Friday, May 31, 2019

बिलोली पोलीस ठाण्या तर्फे ऐतिहासिक मस्जिद येथे ईफ्तार पार्टी संपन्न

बिलोली पोलीस ठाण्या तर्फे ऐतिहासिक मस्जिद  येथे ईफ्तार पार्टी संपन्न




बिलोली.प्रतिनिधी.
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी बिलोली ठाण्याच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या प्रवित्र रमज़ान रोजा उपवास करणार्या मुस्लीम बांधवानां  इफ़्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले







यावेळी पोलीस निरिक्षक भगवानराव धबडगे जामा मस्जिद चे ईमाम  आहेमद बेग  अल्पसख्याक सेल चे तालुका अध्यक्ष शेख सुलेमान सेठ  दारुबंदी आधिकारी सुभाषराव खन्डेराय  माजी उपनगराध्यक्ष यशवंत गादगे  ,अर्जुनराव आंकुशकर,  माजी नगराध्यक्ष रणविर सिह चौहान , आमजद चाऊस , नगरसेवक शाहेद बेग ईनामदार , आजीज बेग  ,मसुद शिबिबि ः,एम.आय.एम. चे साजीद कुरेशी , राजु पाटील शिपांळकर शंकर महाजन , मुन्ना पोवाडे , शोकत बेग ईनामदार,  अ.गफुर कुरेशी , शेख ईलीयास हिगंणीकर , अबरार बेग  तर कार्यक्रम यशस्वि करण्या साठी  पोलीस प्रशासनाचे  नागनाथ वाडेकर  ,शेख नजीर , शेख  ईरफान, जनार्धन बोधने, रघुनाथ चौहान आदिनि सहकार्य केले.


Wednesday, May 29, 2019

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या






राज्य गृह विभागाने आज (बुधवार) रात्री राज्यातील तब्बल 35 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले आहेत.बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली हे पुढील प्रमाणे.

बांदेकर दामोदर वसंत (रत्नागिरी ते मुंबई शहर), पाटील सुधीर भिमराव (वाशिम ते मपोअ, नाशिक), मंडलवार जयदीश शिवाजी (लोहमार्ग, औरंगाबाद ते यवतमाळ), श्रीमती माने वंदना शिवराम (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), भामरे अविनाश भगवान (बुलढाणा ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), खेडकर हरिष दत्‍तात्रय (औरंगाबाद, ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), संपते प्रशांत पांडुरंग (पोप्रके, बाभळगाव, लातूर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), जाधव विजय कृष्णराव (मओप, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), वाघमारे रूपचंद मधुकर (मओअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), पाटील सुनिल रंगराव (मपोअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), गायकवाड हनुमंत अमृतराव (बुलढाणा ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), हुंबे भरत केशवराव (मपोअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), पंडित मारूती शंकर (मगुप्र, पुणे ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), हेगाजे कलगोंडा सतगोंडा (रायगड ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), कांबळे दिपक ज्ञानदेव (गुन्हे अन्वेषण विभाग ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), सोनावणे विलास (जळगाव ते पोप्रके, धुळे), साळवी के.पी. (नाशिक शहर ते मपोअ, नाशिक), पाटील अरविंद वसंत (मुंबई शहर ते नंदूरबार), आदाटे श्रीकांत गुणवंत (मुंबई शहर ते नंदूरबार), फुलपगारे दिलीप मगनशेठ (नागपूर शहर ते ठाणे शहर), बोरिगिड्डे दत्‍तात्रय शंकर (उस्मानाबाद ते कोल्हापूर), बेन डॅनियल जॉन बेन (पालघर ते नागरी हक्‍क संरक्षण), जाधव भरत शिवाजी (पालघर ते नागरी हक्‍क संरक्षण), आकोसकर अनिल भगवानराव (लातूर ते अ.जा.प्र. उस्मानाबाद), घोडके प्रल्हाद बंन्सीपंडीत (औरंगाबाद शहर ते मुंबई शहर), सय्यद मौला सत्‍तार (लोहमार्ग, पुणे ते गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे), हाश्मी नईमपाशाअब्दुल हकीम (औरंगाबाद ग्रामीण ते अ.जा.प्र.प. औरंगाबाद), किशोर हिरालाल चौधरी (लाप्रवि ते राज्य गुप्‍तवार्ता विभाग ), सुशील शिवराम जुमडे (पोप्रके, जालना ते बीडीडीएस, औरंगाबाद), मुनाफ फरीद शेख (राज्य गुप्‍तावार्ता विभाग, बीडीडीएस, पुणे), महमद आजम युसुफ पटेल (मुंबई शहर ते राज्य गुप्‍तवार्ता विभाग), कडू राजेश शेषरावजी (गुन्हे अन्वेषण विभाग ते वर्धा), शंकर आनंदराव इंदलकर (दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ते ठाणे शहर), खेडकर अश्‍वनाथ बाप्पाजी (मुंबई शहर ते रायगड) आणि बाबर शंकर श्रीरंग (मुंबई शहर ते पिंपरी-चिंचवड).

Tuesday, May 28, 2019

पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून सारया कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न अंगाचा थरकाप डविणारी घटना

पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून
सारया कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
अंगाचा थरकाप डविणारी घटना









जिंतूर : अलिबाग येथील पत्रकारावर आमदारांनी केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे सव्वातीन वाजता जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळी या पत्रकारांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांच्यासह कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला आहे.. प्रवीण मुळी हे गेली तीस वर्षे सामानाचे काम करीत असून प्रशांत मुळे लोकमतचे काम करीत आहेत.. दोघेही निस्पृहपणे, प्रामाणिक पत्रकार म्हणून तालुक्यात ओळखले जातात.. असं असताना सारया कुटुंबाला जाळून ठार मारण्याचा कट कोणी रचला याबद्दल परिसरात चचा॓ सुरू आहे..

 पत्रकार प्रशांत मुळी यांच्या राहत्या घरात पहाटे सव्वा तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून आग लावली आग लागली त्या खोलीमध्ये कुटुंबातील सहा व्यक्ती झोपल्या होत्या परंतु वेळीच जाग आल्याने पुढील अनर्थ टळला
    जिंतूर पासून पंधरा किलोमीटर अंतरावरील येलदरी येथे लोकमतचे पत्रकार प्रशांत मुळी यांचे कुटुंब राहते नेहमीप्रमाणे संबंधित कुटुंब राहत्या घरात झोपलेले असताना पहाटे सववातीनचया सुमारास अज्ञात व्यक्तीने घरातील मुख्य दरवाज्यावर पेट्रोल टाकले व त्यास आग लावून दिली अज्ञात व्यक्तीवर इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घराच्या मागील बाजूला पेट्रोल शिंपले संपूर्ण मुळी कुटुंबच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते परंतु सुदैवाने आग लागल्यावर प्रशांत मुळी यांचे बंधू प्रवीण मुळी यांना जाग आली  त्यांनी आरडाओरडा केला.. त्यानंतर सारे कुटुंब जागे झाले आणि त्यांनी आग विझवली..दरवाजाच्या तीन फुटावर कुटुंबातील सर्व व्यक्ती झोपले होते पाच मिनिटे प्रवीण मुळी यांना जाग आली नसती तर....? संपूर्ण घरात पेट्रोल चा वास येत होता   घटनेची माहिती बीट जमादार व पोलीस स्टेशनला देण्यासाठी दूरध्वनी लावला परंतु अधिकारी व पोलिसांनी फोन उचलला नाही घटनेनंतर तब्बल चार तासाने पोलीस घटनास्थळी पोहोचले फिर्यादीस उलट सुलट प्रश्न विचारून भांबावून सोडले  दरम्यान या घटनेची फिर्याद प्रवीण मुळी यांनी जिंतूर पोलिसात दिली असताना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 432 नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ए एम खान हे प्रकरणाचा तपास करीत आहे
चोकट
 पोलिसांना गांभीर्य नाही
 येलदरी येथे मुळी कुटुंबावर एवढे मोठे संकट आल्यावरही घटनास्थळाला पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी  वा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही दैव बलवत्तर म्हणून मुळी कुटुंब वाचले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असता परंतु घटना घडल्यानंतर ही पोलिसांना घटनेचे गांभीर्य वाटले नाही किंबहुना फिर्यादीस चार तास पोलिस स्टेशनला ताटकळत बसावे लागले
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा निषेध केला असून या भयंकर कटामागे कोणाचा हात आहे हे शोधून काढण्यासाठी या प्रकाराची सीबीआयतर्फे चौकशी करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
निवडणूक काळाल आपणास अनुकूल बातम्या दिल्या नाहीत म्हणून सातत्याने असे प्रकार घडत असावेत असा संशय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.. सरकार पत्रकार संरक्षण कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्यानेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.. सरकारने पत्रकारांचे बळी जाण्याची वाट न बघता कायदा अंमलात आणावा अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे..

Monday, May 27, 2019

मोबाइलमधल्या त्या फोटोंमुळे आत्महत्या, हत्या आणि चकमकीसारख्या भयानक घटना घडल्या


मोबाइलमधल्या त्या फोटोंमुळे आत्महत्या, हत्या आणि चकमकीसारख्या भयानक घटना घडल्या






बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मेरठमध्ये राहणाऱ्या एका माणसाने फोटो गॅलरीमधील माजी प्रेयसीसोबतचे फोटो डिलीट केल्याशिवाय त्याचा फोन विकला. त्यानंतर धक्कादायक घटनांची मालिकाच सुरु झाली. मोबाइलमधल्या त्या फोटोंमुळे आत्महत्या, हत्या आणि चकमकीसारख्या भयानक घटना घडल्या. मोबाइलमधल्या त्या फोटोंमुळे शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने पाच वर्षाच्या मुलासोबत पूलावरुन नदीत उडी मारली.यामध्ये महिलेचा मृत्यू झाला पण पाच वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यश आले. या फोटोंमुळे मेरठमध्ये रहाणाऱ्या या महिलेच्या सुखी वैवाहिक आयुष्यात वादळ आले. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पूर्व प्रियकरासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेहोते. महिलेचा पूर्वप्रियकर शुभम कुमारने फोटो डिलीट केल्याशिवाय त्याचा फोन मेरठमध्ये रहाणाऱ्या अनुज प्रजापतीला विकला.शुभम कुमारने हा फोन विकताना त्यातील फोटो डिलीट केले नव्हते. त्यामुळे हे फोटो व्हायरल झाले. आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याआधी या महिलेने एका टपरीवाल्याच्या मोबाइलवरुन फोन केला होता. तपासामध्ये हा फोन नंबर मेरठमध्ये रहाणाऱ्या तिच्या नवऱ्याचा असल्याचे समोर आले. त्यावरुन तिची ओळख पटली.अनुज प्रजापतीने व्हायरल केलेल्या फोटोमध्ये जी महिला होती त्याच महिलेने आत्महत्या केली असे मेरठचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले. त्यानंतर प्रजापतीचा सुद्धा मृत्यू झाला. फोटो व्हायरल केल्याच्या रागातून शुभम आणि त्याच्या मित्रानी २३ मे रोजी मेरठच्या कानकेरखेरा भागात अनुजची हत्या केली. महिलेला जेव्हा हे फोटो व्हायरल झाल्याचे समजले तेव्हा तिने शुभमला फोन करुन आपला राग व्यक्त केला.त्यानंतर शुभमने अनुजची हत्या केली. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल फोनवरुन मेरठ पोलिसांनी अनुज प्रजापतीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला. मेरठ पोलिसांआधी सहारनपूर पोलिसांनी चकमकीनंतर संशयितांना बेडया ठोकल्या. दोन बाईकवरुन पळणाऱ्या पाच जणांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

बिलोली तालुक्यातील कासराळी येथील गावकऱ्यांचे तहसिल समोर उपोषण

बिलोली तालुक्यातील कासराळी येथील गावकऱ्यांचे तहसिल समोर  उपोषण




बिलोली प्रतिनिधी
कासराळी गावची लोकसंख्या जवळपास सहा हजारावर आहे या गावासाठी कायम पाणीपुरवठा अर्धवट व बंद असल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे या गावांमध्ये नागरिकासाठी तात्पुरत्या स्वरूपात विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे विहिरीला अपुरेपणा असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही गावकऱ्यांनी वेळोवेळी पाण्यासाठी तक्रार करून देखील कासराळी ग्रामपंचायत व बिलोली पंचायत समितीचे या पाण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते असून सुद्धा कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले आहे.  गावाची लोकसंख्या प्रमाणे पाच टँकर सुरू करावे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावे सण 2008 मध्ये भारत निर्माण कार्यक्रम पेयजल कार्यक्रम झाल्यानंतर 74 लाख 94 हजार इतकी निधी मंजूर करण्यात आली होती तत्कालीन पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिव यांनी संगनमत करून अर्धवट व निकृष्ट दर्जाचे थातूरमातूर कामे केली व लोकसहभागातून जमा केले नीधीचा अपहरण करून शासनाची व  जनतेची फासवनूक केलेल्या संबंधितांवर गुन्हे करण्याची मागणी
करण्यात आली.. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हैगले  यांच्या नेञत्वाखाली करण्यात आले, उपोषणकर्ते पिराजी चरकुलवार , दिपक संदलोड माजीद शेख, लक्ष्मण फुलारी, कैलास सुर्य. शिवा पाटील,  विनोद बोराडे  साईराजे शिंगोड  सायलू  बरसमवार, चंद्रकांत भुरे,  शफीखान पठाण , ज्ञानेश्वर घाबरोड , बजरंग चरकुलवार , लक्ष्मण चरकूलवार, देविदास शंकरोड, सुरेश बोरोड, हणमंत गजलोड, बालाजी  शिंगोड, या सह असख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आता कासराळी ग्राम पंचायत नागरिकांना पाणी पाजवणार की फक्त पाहत राहणार , प्रशासन आता कोणती कार्यवाही करणार आता गावकर्याचे लक्ष लागले आहे

Sunday, May 26, 2019

पत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा ठेवणारा समाज पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा थंड का असतो

पत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा ठेवणारा समाज
पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा थंड का असतो



बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पत्रकारांनी पत्रकारिता कशी करावी  ? याचे डोस राजकारणी वारंवार पत्रकारांना पाजत असतात.समाजाच्याही पत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा असतात..पत्रकारांनी तटस्थ,निःपक्ष असलं पाहिजे इथपासून पत्रकारांनी पित पत्रकारितेपासून दूर राहिलं पाहिजे,व्रत समजून पत्रकारिता केली पाहिजे,सत्य आणि वस्तुनिष्ठच बातम्या दिल्या पाहिजेत,सामांन्यांना न्याय मिळवून देताना परिणामाची पर्वा न करता लेखणी चालविली पाहिजे..वगैरे वगैरे..समाजाच्या या अपेक्षा चुकीच्या अजिबात नाहीत.पत्रकारिता करताना पत्रकारांनी ही सारी पथ्ये पाळलीच पाहिजेत याबद्दल दुमत असू शकत नाही.परंतू पत्रकारितेचं हे व्रत निभावताना काही हितसंबंधीयांकडून अनेकदा आडकाठ्या आणल्या जातात,पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो,पत्रकारांच्या नोकर्‍यांवर गदा आणून पत्रकारांना रस्त्यावर आणण्याचे उद्योग होतात ,आणि हे सारं होऊनही पत्रकार भीक घालत नाही म्हटल्यावर  त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात किंवा  हल्ले  केले जातात . महाराष्ट्रात दर पाच दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होतो.(याची आकडेवारी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे आहे...ती वेळोवेळी सरकारलाही सादर केलेली आहे.) पत्रकारांवर जेव्हा हल्ले होतात,त्यांचा विविध पध्दतीनं आवाज बंद करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा पत्रकारांकडून ढिगभर अपेक्षा ठेवणार्‍या समाजाची प्रतिक्रिया किंवा भूमिका काय असते..? 'अनेकदा मला काय त्याचे'? हीच भूमिका बघायला मिळते.ज्या पत्रकारांवर हल्ले होतात ते सारेच पत्रकार बदमाश,हाप्तेखोर असतात असा समज समाजानं करून घेतला असेल आणि त्यामुळं  समाज मौन बाळगत असेल तर ते चूक आहे.कारण जे पत्रकार तोडपाणी न करता खंबीरपणे,कोणाची भिडमूर्वत न ठेवता पत्रकारिता करतात त्यांच्यावरच हल्ले होतात हा माझा यासंबंधीच्या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून  अनुभव आहे.टिळक,आगरकरांसारख्या पत्रकारितेची अपेक्षा ठेवणारा समाज प्रामाणिक पत्रकारांच्या पाठिशी उभं राहण्याची हिंमत दाखविणार नसेल तर पत्रकारांनी  कोणाच्या जिवावर हे प्रामाणिकपणाचे आणि सामाजिक बांधिलकीचे  'जोखड' खांदयावर घेऊन पत्रकारिता करावी ?  एखादया पत्रकारावर हल्ला झालाय आणि समाजानं त्याचा समोर येऊन निषेध केलाय, किंवा 'घाबरू नकोस आम्ही तुझ्या पाठिशी आहोत' असा आश्वासक शब्द दिलाय असं अलिकडं कधी घडलेलं नाही.यात गंमत अशीय की,केवळ समाजच नाही तर पत्रकार ज्या वर्तमानपत्रासाठी काम करीत असतो ती वर्तमानपत्रंही अंगावरची पाल झटकल्यासारखे अशा प्रसंगी पत्रकाराला बाजुला करतात,सरकार किंवा पोलीस यंत्रणाही पत्रकारांना मदत करताना दिसत नाही.महाराष्ट्र सरकारनं पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला.दोन वर्षे तो पडून आहे.त्याची अंमलबजावणी न करण्यामागे 'पत्रकारांवर हल्ले झालेच पाहिजेत' अशी सरकारची मानसिकता असावी असा आरोप केला तर तो चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही.कायदा झाला असता तर अलिबागच्या हर्षद कश्याळकर यांच्यावर हल्ला करण्याची आमदार जयंत पाटील आणि आमदार पंडित पाटील यांची हिंमत झाली नसती.हे स्पष्ठ आहे
आमच्यापैकी काही जण चुकीच्या पध्दतीनं पत्रकारिता करीतही असतील.नाही असे नाही .. अशा अपप्रवृत्तींपासून कोणतेही क्षेत्र अलिप्त राहिलेलं नाही.सारेच राजकारणी किंवा अधिकारी धुतल्या तांदळासारखे नाहीत.राजकारणातल्या या घाणीबद्दल कोणी बोलत नाही. मात्र चुकीच्या लोकांना मतं टाकणारा समाज पत्रकारांकडून सभ्यतेची अपेक्षा करतो.ही गंमत आहे.अर्थात पत्रकारितेतील अपप्रवृत्तीची पाठराखण आम्ही कधी केली नाही,करणार नाही.अशा पत्रकारांवर कठोर कारवाई व्हावी पण अशा लोकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी देखील नाही.अशा स्थितीत 'चौथा खांब पोखरला गेलाय' सारखी मुक्तफळं उधळत पत्रकारांची उपेक्षा किंवा टिंगल- टवाळी करायची हा निष्ठेनं पत्रकारिता करणार्‍या बहुसंख्य पत्रकारांवर केला जाणारा अन्याय आहे.पत्रकारांचं मानसिक खच्चीकरण करण्याचाही त्यामागं सूप्त उध्देश असतोच.. पत्रकारितेत अपप्रवृत्ती प्रबळ झाल्यात असा समाजाचा दावा असेल तर पत्रकारितेतील अशा अपप्रवृत्तींना रोखण्याची आणि  पत्रकारितेतील सद्दप्रवृतत्तींना बळ देण्याची जबाबदारी माध्यमातील लोकांची,संघटनांची आहेच पण सरकार,समाजाची काहीच जबाबदारी नाही काय  ? ती जबाबदारी हे घटक पार पाडत नाहीत ही चळवळीची  तक्रार आहे.हर्षदवर हल्ला झाला,सोशल मिडियावर त्याच्या बातम्या आल्या,पत्रकारांव्यतिरिक्त किती लोकांनी त्याचा निषेध केला.. ? अगदी चार-दोन लोकांनी देखील नाही.असे का होते हे स्पष्ठ झाले पाहिजे काय गुन्हा होता हर्षदचा.. ? एखादा लोकप्रतिनिधी अंगावर येतो 'तुम्ही काय वाट्टेल त्या बातम्या छापता' म्हणत थोबाडीत लगावतो, हे काय चाललंय ?  हर्षदनं अशी कोणती बातमी छापली होती की,त्याच्यावर हल्ला करण्यापर्यंत जयंत पाटील भडकले ?..ते त्यांनी सांगावं.पण ते सांगणार नाहीत आणि समाजही त्यांना हा प्रश्न विचारण्याचे धाडस करणार नाही .. उलट पत्रकारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करणार हे दिसतंय..
या साऱ्या प्रतिकूल स्थितीत कोण कोणत्या वर्तमानपत्राचा,चॅनलचा आहे,कोण कोणत्या पत्रकार संघटनेचा आहे याचा विचार न करता सर्वांनी हर्षद आणि अश्याच ज्या पत्रकारांवर हल्ले होतात त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे.आपण एकटे आहोत,त्यामुळं संघटीतपणेच समाजातील हितसंबंधी घटकांशी मुकाबला करू शकतो . .अन्यथा आज हर्षद,उद्या आणखी कोणी अशी स्थिती निर्माण होईल.पत्रकारांनी भक्कमपणे एकजूट दाखविली नाही तर या पुरोगामी महाराष्ट्रात भविष्यात पत्रकारांना काम करणं कठिण होईल हे सर्वच पत्रकार मित्रांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. आपणच आपल्या तंगडया ओढत बसण्यापेक्षा कोणीच आपल्यासोबत नाही हे वास्तव लक्षात घेऊन एकीची ताकद दाखवून द्यावी.जे पत्रकार आजारी आहेत,कोणा पत्रकाराचं अकाली निधन झालं असेल तर आता पत्रकार सरकारी दयेवर अवलंबून न राहता एकत्र येऊन गरजू पत्रकारांना मदत करताना दिसतात.हीच मानसिकता आता सर्वच बाबतीत जपावी लागेल..तरच किमान ग्रामीण पत्रकारांचा निभाव लागेल.

       

Wednesday, May 15, 2019

संभाव्य आपत्ती काळात यंत्रणांनी समन्वय, सतर्कता, तत्परतेने प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

संभाव्य आपत्ती काळात यंत्रणांनी समन्वय, सतर्कता, तत्परतेने प्रयत्न करावेत -  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
 



नांदेड दि. 15 :- आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी संघटीत आणि वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

मान्सून 2019 च्या अनुषंगाने पुर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांचेसह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, पोलीस, आरोग्य, कृषि आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांचा आढावा संबंधीत विभागाकडून घेऊन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, पाझर तलाव, नद्या आणि पाण्याच्या साठवणुकीचे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प पावसाळयात फुटु नये अथवा ओव्हरफ्लो होऊन गावांना धोका होऊ नये यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना वेळीच थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा. महानगरपालिका, नगरपरिषदांनी नालेसफाई तसेच अतिक्रमण दूर करावेत. सर्व प्रमुख यंत्रणांनी 1 जून ते 30 सप्टेंबर या मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. हवाई मार्गाने शोध व बचाव कार्य करावयाची आवश्यकता भासल्यास जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रफळाचे अक्षांश, रेखांश आणि स्थायी व अस्थायी आपत्तकालीन हेलीपॅडची माहिती स्थानिक पातळीवरुन तहसिलदारांना 25 मे पूर्वी पाठवावी. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदी पाणी पातळीचा धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करतांना सर्व खात्यात समन्वय ठेवून धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.  तहसीलस्तरावर मान्सुन पूर्व तयारीची आढावा बैठक वेळीच आयोजित करुन पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सून पूर्वी पूर्ण करावीत आणि स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चालू मोबाईल संपर्क अद्यावत करावीत.

जिल्ह्यात 80 मंडळातील पर्जन्यमापक यंत्र कार्यरत असून ते सुस्थितीत असेल याची खात्री करुन आवश्यक असल्यास पर्जन्यमापक यंत्र त्वरीत खरेदी करावे. शासन निर्णयाप्रमाणे आपतग्रस्तांना योग्य मदत झाली पाहिजे. दरवर्षी होणाऱ्या विजपातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करावे. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबाबत व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
नांदेड जिल्ह्याचे एकुण वार्षिक सरासरी पर्जन्यमान 955.55 मि.मी. एवढे असून मागील पाच वर्षात सन 2014 मध्ये 45 टक्के, सन 2015 - 48 टक्के, सन 2016 - 113 टक्के, सन 2017 - 67 टक्के, सन 2018 मध्ये 81 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मनार या प्रमुख नद्या असून तालुकानिहाय पूरप्रवण गावांची संख्या नांदेड-46, अर्धापूर-9, मुदखेड- 10, लोहा-9, कंधार-17, किनवट-31, माहूर-7, हिमायतनगर-16, भोकर-14, हदगाव-23, उमरी-17, देगलूर-27, मुखेड-36, बिलोली-18, नायगाव-39, धर्माबाद-18 अशी एकुण 337 गावे आहेत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

Tuesday, May 14, 2019

बोअरवेल पुनर्भरण तंत्रज्ञान या वर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

बोअरवेल पुनर्भरण तंत्रज्ञान या वर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न



तालुका  प्रतिनिधी

आपला संपूर्ण भारत देशच आज “पाणी” या विषयावर चिंतीत आहे. गेल्या  एक दोन दशकात पावसाचे कमी झालेले प्रमाण व अनियंत्रित खोदलेल्या बोअरवेल व त्यातून होणारा बेसुमार पाणी उपसा यामुळे भयानक संकट समोर उभा टाकले आहे.
पाण्याच्या पुनर्भरणाचे महत्व लक्षात घेऊन कृषि विज्ञान केंद्र सगरोळी व ऊर्ध्वम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बोअरवेल पुनर्भरण  या विषयीची एकदिवसीय  कार्यशाळा आज दि. १४ मे २०१९ रोजी पार पडली. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्री विनीत फडणीस डायरेक्टर ऊर्ध्वम पुणे, प्रदीप कुलकर्णी प्रचार, प्रसार व विक्री विकास अधिकारी ऊर्ध्वम पुणे, श्री प्रणीत डफळ सिनीअर टेक्निशियन यांनी मार्गदर्शन केले. डॉ.सुरेश कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून शेती करणे हि काळाची गरज आहे असे सांगितले. श्री विनीत फडणीस यांनी पॉवरपॉइंट सादरीकरण द्वारे ६ व ८ इंची बोअरवेल चा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने बोअरवेलचा पाणीसाठ वाढविण्याचे तंत्रज्ञान समजून सांगितले. आपल्या घरातील, सोसायटीतील अथवा शेतातील बोअरवेलचे पाणी वाढवण्यासाठी “बोअरवेल रिचार्ज” तंत्रज्ञानाचा  अवलंब करावा असे श्री प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रात   श्री प्रणीत डफळ यांनी बोअरवेल पुनर्भरणाचे  प्रात्यक्षिक  करून दाखविले. या प्रशिक्षणाचा नांदेड जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांनी लाभ घेतला.  या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन  इंजी. वैजनाथ बोंबले यांनी केले.


Monday, May 13, 2019

रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी मांजरम येथील आगीत जळून खाक झालेल्या आखड्याला भेट दिली*

रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी मांजरम येथील आगीत जळून खाक झालेल्या आखड्याला भेट दिली



दि.१३/०५/१९.
     नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शेतकरी अशोक जांभळे यांच्या पशु आखड्याला दि.११मे रोजी दुपारी आग लागली व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
  आज रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी तलाठी संतोष शहाणे यांच्या समवेत आगीत खाक झालेल्या आखड्याला भेट दिली व शेतकरी अशोक जांभळे व बंधू यांची भेट घेऊन पाहणी केली व संवाद साधला.
  तलाठी शहाणे यांनी पंचनामा केला व त्याचा अहवाल तयार केला आहे.
   पांडुरंग शिंदे यांनी नायब तहसिलदार वंगवाड यांच्याशी फोन वर  संवाद साधला व शेतकऱ्यांला तात्काळ योग्य ती मदत तहसील कार्यालयात देण्यात यावी अशी विनंती केली.
   यावेळी युवा नेते शिवाजी पा. गायकवाड व परिसरातील शेतकरी,अधिकारी उपस्थित होते.

रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महीना

रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महीना.
.





बिलोली.(ता.प्र )

वर्षातील बारा महिण्यापैकी रमजान ईस्लाम धर्मातील अतिशय महत्वाचा   महीना  आहे. रमजान महीना व ईद उत्साहात साजरा केला जातो.
ईस्लाम धर्मातील प्रेषित हजरत मोहम्मद सल्लाहु आलैही व सल्लम यांचा आवडता महीना म्हणुन ओळखले जाते. ईस्लामिक महीने  चान्द्रीक काल गणने वर आधारीत आसल्याने या महिण्याची सुरुवात  सहा मे रोजी चंद्र  दर्शनाने होते. दुसऱ्या दिवशी मुस्लीम बांधव रमजान चा उपवास पकडतात.  जन्नत  स्वर्गाची दारे उघडली जातात व  जहन्नम नरकाची दारे  बंद केली जाते. पुण्य कमविण्यासाठी रोजा उपवास  नमाज तराव्हि जकात  ईफ्तार  शबेकद्र साजरा     केले जाते.
 . रोजा उपवास करताना  पहाटे सुर्यदयापुर्वी जेवण व संध्याकाळी   सुर्यास्ता चे वेळी उपवास सोडुन जेवण केले जाते. दिवसा खाणे पिने  वर्ज्य आसते.
 वर्षातुन एकदा 30  दिवस रोजा केल्याने शरीराचे  आरोग्य   व आयुष्य वाढण्यास मदत होते.
दररोज लाखो लोक  उपाशी झोपतात. श्रीमंत  लोकाच्या  मनात गरीबा बद्दल  आदर  दया  आस्था व करुणा ची भावना निर्माण होते. याचा परिणाम  अन्न धान्य ,दान धर्माची ईच्छा प्रबळ होते. गरीबांच्या आर्थीक व जेवाणा च्या समस्या सुटतात.
..रोजा गर्भवाती महीला मोठा  आजार असलेले व्यक्ती कन्सर  हार्ट पेशन्ट शुगर  पेशन्ट रोजा केल्यास जीवन मरणाचा प्रश्न उदभवतो.म्हणुन अशाना  व लहान बालकाना रोजा ठेवण्याची सक्ती नाही.
..ईस्लाम धर्मात  पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आली.  अधिकाधिक नमाज पठन रोजा  व तरावी ची नमाज जकात अदा केल्यास अधिक पुण्यवान व्यक्ती आहे.
नमाज पढण्यासाठी पाच वेळा मस्जीद मध्ये अजान दिली जाते.
अजान मध्ये  उचारले जाणारे शब्द अल्लाहुअकबर याचा  आर्थे अल्लाह (ईष्वर) सर्वषेठ आहे. मस्जिद मध्ये नमाज पढताना गरीब श्रीमंत  गोरा काळा असा भेदभाव केला जात नाही. एकाच रांगेत असतात.
रात्री तरावी चे नमाज मध्ये  ईमाम कुरान पठण करतात.

Saturday, May 11, 2019

आरळी येथील शादुल मन्नाशा अहमद मन्नाशा गरीबाचे घर जळाले.

आरळी येथील शादुल मन्नाशा अहमद मन्नाशा  गरीबाचे घर जळाले.





बिलोली .प्रतिनिधी.
तालुक्यातील आरळी येथील नागरीकशादुल  मन्ना शा व अहमद मन्नाशा  ही दोन कुटुंब  वास्तव्यास होती. दोघाची ही आर्थीक परिस्थीती अत्यन्त कमकुवत  आहे. दारिदृ रेषेतील गरीब  कुटुबिंयाचे घर  भीषण आगीत जळुन खाक झाले. बिलोली तालुक्याचे ठिकाणी अग्णीशमक दलाची व्यवस्था नाही. घर उघड्यावर पडले. आध्याप शासकीय मदत मिळाली नाही. आगीत धान्य कपडे सर्वच जळाले.गरीब कुटुबिंयाना मदत म्हणुन बशीर सय्यद  याची  ए.बी.एस. ग्रुप टिम च्या वतीने धान्या व कपडे घेण्यासाठी रु.७५००/- जमा करुन देण्यात आले. यावेळी बिलोली पँचायत समिती चे सभापती दत्तराम बोधने स्वस्त धान्य  दुकान कमेटी चे ता.अध्यक्ष मौला सेठ कासीमसाब उपसरपंच सिदराम पाटील व गावातील  नागरीक युवक उपस्थीत होते.

Friday, May 10, 2019

नांदेड जिल्हा क्रिडा संकुल येथे अॅथलेटीक्स खेळाडूंसाठी आहार मार्गदर्शन शिबिर संपन्न

नांदेड जिल्हा क्रिडा संकुल येथे
अॅथलेटीक्स खेळाडूंसाठी आहार मार्गदर्शन शिबिर संपन्न





बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
 

दि.९ मे २०१९,गुरुवार रोजी जिल्हा क्रिडा संकुल,नांदेड येथे 
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड जिल्हा प्रशिक्षण केंद्र,नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 
विविध खेळांचे उन्हाळी मोफत प्रशिक्षण शिबीरात 
खेळाडूंच्या आहाराबदल मार्गदर्शन करण्यात आले.त्यात नांदेड येथील प्रशिध्द  बालरोग तज्ञ डॉ.लक्ष्मीकांत बजाज
यांनी खेळाडू चा आहार कसा असला पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
आणि जिल्ह्यातील खेळाडूंना नांदेड जिल्हा क्रिडा अधिकारी,श्री. राजेश मारावार यांनी खेळाडू ना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुने म्हणुन 
डॉ.शाम तेलंग,डॉ.विवेक मोतेवार यांची उपस्थिती होती 



श्री.राजेश मारावार (जिल्हा क्रिडा अधिकारी,नांदेड)श्री.गुरुजितशिंग संधु (क्रिडा अधिकारी,नांदेड)श्रीमती.शिवकांता देशमुख (अॅथलेटीक्स प्रशिक्षक,म.रा.)श्री.महेश वाकरडकर (बॅडमिंटन,प्रशिक्षक) श्री.अनिल बंदेल (टेबल टेनिस प्रशिक्षक)
श्री.नारायन आनेराव (अॅथलेटीक्स प्रशिक्षक,एन.आय.एस)यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात नांदेड जिल्ह्यातील अॅथलेटीक्स खेळाडू व पालक वर्गाची उपस्थिती होते.
जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्र,नांदेड च्या माध्यमातून श्रीमती शिवकांता देशमुख ह्या अॅथलेटीक्स खेळाडू साठी प्रशिक्षण हे इंदिरा गांधी मैदान, स्टेडियमवर देत असतात.

Tuesday, May 7, 2019

आमदार राजासिंह, लच्छू पहेलवावर गुन्हा दाखल करा:- मिल्लत बचाओ तहेरिक

आमदार राजासिंह, व लच्छू पहेलवावर गुन्हा दाखल करा:-  मिल्लत बचाओ तहेरिक




 आ.राजासिंह,व लच्छू पहेलवावर गुन्हा दाखल करा मागणी : उपोषण सुरू

बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
हैदराबाद येथीलआमदार टी. राजासिंह, व लच्छू पहेलवान वर गुन्हा दाखल करण्यासाठी मिल्लत बचाओ तहेरिकने उपोषण सुरू केला आहे
 शिवसेनेचे खासदार यांच्या प्रचारात आयोजित जाहीर सभेत भाजपाचे हैदराबाद येथील आमदार टी.राजासिंह यांनी मुस्लिम धर्माच्या विरोधात भडकाऊ भाषण केले होते. आणि या सभेत लच्छू पहेलवानने खुलेआम तलवार हातात दिली होती. या दोघांनी भारतीय दंड संहिता 1860 ची विविध कलमांतर्गत व आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मिल्लत बचाओ तहेरिकने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. औरंगाबाद दंगलीतील आरोपी लच्छू पहेलवान यांनी या सभेत तलवार भेट दिली होती. राजासिंह यांनी आपल्या भाषणात मुस्लिम धर्माच्या भावना दुखतील असे या सभेत अनेकवेळा वक्तव्य केले आहे. पोलीस आयुक्त व जिल्हा प्रशासनाला तक्रार करुन सुध्दा अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तलवारीचा उपयोग केल्याने शाहगंज येथील दंगलीचा मुख्य आरोपी लच्छू पहेलवानला तडीपार करणे आवश्यक आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.
उपोषणाला मोहंमद इसा यासिन, नदीम राणा, मुनवर काझी, सादेक खान, शारेक आलम, एजाज खान, अब्दुल हाफिज जेडी, इस्माईल खान, सालेख बिन खालेद, शारेक अली बेग, मजहर मिर्झा, खलील खान, अहेमद सिद्दीकी, गणेश अण्णा, फहीम बाबा उपस्थित होते

Monday, May 6, 2019

शिंपाळा येथे क्रिकेट सामन्यात तहसिलदार राजपुतांच्या उत्स्फुर्त सहभागामुळे प्रेक्षकांकडुन कौतुक

शिंपाळा येथे क्रिकेट सामन्यात तहसिलदार राजपुतांच्या  उत्स्फुर्त सहभागामुळे प्रेक्षकांकडुन  कौतुक




बिलोली ता.प्र.
तालुक्यातील महसुली अवैध धंद्याना आळा घालणारे कर्तव्यदक्ष   युवा तहसिलदार म्हणुन अल्पकालावधीत  नावारुपाला आलेले विक्रम राजपुत हे प्रशासकीय सेवा कार्यासह  क्रिडाक्षेञात देखिल एक पाउल पुढे  आसल्याचे दिसुन आले.ते आज दि.५  मे  रोजी तालुक्यातील  मौ.शिंपाळा येथे आयोजित  क्रिकेटच्या खुल्या सामान्यांचा उद्यघाटनाचा  शुभारंभ तहसिलदार तथा स्टार  व्हिलेवन बिलोली क्रिकेट संघाचे कप्तान विक्रम राजपुत यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी जि.प.सदस्य प्रतिनिधी अँडो.शिवकुमार पाटिल  पञकार राजु पाटिल शिंदे  भारतीय लष्करातील  जवान येथिल भुमीपुञ भिमराव मुंगडे ,मा.सैनिक शिवराज साखरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.




      नवयुवक क्रिकेट संघ शिंपाळा यांच्या वतिने जय बजरंग बली क्रिडा मैदानावर आज दि.५ मे. पासुन  क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या सामन्यात  विविध ठिकाणच्या  विस ते पंचविस संघानी  सहभाग नोंदवला आसुन आजच्या उद्यघाटन  शुभारंभ दरम्यान तमलुर तालुका देगलुर येथिल बस्वेश्वर क्रिकेट संघ व बिलोली स्टार व्हिलेवन संघ या  उभय संघात जवळपास तिन तास रखरखत्या उन्हात पार पडलेल्या  सामन्यात बिलोली संघाच्या  कप्तानकीचा धुरा सांभाळणारे तहसिलदार राजपुत यांच्या नेतृत्वाखाली  योग्य मार्गदर्शनातुन  या प्रथम शुभारंभाच्या विजयाची माळ आपल्या संघाकडे खेचुन  आणल्याने उपस्थित प्रेक्षकांकडुन राजपुतांची प्रशासकीय कार्यशैली व क्रिडाक्षेञातील  चिकाटीचा  जिव्हाळा भर उन्हातील उत्स्फुर्तपणे उत्कृष्ट  नेतृत्वाची भुमिका बजावत आसताना उपस्थित  प्रेक्षकांकडुन टाळ्यांच्या गजरात अभिनंदनाच्या  वर्षावातुन भरभरून कौतुक होताना  दिसुन आले. तसेच या वेळी खेळाचे औचित्य साधुन गावक-यांशी हितगुज साधुन  पाणी प्रश्नासह विविध बाबतीत माहिती जाणुन घेतली.  सदर सामन्यातील सर्वप्रथम विजेता मालिकाविर संघास पंधरा हजार तर द्वितीय विजयी  संघास सात हजार रुपयाचे रोख बक्षिस ठेवण्यात आले आसुन मालिकाविर संघास सगरोळी संघाकडुन प्रोत्साहनपर एक हजार एक रुपयाचे तर सर्वोत्तकृष्ट फलंदाज व गोलंदाजास प्रत्येकी पाचशे एक रुपयाचे  रोख पारितोषिक  ठेवण्यात आले. आसल्याचे संयोजक समीतीच्या वतिने सांगण्यात आले.तर अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे.

Friday, May 3, 2019

नांदेड :गाव भेटी संबंधी आयोजन कार्यक्रम राबवणार :-अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.

नांदेड :गाव भेटी संबंधी आयोजन कार्यक्रम राबवणार :-अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.



नांदेड (एजास कुरेशी)
नांदेड येथील पंचायत समिती कार्यालय तालुका स्तरीय अधिकारी यांची समन्वय सभा नांदेड जिल्ह्यातील प.स.व अर्धापूर तसेच  भोकर तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन प्रधानमंत्री आवास योजनेची व घरकुले व सौचालये यांची पाहणी शाळांना भेटी ,प्रा.आ.केंद्राना भेटी ग्रामपंचायततींना भेटी व तसेच दफ्तर तपासणी व अंगणवाडी भेट व पाहणी दलित वस्ती पाहणी असे गाव भेटी संबधी संभाव्य दौरा कार्यक्रम येत्या 9 तारखेला राबणार असल्याची माहिती अशोक काकडे भा.प्र.से.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे त्या मध्ये पंचायतसमिती अर्धापूर व भोकर तालुक्यातील काही गावात भेटी देऊन  प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले शौचालय यांची पाहणी शाळांना भेटी प्रा.आ.केंद्राना भेटी ग्रामपंचायतीना भेटी दफ्तर तपासणी व अंगणवाडी भेट व पाहणी दलित वसती पाहणी व चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे
भोकर तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजना मध्ये भ्रष्टाचार  झाल्याचे तक्रार जनजागृती माहिती अधिकार समितीने दिलेली आहे त्यांची निःपक्ष पणे चौकशी होणार काय ? या कडे भोकर च्या असंख्य जनतेचे व जण जागृती माहिती अधिकार समितीचे लक्ष लागले आहेत काय होईल हे येणाऱ्या 9 तारखेला समजेल

नगर पालिकेच्या जलशुद्धीकरनाचे पाणी घरात सिरल्याने ठेवलेली १लाख १७ हजाची मिरची भिजून चिंब

 नगर पालिकेच्या जलशुद्धीकरनाचे पाणी घरात सिरल्याने ठेवलेली १लाख १७ हजाची मिरची भिजून चिंब



भोकर नगर पालिके विरुद्ध नागरिकांत संतापाची लाट

 भोकर :एजास कुरेशी
येथील  नगर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र वार्ड क्रमांक ४ मधे आहे ह्या जलशुद्धीकरण केंद्राचे पाणी  मीरची व्यापाऱ्याच्या घरात सिरल्याने घरातील  ३० मिरच्यांचे पोते एकुण ९ क्विंटल भिजून चिंब झाली यात हजारो रुपयाचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्या कडून कळते.




     नगर पालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्राचे अशुद्ध पाणी  मिरची व्यापारी दशरथ लक्ष्मण डुमलवाड यांच्या घरात गेल्याने हजारो रुपयाची मिरची भिजून बेकामी झाली यास सर्वस्वी जबाबदार नगर पालिका आहे.असे या व्यापाऱ्याचे म्हणने आहे. नगर पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र वार्ड क्रमांक ४ मधे असून हे जल शुद्धीकरण केंद्र तयार झाले तेव्हापासून यातील बाहेर येणारे अशुद्ध पाणी वार्ड क्रमांक ४ मधील शेख फरीद नगर मधे आनेक घरांमधे जाते आजपर्यंत या पाण्यामुळे अनेकांच्या घरांच्या भिंती,पडल्या, घरातील अनेक वस्तूनासधूस झाल्या आहेत.या पाण्यामुळे रस्त्याने चालणे सुध्दा अवघड झाले आहे.हे पाणी वस्तीत येणे बंद करावे असे वार्डातिल नागरिकांनी अनेकवेळा येथील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगर सेवक साहेबराव सोमेवाड व नगर परिषद यांच्या कडे लेखी तक्रार केली होती तरी आमच्या समस्या कडे कोणीच दखल घेण्यास तयार नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणने असून डुमलवाड यांचे म्हणने आहे की  माझ्या घरात ठेवलेल्या पोत्या पैकी ३० पोती एकुण ९ क्विंटल अंदाजे १ लाख १७ हजार रुपयाची मिरची आपल्या जलशुद्धीकरण केंद्रातील अशुद्ध पाणी जाऊन भीजून खराब झाली यामुळे येथील नागरिकांत नगरपालिका व स्थानिक नगर सेवकावीरुद्ध संतापाची लाट निर्माण झाली आहे.या घटनेस सर्वस्वी जबाबदार नगर पालिका असून नास झालेल्या वस्तूची तत्काळ भरपाई देवून त्वरित जलशुद्धीकरण केंद्रातील बाहेर येणारे पाणी न थांबवल्यास येथील नागरिकांच्या वतीने आपल्या जलशुद्धीकरण केंद्राला टाळे लावण्यात येईल आणि आपल्या कार्यालया समोर वार्ड क्रमांक ४ मधील सर्व नागरिकांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

वाढदिवसा निमित्त ग्रामीण रूग्णालयात फळ व थंड पाण्याचे वाटप

वाढदिवसा निमित्त ग्रामीण रूग्णालयात फळ व थंड पाण्याचे वाटप


(बिलोली/ प्रतिनिधी ) येथील  कलाल समाजाचे नेते व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सायलू अंगावार याच्या ३९ व्या वाढदिवसा निमित्य दि.२ मे रोजी सकाळी ११ वा. ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळे व थंड फिल्टर पाणी वाटप करण्यात आले.
◼या वेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ.सतीष तोटावाड नगरसेवक प्रतिनिधी अमजद चाऊस,आनंद गुडमलवार, कलाल समाजाचे मार्गदर्शक संजय अलेवार, प्रकाश गौड, नरसिमलू गौड,मलेश गौड, शंकर गंजगुडे, ज्ञानेश्वर अंगावार, चंद्रकांत अंगावार, व्यकटेश गौड, बाबड भाऊ मिनकीकर, काशिनाथ बामनिकर आदि सह रूग्णालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Thursday, May 2, 2019

अल्पवयीन मुलीला छेडछाड प्रकरणी आरोपीस एक महीना कारावास व ५ हजार दंडाची शिक्षा .

अल्पवयीन मुलीला छेडछाड प्रकरणी आरोपीस एक महीना  कारावास व ५ हजार दंडाची शिक्षा .


बिलोली प्रतिनीधी.
अल्पवयीन मुलीस छेडछाड केल्या प्रकरणी आरोपी महेश शंकरराव सुवर्णकार यास एक महीना कैद व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा  बिलोली येथिल अति. जिल्हा व  सत्र न्यायाधिश एस.बी. कचरे साहेब यानी सुनावली.

याप्रकरणाची आधिक माहीती अशी की दिनांंक  १ जुलै  २०१६ रोजी फिर्यादी ची मुलगी पिडीत मुलगी पोलीस स्टेशन देगलुर हदधीतील जि.प. प्रा. शाळेच्या  पाठीमागे  रोडवर आझाद कालनी देगलुर मार्गे मानव्य विकास विध्यालय देगलुर येथे जात असताना यातील आरोपी महेश सुवर्णकार ने तिचा पाठलाग करुन तिला गाठले. व लैगीक  उध्धेशाने ,तु मला आवडतेस. आपण लग्न करुन घेऊ., असे म्हणुन हात धरण्याचा प्रयत्न केला. म्हणुन फीर्याद दिल्या वरुन आरोपी विरुध्द भा.द.वी.चे कलम ३५४ ( ड )  व सह कलम १२ बाल लैगीक आत्याचार प्रतिबधक कायदा प्रमाणे दोषारोप   होता.
यावरुन  पो.स्टे देगलुर येथे गुन्हा  दाखल करुन मा.न्यायालयात दोषारोप  दाखल करण्यात आले.
सरकार पक्षा तर्फे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी  पिडीत मुलगी पंच व तपासिक अधिकारी  एस बी पाटील  उपनिरिक्षक यान्च्या  साक्षी महत्वाच्या  ठरल्या. मा.न्यायालयाने  सरकार पक्षा तर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद  लक्षात घेवुन आरोपी महेश सुवर्णकार यास भा.द.वि. कलम ३५४  ड  व सह कलम १२ बाल लैगीक आत्याचार   प्रतिबँधक  कायदा  नुसार एक महीना कारावास व ५ हजार रुपये  दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे स. सरकारी वकील एस. बी. कुन्डलवाडीकर व पैरवी आधिकारी म्हणुन शेख अहेमद पो.हे. का. ब.न. १६६६ यानी काम पाहीले.

नांदेड - समाजकल्याण कार्यालय नांदेड येथे बार्टी च्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिवस साजरा


नांदेड - समाजकल्याण कार्यालय नांदेड येथे बार्टी च्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिवस साजरा




नांदेड - समाजकल्याण कार्यालय नांदेड येथे सकाळी ०७.०० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.तसेच  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था च्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला  .सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली
समाज कल्याण कार्यालयातील सर्व कामगारांचा सत्कार करण्यात आला .व सोबतच मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि. आपण १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून साजरा करतो हे समजलं पण “जागतिक कामगार दिन” हा सुद्धा १ मे रोजीच का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो
दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.कामगारांच्या प्रमुख मागण्या १. कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६. कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
७. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य. कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या
वर्षे लोटली तशतशा अधिकाधिक देशांतल्या तुकडया १ मे दिनाच्या सोहळ्यात सामील होत गेल्या आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिवस साजरा करु लागले आणि १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिनात होऊ लागला. १ मे दिवस ही सर्व कामगार चळवळीची परंपरा झाली


यावेळी सोबतच कामगार प्रवीण ढेंबरे , संजय मंत्री,संजय कोसवे ,विकास अदावर्ते,नरवाडे ,वैशाली जाधव ,राधा देवडे ,दत्ता पाईकराव या सर्व कामगारांचा बार्टी च्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अविनाश जोंधळे यांनी केले तर समतादूत विनोद पाचंगे व महेश इंगोले यांनी मार्गदर्शन केले.व समतादूत ज्योती जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  समतादूत दीपाली हाडोळे ,राणी बंडेवार,ज्योती जोंधळे ,सचिन घुले ,खंडू फोले,जगदीश निवळे,दिगंबर पोतुलवार ,बालाजी डुमणे ,दिलीप सोंडारे ,शारदा माले,प्रीती जमदाडे, इर्शाद मौलाना यांनी परिश्रम घेतले

Wednesday, May 1, 2019

तुम्हांला खरंच देशाची सुरक्षा करायची आहे की फक्त मुस्लिम महिलांना दहशतवादी म्हणून संशयाची राळ उठवायची आहे?

तुम्हांला खरंच देशाची सुरक्षा करायची आहे की फक्त मुस्लिम महिलांना दहशतवादी म्हणून संशयाची राळ उठवायची आहे?






बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पहिली गोष्ट म्हणजे श्रीलंकेने आतापर्यंत तरी बुरख्यावर कोणतीही बंदी लागू केलेली नाहिये. तर "फेस कव्हरींग आॅब्जेक्ट्स" वर बंदी आणण्याचे वैयक्तिक विधेयक एका खासदाराने तेथील संसदेत मांडले आहे, ज्यावर अजुनही राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली नाहिये. त्या विवेयकात बुरख्याचा कुठेही उल्लेख नाहिये.
 फक्त चेहरा झाकणे, एवढंच म्हणजे बुरखा नसतो. पण प्रकरणाची सखोल माहिती न घेता आपल्या महाराष्ट्रातले काही नेते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन भारतातही तशी बंदी लावण्याची मागणी करत आहेत, जे संवैधानिकदृष्ट्या कधीही शक्य होऊच शकत नाही.
   कारण फक्त मुस्लिम महिलाच नव्हे तर मारवाडी, राजपूत, राजस्थानी, वाल्मिकी व मराठा देशमुख महिलाही घुंघट घेत असतात, जैन साधु व साध्वीही अर्धा चेहरा झाकत असतात. मग त्यावरही बंदी आणणार का?
 गुन्हा करण्यासाठी वापरले जाणार्या साधनांवर बंदी आणणे जर खरंच आवश्यक असेल तर मग हेल्मेटवरही बंदी आणणार का? कारण काही वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका फायरींगच्या घटनेत दहशतवाद्यांनी हेल्मेट घातलेले होते. मागे सारस्वत बँकेवर छत्रीचा वापर करून चेहरा झाकून चोरी झाली होती, मग छत्रीवर बंदी आणणार का?
हवेतील जंतुपासून वाचण्यासाठी तोंडावर हिरव्या रंगाचा मेडिकल मास्क चढवला जातो आणि तो वापरण्यास कुणीही बंदी आणू शकत नाही. मग उद्या बुरख्याने चेहरा झाकण्यास बंदी आल्यावर मुस्लिम महिला या मेडिकल मास्कचा वापर करू लागली तर तुम्ही त्यांना कसं काय रोखणार आहात?

हा सगळा प्रकार करणार्यांना एक प्रश्न असा की, तुम्हाला खरंच देशाची सुरक्षा करायची आहे की फक्त मुस्लिम महिलांना दहशतवादी म्हणून संशयाची राळ उठवायची आहे? खरंच सुरक्षेचा प्रश्न असेल तर मग याच मुद्यावर श्रीलंकेतील "जमियत उलेमा एक सिलोन"ने मध्यम मार्ग स्वीकारत तेथील सर्व मुस्लिम महिलांना सुरक्षा रक्षकांशी सहकार्य करण्याचं आवाहन केले आहे आणि कुणावर संशय आल्यास आणि महिला सुरक्षाकर्मींनी मागणी केल्यास आपला चेहरा महिलांनी त्यांच्यासमोर उघड करणायाचे आवाहन केले आहे. त्यासाठी पूर्ण बुरखा काढायची गरज नाही. हा आहे मध्यम मार्ग ज्याद्वारे सुरक्षाही होते आणि महिलांच्या अंगप्रत्यंगांचे प्रदर्शन थांबून बुरखाकवचाद्वारे त्यांची काही आंबट नजरांपासून संरक्षणही होते.

तथागतांचा मध्यम मार्ग अवगत असलेल्या श्रीलंकेत उलेमांनी सांगितलेला हा मध्यम मार्गच राबविण्याची शक्यता आहे. भारतात तो आधीपासूनच राबविला जातो. आजही अनेक माॅलमध्ये जातांना बुरखाकवचधारी महिलांना महिला सुरक्षाकर्मी एका रूममध्ये नेऊन त्यांचा चेहरा बघून धातूशोधक यंत्राद्वारे तपासणी केली जाते आणि मग आत सोडले जाते.

काही वर्षांपूर्वी पुसद परिसरात बंजारा समाजातील महिलांच्या पारंपरिक घागर्यावर बंदी आणण्याची मागणी होत होती. या घागर्याचा उपयोग काही महिला चोरी करणायासाठी करत असल्याचा काही जण आरोप करत होते. परंतु स्वाभिमानी बंजारा महिलांनी आंदोलन करून ती मागणी धुडकाऊन लावली. 
  कारण फक्त गुन्ह्यांच्या साधनांवर बंदी आणल्याने गुन्हे कमी होणार नसून आपली सुरक्षा व्यवस्था, गुप्तहेरांचं सशक्त जाळं व सुरक्षाकर्मींच्या दक्षतेत वाढ करण्याची गरज आहे.
आज देशातील अनेक संवेदनशील ठिकाणांचे कॅमेरे एकतर निकामी असतात किंवा काम करत असले तरी त्यातील विज्युअल्स धूसर असतात. अनेक अपराधी त्यामुळेच सुटतात. ही सर्विलियन्स यंत्रणा मजबूत करण्याची गरज आहे.
मुस्लिम महिलांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे हा समस्त नारी जातीचा अपमान आहे. खरं म्हणजे श्रीलंकेतील तो बुरखाधारी आत्मघाती हल्लेखोर महिला नसून पुरूष होता. त्यात भारतीय शिलवंत बुरखाकवचधारी महिलांचा काय दोष.
हादेखील खरं आहे की,  बरख्याची जबरदस्ती नको, पण कुणी कोणतं वस्त्र प्रावरण नेसावं, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. घटनेनं कलम 19 व 25 मध्ये जिथं भाषण स्वातंत्र्य दिलंय, तिथं वस्त्र स्वातंत्र्यही दिलं आहे.
मुस्लिम महिलांच्या अंगावरचे कपडे घेचण्याचा जर प्रयत्न झाला तर देशाची कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे. कारण मुस्लिम महिला जीव देतील पण रस्त्यावर बुरखा काढणार नाहीत, मग देशभरातील तुरंग कोट्यवधी मुस्लिम महिलांसाठी कमी पडतील. अशी परिस्थिती उद्भवू द्यायची नसेल तर बोलघेवड्या राजकारण्यांनी आपल्या जीभेला लगाम लावला पाहिजे.

मुस्लिम महिलांवर बुरख्याची कुणीही जबरदस्ती करत नाही. त्या स्वतःहून त्या नेसतात. त्यांचं लहानपणापासून ब्रेनवाॅश करण्यात आल्यामुळे त्या तो नेसतात असा आरोप जर कुणी करत असेल तर मग अनेक ब्राह्मण मुली स्वतःहून इस्लाम कबूल करून स्वतःच्या मर्जीने आज कसा काय बुरखा नेसत आहेत, याचं उत्तरही द्यावं. ब्रेनवाॅश तर शाॅर्ट स्कर्ट नेसण्यासाठीही केला जातो. म्हणून हा आरोप बिनबुडाचा आहे.
नागपूरच्या अनेक हिंदू मुलीही पर्यावरण प्रदर्शनापासून वाचण्याकरिता जशा स्कार्फ बांधतात तसंच वासनेने वखवखलेल्या नजरांच्या सांस्कृतिक नजरांपासून वाचण्याकरिता मुस्लिम महिला स्वतःहून बुरखा नेसतात, कुणी तो नेसण्याची जबरदस्ती करत नाही. म्हणून तो उतरविण्याचीही जबरदस्ती करू नये.

कुणी रस्त्यावरून जाणार्या मुलीला जॅकेट काढण्यासाठी सांगत असेल तर कायद्याच्या भाषेत ही जशी "इव्ह टिसींग" आहे, तशीच कुणी बुरखा काढण्यासाठी म्हणत असेल तर ती देखील एकप्रकारची इव्ह टिसींगच आहे. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.

आत्मघाती हल्लेखोर तर राष्ट्रपती नेसतात तशा शेरवाणीतही बाँब लपवून आणू शकतो, मग काय शेरवाणीवरही बंदी आणणार का?

वास्तविकता ही आहे की, महिलेच्या शरीराचे उभार, अंग प्रत्यंग पाहून स्त्रीला फक्त नयनसुखाचं साधन मानणारी भांडवलदारधार्जीनी पुरूषी मानसिकता यामागे आहे. अशी मानसिकता भारतीय संस्कृतीविरूद्ध आहे, कारण बुरखा हा भारतीय संस्कृतीचाही भाग आहे. बाकी  श्रीलंकेत बुरख्यावर बंदी आली नसतांनाही बंदी आल्याची अफवा पसरली अन् ही बंदीची भाषा त्या अफवेवर आधारित नुसती बडबड आहे, अशी कोणतीही बंदी येणार नाही, म्हणून सर्वांनी निश्चिंत राहावं. आधीच सैरभैर झालेल्या सत्ताधार्यांना आणखी अडचणीत आणण्याचा हा संजयी कावा आहे, दुसरं काही नाही.

भोकर नगर पालीकेचा अजब कारभार :पाणी एक थेंब न देता बिल मात्र हजारो रुपयाचे !

भोकर नगर पालीकेचा अजब कारभार :पाणी एक थेंब न देता बिल मात्र हजारो रुपयाचे !



आठ दिवसात पाणी पुरवठा न केल्यास आमरण उपोषण करण्याचा नागरिकांचा इशारा


भोकर : शहरातील नगर पालिकेच्या पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण यंत्र वार्ड क्रमांक मधेच असूनही येथील शेख फरीद नगर, हनुमान नगर, बोरगाव रोड लगत लक्ष्मी नगर , जिल्हा परिषद हायस्कूल च्या पाठी माघील भागात जाणीवपूर्वक कृत्रिम तीव्र पाणी टंचाई ची समस्या निर्माण केली जात असून नगर परीषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पैसे भरून नळ जोडणी घेऊनही गेल्या चार-पाच वर्षापासून म्हणजेच नळ जोडणी घेतल्या पासून नळाला एक थेंबही पाणी येत नसल्याने येथील नागरिकांनी नगर पालिका व येथील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.

     शहरात नगर पालिकेने पाणी पुरवठ्याच्यासाठी मोठ मोठी पाईप लाईन सर्वत्र टाकली पण शहरातीलच माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवकाचा वार्ड म्हणजे वार्ड क्रमांक ४ मधील  जिल्हा परिषद हायस्कूल च्या पाठिमाघील भाग शेख फरीद नगर या वस्तीत काही भागात ही पाईप लाईन गेली तर काही भागात गेलीच नाही आणि ज्या भागात गेली तिथे अजूनही पाणी पोहचले येथील नागरिकांनी नळ जोडणी साठी रितसर तिन हजार सातशे रुपये भरून नळ जोडणी घेतली.नळ जोडणी  घेऊनही  चार ते पाच होऊन गेली आजवर यांच्या नळाला एक थेंबही सुद्धा पाणी आले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. येथील नागरिकांचे म्हणने आहे की,आम्ही अनेक वेळा विनंती तक्रार येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगर सेवक साहेबराव सोमेवाड यांच्याकडे केली असता यांनीही या बाबतीत कसलीच दखल घेतली नाही, नगर परिषदेकडे अनेक लेखी अर्ज केलोत तरी आमच्या मागणी कडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाहीत व नळ पट्टी मात्र वेळेवर येते.नळाला एक थेंबही पाणी येता पाणी पट्टी मात्र  आठ-आठ हजार रुपए येत आहे हे मात्र आश्चर्याची बाब आहे. आम्ही नळ जोडणी साठी हजारो रुपये भरुणही पाणी मिळत नाही आणि वरून पाणी पट्टी च्या नावाखाली हजारो रुपयाची लूट करण्यात येत आहे.पाण्यासाठी वार्डातील महिलांना-लेकरांना भर उन्हात, रात्रीबेरात्री एक-दोन किलो मीटर दूर वनवन भटकावे लागतं आहे.सद्या शहराला दोन दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे आमच्या नळाला दोन वर्षे आड तरी पाणी पुरवठा करा अशा संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करीत वरिष्ठांनी आमच्या मागणीकडे लक्ष देवून येत्या आठ दिवसात आमच्या नळाला पाणी पुरवठा न झाल्यास व मागील पाणी पट्टी माफ न केल्यास आठ दिवसा नंतर आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने वार्ड क्रमांक ४ मधील सर्व महिला-पुरुष यांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील स्थानिक नागरिकांनी दिला. पाणी न देता पाणी पट्टी मात्र वेळेवर जाते आणि सक्तीने वसूल केली जाते. यावरून भोकर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा जलशुद्धीकरण योजनाच्या नावाने नागरिकांची अर्थिक लूट होत आहे व फसवी व कुचकामी ठरत आहे की काय असं भोकर येथील नागरिकांना वाटत आहे.



आमच्या वसाहतीत भोकर नगर पालिकेकडून घेतलेल्या नळाला आमच्यासह अनेक घरातील नाळाला नळ जोडणी घेतली तेव्हापासून पाणी येतच नाही. पाण्यासाठी भर उन्हात शाळेतील लेकरांनासुद्धा घेऊन बाहेर भटकावे लागत आहे.आम्ही अनेक वेळा येथील नगर सेवक साहेबराव सोमेवाड यांच्याकडे आमच्या नळाला पाणी येत नसल्याचे अनेकवेळा सांगितले पण हे म्हणतात मी काय करू शकतो हे माझे कामं नाही असे म्हणून माघील चार वर्षापासून उडवाउडवी ची उत्तरे देत आहेत. मी घरी नळ घेऊन चार वर्षे झाली तरी मागील चार वर्षात नाळाला एक थेंबही पाणी आले नाही पाणी पट्टी बिल मात्र वेळेवर येते.शहरात दोन दिवस आड पाणी पुरवठा होतो पण माझ्या  घरी चार वर्षात एकदाही पाणी आले नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नगर पालिकेविरुध्द आणि येथील नगर सेवका बद्दल व्यक्त करीत आहेत.पाणी न देता भरमसाट दिलेले माघील पाणी बिल माफ करून,येत्या आठ दिवसात नाळाला पाणी पुरवठा झाल्यास मी कुटुंबासह आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण करेल असा इशाराही यावेळी दिला.

         - जयश्री टिकेकर

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...