Wednesday, October 31, 2018

पुण्यात शुक्रवार पेठेमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार, कोयत्याने केले वार.

पुण्यात शुक्रवार पेठेमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार, कोयत्याने केले वार.
                File photo

      प्रचंड वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या शुक्रवार पेठेतील शिंदे आळी येथे भर दुपारी एका तरुणावर पिस्तूलमधून धाड-धाड चार गोळ्या झाडल्या. तसेच कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भर रस्त्यात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. जखमी तरुणाने हल्लेखोरांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगेश धुमाळ (वय 32, शिंदे आळी, शुक्रवार पेठ) असे यामध्ये जखमी झालेल्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास धुमाळ हा शिंदे आळी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम समोर उभा असताना त्याच्यावर दोघांनी कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली, यात त्याच्या डोक्यावर जखम झाला. त्यानंतर त्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्याला लागल्याने तो जखमी झाला. भर रस्त्यामध्ये झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करून घेत धुमाळ यांनी थेट खडक पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना हा प्रकार सांगतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर धुमाळ याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली आहे.या घटनेची माहिती कळताच गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवलीजात आहे. धुमाळ याचाही गुन्हेगारी रेकार्ड असल्याने हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाल्याची शक्यता आहे.

भाजपचे आमदार राजेश काशीवार यांची आमदारकी रद्द.

भाजपचे आमदार राजेश काशीवार यांची आमदारकी रद्द.

             भनडारा-साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार राजेश काशीवार यांची आमदारकी रद्द झाली आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. नागपुर खंडपीठाच्या निकालानंतर भाजप आमदाराचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द झालेय.पराभूत काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार सेवक वाघाये यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. काशीवार यांनी निवड़णुक लढवितांना शासकीय कंत्राटदार असल्याची माहिती लपविली होती. त्याचा उल्लेख आपल्या तक्रारीत केला होता. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली असता वाघाये यांनी सादर केलेले पुरावे आधारावर नागपूर खंडपीठातील न्यायाधिशांच्या बेंचने आमदार काशीवार यांचे विधानसभेचे सदस्यत्व केले रद्द आहे. त्यामुळे भाजपला हा धक्का मानला जात आहे. मतदार संघासह भंडारा जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे भाजप आमदार राजेश काशीवार यांची आमदारकी रद्द करण्यात आलीय. नागपूर खंडपीठानं काशीवार यांची आमदारकी रद्द केलीय. काशीवार यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी आणि चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.

वाराणसीत गोळीबार, दोघांचा मृत्यू

वाराणसीत गोळीबार, दोघांचा मृत्यू 

          वाराणसीतील कँट परिसरात असलेल्या मॉलमध्ये अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, कँट परिसरातील जेव्हीएच मॉलमध्ये एका अज्ञात व्यक्तीनेगोळीबारकेला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यासाठी लोकांनी मॉलमध्ये गर्दी केली होती. मात्र, गोळीबाराचा आवाज आल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

कालच्या जिल्हानियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री असे का वागत होते? - आमदार डी. पी. सावंत

कालच्या जिल्हानियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री असे का वागत होते? - आमदार डी. पी. सावंत

  (File photo)

नांदेड़:-(एजास कुरेशी)

नांदेड़ येथे एकूणच कालच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री असे का वागत होते असा प्रश्न आ. सावंत यांनी उपस्थित केला. निलंबीत केलेल्या सदस्यांना आजपर्यंत तरी कोणतेही आदेश आले नाही आणि ते आदेश शासनाचे असावे लागतात त्याशिवाय त्या आदेशांना काही महत्व नाही. एकूणच पालकमंत्र्यांना आपले वागणं, बोलणं सुधारावं अशी अपेक्षा आ. सावंत यांनी व्यक्त केले. दलित वस्ती योजनेतील आजही 4 कोटींचा निधी प्रलंबित आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या कामामध्ये पालकमंत्री जाणुन बुजून त्रास देत आहेत आणि तो त्रास संपवण्यासाठी संघर्ष सुरूच आहे आणि तो संघर्ष पुढेही चालूच राहील असे डी.पी. सावंत म्हणाले. धर्माबाद येथे 12 कोटींचा निधी देण्याची घोषणा शासनाने जिल्हा नियोजन मंडळातील रक्कम द्यावी असे सांगितले यानंतर झाली. पण तो निधी मार्च 2019 पर्यंत आला नाही तर काय करणार, आपल्या जिल्ह्याचा पैसा एका तालुक्यावर खर्च होईल आणि तो परत आला नाही तर काय ? असा प्रश्न आ. सावंत यांनी उपस्थित केला. या प्रसंगी मात्र पालकमंत्री रामदास कदम यांनी 5 वेळेस विचारलेल्या या प्रश्नांना उत्तर देताना प्रत्येक वेळेस या प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे असे सांगितले होते, त्याला बगल दिली. आ. अमर राजूरकर यांनी पुन्हा सहाव्यांदा हाच प्रश्न उपस्थित केल्यानंतर रामदास कदम यांनी बैठक समाप्त झाल्याची घोषणा केली आणि त्यानंतर गोंधळ झाला होता. पालकमंत्री रामदास कदम यांनी काल दि. 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना तेथील न घडलेल्या गोष्टी सांगितल्या याबद्दल आ. डी.पी. सावंत यांनी खेद व्यक्त केला.

   नांदेड येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेला वाद चव्हाट्यावर आला आहे असे चित्र दिसत आहे
एका महिलेचा अपमान करत पालकमंत्र्यांनी केलेेले असभ्य वर्तन अत्यंत चुकीचे असल्याचा उल्लेख आ. सावंत यांनी केला. त्या महिलेने आपल्या भागातील मंडळी तेलंगणा राज्यात जाण्याच्या तयारीत आहे, असे वक्तव्य त्या भागातील जनतेसाठी निधी मिळावा म्हणून केले होते, असे आ. सावंत म्हणाले. यावेळी मात्र त्या महिला सदस्यांना रामदास कदम यांनी माझ्या महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही, असे सांगितले होते त्या शब्दांना मात्र बगल दिली. सिडको स्मशानभुमीत कार्यक्रमाला गेलेल्या पालकमंत्र्यांना तेथे कोणीच नसल्याने उपमहापौर गिरडे यांनी नारळ मागवला, त्यानंतर तो नारळ फोडण्यात आल्याची माहिती सांगितली. पण नारळ फोडण्याचा अधिकार पालकमंत्र्यांनी उपमहापौर विनय गिरडे यांनाच दिला होता, हे सांगितले नाही.नांदेडच्या पाणीप्रश्नावर बोलताना युपीपीचे पाणी ही पर्यायी सोय आहे. पण शासनाच्या नियमाप्रमाणे अगोदर पिण्याचे पाणी, त्यानंतर शेतकरी आणि त्यानंतर उद्योग यांना द्यायचे असते, असे सावंत म्हणाले

राफेल वर सुप्रीम कोर्टाच मोठ निर्णय, मोदी सरकारला आणखीन एक झटका. माहिती सादर करू शकत नाही - सरकारचे स्पष्टीकरण

राफेल वर सुप्रीम कोर्टाच मोठ निर्णय, मोदी सरकारला आणखीन एक झटका.
माहिती सादर करू शकत नाही - सरकारचे स्पष्टीकरण
 
             नवी दिल्ली: राफेल डील प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी करत सरकारकडून या व्यवहाराबाबत माहिती मागितली आहे. विमान खरेदीची प्रक्रिया काय आहे. तसेच याची सौद्याची किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनर याबाबत बंद पाकिटात १० दिवसात माहिती सादर करावी असे आदेश दिले आहेत. दरम्यान, सुनावणीदरम्यान अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी सांगितले की, राफेल विमानाची किंमतीचे प्रकरण संवेदनशील आहे. तसेच काही कागदपत्रे ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत येतात. त्यामुळे याबाबत संवेदनशील माहिती सादर करू शकत नाही.
यावर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधिश रंजन गोगोई यांनी सांगितले की, जर असे काही असेल तर तुम्ही याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करून सांगा की ही कागदपत्रांची माहिती का देऊ शकत नाही? आता यापुढील सुनावणी १४ नोव्हेंबरला होणार आहे.
                  सुप्रीम कोर्टाने केंद्राला आदेश दिले की, राफेल डीलबाबतची तर्कसंगत माहिती सार्वजनिक केली जावी. तसेच याचिकाकर्त्यांना भारतीय ऑफसेट पार्टनर निवडण्याबाबतची माहिती सादर करावी. संबंधित याचिका वरिष्ठ वकिल प्रशांत भूषण, अरूण शौरी आणि यशवंत सिन्हा यांनी दाखल केली आहे.प्रशांत भूषण यांनी राफेलची चौकशी कोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआयने करावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करणा-या सीबीआय अधिका-यांच्या बदल्या करू नये अशीही मागणी भूषण यांनी याचिकेत केली आहे. 
                 सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस एसके कौल आणि जस्टिस केएम जोसेफ यांच्या खंडपीठाने आज चार याचिकांवर एकत्रित सुनावणी करताना केंद्र सरकारकडून माहिती मागितली आहे. या याचिका प्रशांत भूषण, अरुण शौरी आणि यशवंत सिन्हांसह, वकील एम एल शर्मा व विनीत ढांडा आणि आप खासदार संजय सिंह यांनी दाखल केल्या.

Tuesday, October 30, 2018

वाढत्या महागाईचा आणखीन एक फटका, एसटीची हंगामी भाडेवाढ उद्यापासून; प्रवास भाड्यात १० टक्क्यांनी वाढ

वाढत्या महागाईचा आणखीन एक फटका, एसटीची हंगामी भाडेवाढ उद्यापासून; प्रवास भाड्यात १० टक्क्यांनी वाढ


                                                                                                                                                (File Photo)
           दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून राज्याच्या विविध भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वाढविण्यात आलेले दहा टक्के प्रवास भाड्याची अंमलबजावणी दि. १ नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यानुसार पुणे विभागाने प्रवास भाडे निश्चित केले आहे.दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एस.टी चीसरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ दि. १ ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल. मागील वर्षी याच काळात सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ केली होती. ही भाडेवाढ भाडेवाढ दि. ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्री पासून लागू होईल. पुण्यातील शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकातून विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी जादा बस सोडल्या जाणार आहेत. या बसचे दहा टक्क्यांनुसार जादा बस भाडे निश्चित करण्यात आले आहेत. एसटीकडून वातानुकुलित व्होल्वो, वातानुकुलित शिवशाही, निम आराम, साधी व रातराणी अशा बस सोडल्या जातील.एसटीने दिवाळीनिमित्त १० टक्के प्रवासभाडे वाढविले आहे. ही भाडेवाढ दि. १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. पण काही बुकिंग आधीच्या दरानुसारच झाले आहे. बहुतेक जण दीड पट प्रवास भाडे आकारत आहेत. ट्रॅव्हल कंपन्यांनी एसटीच्या दीडपटच भाडे आकारावे.

- बाळासाहेब खेडेकर,अध्यक्ष, पुणे डिस्ट्रीक लक्झरी बस असोसिएशन
खासगी ट्रॅव्हल्सचे जादा भाडे -
खासगी ट्रव्हल कंपन्यांना एसटीच्या प्रवास भाड्याच्या दीड पट भाडे आकारण्याची मुभा राज्य शासनाने दिली आहे. त्यानुसार बहुतेक ट्रव्हल्सकडून भाडे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, काही ट्रॅव्हल्सकडून अजूनही जादा भाडे आकारले जात आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नुकतीच ट्रॅव्हल मालकांची बैठकही घेण्यात आली. त्यामध्ये नियमापेक्षा जादा भाडे न आकारण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

जादा भाडेदर आकारल्यास खासगी वाहनांवर होणार कारवाई
सरकारने ठरवून दिल्या प्रमाणे भाडे न आकारणाऱ्या प्रवाशी वाहनांवर मोटार वाहन कायद्या प्रमाणे कारवाई करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिला. दिवाळीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहनांचा वापर करतात. त्या काळात नेहमीच्या प्रवास शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारले जाते. त्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी)अधिकारी आणि खासगी बस वाहतूकदारांची बैठक आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने टप्पा वाहतूकीचे दर या पुर्वी जाहीर केले आहेत. त्यानुसार बससाठी येणार्या प्रति किलोमीटर खर्चापेक्षा ५० टक्क्यांहून असणार नाहीत. त्यानुसार कमाल भाडेदरही निश्चित करण्यात आले आहे.खासगी बस वाहतुकदारांनी आॅनलाईन आरक्षण दर त्या पेक्षा अधिक दर्शविल्याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. भाडेदर नियमापेक्षा जास्त राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिली. नियमापेक्षा ज्यादा भाडेदर आकारल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.

साखर कारखाने आजपासून बंद; कारखानदारांच्या बैठकीत निर्णय.

साखर कारखाने आजपासून बंद; कारखानदारांच्या बैठकीत निर्णय.
                                                                                                                                                (File Photo)
          शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे तुटलेला ऊस गाळप करुन आज, बुधवारपासून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय साखर कारखानदारांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. ‘रयत क्रांती’ शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक २०० रुपये,‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने विनाकपात ३२१७ रुपये, तर शेतकरी संघटनेने एक रकमी ३५०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यातील संताजी घोरपडे, ‘राजाराम’सह इतर कारखान्यानी गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी तोडण्या रोखण्यास सुरुवात केल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जात आहे. त्याचा फटका येथील कारखान्यांना बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सध्या साखरेचा दर २९ रुपये आहे. बॅँकांकडून ८५ टक्क्यांप्रमाणे मिळणारी उचल आणि शेतकरी संघटनांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. ऊस तोडणी-वाहतूक खर्च, मागील हंगामातील कर्जाचे हप्ते द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागण्यांप्रमाणे सध्यातरी दर देणे अशक्य असल्याने हंगाम बंद ठेवणेच योग्य होईल. अशा परिस्थितीत शासनाने मदत करावी, त्यांच्या मदतीशिवाय हंगाम सुरू होणे अशक्य असल्याचे कारखानदारांनी सांगितले.

एटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान ! एटीएम मशीन हॅंग करून गंडा घालणाऱ्या आरोपीला बेड्या

एटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान ! एटीएम मशीन हॅंग करून गंडा घालणाऱ्या आरोपीला बेड्या
    अंधेरीतील एटीएम सेंटरमध्ये एटीएममशीन हँग करून एटीएम धारकांना गंडा घालणाऱ्या आकाश भोसले या आरोपीला अंधेरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. आतापर्यंत ही शक्कल वापरून आकाशने १० ते १५ ग्राहकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. अंधेरीतील एटीएम मधून अनेकांची फसवणूक केल्यानंतर अंधेरी पोलीस या आरोपीच्या मागावर होते. पोलिसांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आणि त्यानंतर आरोपी आकाशला अटक करण्यात आली आहे.  दोन एटीएम असलेली एटीएम सेंटर आकाश निवडायचा. त्यानंतर काही बटणं दाबून आकाश एक मशींन हॅंग करतो आणि त्यानंतर दुसऱ्या मशीनजवळ थांबतो. हॅंग झालेल्या मशीनजवळ ग्राहक येतो आपलं कार्ड टाकतो आणि पैस काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ती मशीन हॅंग झालेली असते. त्यावेळी शेजारी उभा असलेला आकाश त्याला दुसऱ्या एटीएमकडे पाठवतो. खातेदार पिन क्रमांक टाकून आपले पैसे काढत असताना आकाश त्याचा पासवर्ड बघतो आणि चार अंकी पिन क्रमांक लक्षात ठेवतो. नंतर हा ग्राहक जाताच आकाश हॅंग झालेल्या मशीनला परत व्यवस्थित करतो आणि त्या एटीएम मशीनमध्ये त्या ग्राहकाच्या कार्डची एंट्री आधीच झालेली असते. त्यामुळे पुन्हा एटीएम कार्ड इन्सर्ट करण्याची गरज नसते हँग केलेल्या मशीनमध्ये आकाश पासवर्ड टाकतो आणि पैसे काढून पसार होतो. अशी होती आरोपी आकाशाची मोडस ऑपरेंडी. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या एटीएम मशीनला कार्ड क्लोनिंग करून पैसे लुबाडले जात होते. आता आरोपी आकाशची ही शक्कल ऐकून बॅंकेचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत. युट्युबवर बघून आपण हे शिकल्याच आकाशने पोलिसांना सांगितलं आहे.

भूक का कोई मजहब नही होता साहंब', सहा वर्षांपासून गरिबांची भूक भागवतायंत अजहर मक़सूसी.

भूक का कोई मजहब नही होता साहंब', सहा वर्षांपासून गरिबांची भूक भागवतायंत अजहर मक़सूसी.


     सय्यद उस्मान अजहर मकसुसी यांनी माणुसकीचा धर्मच सर्वात मोठा असतो, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. हैदराबाद येथील सय्यद उस्मान हे गेल्या 6 वर्षांपासून सातत्याने गरीब, पीडित आणि वंचितांची भूक भागवतात. विशेष म्हणजे दररोज 300 ते 400 लोकांना ते मोफत जेवण देतात. शहरातील दबीरपुरा फ्लायओव्हरजवळ ते दररोज ही सेवा देताना तुम्हाला पाहायला मिळतील. हैदराबादच्या दबीरपुरा फ्लायओव्हर जवळील गरीब, भिकारी, बेघर, कचरा विकणारे, मजूर आणि गरजू लोक दररोज दुपारी सय्यद उस्मान याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. दुपारचे 12.30 वाजताच, सय्यद या जागेवर पोहोचतात. त्यानंतर, सुरू होते मोफतअन्नदान.गरम गरम भात आणि दाळ या गरजू व भूकेल्यांच्या पोटात घालण्याचे पवित्र काम सय्यद यांच्याकडून केलं जातं. गरीब आणि भुकेल्यांची भूक शांत करणं हेच अहजर यांच्या आयुष्याच उद्दिष्ट बनल्याचं दिसून येतंय. 'भूक का कोई मजहब नही होता', हेच अहजर यांच ब्रीदवाक्य आहे. भाकरीवर सर्वांचाच अधिकार आहे. त्यामुळे भुकेली व्यक्ती कुठल्या जातीची, पंथाची किंवा धर्माची आहे, याचा काहीही फरक पडत नसल्याचे उस्मान यांनी म्हटले. लहानपणी पैशांची कमरतता असल्यामुळे अनेकदा माझे कुटुंब उपाशीपोटी झोपलंय. सहा वर्षांपूर्वी एका फ्लायओव्हरजवळ लक्ष्मी नावाची एक महिला भुकेनं व्याकूळ झाली होती, ती रडत होती. त्यावेळी, तिला मी पोटभर जेवण दिलं. त्यामुळे मलाच मोठं समाधान वाटल. तेव्हापासून जमेल तसं पण दररोज मी फ्लायओव्हर खाली बसणाऱ्या गरजुंना अन्न पुरविण्याचं काम हाती घेतलं. सुरुवातीला मी एकटाच यासाठी पुढाकार घेतला. परंतु, नंतर काहीजण माझ्या मदतीला येऊ लागली. कुणी किराणा सामान देऊन तर कुणी अन्य मार्गाने माझ्या या कामाला गती दिली. त्यामुळे मी येथील गांधी जनरल रुग्णालयात उपाशी रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणं देण्याचे काम सुरू केल. सध्या दररोज 300 ते 400 गरजुंना या माध्यमातून अन्न मिळतं, असे अजहर यांनी सांगितल. विशेष म्हणजे अजहर यांनी आपल्या कामाची व्याप्ती राज्याबाहेरही वाढवली आहे. बंगळुरू, रायचूर, तंदूर, झाखंड आणि आसाम राज्यातही हे काम सुरू केल्याचं अजहर यांनी सांगितल. सध्या या सर्व ठिकाणी मिळून जवळपास 1000 ते 1200 जणांना दररोज जेवण देण्यात येत. त्यामुळे मला सर्वात आनंद होतो, असेही अजहर यांनी म्हटले. विशेष म्हणजे अजहर यांच्या या कामाचे स्वत: सलमान खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांनीही कौतूक केलं आहे.

बेवारस लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा इंटरनेशनल ह्यूमन राइट्स काँन्सिल

बेवारस लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा - इंटरनेशनल ह्यूमन राइट्स काँन्सिल


         परभणी शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, बस स्टॅंड परिसर ई. सार्वजनिक ठिकाणी बेवारस, बेसहारा लोक ज्यांच्या अन्न, वस्त्र ,निवारा इ. मूलभूत गरजा पूर्ण होत नाही त्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच जनावरा पेक्षाही अतिशय दयनीय अवस्था ज्या निराधार लोकांची झालेली आहे, त्यांच्या राहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी जेणे करून त्यांचे राहणीमान सुधारले जातील, या मागणी करिता इंटनँशनल  ह्यूमन राइट्स कॉंसिल टीम परभणी च्या वतीने उप जिल्हाअधिकारी डॉ. संजय कूंडेटकर यांच्या कडे देण्यात आले निवेदन देतांना IHRC चे जिल्हा अध्यक्ष वाजेद खान, जिल्हा सचिव मो. अजहर फारोखी, जन संपर्क अधिकारी अॅड.शेख रियाज़ व सदस्य शेख रफीक इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.

बंटी-बबली'ने 65 जणांना लावला चुना; एचडीएफसी बँकेचं दिलं बोगस पत्र.

बंटी-बबली'ने 65 जणांना लावला चुना; एचडीएफसी बँकेचं दिलं बोगस पत्र.

   तुम्ही 'बंटी और बबली' चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटातील कथानकात ज्यापद्धतीने दाम्पत्य अनेक लोकांना लाखो रुपयांचा चुना लावते. अशाच प्रकारे एका दाम्पत्याने येथील तरुणांना चुना लावला आहे. एचडीएफसी बँकेत नोकरी देतो, असे सांगून या दाम्पत्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.या दाम्पत्याने आणखी एका साथीदाच्या मदतीने बेरोजगार तरुणांना गाठून एचडीएफसी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. एवढेच नाही तर या तरुणांना नोकरी लागल्याचे त्यांनी नियुक्तीपत्र देखील सुद्धा दिले. मात्र, बँकेत गेल्यानंतर ते पत्र बोगस असल्याचे समजले आणि बँकेत कोणत्याच प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याचे तरुणांना समजले. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, फसवणुक झालेल्या तरुणांनी या दाम्पत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाम्पत्य पसार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली असून चौकशीला सुरुवात केली आहे. चौकशीत असे समजते की, या दाम्पत्याने गेल्या वर्षभरापासून अशाच प्रकारे तरुणांना गंडा घातला असल्याचे उघडकीस आले आहे. मार्च 2017 ते 2018 पर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता. नोकरीसाठी 'सिक्युरिटी मनी'च्या नावाखाली एकूण 65 जणांकडून या दाम्पत्याने प्रत्येकी 25 ते 30 हजार रुपये उकळले आहेत. या दाम्पत्याचे नाव रोहित कुमार उर्फ अमित चौधरी आणि त्याची पत्नी कोमल कुशवाह असे आहे. तर, त्यांच्या साथीदाराचे नाव विशाल पांडे असून तो उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील रहिवाशी आहे. तिघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

एस.टी. कर्मचारीही सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाहीत- धनंजय मुंडे

एस.टी. कर्मचारीही सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाहीत- धनंजय मुंडे

मुंबई दि.30 राज्यातील एस.टी. कर्मचार्‍यांना 4 हजार 849 रूपयांची ऐतिहासिक पगारवाढ दिल्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा फसवी असून कर्मचार्‍यांना अद्यापही या वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही. दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास राज्यातील एस.टी. कर्मचारीही सरकारला आणि परिवहन मंत्र्यांना दिवाळी गोड साजरी करू देणार नाहीत. असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. 
     मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या उपोषणाला त्यांनी आज भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी आ.अशोक धात्रक, संघटनेचे सरचिटणीस, हनुमंत ताटे उपस्थित होते. 
ज्या-ज्या वेळी सरकार ऐतिहासिक शब्द वापरते तेंव्हा तेंव्हा फसवणुक होणार हे नक्की असते, ऐतिहासिक कर्ज माफी म्हणून केलेली कर्जमाफी फसवी निघाली, त्याचप्रमाणे रावते यांची ऐतिहासिक पगारवाढीच्या घोषणाही फसवी निघाली आहे. अद्याप कर्मचार्‍यांना त्याचा लाभ मिळालेला नाही, यामुळे आता मी स्वतः कामगारांच्या खांद्याला खांदा लावून लढा देऊ अधिवेशनापूर्वी हा लाभ न मिळाल्यास अधिवेशन चालु देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या संघटनेच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्र पवार यांची ताकद उभी असल्याने कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मार्गी लागे पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे सांगतानाच हे सरकार एस.टी. महामंडळासह महाराष्ट्राला विकुन टाकायला निघाला आहे. 

या सरकारला उलथून टाकण्याची गरज असून, एस.टी. कर्मचार्‍यांनीच सरकारची घंटी वाजवण्याची वेळ आली असल्याचे मुंडे म्हणाले.

मनोहर पर्रीकर असतील तर दाखवा, नसतील तर श्राद्ध घाला; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान


  • मनोहर पर्रीकर असतील तर दाखवा, नसतील तर श्राद्ध घाला; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

  • गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या राजकारणात सक्रीय नाहीत. त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचं पथक त्यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निगरानीखाली मनोहर पर्रीकर24 तास असतात. दरम्यान, 14 ऑक्टोबरपासून पर्रीकर सार्वजनिकरित्या कोठेही दिसूनआले नाहीत. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होऊ लागल्या आहेत. यादरम्यानच, काँग्रेस नेता जितेंद्र देशप्रभू यांनी पर्रीकरांसंदर्भात वादग्रस्त विधान केले. जितेंद्र देशप्रभू यांनी टीका करताना म्हटलं की, गोव्याचे मुख्यमंत्री आहेत की नाही?, अशी आमच्या मनातशंका निर्माण होत आहे. खासगी किंवा सार्वजनिकरित्या ते कोठेही दिसून येत नाहीत. तुमच्याकडे जर मुख्यमंत्री नाहीत, तर मग त्यांचं श्राद्ध घाला. आम्हाला मुख्यमंत्री दाखवा तरी. आम्हाला पाहायचे आहे की, ते चालत फिरत आहेत का? बोलत आहेत का?, असे प्रश्न उपस्थित करत देशप्रभू यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
  • 14 ऑक्टोबरला मनोहर पर्रीकर यांना नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर सार्वजनिकरित्या ते कोठेही दिसले नाहीत. भाजपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्रीकरांच्या निवासस्थानी डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आले असून हे पथक त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहे. तर दुसरीकडे,काँग्रेसनं आरोप लावला आहे की, मुख्यमंत्र्यांच्या आसपास असलेल्या अधिकाऱ्यांचा समूह त्यांच्या गैरहजेरीत अयोग्य पद्धतीनं निर्णय घेत आहेत. दरम्यान, जितेंद्र देशप्रभूनं असंही म्हटलं की, मनोहर पर्रीकर जिवंत असतील तर ते सत्ताधारी भाजपानं गोव्याच्या जनतेसमोर सिद्ध करुन दाखवावं.

साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहितसह अन्य आरोपींवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप निश्चित


साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहितसह अन्य आरोपींवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप निश्चित

2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह अन्य आरोपीविरोधात मंगळवारी एनआयएकडून आरोप निश्चित करण्यात आले. साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहितसह अन्य सात आरोपींविरोधात दहशतवादी कट आखणे, हत्या आणि अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत. आपल्या विरोधात आरोप निश्चित करण्याला स्थगिती देण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य व्यक्तींनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावली होती.
आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर सर्व सातही आरोपींनी आपल्या विरोधातील आरोप फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, हायकोर्टाने एनआयएचे वकील संदेश पाटील यांना पुढील सुनावणीपर्यंत कर्नल पुरोहित यांनी दिलेल्या एका अर्जाचे उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील भिक्कू चौक येथील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींना एटीएसने अटक केली होती.

दोन्ही राजे एकत्र मात्र, अबोला कायम !

दोन्ही राजे एकत्र मात्र, अबोला कायम.
जुना मोटार स्टँड येथील दारू दुकान हटवण्यावरून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजांचा कडवा संघर्ष झाल्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंतही पोहाचले. असे असले तरी सोमवारीमात्र हेच दोन्ही राजे सातार्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. एवढेच काय तर दोघेही शेजारी शेजारीच बसले होते. संपूर्ण कार्यक्रमात दोन्ही राजांची जवळ बसणे लक्षवेधक ठरले असले तरी त्यांच्यातील अबोला मात्र कायम असल्याचेच दिसून आले. महाबळेश्वर-सातारा-धामणेर या रस्त्याच्या सुधारणा कामांचे भुमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले. या कार्यक्रमात खा. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या दोन्ही राजांमध्ये सुमारे वर्षभरापासून कडवा संघर्ष उफाळून आला आहे. अगोदर आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन ठेका व अलिकडे जुना मोटार स्टॅड येथील दारू दुकान हटवण्यावरून त्यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाल्याने त्यांच्यामधून विस्तवही जात नाही. दोन्ही राजांमध्ये पत्रकबाजीतून टिकास्त्रही सुरूच आहे. सोमवारी मात्र सातारकरांना हेच दोन्ही राजे एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले पहायला मिळाले. महाबळेश्वर -सातारा -धामणेर रस्त्याच्या सुधारणा कामाचे भुमिपूजन बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी  दोन्ही राजे उपस्थित होते.दोघेही शेजारी शेजारी बसले होते. मात्र त्यांनी कार्यक्रम संपेपर्यंत एकमेकाकडे ढुंकूनही पाहिले नाही. खा. उदयनराजे निमंत्रण पत्रिका पाहण्यात तर आ. शिवेंद्रराजे मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असताना चित्र दिसले. एकमेकांशेजारी बसूनही त्यांनी एकमेकांना दुर्लक्षितच केल्याचे पहायला मिळाले. कार्यक्रम संपल्यानंतरही दोन्ही राजे दोन्ही दिशेला निघून गेले. आ. शिवेंद्रराजे आपल्या गाडीतून मार्गस्थ झाले तर खा. उदयनराजे मात्र ना. चंद्रकांत पाटील यांच्या गाडीतून निघून गेले. खा. उदयनराजे व ना. चंद्रकांत पाटील यांनीएकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे सातार्यात राजकीय चर्चांना उधाण आले. खा. उदयनराजे व ना. चंद्रकांत पाटील यांच्या या एकत्र प्रवासात नक्की विकासकामांची चर्चा होती का  राजकीय चर्चा झाली?  याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. खा. उदयनराजे यांच्यासारखा हुकूमाचा एक्का आपल्या पक्षात असावा, यासाठी आता भाजपा धडपड करताना पहावयास मिळत आहे.

ही तोडफोड पाहून सरदार पटेलही रडले असते, ग्रामस्थांचे पंतप्रधान मोदींना पत्र

ही तोडफोड पाहून सरदार पटेलही रडले असते’, ग्रामस्थांचे पंतप्रधान मोदींना पत्र'
        जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं काम पूर्ण झालं आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. सध्या जपान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी तेथील भारतीयांशी संवाद साधताना या मुर्तीबद्दल माहिती दिली. एकंदरितच मोदी सरकार या भव्यदिव्य प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करुन उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे. तरी दुसरीकडे या मुर्तीबद्दल आक्षेप घेणाऱ्यांचीसंख्याही बरीच आहे. त्यात मुख्यपणे या प्रकल्पाच्या परिसरातील २२ गावांतील गावकऱ्यांचाही समावेश आहे. या २२ गावातील ग्रामस्थांनी पंतप्रधान मोदींना या प्रकल्पाला विरोध दर्शवणारे खुले पत्रच लिहिले आहे.
जगातील सर्वात उंच मुर्ती साकारण्यासाठी सरदार सरोवर येथील धरणाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ नाराज झाले आहेत. ‘आज सरदार पटेल जिवंत असते तर मुर्तीसाठी करण्यात आलेली धरण परिसरातील तोडफोड पाहून त्यांनाही रडू कोसळले असते. तसेच उद्घाटनाच्या संमारंभासाठी मोदी उपस्थित राहणार असले तरी गावकरी त्यांचे स्वागत करणार नाहीत’, असेही या गावकऱ्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. ‘पंतप्रधान मोदी जी तुम्हाला सांगताना खूप दु:ख होतंय. पण जेव्हा तुम्ही सरदार पटेलांच्या मुर्तीच्या उद्घाटनासाठी ३१ तारखेला अहमदाबादमध्ये याल तेव्हा आम्ही तुमचे स्वागत करणार नाही. तुम्ही नको असलेल्या पाहुण्यासारखे बिनधास्त या पण आम्ही तुमचे स्वागत करणार नाही.’, असं गावकऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे.सरदार सरोवर परिसरात असणारी जंगले, नद्या, धबधबे, जमीन आणि शेती व्यवसाय आमच्यासाठी जगण्याचे साधन आहे. पण या प्रकल्पामुळे सगळं काही नष्ट करण्यात आलं आहे. आणि आता यासाठीचा सोहळा साजरा होणार असल्याबद्दल या पत्रात दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. तसेच ‘पंतप्रधान मोदी जी, तुम्हाला वाटत नाही का हा उद्घाटन सोहळा करणं म्हणजे एखाद्याच्या मरणाचा सोहळा साजरा करण्यासारखं आहे?’; असा सवालही या गावकऱ्यांनी मोदींना केला आहे. गावकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवताना यासाठी आलेल्या खर्चाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य लोक कष्टाने पैसा कमवून कराच्या रुपाने सरकारची तिजोरी भरतात. मात्र सरकार अशा अवाढव्य मुर्ती बांधण्यासाठी हाच पैसा पाण्यासारखा खर्च करते. या भागातील अनेक गावांमध्ये अद्याप गरजेच्या सुविधा पोहचलेल्या नाहीत. पिण्याचे पाणी, रुग्णालये, शाळा अशा अनेक सुविधा गावांमध्ये आजही उपलब्ध नाहीत. या सुविधांसाठी सरकार पैसे का खर्च करत नाही असा सवालही गावकऱ्यांनी केला आहे.सरदार पटेलांची ही मुर्ती उभारण्यासाठी २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २७ ऑक्टोबर २०१४ रोजी लार्सन अॅण्ड टुब्रोने या मुर्ती बांधणीचे कंत्राट मिळवले होते. अडीच हजार कामगार, २०० इंजिनिअर्सने आपले कौशल्य पणाला लावून ही मुर्ती साकारली आहे. यामध्ये चिनी कामगार आणि इंजिनिअर्सचाच भरणा अधिक होता. २२ गावांव्यतिरीक्त स्थानिक जनजातीच्या नेत्यांनीही सरदार पटेलांच्या मुर्ती अनावरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. ज्याप्रकारे ही मुर्ती बनवण्यासाठी नैसर्गिक घटकांची तोडफोड करण्यात आली, त्यांचे नुकसान करण्यात आले ते पाहता या सोहळ्याला उपस्थित राहणे अयोग्य ठरेल.

ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांच निधन.

ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांच निधन.
ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारामुळे त्यांनी दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. सोमवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या देव यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. आपल्या लेखनकौशल्य आणि संगीत दिग्दर्शनाने अनेक वर्ष त्यांनी संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविले.मराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘येशिल येशिल येशिलराणी’, अशा अनेक संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना सुरेल मराठी गीतांची अनुभूती यशवंत देव यांनी दिली. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली. तसेच, ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली.यशवंत देव यांची मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत गीतकार-संगीतकार म्हणून ओळख राहिली. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 साली झाला होता. वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा त्यांनी पुढे कायम चालविला. जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळे यशवंत देव संगीताकडे वळले. सुरुवातीच्या काळात यशवंत देव यांनी लग्नानंतर रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. त्यावेळी नोकरी सांभाळत ‘शहजादा’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यानंतर 1951मध्ये त्यांनी सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले आणि त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांना त्यांनी गुरुस्थानी मानले आहे. गीतातील भावार्थाची लय नेमकी पकडणारे संगीत अनिल विश्वास देतात आणि ते प्रचलित संगीतकारांपेक्षा निराळे आहेत, असे सांगत त्यांनी गुरुनिष्ठा कायम जपली. आकाशवाणीवरील ‘भावसरगम’, ‘असे गीत जन्मा येते’,‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा कानमंत्र’ आणि स्वत:च्या रचनांचे रंगमंचीय कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले. याचबरोबर, संगीत विषयक कार्यशाळा त्यांनी मोठ्या प्रमाणात घेतल्या आहेत. कविता लेखन, रुबाया लिहिल्या आणि कृतज्ञतेच्या सरी त्यांच्या लेखणीतून बरसल्या. तसेच विडंबन गीते केली. ‘अक्षरफुले’ आणि ‘गाणारे शब्द’ हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय, त्यांनी आत्मचरित्रात्मक लेखनही केले आहे. यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

बँकांच्या कामकाजातील ढवळाढवळ बंद, अन्यथा....RBIच्याकर्मचारी युनियनचा केंद्राला इशारा

 बँकांच्या कामकाजातील ढवळाढवळ बंद, अन्यथा....RBIच्याकर्मचारी युनियनचा केंद्राला इशारा
     गेल्या काही दिवसांपासून सीबीआयमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळेकेंद्र सरकारच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. त्यातच आता रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियननंही केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे.त्या पत्रात त्यांनी बँकांची स्वायत्तता अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच आरबीआयच्या कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करणं थांबवावं, असंही पत्रात म्हटलं आहे.जर तुम्ही आरबीआयच्या कामातील ढवळाढवळ बंद केली नाही,तर त्याचे परिणाम भोगायलाही तयार राहा, असा इशाराच आरबीआय कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं दिला आहे. सरकारकडून बँकांच्या स्वायत्ततेला धोका पोहोचवला जातोय, असाही या पत्रात उल्लेख आहे. आरबीआयचे उपगव्हर्नर विरल आचार्य यांनीही कर्मचारी संघटनेच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. ज्यात सरकार हस्तक्षेप करत असल्याचं म्हटलं आहे. आरबीआय संघटनेच्या विधानानंतर राहुल गांधींनीही मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल केंद्रीय बँकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.भारत देश हा भाजपा आणि आरएसएसला सरकारी संस्थांवर कब्जा करू देणार नाही, याचा मला विश्वास असल्याचं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. खरं तर उशिरा का होईल पण पटेल आरबीआयला वाचवण्यासाठी पुढेसरसावले आहेत. पटेल आरबीआयला 'मिस्टर 56' पासून वाचवू इच्छितात. भाजपा आणि आरएसएस भारतातील संस्थांवर कब्जा करू शकत नाहीत, असं ट्विट करत राहुल गांधी म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि केंद्र सरकारमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. ऊर्जित पटेलांचे अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकार बरोबर मतभेद आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोदी सरकारला घेरण्याची आयती संधी मिळाली आहे.

वसमत येथे गोळीबार,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल >>>> (Bedhadak Maharashtra News)>>>>>

वसमत येथे गोळीबार,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखलवसमत (प्रतिनिधी)
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून दोन गोळ्या झाडुन एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी शहर पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे झालेल्या गोळीबारामुळे परिसरात दहशत पसरली आहे

पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास किरणसिंग रतन सिंग चव्हाण राहणार रेल्वे स्टेशन रोड वसमत यास आरोपीतानी गैरकायद्याची मंडळी जमवून तुम्ही लिंगाडेला मदत का करता, तुम्हाला लय मस्ती आली असे म्हणून थापड़ बुक्याने मारहाण केली तसेच फिर्यादीचे आई-वडीलास मारहाण करू लागल्याने फिर्यादी हा तेथून पळत कार क्रमांक एम.एच 38 717 मध्ये बसला असता आरोपी हिरासिंग चव्हाण राहणार रेल्वे स्टेशन रोड वसमत याने त्याचे जवळ असलेल्या बंदुकीने फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने दोन गोळी फायर केले या घटनेने परिसरात खळबळ माजली होती

सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही दरम्यान या प्रकरणी आज दिनांक 29 ऑक्‍टोबर रोजी किरण सिंग रतन सिंग चव्हाण यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हि-यासिंग भुऱ्यासिंग चव्हाण,भुऱ्यासिंग चतुरसिंग चव्हाण,बाळू उर्फ अविनाश खंदारे,या तीन जणांसह दीपाकौर चव्हाण,अक्कलकौर चव्हाण,कमलकौर चव्हाण या तीन महिलां असे एकूण सहा जण सर्व राहणार रेल्वे स्टेशन रोड वसमत यांच्या विरुद्ध गुरन 355/2018 कलम 307,323,143,147,
148,149,भा.द.वि सह कलम 3/25 आर्म एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रवींद्रसिंग धुन्ने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास फौजदार सदानंद मेंडके हे करीत आहेत

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...