडाऊनमुळे नांदेडमधील ऑटो रिक्षाचालक आर्थिक संकटात; जगावं की मरावं हाच प्रश्न..:-अहेमद बाबा बागवाले

लॉकडाऊनमुळे नांदेडमधील ऑटो रिक्षाचालक आर्थिक संकटात; जगावं की मरावं हाच प्रश्न..:-अहेमद बाबा बागवाले



नांदेड:- (एजास कुरेशी)
ऑटो रिक्षाचे हप्ते, घर खर्च, घराचे भाडे, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक अडचणीत सापडलेला ऑटो रिक्षाचालक आता लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊन मुळे त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे काटकसरीने दिवस काढत आहेत. रिक्षाचालकांचा जगण्याचा प्रश्न गंभीरबनला आहे.
त्यांतच अत्ता
 रिक्षाचे हप्ते कसे भरायचे. बँक कार्पोरेशन बँक बचत गट फायनान्स कंपनी बजाज कंपनी व इतर खाजगी फायनान्स लाईट बिल विना व्याज पाच महिन्यांची पैसे भरण्याची सवलत देण्यात यावी कारण रिक्षा चालू असून बंद असल्यासारखे आहे
 लॉक डाऊन लागल्यामुळे रिक्षाचालकांचा तीन महिन्यापासून व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे नांदेड मध्ये रिक्षाचालकांना रिक्षा चालवण्याची परवानगी दोन प्रवासी साठी देण्यात आलेली आहे नांदेडमध्ये पंधरा हजार रिक्षाचालक आहेत सध्याच्या परिस्थितीत रेल्वे बंद आहे ,बस बंद आहे, कॉलेज बंद आहे ,टिहीशन  बंद ,आहे ग्रामीण भागातील प्रवासी बंद आहे ,व इतर घटक बंद असल्या कारणाने व कोरोनाच्या भीती कारणांनी रिक्षाचालकांना प्रवासी साठी कसरत करावी लागत आहे रिक्षा रोड वर तर दिसत आहे आमदनी मात्र काहीच नाही रिक्षाचालकांची दयनीय अवस्था झालेली आहे सध्याच्या परिस्थितीत रिक्षाचालकांची पोटाची खळगी भरणे कठीण झालेले आहे अशा परिस्थितीत कर्ज कसे फेडणार बँकेचे कर्ज, खाजगी कज, खाजगी फायनान्स, बचत गट ,लाईट बिल, कसे भरणार लॉक डाऊन लागून जवळपास तीन महिने लोटलेले आहेत  रिक्षाचालक 80% घरासमोर उभे आहेत. सध्याच्या परिस्थितीत रिक्षाचालकांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. असेच राहिले तर  रिक्षाचालक पण शेतकरी प्रमाणे आत्महत्या करतील दोन रिक्षाचालकाने आत्महत्या केलेली पण आहे. गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असणाऱ्या लॉक डाऊन मुळे ऑटोरिक्षा घराच्या दारातच उभी करावी लागत आहे. कोरोना संकटात संचारबंदी लागू केल्याने रिक्षाचं चाक न फिरल्यामुळे त्यांच्या संसाराचा गाडा हे आता थांबला आहे.
त्यामुळे रिक्षाचालकांचे घराचे आर्थिक मीटरचा जणू काही डाऊन झाले आहे. यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या परिस्थितीत ला समजून नांदेड येथील टायगर ऑटोरिक्षा संघटनाचे जिल्हा अध्यक्ष अहेमद बाबा बागवाले, यांनी जिल्हाधिकारी कडे दाद मागितली आहे टायगर ऑटोरिक्षा युनियन संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना अर्ज दिला आहे जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे लक्ष देऊन गरीब ऑटो वाल्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

Thursday, June 11, 2020

राज्यातील अजून एक मंत्री कोरोना पॉझिटिव

 राज्यातील अजून एक मंत्री कोरोना पॉझिटिव




नांदेड  (प्रतिनिधी) : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य  कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.
5 जून रोजी परळीत जगतकर गल्लीतील एक महिला औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह  आढळून आली होती . त्यावेळी तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात ना.धनंजय मुंडे देखील आले होते . मात्र मुंडे यांचा समावेश हायरिस्क गटात न करता लो रिस्क गटात करण्यात आला होता . त्यामुळे त्यांचे स्वब घेण्यात आले नव्हते . तर हायरिस्क गटातील लोकांचे स्वब निगेटिव्ह आढळून आले होते . त्यानंतर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते . आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नाही  .

18 लाख 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त

18 लाख 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त



संबंधितांवर गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) दि. 11 :- लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये गोवा गुटखा 30 बोरी अंदाजे 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.

लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र. के. ए. 38- 6482 या वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थाची 10 जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी तपासणी केली. यावेळी 1 हजार गोवा गुटखा 30 बोरी जवळपास 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला.  गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील पडसावली (ता. आळंदा) येथील आरोपी रुखमोद्दिन इमाम इमानदार वय वर्षे 28 यांच्या विरुद्ध माळाकोळी पोलीस स्टेशन येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मा. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास अजीवन तुरुगंवास आणि 10 लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.  अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, सुनिल जिंतूरकर व नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी केली

Saturday, June 6, 2020

अवैध वाळू वाहतूकवर तहसील प्रशासनाची धडक कार्यवाही अजून एक अवैध वाळूचा ट्रक जप्त

अवैध वाळू वाहतूकवर तहसील प्रशासनाची धडक कार्यवाही अजून एक अवैध वाळूचा ट्रक जप्त 




भोकर (प्रतिनिधी)
संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी भोकर तालुका प्रशासन काटेकोर प्रयत्न करून प्रशासकीय कामात व्यस्त आहेत याचाच गैरफायदा घेत  तालुक्यातील वाळू माफिये रेती  घाटातुन अवैध वाळू उत्खनन जोमात करून उत्खनन करण्यात आलेले अवैध वाळू साठा छुप्या मार्गाने तालुक्यात आणून जास्तीच्या दराने विकत आहेत

नुकतेच मागील आठवड्यात तहसील कार्यालया मार्फत एक अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक ताब्यात घेऊन कार्यवाही करण्यात आली होती. तहसिल प्रशासन एवढे कारवाया करून सुद्धा अवैध रेती वाल्यांना कोणताच धाक बसत नाही याचे कारण काय असावे..? रोज रात्रीच्या वेळेस अवैध वाहतूक सुरूच आहे. आणखी एक ट्रक पकडण्यात आला आहे.
दिनांक ५ जून 2020 च्या रात्री ११ च्या दरम्यान मौ.भोसी येथे एक टिप्पर अवैध रीत्या  वाळू   वाहतूक करताना आढळून आला  नायब तहसिलदार संजय सोलंकर यांना तपासणी दरम्यान आढळून आला सदरील वाहन क्रमांक एम.एच.,२६, ए.डी., १२५४, वाहन मालक  पिंटू पाटील,रा.वासरी,ता.मुदखेड व वाहन चालक विठ्ठल भुजंग उमाटे रा.वासरी,ता.मुदखेड,  यांच्यावर दंडात्मक कार्यवाही साठी ते वाहन जप्त करून तहसील कार्यालयात आणण्यात आले आहे सदरील कार्यवाहीसाठी पथकात सुरेश कपाटे (मंडळ अधिकारी मातुळ)यांचा सहभाग होता
सदरील वाहन भोकरचे उपजिल्हाधिकारी पवन चांडक यांच्या आदेशाने व सूचनेनुसार करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्या पासून तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली. सर्वसाधारणपणे खुल्या ट्रक, ट्रॅक्‍टर व डंपरमधून वाळू वाहतूक केली जाते. परंतु ही वाहने खुली असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे सहज शक्‍य होते. त्यामुळे वाळू व्यावसायिकांनी आता त्यावर इलाज शोधून वाळू वाहतुकीचा नवा फंडा सुरू केला आहे. मालवाहू बंदिस्त ट्रकमधून वाळू वाहतूक होत असून, ट्रक बंदिस्त असल्याने वाळू दिसत नाही आणि इतर वाहनांपेक्षा अधिक साठा वाहून नेला जाऊ शकतो,  म्हणून ही पद्धत अलीकडे सर्रास सुरू आहे.असेच काही मालवाहू बंदीस्त वाहन ज्यांच्यावर धनलक्ष्मी आहे ते वाहन किनवट रोड ने हिमायतनगर च्या पुढे जात आहेत या कडे प्रशासना ने लक्ष द्यावे अशी चर्चा भोकर शहरात होत आहे

Friday, June 5, 2020

माजी नगरसेवका विरुद्ध ॲट्रॉसिटी व खंडणीचा गुन्हा दाखल

माजी नगरसेवका विरुद्ध ॲट्रॉसिटी व खंडणीचा गुन्हा दाखल




भोकर (प्रतिनिधी)
भोकर नगर परिषदेचे माजी नगरसेवक केशव  मुद्देवाड यांनी नगरपालिकेच्या कार्यालयीन कर्मचारी व घन कचरा उचलणाऱ्या गुत्तेदाराला खंडणी पोटी धमकावून रक्कम मागितल्याची तक्रार देण्यात आली आहे.
याप्रकरणी भोकर पोलिसात माजी नगरसेवका विरुद्ध खंडणी व आत्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे भोकर नगर परिषद अंतर्गत शहरातील घनकचरा उचलणारे गुत्तेदार यशवंत ज्ञानोबा प्रधान हे दिनांक 4 जून रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान भोकर नगर परिषदेतील कामकाज आटोपून बाहेर निघाले यावेळी नगरपालिकेच्या गेट समोर माजी नगरसेवक केशव मुद्देवाड  यांनी त्यांना अडवून तू मागील दीड वर्षापासून घन कचरा उचलण्याची गुत्तेदारी करतो, पण तू आज पर्यंत एकही रुपया दिला नाहीस, मागील कामाचे दीड लाख रुपये दोन दिवसात दे, व प्रतिमाह 50 हजार रुपये दे, नाहीतर टेंडर मिळू देणार नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे तसेच भोकर नगर परिषदेतील कार्यालयीन कर्मचारी साहेबराव मोरे हे दिनांक 4 जून रोजी 2:30 च्या दरम्यान कार्यालयीन कामकाज करीत असताना त्याठिकाणी माजी नगरसेवक आले व त्यांनी साहेबराव मोरे यांना मी माहिती अधिकार टाकलेल्या कामाची माहिती अद्याप का दिली नाही अशी विचारणा केली यावेळी साहेबराव मोरे यांनी सध्या लॉक डाऊन आहे व मी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या कामात असल्याने विलंब झाला असला तरी मी लवकरच माहिती देईल असे सांगितले तेव्हा मुद्देवाङ यांनी साहेबराव मोरे यांना जातिवाचक शिवीगाळ करून झटापटी करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. उपरोक्त प्रकरणी गुत्तेदार यशवंत प्रधान व साहेबराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अ.जा.अ.ज. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत शासकीय कामात अडथळा व खंडणीचा गुन्हा भोकर पोलिसात दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बी मुदीराज हे करीत आहेत

काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते फारूक करखेलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण व फळ वाटप

काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते फारूक करखेलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण व फळ वाटप





भोकर (प्रतिनिधी)
भोकर शहरातील  युवक काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते मंत्री अशोक चव्हाण साहेबांचे विश्वासू फारूक भाई करखेलीकर यांच्या वाढदिवसा निमित्त ५ जून रोजी तालुक्यातील युवा काँग्रेसचे कार्यकर्त्या सह मित्र मंडळींनी वाढदिवस साजरा करून वाढदिवस निमित्त भोकर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप केले व महाराष्ट्र परिवहन महामंडळ,व तहसील कार्यालय,व तसेच ग्रामीण रुग्णालयात, वृक्षरोपण करण्यात आले

काँग्रेस पक्षात मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून  ओळख असलेल्या फारूक करखेलीकर यांचे ग्रामीण,व शहरातील, गोरगरीब  जनतेच्या खाजगी, शासकीय कोणत्याही कामाकरिता  सदैव धावून जाणारे म्हणून एक वेगळी  ओळख  निर्माण केली आहे.



 फारूक भाई करखेलीकरला वाढदिवसा निमित्त तालुक्यासह परिसरातून वॉट्सअप्प, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाचे वर्षाव झाले. रुग्णालयात फळ वाटप वृक्ष रोपण करते वेळी सम्राट हिरे, काँग्रेस नेते,आदिनाथ चिंताकुटे, काँग्रेस कार्यकर्ते सुरज जाधव,शेख रहिम दादा,इंम्तीयाज इनामदार,रहिम करखेलीकर,शेख सम्रान, सद्दाम शेख,अमेर शेख, जेडी फेरोज, माजीद लाला, निसार शेख,नाजीम शेख, व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

नांदेड :-लॉकडाऊनमुळे उपाशी मरणाची आली वेळ..! म्हणून आंबा नगर येथील युवकांने गळफास घेऊन संपवला जीवनाचा खेळ..!

नांदेड :-लॉकडाऊनमुळे उपाशी मरणाची आली वेळ..! म्हणून आंबा नगर येथील युवकांने गळफास घेऊन संपवला जीवनाचा खेळ..!


                                                                     

हाताला काम नसल्यामुळे नैराश्यातून एका जेसीबी चालकाची आत्महत्या                           



नांदेड (ए एम कुरेशी)
अंबानगर सांगवी येथील दत्ता उकंटी खिल्लारे यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांचा भाऊ माधव उंकटी खिल्लारे (३९) हा जेसीबी चालक म्हणून काम करत होता. पण जवळपास तीन महिन्यापासून कांहीच काम नसल्याने घराचा गाडा कसा चालवावा या चिंतेत त्याने ३ जून रोजी पहाटे ३ ते ४ या वेळेदरम्यान आपल्या घरातील कडीला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. विमानतळ पोलीसांनी या संदर्भाने आकस्मात मृत्यू दाखल केला असून पोलीस नाईक गोवाडे अधिक तपास करीत आहेत.

, घर खर्च, घराचे भाडे, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक अडचणीत सापडलेला जेसीबी चालक आता लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला होता. लॉकडाऊन वाढविल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले होते. चालकांवर अवलंबून असणारे त्याचे कुटुंब काटकसरीने दिवस काढत होते. जगण्याचा प्रश्न गंभीरबनला होता म्हणून त्यांने जीवनच संपवला.


भारत सरकारने लॉक डाऊन केल्यामुळे आज जवळपास ९० दिवसांपासून हाताला काम नाही उपासमारीची वेळ आली आहे  माझ्याच खाण्यापिण्याचे वांदे होत असल्यामुळे मी दोन मुले पत्नी  इतक्या जीवाची कशी  वेवस्था करू या निराशेतून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली  हाताला काम नसल्यामुळे नैराश्यातून या तरुणाने आत्महत्या केली असल्यामुळे नांदेड शहर हळहळ व्यक्त होत आहे लॉक डॉऊन मध्ये आत्महत्या करणारा हा जेसीबी चालक जिल्ह्यात तिसरा व्यक्ती आहे.

Thursday, June 4, 2020

जिल्ह्यात बांधीत कामगाराच्या संपर्कात आलेल्यामूळे ५ तर दुसरे २ एकूण ७ कोरोना पॉझिटिव्ह,

जिल्ह्यात बांधीत कामगाराच्या संपर्कात आलेल्यामूळे ५ तर दुसरे २ एकूण ७ कोरोना पॉझिटिव्ह,





प्रतिनिधी / नांदेड
जिल्ह्यात गुरुवारी  ६९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील ७ अहवाल  कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हातील कोरोना बधितांची संख्या १८२ झाली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये  नई आबादी येथील बांधीत कामगार रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक आहेत
लेबर कॉलनी येथील ५ जनाचा समावेश आहे. व  १ नवीन रुग्ण उमरखेड येथील रहिवासी व तसेच १ नवीन रुग्ण औरंगाबाद येथील रहिवाशी आहे आज ६९ अहवाल प्राप्त झाले असून त्यात ५ पोजिटीव्ह  ४७ निगेटिव्ह ४ नाकारले नमुने व २ अनिर्णित व तसेच ७० प्रलंबित आहेत आतापर्यंत बांधिन रूप व्यक्तीची एकूण संख्या १८२ झाली आहे व तसेच १२६ जणांना घरी सोडले आहेत ४६ जणांवर उपचार सुरू आहेत व तसेच आठ बांधीता चे मृत्यू झाले आहे नागरिकांना आव्हान आहे नांदेडमध्ये संक्रमण वाढत आहे सर्वांनी काळजी घ्यावी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर निघू नये मास्क चा वापर करावा सॅनिटायझरचा वापर करावा वारंवार साबणाने हात धुवावे १० वर्षाखालील मुले ६० वर्षावरील व्यक्ती व तसेच गरोदर माता आणि आजार ग्रस्त व्यक्तींना वैद्यकीय उपचाराच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू देऊ नये २ व्यक्ती मध्ये किमान कमीत कमी ६ फुटाचा अंतर राखावे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये प्रवास शक्यतो टाळावा प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या अन्न फळे व पियाचे सेवन करावे

टायगर ऑटोरिक्षा संघटनाच्या वतीने ऑटो चालकांना राशन किट वाटप

टायगर ऑटोरिक्षा संघटनाच्या वतीने ऑटो चालकांना राशन किट वाटप




नांदेड:- (एजास कुरेशी)
नांदेड येथील ऑटो रिक्षाचालकांचे व मालकांचे खूप दयनीयअवस्थाझालीआहे. हप्ते, घर खर्च, घराचे भाडे, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक अडचणीत सापडलेला ऑटो रिक्षाचालक आता लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊन वाढविल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे काटकसरीने दिवस काढत आहेत. रिक्षाचालकांचा जगण्याचा प्रश्न गंभीरबनला आहे.

या परिस्थितीत ला समजून नांदेड येथील टायगर ऑटो रिक्षा संघटनाच्या वतीने चालकांना राशन किट वाटप करण्यात आले आहे. फुल नाही फुलाची पाखळी म्हणून छोटीशी मदत करण्यात आली लॉक डाऊन काळात बरेच चालक आत्महत्या करत आहेत  त्यात काही चालकांचे विधवा महिला आहेत त्यांना पण टायगर ऑटो संघटना च्या वतीने राशन किट वाटप करण्यात आले आहे.
सरकार ने पण मदत करावी असे मागणी टायगर ऑटो संघटनाचे जिल्हा अध्यक्ष अहेमद बाबा बागवाले यांनी केली आहे.व संघटनेत काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेचा आभार मानला आहे

मंत्री अशोक चव्हाण यांनी केली कोरोना वर मात लवकरच घरी परतणार..!!

मंत्री अशोक चव्हाण यांनी केली कोरोना वर मात लवकरच घरी परतणार..!!




नांदेड (प्रतिनिधी)
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांना करोनाचा संसर्ग झाला होता. ते आता कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत.  त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली असून, ते लवकरच घरी येत आहेत. त्यांनी कोरोनावर मात केली असली तरी डॉक्टरांनी पुढील एक महिना सक्तीची विश्रांती करण्यास सांगितले आहे. या काळात मला कुणीही भेटायला येऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल, असं देखील ते म्हणाले.


त्यांच्यावर मुंबई येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले


कोव्हिड पॉझिटिव्ह ड्रायव्हरच्या संपर्कात आल्यामुळं अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी  त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. बरे झाल्यानं नांदेड सह अशोक चव्हाण यांचा मतदान संघ भोकर येथील सर्व कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला
 आहे.

Wednesday, June 3, 2020

बिग ब्रेकिंग:-नांदेडमध्ये वेगवेगळ्या भागात आज तब्बल २३ कोरोना पॉझिटिव्ह,

बिग ब्रेकिंग:-नांदेडमध्ये वेगवेगळ्या भागात आज तब्बल २३ कोरोना पॉझिटिव्ह,




नांदेड़ (प्रतिनिधि)
नांदेड़;- बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालात तब्बल २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नांदेड शहरातील देगलूर नाका भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. या ठिकाणी डॉक्टर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे उर्वरित त्याच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक आहेत. त्याचबरोबर शिवाजीनगर भागातील नई आबादी येथील नऊ रुग्ण आढळून आले आहेत. बाधित कामगार कुटुंबातील त्याचे सदस्य व नातेवाईक आहेत. तसेच आमदापुर (ता. देगलूर) येथे एक नवीन रूग्ण आढळून आला आहे.

कोरोना संशयितांचा स्वॅब तपासणी अहवाल बुधवारी (दि. ३) प्राप्त झाल्यानंतर खळबळ उडाली असून सकाळी दोन तर सायंकाळी २१ असे दिवसभरात २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्हची संख्या १७५ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.

गेल्या दोन तीन दिवसापासून लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर आणि बाजारपेठेत गर्दी झाली आहे. तर दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असताना आणि अनेकजण बरे होऊन घरी जात असताना बुधवारी (दि.३) धक्कादायक घटना घडली आहे. दिवसभरात तब्बल २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

नांदेड जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७५ वर गेली आहे. बुधवारी संध्याकाळी १३२ अहवाल प्राप्त झाले असून त्यात २१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच ९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नाकारलेले नमुने सहा तर अनिर्णित सहा आहेत. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच जनतेने आपल्या मोबाईलवर 'आरोग्य सेतू ॲप' डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Tuesday, June 2, 2020

हातगाडे फळ विक्रेता संघटनेचे अध्यक्ष पदी मंसूर खान पठाण यांची निवड

हातगाडे फळ विक्रेता संघटनेचे अध्यक्ष पदी मंसूर खान पठाण यांची निवड





भोकर (प्रतिनिधी)
मागील अनेक वर्षांपासून  छोटे व्यावसायिक रस्त्याच्याकडेला हातगाडी लावून फळ व भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाढा ओढत आहे  त्यांच्यावर सतत अन्याय होत असतो यांना वेळोवेळी दबावतंत्राचा वापर करून हाकलून लावण्यात येते म्हणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असते पहिलेच अनेक होतकरू तरुणांच्या हाताला काम नाही. अशातच हातगाडी लावून आपला उदरनिर्वाह करत आहेत त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून एक संगठना बनवण्यात अली आहे त्या संघटनेचे अध्यक्ष म्हनून मन्सूर खान पठाण, तर उपाध्यक्ष शेख जाहीर, यांची निवड करण्यात आली आहे

 भोकर तालुक्यात तसेच शहरात हात गाडी चालवून फळ व जीवनाश्यक वस्तू विकणाऱ्या ची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ते असंघटित असल्यामुळे त्यांच्यावर वारंवार अन्याय अत्याचार होतो म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, यांच्या निवासस्थानी हात गाडी फळ जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या लोकांची बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांच्यावर होणारा अन्याय संदर्भात चर्चा करण्यात आली या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी एक संघटना व्हावी म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांचे विश्वासू मंसूर खान पठाण कोळगावकर, यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष शेख जहीर, सचिव शेख गौस,यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित कार्यकारिणीचे माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, माजी नगरसेवक करीम बागवान, व तसेच माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, यांनी स्वागत केले यावेळी शेख नसीर भाई, शेख फयाज भाई, बाळूमामा, ललिताबाई खांडरे, नागोराव, रहमान भाई, मोहम्मद अन्सार, जब्बार पठाण, शेख मुसा, मोहम्मद नवाब, शेख गौस शेख चांद, यांची उपस्थिती होती.




मन्सूर खान पठाण  कोळगावकर

आज पासून कोणत्याही फळ विक्रेतेवर अन्याय होऊ देणार नाही प्रशासना फळ विक्रेत्यावर व हातगाडे वर उदरनिर्वाह करणाऱ्यावर अन्याय करू नये अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आज पासून कोणत्याही हातगाडा असो का फळ विक्रेत व भाजीपाला विकणाऱ्या गरीब जनतेला मी आव्हान करतो कोणावर ही कोणताही अधिकारी विनाकारण अन्याय करत असेल तर मला कळवावे मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही हात गाड्यावर फळविक्रेते त्यांना न्याय मिळवून देईल:- मन्सूर खान पठाण  कोळगावकर

Tuesday, May 26, 2020

वैघकीय सेवेवर विश्वास नाही काय? अशा पद्धतीने प्रश्न विचारणे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होय. ज्यांनी हा आरोप केला त्यांना जिल्ह्यातील जनता चांगलेच ओळखून आहे.-आ.राजुरकर

वैघकीय सेवेवर विश्वास नाही काय? अशा पद्धतीने प्रश्न विचारणे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होय. ज्यांनी हा आरोप केला त्यांना जिल्ह्यातील जनता चांगलेच ओळखून आहे.-आ.राजुरकर





नांदेड दि. 26 - लोकांमध्ये जावून काम करीत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी नांदेडमधील एका रूग्णालयात त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना तात्काळ मुंबईला या असा आग्रह धरला. त्यामुळेच त्यांना मुंबईला हलविण्यात आले. यातही काही जणांकडून राजकारण होत आहे. एका बाजूस त्यांना बरे होण्याचे सदिच्छा देताना राजकारण करण्याचा जो काही प्रयोग होत आहे तो अतिशय खालच्या पातळीचे असल्याचे मत विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर यांनी व्यक्त केले.
देशात आणि राज्यात जेंव्हा कोरोनाचा प्रसार होत होता. अशावेळी आपला नांदेड जिल्हा हा या रोगापासून दूर राहिला पाहिजे. यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अहोरात्र प्रयत्न केले. वारंवार बैठका घेवून प्रशासनास सूचना केल्या. जिल्हा नियोजन समितीच्या उपलब्ध निधीपैकी 33 टक्के निधी हा आरोग्य सेवेसाठी वापरण्यात यावा असा आदेश दिला. नांदेडमधील जुन्या दवाखान्यातील सेवासुविधा वाढविण्यासाठी त्यांनी 2.25 कोटी निधी जिल्हा नियोजन समितीतून तात्काळ उपलब्ध करून दिला. प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सेंटरची स्थापना केली. भविष्यात वाढणार्‍या रूग्णांसाठी सेवेत कुठलीही कमी पडू नाही यासाठी औषध उपलब्धता, पीपीई किटची उपलब्धता, मास्क यासोबत अन्य वैद्यकीय साधन सामुग्रीची उपलब्धता अनेकदा तपासून पाहिली.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील गरीब माणसांना अन्नधान्याची अडचण येवू नये यासाठी घरपोच अन्नधान्य योजना राबविली. दुर्देवाने लोकांमध्ये काम करताना त्यांना कोरोनाची  लागन झाली. यामुळे जिल्ह्यातील जनता चिंताक्रांत आहे. लवकरच या आजारातून मुक्त होवून जिल्ह्यातील लोकांच्या समस्यांना सोडविण्यासाठी ते सहभागी होणार आहेत.
अशावेळी एका बाजूस त्यांनी बरे व्हावेत ह्या शुभेच्छा देताना दुसर्‍या बाजूस जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेवर विश्वास नाही काय? अशा पद्धतीने प्रश्न विचारणे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होय. ज्यांनी हा आरोप केला त्यांना जिल्ह्यातील जनता चांगलेच ओळखून आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची सुश्रुशा व सेवा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून यावर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सूक्ष्म लक्ष असल्याचेही आ. राजुरकर यांनी यावेळी सांगीतले.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...