Friday, August 23, 2019

३ महिन्याला जनता दरबार घेणार खासदार आपल्या दारी उपक्रम राबवणार :- खा.प्रताप पाटील चिखलीकर

दर ३ महिन्याला जनता दरबार घेणार
 खासदार आपल्या दारी उपक्रम राबवणार  :- खा.प्रताप पाटील चिखलीकर




एजास कुरेशी
भोकर : केंद्र व  राज्य सरकारच्या मिळणाऱ्या विविध योजनेच्या लाभापासून भोकर तालुक्यातील जनता मागील काळात वंचित असून आता यापुढे थेट जनता दरबारात खासदाराला भेटून समस्यांचे प्रत्यक्ष समाधान केले जाणार आहे.त्याच अनुशंगाने जनतेचे प्रलंबीत प्रश्न व समस्या जाणून घेतांना अधिका-यांकडून होत असलेली हेळसांड प्रस्तुत झाल्याने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ” अधिकाऱ्यांनों माझ्या सोबत काम करताना चष्मा बदला व जनतेच्या हिताची कामे प्राधान्यानी करा,मी निवडून गेल्यानंतर पाच वर्षांनी मतदार संघात येणारा खासदार नाही तर सतत जनतेच्या सेवेत राहणारा सेवक आहे. जर जनतेच्या कामात कुचराई किंवा हयगय करत असाल तर गाठ माझ्याशी आहे.मी कुणालाही माफ करणार नाही असा सज्जड सल्ला खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी भोकर तहसिल कार्यालयात दि.२२ ऑगस्ट रोजी प्रथमच संपन्न झालेल्या जनता दरबारात अधिका-यांना बहुसंख्य जनतेच्या समोर दिला.
भोकर तहसिल कार्यालयात खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी विविध विभागांतर्गत असलेल्या जनतेच्या समस्या व प्रलंबीत प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी जनता दरबार भरविला होता. तालुक्यातील बहुसंख्य जनतेनी लेखी निवेदनांनी आणि प्रत्यक्ष बोलून तक्रांरींचा महापुर मांडला.यावेळी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी अधिका-यांशी प्रश्नोत्तरे करुन प्रलंबीत प्रश्न व समस्या सोडवित ‘ऑन द स्पॉट ‘ जनतेचे समाधान केले.
तर जनता दरबाराचा समारोप करतांना खा.प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की,तालुक्यातील प्रत्येक गावात मला जाता आले नसले तरी सर्वच गावातील मतदारांनी लोकसभा निवडणूकीत मताचे भरभरून दान माझ्या झोळीत टाकले व निवडून दिले आहे.त्या उपकाराची जान मला असल्याने मी आभार व्यक्त करतो व गेल्या २५ वर्षात जे झाले नाहीत ते विकास कामे मी या ५ वर्षात करेन अशी ग्वाही देतो.परंतू ही प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी मी एकटा कमी पडेन,त्यासाठी  येणाऱ्या काळात जनतेच्या समस्या सोडविणारा एक जोडीदार येत्या विधानसभा निवडणूकीत निवडूण माझ्या ताब्यात द्या.तसे झाल्यास मागील पुर्ण बॅक लॉग भरुन काढण्याचा प्रयत्न आम्ही करु.तसेच पारिवर्तनाची लाट असून येणाऱ्या काळात तुमच्या हातून परिवर्तन घडवा.त्या परिवर्तनातून जनतेची कामे वेळेत नक्कीच होतील व आम्ही ते करुच आता ” खासदार आपल्या दारी ” या ऊपक्रमांतर्गत दर ३ महिन्याला मी जनता दरबार घेणार आहे.असे ही ते म्हणाले.



यावेळी राजा खंडेराव देशमुख,जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी सुरकुंटवार,माजी नगरसेवक दिलीप सोनटक्के,भाजपा ता. अध्यक्ष गणपत पिट्टेवाड,प्रकाश मामा कोंडलवार,प्रविण गायकवाड,सुभाष पाटील घंटलवार,सुभाष पाटील किन्हाळकर,किशोर पाटील लगळुदकर,गणेश कापसे बटाळकर,सुभाष पाटील कोळगावकर,दत्तात्रय पांचाळ,डॉ. फेरोज इनामदार,जवाजोद्दीन बरबडेकर,माधव शिंदे बटाळकर,उत्तम बाबळे,प्रशांत कानडे,नामदेव वाघमारे, बालाजी वाघमारे,शेख अर्शद भाई,सुनिल शहा,नगरसेवक शेख वकील शेख खैराती,खाजा तौफिक इनामदार,राजेश्वर देशमुख,नागमोड,संभाजी देशमुख कल्याणकर यासह तालुक्यातील सरपंच,ऊपसरपंच व सामान्य नागरीकांसह आदींची उपस्थीती होती.तर वन परिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे,सा.बां.वि.चे कार्यकारी अभियंता एस.व्ही.तोटावाड, उपअभियंता शिंदे, गटविकास अधिकारी जी.एल.रामोड,ता. कृषि अधिकारी विठ्ठल गिते यांसह शासकीय कार्यालयांच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जनतेचं मत…पुर्वीच्या खासदाराच्या कार्यकाळात असला दरबार कधीच झाला नाही… आता मात्र ‘ऑन द स्पॉट ‘ न्याय मिळतांना दिसतय !

संत रविदास मंदिर पूर्ववत बांधून देण्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन

संत रविदास मंदिर पूर्ववत बांधून देण्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन





भोकर :-एजास कुरेशी
भारताची राजधानी दिल्ली येथील तूघलकाबाद येथील श्री संत गुरु रविदास महाराजांचे ऐतिहासिक भव्य व पुरातन मंदिर जातीवादी सरकारने जेसीबीच्या साह्याने पाडून जमीनदोस्त केले आहे, त्याचा निषेध म्हणून भारतात सर्वत्र तीव्र स्वरूपाचे आंदोलने होत आहेत, गुरू रविदास यांचे मंदिर होते त्याच ठिकाणी पूर्ववत बांधून देण्यात यावे या मागणीसाठी अनेक कार्यकर्ते दिल्ली येथे ठाण मांडून बसले आहेत, त्या कार्यकर्त्यांवर दिल्ली सरकारने खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्यातचे पाप केले आहे, त्यांना तात्काळ सोडण्यात यावे व गुरु रविदास महाराजांचे मंदिर पूर्ववत तुघलकाबाद येथेच बांधण्यात यावे यासाठी भोकर येथील अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज दिनांक 23 ऑगस्ट 2019 रोजी नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत



 या निवेदनावर अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद शाखा भोकरचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार रमेश गंगासागरे, सचिव संतोष नरवाडे, बालाजी कंधारे, दशरथ तोडके, शिवराज इंगळे, पंढरी गंगासागरे, संजीव वाघमारे, कैलाश गंगासागरे, गणेश गंगासागरे, सुरेश गंगासागरे, बालाजी गंगासागरे, केरबाजी कदम, आकाश कुंडलकर, सदानंद लिंगमपले, यांच्या सह्या असून या आंदोलनास भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भीमराव दुधारे, पत्रकार एल.ए हिरे, भिम शाहीर बाबूराव गाडेकर  व भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष  मिलिंद गायकवाड यांनी पाठिंबा दिला आहे.

Thursday, August 22, 2019

नांदेडचे पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची मुंबईला बदली नवीन पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर

नांदेडचे पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची मुंबईला बदली नवीन पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर



नांदेड ()
 राज्याच्या गृहविभागाने आज 22 ऑगस्ट 2019 रोजी दुपारच्या सत्रानंतर जारी केलेल्या आदेशात 4 भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नांदेडचे पोलीस अधिक्षक संजय जाधव यांना मुंबईला पाठविण्यात आले आहे.

राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी आपल्या स्वाक्षरीने जारी केलेल्या आदेशात नांदेडचे पोलीस अधिक्षक संजय बालाजीराव जाधव यांची मुंबई शहरात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त पदावर नेमणुक झाली आहे. त्यांच्या जागी नांदेडचे पोलीस अधिक्षक या पदावर सोलापूरचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये उस्मानाबादचे पोलीस अधिक्षक राजा रामस्वामी यांना सुध्दा संजय जाधव यांच्यासह राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदावर पाठविण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक पदी नागपुर शहरात पोलीस उपआयुक्त पदावर कार्यरत असलेले राजतिलक रोशन यांना पाठविण्यात आले आहे. पोलीस महासंचालकांचे आदेश झाल्यानंतर या सर्वांना नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे संकेत या आदेशात दिले आहेत. हा आदेश राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक 201908221724529229 असा आहे.
दोन दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापुर्वीच संजय जाधव यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे

Monday, August 12, 2019

भोकर तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी

भोकर तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी

भोकर(एजास कुरेशी) भोकर तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांनी ईद अत्यंत उत्साहात साजरी करत सामूहिक नमाज अदा केली





त्यागाचे प्रतीक म्हणून साजरी करण्यात येणारी बकरी ईद भोकर तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांनी भोकर येथील उमरी रोड स्थित ईदगाह व शहरातील अनेक मस्जिद मध्ये नमाज पठण करून भारतात अमन शांती  नांदावी व तसेच ज्या भागात कमी पाऊस झाला तेथे पावसासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली शहरातील ईद निमित्त काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक साहेबांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी इदगाह येथे भोकर नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रतिनिधी विनोद पाटील चिंचाळकर, माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील ,सुभाष पाटील घंटालवार, सुभाष पाटील किन्हाळकर, सुभाष पाटील गौड, नगरसेवक मनोज गिमेकर ,भगवान  दंडवे, दत्तात्रय पांचाळ ,राम नाईक, बहुजन रयत पार्टी चे  माधव मेकेवाड, शिवेवार, शयामसुंदर मेटकर,वैजनाथ क्षीरसागर,सह
 विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते

Sunday, August 11, 2019

पक्षाने आदेश दिल्यास एमआयएम वंचीत कडून बाबा खान विधानसभा उमेदवारी लढवणार !

पक्षाने आदेश दिल्यास एमआयएम वंचीत कडून बाबा खान विधानसभा उमेदवारी लढवणार !




भोकर :नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा सपाटून पराभव झाला व काँग्रेस पक्षाच्या विविध पदावरुन मुक्तता झाली असल्याने त्यांनी नांदेड जिल्हा आणि विशेषत: भोकर विधानसभा मतदार संघात राजकीय मोर्चेबांधणी जोमाने सुरु केली आहे.त्यांचे भावी राजकीय अस्तित्व हे भोकर विधानसभा निवडणूक ठरविणार असल्याने चव्हाण कुटूंबीयांनी त्यांच्या पारंपारिक पारिवारीक भोकर विधानसभा मतदार संघास आपले लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणूकीत काही स्वपक्षीय व राष्ट्रवादीने त्यांच्या पराभवासाठी मोठा हातभार लावला हे सर्वश्रुत आहे.अशातच
विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आले असून भोकर चा राजकारण जोर धरू लागला आहे सर्व पक्षाचे मोर्चे बांधणी सुरू आहेत भोकर मतदार संघातून वंचित बहुजन व एम आई एम कडून बाबा खान पठाण उमेदवारी लढवणार असल्याची माहिती बाबा खान पठाण  यांच्या कडून मिळाली आहे पक्षाला उमेदवारी मागितली आहे पक्षाने आदेश दिल्यास भोकर मधून लढवणार आहे.भोकर मधील युवा पिढीचे चाहते आहेत बाबा खान म्हणून सर्व युवा कार्यकर्त्यांची इच्छा आहे बाबा खान ला एक वेळेस उमेदवारी मिळावी आम्ही जिंकून देऊ असे भोकर येथील सर्व एम आय एम च्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे
लोकशाहीत मतदान करणे व निवडणूकीत उमेदवार म्हणून उभे राहणे हा संविधानिक अधिकार प्रत्येक भारतीय नागरीकास दिला आहे.त्यामुळे एखाद्या नागरीकाने निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यात नाविन्य असे काहीही नाही

भोकर विधानसभेचा मागील इतिहास पाहिला तर येथील दलित,बहुजन मतदारांनी तत्कालीन उमेदवार नागनाथ घिसेवाड,डॉ. उत्तम जाधव व किशोर केसराळे यांना प्रस्तापितांच्या विरुद्ध अगदी विजयाच्या उंब-यावर नेऊन ठेवल्याची नोंद आहे.त्यामुळे आगामी निवडणूकीत या मतदारांनी जर पुर्वी सारखीच साथ दिली तर मोठा चमत्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही

Saturday, August 10, 2019

भोकर येथे आशा वर्कर्स , गट प्रर्वतक यांचा मेळावा संपन्न .

भोकर येथे आशा व्रकर्स , गट प्रर्वतक यांचा मेळावा संपन्न . 






      भोकर ( एजास कुरेशी ) येथे चॅलेंज कोचींग क्लासेस च्या हॉलमध्ये आशा वर्कर्स , गट प्रवर्तक यांचा मेळावा आज दि १०अॅगस्ट २०१९ रोजी कॉ . उज्वला पडलवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करन्यात आला असून CITU ( सिटू ) संलग्न महाराष्ट्र आशा वर्कर्स , गट प्रवर्तक संघटना शाखा भोकर नुतन कार्यकारणी निवडण्यात आली. जयश्री इंगळे ( अध्यक्ष ) रेणूका देशमुख ( सचिव ) , सहसचिव अनिता जंपलवाड, निर्मला गायकवाड , सुवर्णा अकमवार,आहिल्या चुकमवाड आदि कार्यकारणी सर्वानू मते निवडण्यात आली. यावेळी कॉ दिलीप पोतरे, शिवाजी गायकवाड , धोंडगिर गिरी, संजय जळपतराव , अनिल कराळे आदि सिटूचे पदाधिकरी उपस्थित होते. दिलीप पोतरे , शिवाजी गायकवाड यांनी आशा वर्कर्सना मार्गदर्शन केले . शेवटी कॉ. उज्वला पडलवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. शेवटी आशा वर्कर्स गट प्रवर्तक यांचे शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन भोकर  तहसिलदार यांना देण्यात आले .


Friday, August 9, 2019

३ लाख १२ हजार लाचेची रक्कम स्विकारनाऱ्या नगरअध्यक्षा सह एकाला अटक

३ लाख १२ हजार लाचेची रक्कम स्विकारनाऱ्या नगरअध्यक्षा सह एकाला  अटक





नांदेड (प्रतिनिधी)
मुदखेड नगर परिषद नगराध्यक्ष मुजीब अहेमद अमिरोद्दीन अन्सारी व  खासगी इसम मो.अली मो.एजाज मुदखेड येथील नगर परिषदचे नगरअध्यक्ष यांनी गुत्तेदारचे बिल काढण्यासाठी ५ लाख ९२ हजार ची मागणी केली होती  त्या प्रमाणे ५ लाख राउंड फिगर ची मागणी केली असता  ३ लाख १२ हजार रुपये नगदी नगराध्यक्षचा सहकारी मो. अली मो.एजाज याला ३ लाख १२ हजाराची लाच स्वीकारताना नगर परिषद मुदखेड येथे रंगेहात अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की
मुदखेड नगरपरिषदेमध्ये कंत्राटदार असणाऱ्या बजरंग वामनराव खोडके यांचे बिल काढून देण्यासाठी मुदखेडचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अमीरोद्दीन अन्सारी यांनी खाजगी इसम मोहम्मद अली मोहम्मद एजाज यांच्याकडे ३ लाख १२ हजार रूपये दिले. त्यांच्या कामाचे शिल्लक राहिलेले देयक आणि सुरक्षाठेव रक्कम ३४ लाख ८४ हजार ५२६ रूपये यावर स्वाक्षरी करून देण्यासाठी नगराध्यक्ष मुजीब जहागीरदार यांनी १७ टक्केप्रमाणे ५ लाख ९२ हजार ३९६ रूपये लाच मागत असून एकत्रीत रक्कम ५ लाख रूपये दिले तरच देयक स्वाक्षरी करणार असे सांगत असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १ ऑगस्ट रोजी आली होती. ७ ऑगस्ट २०१९ रोजी मुदखेड येथे पंचासमक्ष मुजीब अहेमद अन्सारी, जहागीरदार यांनी ३ लाख १२ हजार रूपये लाच मागितल्याची मागणी समोर आली. ते ३ लाख १२ हजार रूपये जी लाचेची रक्कम आहे, ती मुदखेड येथील खाजगी माणुस मोहम्मद अली मोहम्मद एजाज यांच्याकडे देण्यास सांगितली. आज ९ ऑगस्ट रोजी ३ लाख १२ हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुदखेडचे कॉंग्रेसचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अमीरोद्दीन अन्सारी (५१) आणि खाजगी माणुस मोहम्मद अली मोहम्मद एजाज (२८) या दोघांविरूद्ध मुदखेड पोलिस ठाण्यात
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८  (संशोधन२०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय लाटकर , श्नीमती अर्चना पाटील, व पोलीस उप अधीक्षक विजय डोंगरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कपिल शेळके,व बालाजी तेलंग, गणेश तालकोकुलवर,जगन्नाथ आनंतवार, सुरेश पांचाळ,  नरेंद्र बोळके, यांनी कार्यवाही पार पडली आहे.

 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी हा शासकीय काम करण्यासाठी लाच मागत असेल तर त्या संदर्भाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी. लाचेच्या मागणीचे फोनवरील बोलणे, एसएमएस, ओडीओ, व्हिडीओ असल्यास ती माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाल द्यावी, कोणाकडे माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार प्राप्त झालेली शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असेल तर ती माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी. लाच संदर्भाने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर, फेसबुक पेजवर तक्रार करता येते, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक 1064 (2), कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462 253512 आणि पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांचा मोबाईल क्र. 8975769918 यावर सुद्धा तक्रार करता येईल.

Tuesday, August 6, 2019

नांदेड मध्ये दुचाकी गाडीवर सापडलेल्या दोन अज्ञात बॅगमुळे बॉम्ब असल्याचे अफवेह ने काही काळ भीतीचे वातावरण

नांदेड मध्ये दुचाकी गाडीवर सापडलेल्या दोन अज्ञात बॅगमुळे बॉम्ब असल्याचे अफवेह ने काही काळ भीतीचे वातावरण




सोशल मीडियावर अफवेहला उत


‘खोदा पहाड निकला चुहा


नांदेड| प्रतिनिधी
 वर्कशॉप कॉर्नर जवळ असलेल्या यादव कॉम्प्लेक्स समोर एका दुचाकी गाडीवर सापडलेल्या दोन अज्ञात बँग्समुळे काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने त्यांची तपासणी केल्या नंतर 'खोदा पहाड निकला चुहा’ अशी परिस्थिती झाली.पोलिसांसह जनतेने सुद्धा सुटकेचा सुस्कारा सोडला.



यादव कॉम्प्लेक्स समोर एका दुचाकीवर दोन बँग्स ठेवलेल्या होत्या.दुचाकीस्वार आला तेव्हा त्या बँग्स आपल्या आहेत असे म्हणणारा कोणीच तेथे नव्हता.मग मात्र दुचाकीस्वाराची गाळण उडाली. त्याने याबाबतची माहिती भाग्यनगर पोलिसांना दिली.त्यांनी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले तेव्हा पोलीस निरीक्षक मधुसूदन अंकुशे,पोलीस उप निरीक्षक सानप,संगीता कदम,अनेक पोलीस कर्मचारी यांचा ताफा तेथे पोहचला.धातू परीक्षक आणि स्वान यांच्या साहाय्याने त्या दोन बॅग्सची तपासणी केली तेव्हा त्यात एका बॅग मध्ये कागदपत्रे आणि एका बॅग मध्ये कपडे सापडले.बॅग मधील कागदपत्रांच्या आधारे त्याबग्स तेलंगणा राज्यातील माणसाच्या असाव्यात असा अंदाज आहे. बॅग तपासणी झाली तेव्हा यापरिसरात मोठी गर्दी जमली होती.दुचाकीस्वाराने सुद्धा आपल्याला आलेली शंका पोलिसांना सांगितली.पोलीस विभागाने अत्यंत जलदगतीने प्रतिसाद दिला आणि तपासणी केली.अशीच दक्षता सर्व नागरिकांनी बाळगावी असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले आहे.जमलेल्या गर्दी मधून खूप जणांनी त्याची व्हिडिओ चित्री करणं करून सोशल मीडियावर पाठवून अफवाह करत आहेत अशी अफवाह पसरू नये अशे निर्देश पोलीस विभागाने जारी केले आहे.  तसेच आज सकाळ पर्यंततरी त्या दोन बॅग्सचा कोणी मालक पोलीसांपर्यन्त आला नव्हता. सध्या त्या दोन बॅग भाग्यनगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या आहेत.

Monday, August 5, 2019

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेवर गुन्हा दाखल करा....बहुजन रयत पार्टी

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेवर गुन्हा दाखल करा....बहुजन रयत पार्टी





भोकर:-एजास कुरेशी
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल अपमानापस्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मातंग समाजाच्या व अण्णा भाऊ साठे(महापुरुष) यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ते पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या भाष्यामुळे रामदास आठवले यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा. अशी तक्रार  भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना देण्यात आली आहे बहुजन रयत पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष माधव मेकेवाड ,बालाजी चार्लेवाड(मराठवाडा उपाध्यक्ष),रवी गेंटेवार (नांदेड जिल्हा उपाध्यक्ष),स.जब्बार स. (तालुका अध्यक्ष),सय्यद महेमूद(ता.कार्याध्यक्ष),आमेरअली सज्जाद अली(तालुका युवक कार्याध्यक्ष, भोकर) व अन्य बहुजन रयत पार्टी कार्यकर्ते तसेच पत्रकार अरुण डोईफोडे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी देखील भोकर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते .याबाबत अधिक माहिती अशी की ३ जुलै रोजी पिंपरी चिंचवड येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जनशताब्दी कार्यक्रमात आठवले यांनी अण्णाभाऊ यांनी लिहलेल्या गीतांचा अपमान करून म्हंटले की माझी मैना गावाकडं राहिली, म्हणून मी मुंबईकडे दुसरी पहिली. असे भाष्य आठवले यांनी केले. त्यामुळे  अण्णा भाऊ साठेच्या अनुयायांची भावना दुखावल्या आहेत. तसेच आठवले यांच्या या अशा वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि समाजात अशांतता ही पसरवू शकते.त्यामुळे वेळीच त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.


बहुजन रयत पार्टी कार्याध्यक्ष माधव मेकेवाड यांनी बेधडक महाराष्ट्र च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की....
भाजपने आठवले सारख्या बहुजनाच्याच एका गद्दाराला सोबत घेतले आहे.बहुजन समाजाचे हनन एका बहुजन समाजाच्या माणसाच्या हातून कसे करता येईन हे षड्यंत्र भाजप नेहमी आखत असते.लोकशाहीर सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या कडून बहुजन समाज संपूर्ण जागा झाला आहे.त्यांच्या साहित्याच्या लिखाणातून अनेक जण घडले आहेत.असे असताना दिल्लीतून येऊन महाराष्ट्र मध्ये अण्णा भाऊ चे चारित्र्य हनन होईल असे बेताल वक्तव्य त्यांच्या गीतातून केले आहे.ह्या मुळे संपूर्ण अण्णा भाऊ च्या अनुयायीची मने दुखावली आहेत.भाजप आणि RSS च्या लोकांनी बहुजन नेत्याच्या चारित्र्याचे हननांचे कार्य आज पर्यंत केलेले आहे आशा लोकांना भाजपने समर्थन केलेले आहे.आता आठवले सारख्या स्वार्थी माणसाला महापुरुष अण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य  करण्यासाठी सांगितले आहे.हे सर्व भाजप च्या सांगण्यावरून आठवले महाराष्ट्र मध्ये आले आणि असे बोलून गेले ह्या गोष्टीचा बहुजन रयत पार्टी तीव्र निषेध व्यक्त करत आहे त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अन्यथा आंदोलन ,उपोषण महाराष्ट्र भर करन्याचे निवेदन भोकर पोलिसांना दिले आहे त्याबद्दल चौकशी करून गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आमची आहे असे ते बोलले आहेत.

Sunday, August 4, 2019

बापूसाहेब गोरठेकर यांची सुलोचनाताई ढोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ढोले निवासस्थानी घेतली भेट

बापूसाहेब गोरठेकर यांची सुलोचनाताई ढोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ढोले निवासस्थानी घेतली भेट





भोकर (एजास कुरेशी)
  भोकर येथील काँग्रेस पक्षाचे महिला आघाडी शहरअध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुलोचनाताई माधवराव ढोले यांनी आपल्या कार्यकर्त्यां सहित ढोले निवासस्थानी  बापूसाहेब गोरठेकर यांची भेट  घेतली आहे.


सविस्तर वृत्त असे की  भोकर काँग्रेस पक्षाचे महिला आघाडी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते  हे सद्यैव भोकरच्या सामाजिक कामात त्यांची नोंद असतेच व आता ते  बापूसाहेब गोरठेकरच्या नेतृत्वाखाली जनतेचे प्रश्न सोडवतील की काय..? अशी चर्चा सुरू आहे व तसेच त्यांनी कोणताही पद न घेता फक्त बापूसाहेब गोरठेकर यांची भेट घेतली आहे. ढोले हे बापूसाहेब सोबत राष्ट्रवादी मध्ये १० वर्ष इमानदारीने पक्षवाढी साठी काम केलेले आहे काही काळा साठी ते काँग्रेस मध्ये प्रवेश केले होते  भोकर मध्ये सध्या बापूसाहेब गोरठेकर मित्र मंडळ मध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे बापूसाहेब गोरठेकर यांच्या  नेतृत्वावर विश्वास ठेवून बापूसाहेब जिथे आम्हीं तिथे असा नारा देत बापूसाहेब मित्र मंडळ मध्ये प्रवेश करत आहेत. बापूसाहेब गोरठेकर सोबत सुभाश पाटील घंटलवाड , दत्ता पांचाळ ,तोफिक नगरसेवक,सलीम सर, जवाजोद्दिन बारबडेकर, डॉ फ़ेरोज इनामदार ,मोहन पाटील हसापूरकर ,आनंदराव पाटील, बाबूराव पाटील अंदबोरीकर , शशी पाटील अर्धापुर, दिलीप तिवारी , बाभळीकर , आनंद ढोले,अमोल ढोले आदी सह उपस्थित होते

लोकसभेच्या पराभवानंतर भोसीकर यांचा भोकर तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा अखेर मंजूर

लोकसभेच्या पराभवानंतर भोसीकर यांचा भोकर तालुका अध्यक्ष  पदाचा राजीनामा अखेर मंजूर





भोकर:-(एजास कुरेशी)
भोकर तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर यांनी लोकसभा निवडणुकी नंतर त्यांच्या तालुकाअध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनी काल तो मंजूर केला आहे.
     मुस्लिम विरोधी वक्तव्य केल्याचे आरोप सुद्धा सामाजिक कार्यकर्ता एक मुस्लिम कार्यकर्ता शमीम इनामदार यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून भोकर पोलिसात  त्यावेळी अर्ज केला होता म्हणून त्यांच्या बद्दल अनेक चर्चेला उत शहरात पसरले होते त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया वर त्यानी राजीनामा द्यावा ह्या साठी सुद्धा पोस्ट केले होते.त्यावेळी काँग्रेस पार्टीचे  जिल्हाध्यक्ष   राजीनामा मागितला न्हवता पण अशा पडसादाने मुस्लिम मत लोकसभा उमेदवार एकवटू शकला नाही त्याच्या मुळे अशोक चव्हाण यांचा दारुण पराभव झाला त्या पराभवाला लक्षात घेऊन अनेक काँग्रेस चे दिगग्ज कार्यकर्ते आपले राजीनामे दिले होते त्यानंतर अनेक दिवसांनी भोकर शहरातील जगदीश भोसीकर यांचा राजीनामा मंजूर झाला पण हा राजीनामा काँग्रेस च्या लोकसभा पराभवाचा नसून जगदीश पाटील यांच्यावर त्या वक्तत्यावरून नाराज असलेल्या मुस्लिम समाजाची मते एकवटण्यासाठी आहे अशी चर्चा शहरात सध्या विरोधी पार्टी कडून जोर धरू लागली आहे.

Saturday, August 3, 2019

संपादक उत्तम बाबळे हे " साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान पुरस्काराने " सन्मानित

संपादक उत्तम बाबळे हे " साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान पुरस्काराने " सन्मानित




सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी भोकर येथे केले त्यांचे भव्य स्वागत सत्कार




भोकर एजास कुरेशी
भोकर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभीय जयंती सोहळ्या निमित्त त्यांच्या पवित्र जन्मूमीत वाटेगाव ता.वाळवा जि.सांगली येथे दि.१ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या अभिवादन सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री खा.शरदचंद्र पवार,माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे व आदी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ सामाजिक नेते संपादक उत्तम बाबळे यांना देशस्तरीय  " साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान पुरस्कार " प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या गौरवाचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून भोकर येथे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी त्यांचे भव्य स्वागत केले व भावी सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
विश्वभुषण थोर साहित्यीक साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे १ ऑगस्ट २०१९ ते १ ऑगस्ट २०२० हे जयंती जन्मशताब्धी वर्ष आहे.या औचित्याने सबंध वर्षभर राज्य,देश व विदेशात त्यांच्या गौरवार्थ विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन विचार अनुयायींच्या वतीने करण्यात येणार आहेत.




याच अनुशंगाने जन्मशताब्दीय वर्ष प्रारंभी जयंती सोहळा त्यांच्या पवित्र जन्मभूमीत वाटेगाव ता.वाळवा जि.सांगली येथे दि.१ ऑगस्ट २०१९ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या सोहळ्या प्रसंगी प्रथमच देशस्तरीय " साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान पुरस्कार -२०१९ " चे पहिले मानकरी ठरलेल्या आ.डॉ.जितेंद्र आव्हाड,प्रा.डॉ.कॉ.कन्हैया कुमार व जेष्ठ सामाजिक नेते संपादक उत्तम बाबळे यांना शरदचंद्र पवार, सुशिलकुमार शिंदे,राजू शेट्टी यांच्या हस्ते व आमदार जयंत पाटील,माजी खा.राजू शेट्टी,माजी मंत्री नितिन राऊत,आामदार आमदार सुमन पाटील,आमदार जयदेव गायकवाड,माजी मंत्री हसन मुश्रीफ,आमदार आनंदराव पाटील,माजी आमदार मानसिंग नाईक,रविंद्र काका बर्डे,अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई मधूकर साठे,नातू सचिनभाऊ साठे,नातू गणेश भगत,मानवी हक्कचे प्रा.डॉ.मिलींद आव्हाड,जेष्ठ सामाजिक नेते सतिश कावडे,सुरेश पाटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. संपादक उत्तम बाबळे यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत ही न डगमगता सामाजिक,शैक्षणीक,राजकीय व विविध क्षेत्रासह निर्भिड पत्रकारीतेतून निस्वार्थपणे अन्याय अत्त्याचाराविरूद्ध विरुद्ध अनेक वर्षापासुन अविरतपणे काम केलेले आहे.त्यांच्या या विशेष उल्लेखनिय कार्याची नोंद घेऊन वाटेगावच्या जयंती सोहळा समितीने त्यांचा देशस्तरीय पुरस्काराने सन्मान केला आहे.नांदेड जिल्हा व भोकरसाठी ही अभिमानाची बाब असल्याने अनेकांतून त्यांचे अभिनंदन होत असून भरभरुन शुभेच्छा दिल्या जात आहेत.
तसेच साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण उत्तम बाबळे यांचे दि.२ ऑगस्ट रोजी भोकर येथे आगमण झाले असता सामाजिक कार्यकर्ते व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांनी त्यांचे भव्य स्वागत केले.तसेच शासकीय विश्रामगृह भोकर येथे नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली व यथोचित सत्कार करण्यात येऊन भावी सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या.या सत्कार कर्त्यात व शुभेच्छूकात दिलीप वाघमारे,नामदेव वाघमारे,राजन्ना माहूरकर, देवराव मनपुर्वे,सखाराम वाघमारे,संग्राम वाघमारे,विठ्ठलनाथ डाकोरे,पत्रकार संघाचे अरुण डेईफोडे,सिद्धार्थ जाधव,बी.एस. सरोदे,शंकर कदम,शेख लतिफ भाई,संदेश कांबळे,कमलाकर बरकमकर,बाजार समिती संचालक अप्पाराव राठोड,चंद्रकांत बाबळे,आकाश बाबळे यांचा समावेश आहे.तर या स्वागत सत्काराचे आयोजन पांडूरंग सुर्यवंशी यांनी केले होते.

Friday, August 2, 2019

त्या नाराधमाने केला अल्पवयीन मुलीवर सतत एक वर्ष बलात्कार पीडितेच्या आईनेच केली होती त्याला मदत

त्या नाराधमाने केला अल्पवयीन मुलीवर सतत एक वर्ष बलात्कार  पीडितेच्या आईनेच केली होती त्याला मदत




भोकर-एजास कुरेशी
– भोकर येथील समता नगरमध्ये धक्का दायक घटना घडली आहे. वास्तव्यास रहात असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आईच्या मदतीने एका नराधमाने सतत एक वर्ष बलात्कार केल्याची तक्रार गुरूवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन पीडितेने केली आहे. याप्रकरणी पिडीतेच्या आईसह नराधमाविरूध्द भोकर पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  सविस्तर बातमी अशी की प्रकाश रामजी राठोड (५०) रा.हरीतांडा धानोरा असे त्या नराधमाचे नाव असून राठोडने पिडीतेच्या आईशी संगनमत करून तब्बल एक वर्षापासुन पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत होता. राठोड करीत असलेले अत्याचार सहन होत नसल्याने पिडीतेने दि. १ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी राठोड आणि पिडीतेच्या आईवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपविभागीय अधीक्षकारी बी. मुद्दीराज करीत आहेत.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...