Monday, December 23, 2019

भोकर तालुक्यातील चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल हमीद उर्फ गोरे मियाँ यांचे निधन

भोकर तालुक्यातील चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल हमीद उर्फ गोरे मियाँ यांचे निधन



भोकर तालुक्यातील चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल हमीद उर्फ गोरे मिया यांचे  दि. 13-12-2019 शुक्रवार रोजी निधन झाले असून त्यांच्या निधनाची माहिती कळताच त्यांच्या चाहत्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे अब्दुल हमीद उर्फ गोरे काका यांचा मोठा परिवार असून त्यांना सात मुले व तीन मुली असून त्यांचा नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे आणि ते भोकर येथील प्रसिद्ध व्यापारी शेख मुजाहिद ऊर्फ मुज्जू भाई यांचे वडील होते त्यांची गल्ली चिखलवाडी येथील लोक व तेथील मस्जिदीचे सदर त्यांच्या मते गोरे काकांचा निधन झाल्या मूळे आमच्या गल्लीतील छत हरवल्यासारखं वाटत आहे गोरे काका हे  एक प्रमाणिक व्यक्ती मत्त्व असणारे व्यक्ती असून ते सर्व छोट्या- मोठ्यांना प्रेरणा देणारे होते आणि रमजानच्या पवित्र महिन्यात त्यांनी देत असलेल्या आवाजाने लोक सहेरी करत असे आणि ते घरोघरी सकाळी तीन वाजेच्या सुमारास तेथील लोकांना नमाज व सहेरी रोजा साठी लोकांना उठवत होते त्यांच्या सारखा नेक ह्रदयाचा माणूस आम्हा लोकांना पुन्हा लाभणार नाही असे तेथील मस्जिदचे सदर यांनी सांगितले

धम्म परिषदेतून समाजाच प्रबोधन व्हावे- सामाजिक कार्यकर्ते एल.ए.हिरे यांचा डॉ.आंंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मान

धम्म परिषदेतून समाजाच प्रबोधन व्हावे-
सामाजिक कार्यकर्ते एल.ए.हिरे यांचा डॉ.आंंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मान



हिमायतनगर(प्रतिनिधी)
   भोकर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एल.ए.हिरे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पाटील जळगावकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न भवरे यांचेसह मान्यवराच्या हस्ते पुरस्काराचे सन्मान पत्र व समृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला आहे.


  रविवार दि.२२ डिसेंबर२०१९ रोजी सोनारी फाटा तालुका हिमायतनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण नांदेड तर्फे आयोजित बौद्ध धम्मपरिषदेत हा गौरव पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला आहे.


भोकर तालुक्यातील बहुजन आंबेडकरी चळवळीत लक्ष्मण अमृता हिरे यांचे मोलाचे योगदान आहे.दलित पँथर या लढाऊ संघटनेत कार्यरत असतांना मराठवाडा विद्यापीठ नामांतरासह बेघर झोपडपट्टीवासीय भुमिहीन गायरान कास्त काराच्या प्रश्नावर अनेकवेळा मोर्चे आंदोलने केली.ओबीसी,दलित-आदिवासी भटक्या  वंचित घटकांवर झालेल्या अन्यायाच्या न्यायहक्कासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला.बहुजन समाजाचे संघटन प्रबोधन व्हावे या उधेशाने अंधश्रदा निर्मुलनासह विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम  राबविली पत्रकारिता क्षेत्रात ते १९९१पासून  निर्भिडपणे लिखान करून सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांनी दबदबा निर्माण केला.त्यांच्या कार्याची दखल घेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड तर्फे हिरे यांना समता गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.

सत्काराला उतर देतांना हिरे म्हणाले धम्म परिषदेतून समाजाच प्रबोधन झाल पाहिजे थोरसमाज सुधारकांचे विचार प्रत्येकांच्या घरी गेले पाहिजेत. भगवान बुध्दाचा धम्म मानवाच्या कल्याणासाठी आहे.तो आचरणात आणावा इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्यातील दोष प्रथम शोधाले पाहिजेत!माझ्या कार्याची दखल घेवून सन्मान केलात त्याबद्दल मी आपला श्रृणी असून हजारो जनते समोर दिलेला पुरस्कार मोठा सन्मान आहे. शासनाकडे डॉ.बा.आंबेडकर समाज भुषण पुरस्कारासाठी ३ वेळा प्रस्ताव दाखल केला परंतु राजकीय लग्गेबाजीमुळे तो मिळाला नसल्याची खंत हिरे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आमदार माधवराव पा.जळगावकर यांनी धम्म परिषदेला शुभेच्छा दिल्या यावेळी  प्रकाश गायकवाड माहूर,हास्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे,विजय कांबळे, शिलवंत वाढवे,डॉ.इरवंत पल्लेवाड,बालाजी नागमवाड,प्रा.एस.के.चव्हाण,एम.डी.गुरपवाड,प्रा.पंजाब शेरे यांचाही यथोचित गोरव करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्या जोत्सना नरवाडे, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड,माजी सभापती जोगेद्र नरवाडे, दिलिप शिंदे,अनिल मादसवार,भिमराव कावळे,शेख खयुम,उतम कानिंदे, भिमराव दुधारे,बी.एस.सरोदे,दता डोंगरे,अनिल डोईफोडे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचलन डॉ.मनोज राऊत यांनी केले तर आभार लक्ष्मण भवरे यांनी मानले.रात्रीला बुध्द भीम गिताचा  बहारदार कार्यक्रम झाला.

Friday, December 20, 2019

भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन मंजुर केलेल्या नागरिकता संशोधन विधेयका विरोधात भोकरमधे मुक मोर्चा व धरणे

भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन मंजुर केलेल्या नागरिकता संशोधन विधेयका विरोधात भोकरमधे मुक मोर्चा व धरणे

   


एजास कुरेशी भोकर
भोकर : भारतीय राज्य घटना हि न्याय, समता आणी बंधुता या मुलभुत तत्वांवर आधारीत असुन यातील महत्वाचे कलम १५ अन्वये स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे की, धर्म, वंश,जात, लिंग, जन्मस्थान इत्यादीचे आधारावर भारतीय समाजात भेदभाव करता येणार नाही. मात्र मुलतत्ववादी भाजपा सरकारच्या कार्यकाळात संविधानातील वैधानीक तत्वांना छेद दिला जात असुन भारतात जन्मलेल्या व पुर्वापात रहिवासी असलेल्या मुस्लीम समाज बांधवांना दुय्यम दर्जाची वागणुक दिली जात आहे हे नागरीकता सशोधन विधेयक पारीत करुन  सरकारने सर्व मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.



      नागरिकता संशोधन विधेयाच्या विरोधात भारतभर ठिकठिकाणी निदर्शने होत आहे या पार्श्र्वभुमीवर सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आज दि.२० डिसेंबर २०१९ रोजी  दुपारी शुक्रवारची नमाज पठण केल्यावर काजी मस्जितीपासून शांततेच्या मार्गाने पोलिस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरचौक मार्गाने
 तहसील कार्यालया पर्यंत शेकडो मुस्लीम बांधव मुक मोर्चाव्दारे तहसीलदार भोकर  यांच्या मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात आले.
      सदर निवेदनाव्दारे असे सुचीत करण्यात आले आहे की, दि.९ डिसेंबर २०१९ रोजी लोकसभेत ११ डिसेंबर २०१९ रोजी राज्य सभेत सिटीजन अमेंडमेंट बिल २०१९ (नागरिकता संशोधन बिल) बहुमताने मंजुर करुन इंडियन सिटीझन अ‍ॅक्ट १९५५ मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असुन त्यामध्ये मुस्लीम धर्मीयांना जाणीव पुर्वक वगळुन इतर धर्मीयांना नागरिकत्व देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन सदर विधेयक मंजुर करण्यात आले आहे. सदर विधेयक हे असंवेधानीक असुन मुस्लीम धर्मीयांच्या नागरीकांवर अन्याय करणारे हे विधेयक आहे. त्यामुळे सदर विधेयकावर पुनर्विलोकन व संशोधन होणे नितांत गरजेचे आहे.

      सदरचे नागरिकता संशोधन विधेयक हे नागरिकांच्या सार्वभौम अधिकार कर्तव्यांची पायमल्ली करणारी बाब असुन या बाबत महामहिम राष्ट्रपतींनी पुनर्विचार करुन भारतीयत्व आणी भारतीय राज्य घटनेत अंतर्भुत करण्यात आलेल्या तत्वांनुसार योग्य ते बदल करुन बहुसंख्य मुस्लीम समाज बांधवांना आपण भारतीय असलेला सार्थ अभिमान हा भविष्य काळातही निर्वीवाद राहावा या दृष्टीने पावले उचलावीत असे सदर निवेदनात नमुद केले आहे.

धरणे आंदोलनात  मौलाना हाफिज,मौलाना उमर फारूक,मुफ्ती फुरखान,मौलाना रिजवान सरवरी,मौलाना रियाज, मौलाना हाफिस सद्दाम, मुफ्ती खुर्शीद  साहेब,मौलाना शुजाओद्दीन, ऍड मो. सलीम ऍड मुजाहेद्द खतीब,मजीद लाला,सहित शेकडो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते

Saturday, December 14, 2019

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी घडवावेत- एम.जी वाघमारे

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी घडवावेत- एम.जी वाघमारे




  भोकर( प्रतिनिधी ) शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिल्यास विद्यार्थी हा येणाऱ्या काळास कवेत घेईल असे प्रतिपादन शिक्षण विस्ताराधिकारी एम.जी वाघमारे यांनी केले.

तालुक्यातील हाळदा संकुलाची ०३री केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आज (दि14 )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघाळी येथे उत्साहात संपन्न झाली.

 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य  व सध्याचे तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम पाटील पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून  शिक्षण विस्तार अधिकारी डी.जी. वाघमारे ,  शिक्षण प्रेमी सदस्य  दिलीपराव अनंतवाड व गावचे सरपंच बालाजी घुमरे प्रभारी केंद्रप्रमुख प्रल्हाद जोंधळे ,केंद्रीय मुख्याध्यापक इबितदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 या शिक्षण परिषदेस केंद्राअंतर्गत असलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या विकासासंदर्भात या शिक्षण परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली.  अध्ययन निष्पत्ती , Diksha app , आनापान, सगुन पोर्टल  आदी संदर्भात प्रशासकीय सूचना येथे देण्यात आल्या. या परिषदेत तज्ञ साधन व्यक्ती म्हणून सहशिक्षक खेराव, सहशिक्षक खांडरे  व सहशिक्षक व्यवहारे  तसेच  सहशिक्षक पवनकर यांनी आपल्या अमोघ  वक्तृत्व शैलीतून सर्व शिक्षकांना मंत्रमुग्ध करत विषय ज्ञानाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला.  शिक्षण परिषद सुरळीत व अत्यंत नियोजन पद्धतीने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे संपन्न झाली.
 येथील मुख्याध्यापक तोषटवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शाळेच्या शिक्षक वृंदानी या शिक्षण परिषदेचे सुरेख नियोजन केले होते.


प्राथमिक शाळा मोघाळी येथील मुख्याध्यापक रामदास तोषटवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंदानी या शिक्षण परिषदेचे सुरेख नियोजन केले होते.

संकुल कन्या भोकरची केंद्रस्तरिय शिक्षण परिषद संपन्न

संकुल कन्या भोकरची केंद्रस्तरिय शिक्षण परिषद संपन्न



भोकर, (प्रतिनिधी) दि. १४
 भोकरच्या संकुल कन्या ची ३री केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्रातर्गत जि.प. प्रा.शा.गोपीतांडा येथे संपन्न झाली असुन परिषदेचे अध्यक्षस्थानी श्री नाईक होते तर उद्घाटक संकुलाचे प्रमुख जकियोद्धीन शेख हे होते. यावेळी केंद्रिय मु.अ.सुधिर सुरंगळीकर,सरपंच श्री करपे आदी उपस्थित होते.
या परिषदेत केंद्रातर्गत बारा शाळेतील मुख्याध्यापक,व शिक्षक उपस्थित होते.
 सुंदर अशा भौगोलिक व निसर्गरम्य असलेल्या गोपीतांडा व हरीतांड्याच्या विधार्थ्यानी  प्रारंभी स्वागत गाऊन  उपस्थितांची मने जिंकली. यावेळी गावचे सरपंच श्री करपे हे दोन्ही शाळा डिजिटल करण्यासाठी एलईडी देण्याचे आश्वासन दिले व एका महिन्यात शाळा डिजिटल होईल असे शाळेचे मुख्याध्यापक रमेश डूमलवाड यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख जे.एम. शेख यांनी केले.
 दुसऱ्या सत्रात मित्र उपक्रमांतर्गत आनापानाचे महत्व, विषद करून  कन्या शाळेचे शिक्षक मिलिंद जाधव यांनी मार्गदर्शन  केले. दिक्षा अॅप व सगुन कार्यक्रमांबद्धल ची माहिती जितेंद्र गवळे यांनी दिली.परिषदेच्या यशस्वितेसाठी हरीतांडयाचे मुअ अक्कलवाड, नरसिंग पसनूरवार आदी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री मठपती तर आभार रमेश डुमलवाड यांनी मानले.

Saturday, November 30, 2019

राष्ट्रवादी-काँग्रेस मधून भाजपात घुसलेल्या अनेकांना घरवापसीचे वेध लागणार..!

राष्ट्रवादी-काँग्रेस मधून भाजपात घुसलेल्या  अनेकांना घरवापसीचे वेध लागणार..!



नांदेड (बेधडक महाराष्ट्र विशेष)
  जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीपूर्वी
अनेक काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची सत्ता आली पण ज्यांनी ज्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचे काय? हा एक मोठा प्रश्‍न आता जनमानसात विचारला जात आहे. या सर्वांनी भाजपात घुसताना ’’आम्हाला मतदार संघात कामे करावयाची आहेत, मतदारसंघाचा विकास करावयाचा आहे असे, जनतेला सांगितले आहे. आता तर भाजपाची सत्ताच आलेली नाही, मग भाजपात गेलेले हे नवप्रवेशवाले नेते आपल्या मतदारसंघात विकास कामे कशी काय करतील? कोण यांना निधी देणार? हे प्रश्‍न आता उपस्थित केले जात आहेत. . अशी माणसे आम्ही जनतेच्या विकास कामांसाठी पक्ष सोडून भाजपात जात आहेत, असे म्हणत असतील तर त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्याबाबत जनतेला सक्ती कोण करु शकतो ? तर राज्यभर अशा मंडळींना जनतेने धडा शिकविला आहे. आयुष्यभर काँग्रेस-राष्ट्रवादीने ज्यांना -ज्यांना प्रचंड, महाप्रचंड दिले त्यांनीच स्वार्थासाठी पडत्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून भाजपा जवळ केली, ही बाब जनतेला पटलेली नाही, राज्यभर ही मंडळी आज हास्यास्पद विषय झाली आहेत. सक्रीत तर भाजपा कार्यकर्त्यांनी गंमतच केली आहे. त्यांनी चक्क सोशल मिडीयावर पक्षात नव्याने घुसलेल्यांना आवाहन केले आहे, ’’जनतेची कामे करण्याचा बहाणा करुन तुम्ही ऐनवेळी भाजपात घुसलात, आता भाजपाचेच सरकार आलेले नाही,  तुमची विकास कामे होणार नाहीत, नंतर दोष देण्यापेक्षा तुमची  कामे जिकडे होणार असतील तिकडे आजच निघून जा’’ भाजपात घुसलेल्या संधीसाधूंची या पेक्षा अधिक दुसरी बेईज्जत काय असू शकते. ही सर्व मंडळी आज हास्याचा विषय झाली आहेत. बरं त्यांचे परतीचे दोरही कापले गेले आहेत. काँग्रेस -राष्ट्रवादीत स्वगृही गेले तरी त्यांना पूर्वीचा मान राहिल काय? कुणीतरी घोषणाच केली होती, की भाजपात गेलेली मंडळी पुन्हा परत स्वगृही आली तरी त्यांना कार्यकर्त्यांच्या रांगेत बसावे लागेल ! यात चूकीचे काही आहे असे कुणी म्हणू शकणार नाही. परंतू महाराष्ट्राच्या घडामोडींनी एकूणच देशाच्या राजकारणात एक फार मोठा अंडर करंट सोडला आहेे. देशात ’’बिगर भाजपा वादास’’ सुरुवात झाली आहे. भाजपाने ज्या प्रकारे शतप्रतिशत भाजपा, काँग्रेस मुक्त भारत, विरोधकांचा उघड सफाया, मित्र पक्षांचा स्लो पॉयझनींग तत्वाने सफाया, ही निती अवलंबीली होती. त्यामुळे विरोधकांच्या व मित्रपक्षांच्या आस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. ही बाब ’बिगर भाजपा’ वादाचे अंकुर  उगवण्यास कारणीभूत झाली आहे. भाजपामुळे आपले अस्तित्वच धोक्यात येत असल्याची जाणीव भाजपातेत्तर सर्वच पक्षांना झाली आहे. त्यातून सर्वात प्रथम  शिवसेना पक्ष सावरला आहे. अधिक काळ भाजपा सोबत राहिलो तर आपण संपून जावू, त्यापेक्षा काँग्रेस -राष्ट्रवादी परवडली.  हा विचार सेनेने केला आणि बिगर भाजपा वादाच्या मोहिमेची मुहुर्तमेढ महाराष्ट्रापासून रोवली. हा अंडर करंट आता देशभर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. हे सर्व होत असताना व  देशात भाजपाचा प्रादेशिक राजकारणाचा शेअर 70 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांपर्यत घसरला असताना, भाजपामध्ये नव्याने घुसलेल्या या संधीसाधू  काँग्रेसींचे लाईट लागले नसते तरच नवल होते. त्यातूनच राज्यात अनेकांच्या डोक्यात घरवापसीचे, स्वगृही परतण्याचे चक्र आतापासूनच सुरु झाले आहे. महाविकास आघाडीचा शपथविधी होण्याआधीच एक घरवापसी झाली आहे. आता राज्यभरात भाजपात ताजे -ताजे घुसलेल्यांना पश्‍चात बुद्धी म्हणा, की  पश्‍चातापाची अनुभुती म्हणा, अनेकांना घरवापसीचे वेध लागणार आहेत, ही बाब निश्‍चीत !

Wednesday, November 27, 2019

भोकरच्या त्या मुख्याधिकारी ला अखेर पोलीस कोठडी

भोकरमध्ये भ्रष्टाचार केलेल्या मुख्याधिकारी त्या मुख्याधिकारी ला अखेर पोलीस कोठडी




भोकर (एजास कुरेशी)
भोकर ची नगरपरिषद मनले ची भ्रष्टाचार हे भोकरच्या जनतेला सांगण्याची गरज नाही कारण नगरपरिषद मध्ये बरेच  भ्रष्टाचार झालेले आहेत  काही उघडकीस आलेले पण आहेत ते घनकचरा असो का नोकर भरती
भोकर येथील नगर परिषदे अंतर्गत सन 2018 मध्ये झालेल्या घनकचरा व्यवस्थापनातील घोटाळा प्रकरणी आरोपी असलेले तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण  यलगड्डे यांना बुधवारी प्रथमवर्ग न्यायालयाने 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे प्रकरणाची पार्श्वभूमीवर अशी की यातील प्रमुख आरोपी पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर तत्कालीन मुख्याधिकारी हरी कल्याण यलगड्डे आणि साईबाबा संस्थेचे अध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी संगनमत करून 8 सप्टेंबर 2017 ते 29 सप्टेंबर 2017 या कालावधीत शहरातील घनकचरा व्यवस्थापनात बनावट दस्तावेज तयार करून शासनाच्या दहा लाख 18 हजार 500 रुपयांचा गैरवापर केल्याची माहिती अधिकारातून आढळुन आल्यानंतर यातील फिर्यादी नगरसेवक केशवरामा मुद्देवाड यांनी तक्रार केली होती याबाबत न्यायालयाच्या आदेशाने 14 जून 2018 रोजी वरील तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून सर्व आरोपी पोलिसांना मिळून आले नव्हते याबाबत भोकर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रकरणातील तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश भाले, पोलिस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत आरकिलवाड, कृष्णा तलवारे, यांनी पुणे येथून आरोपी हरी कल्याण यलगड्डे, यांना अटक केली असून त्यांना येथील प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

Monday, November 25, 2019

भोकर तालुक्यात सशक्त अभियानास उदंड प्रतिसादत

भोकर तालुक्यात सशक्त अभियानास उदंड प्रतिसाद





 भोकर(एजास कुरेशी)
तालुक्यात  विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी  सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत आज( दि. 25 ) घेण्यात आलेल्या 'आयएफए' गोळ्या वाटपाच्या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुधारणेसाठी विविध उपक्रम हाती घेतले असून याच धर्तीवर अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शहरासह प्रत्येक गाव,वाडी,तांड्यावरील सुमारे 125 शाळेसह प्रत्येक अंगणवाडीतील  विद्यार्थ्यांना,  लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते 'आयएफए' गोळ्या खाऊ घालण्यात आले आहेत.




सदर उपक्रमांमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत अंगणवाडी मधील बालकांना शिरपचे डोस  देण्यात  आले. यानंतर सकाळी ११ ते ०१ या वेळेत  स्थानिक मान्यवरांकडून शालेय गुणवत्ता तपासली गेली असून,दुपारच्या भोजनानंतर तालुक्यातील सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना आयर्न व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या खाऊ घालण्यात आले.

 केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन भोकर येथे जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख ,
तालुक्याचे गट विकास अधिकारी  जी.एल. भोकर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ पत्रकार जयभीम पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  आयएफए गोळ्या  खाऊ घालण्यात आल्या. तर प्राथमिक शाळा रावणगाव येथे जिल्हा परिषद सदस्य रावणगावकर, गटशिक्षणाधिकारी डॉक्टर डी एस मठपती मौजे भोसी येथे जि.प.सदस्य प्रकाश पाटील भोसीकर, तर रायखोड येथील प्राथमिक शाळेत पंचायत समितीचे उपसभापती सुरेश बिल्लेवाड, शिक्षण विस्ताराधिकारी एम.जी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना आयएफए  गोळ्या खाऊ घातल्या. मौजे दिवशी येथे राजा खंडेराय यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फॉलिक ऍसिड चे डोस देण्यात आले. तालुक्यातील सर्व गावात स्थानिक लोकप्रतिनिधीकडून गोळ्याचे वाटप करण्यात आले.




 नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, निरंतर शिक्षण विभागाचे दिलीप बनसोडे यांनी या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी तालुक्यातील काही शाळांना भेटी देऊन, सायंकाळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला.

 गटशिक्षणाधिकारी  डॉ.डी.एस.मठपती, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दहिफळे व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सशक्त विद्यार्थी अभियान हा उपक्रम एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात राबविण्यात यावा यासाठी ग्रामपातळीवरील  अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक,आरोग्य सेवक, शिक्षक,मुख्याध्यापक, आशा वर्कर, एनआरएचएम अंतर्गत काम करणारे कर्मचारी आदी  यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करून सदरील उपक्रम यशस्वी केला.

Sunday, November 24, 2019

आयएफए गोळ्या वाटपासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

 आयएफए गोळ्या वाटपासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज




 भोकर( एजास कुरेशी)
  तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी  सशक्त विद्यार्थी अभियान या उपक्रमांतर्गत,तालुक्यात दिनांक 25 नोव्हेंबर  रोजी  एकाच दिवशी स्थानिक पातळीवरील मान्यवरांच्या हस्ते , आयर्न व फॉलिक ऍसिडच्या' गोळ्याचे वाटप केले जाणार आहे.

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मा.अशोक काकडे हे जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुधारणेसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. याच धर्तीवर अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून  शहरासह प्रत्येक गाव,वाडी,तांड्यावरील सुमारे 125 शाळेतील व अंगनवाडीतील  विद्यार्थ्यांना, मा लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते 'आयएफए' गोळ्या खाऊ  घातले जाणार आहेत. यासाठी आरोग्य ,महिला बालविकास  व शिक्षण विभागाकडून याची योग्य ती तयारी करण्यात आली आहे.
सदर उपक्रमांमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत गोळ्या वाटपाचे अंगणवाडीत कार्यक्रम घेतले जाणार असून ११ ते ०१ या वेळेत  मान्यवरांकडून शालेय गुणवत्ता तपासले जाणार असून,दुपारच्या भोजनानंतर विद्यार्थ्यांना गोळ्या वाटप करण्याचे  नियोजन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तालुक्याचे गट विकास अधिकारी  जी.एल.रामोड गटशिक्षणाधिकारी  डॉ.डी.एस.मठपती, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दहिफळे व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन महिन्यापासून  शाळास्तरावर लोह व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या विद्यार्थ्यांना खाऊ घातले जात आहेत. दरम्यान सशक्त विद्यार्थी अभियान हा उपक्रम  लोकचळवळ म्हणून समोर यावी यासाठी एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात स्थानिक पातळीवरील सरपंच,पोलीस पाटील, साहित्यिक,यशस्वी उद्योजक ,शेतकरी, आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या  हस्ते आयएफए गोळ्या वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.  अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनाही आयएफए गोळ्या दिल्या जाणार असून.. सशक्त विद्यार्थी अभियान हा उपक्रम लोक चळवळ म्हणून उभे राहावी यासाठी ग्रामपातळीवरील  अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक,आरोग्य सेवक, शिक्षक,मुख्याध्यापक, आशा वर्कर, एनआरएचएम अंतर्गत काम करणारे कर्मचारी आदी सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर पूर्वतयारी  करत असताना दिसून येत आहेत.

Tuesday, November 12, 2019

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू..!!


राज्यपालांच्या आदेशाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क:-
 महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात राज्यात राष्ट्रपती लागू करण्याचे आदेश राष्ट्रपतींकडून देण्यात आलेत राष्ट्रपतींच्या आदेशानंतर ही घोषणा करण्यात आलीय. महाराष्ट्राच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येतेय.

दोनवेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली होती शरद पवार व राष्ट्रवादी....

महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिले दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे.१९८० आणि २०१४ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं होतं.१९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचं सरकार होतं.हे सरकार बरखास्त करून तेव्हा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या.त्यामुळे १७ फेब्रुवारी ते ९ जून १९७८ या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.त्यानंतर २०१४ मध्येही महाराष्ट्र राष्ट्रपतीखाली गेलं.ही राष्ट्रपती राजवट ३२ दिवसांसाठी होती.राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळलं होतं व त्यानंतर २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
 धक्कादायक म्हणजे, सोमवारी सायंकाळी खुद्द राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बोलावून मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याची मुदत दिल्याचं सांगितलं होतं. मात्र, आज सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी राज्यपालांना फोन करून सत्तेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणारं पत्रं धाडलं होतं. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर केल्याची माहिती राजभवनानं दिलीय. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार अहवाल सादर करण्यात आला होता. याबद्दल खुद्द राज्यपालांनी ट्विटरद्वारे माहिती दिली होती.

Monday, November 11, 2019

ना उद्धव.. ना फडणवीस… ‘पॉवर’ केवळ पवारांचीच

ना उद्धव.. ना फडणवीस… ‘पॉवर’ केवळ पवारांचीच




विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १८ दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यपालांनी भाजपाला सत्तेस्थापनेसाठी शनिवारी आमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळेच आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेच्या हलचाली सुरु केल्या आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळेच राज्यातील घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. म्हणूनच देशभरामध्ये शरद पवार यांच्यासंदर्भात होणाऱ्या सर्चचे प्रमाण वाढल्याचे गुगल ट्रेण्डवर दिसत आहे. विशेष म्हणजे राज्याने युतीच्या बाजून जनमत देऊनही युतीमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा पवारांबद्दल सर्च होण्याचे प्रमाण जास्त आहे.
गुगल ट्रेण्डवरील आकडेवारीकडे पाहिल्यास भाजपाने सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर रविवारी रात्री शरद पवार यांच्या नावाने गुगल सर्च होण्याचे प्रमाण वाढले. रात्री आठपासून पवार यांच्या नावाबद्दल सर्चमध्ये अचानक वाढ झाली. तेव्हापासून गुगल ट्रेण्डच्या सर्च टॉपिकमध्ये शरद पवार (Sharad Pawar) ही टर्म उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोन्ही टर्मपेक्षा अधिक प्रमाणात सर्च झाली आहे. भाजपाने नकार दिल्यापासून पवारांचे नाव सर्च होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी दुपारीही तिन्ही टर्मचा एकंदरित विचार केल्या पवार यांचे नाव हे पहिल्या क्रमांकावर उद्धव दुसऱ्या तर फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Friday, November 8, 2019

सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने राहुं गावात शांतता ठेऊ न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करू-भोकर शांतता कमेटी

सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने राहुं गावात शांतता ठेऊ न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करू-भोकर शांतता कमेटी



भोकर :(एजास कुरेशी )
अयोध्येतील रामजन्मभूमी, बाबरी मशिद प्रकरणी लवकरच न्यायायलायकडून निकाल दिला जाणार आहे. हा निकाल कोणत्याही बाजूने लागू शकतो त्यामुळे निकालानंतर अती उत्साही होवून जल्लोषात फटाके फोडणे, डिजे लावणे, मिरवणूक काढणे, किंवा निकालाबाबत निषेध करणे या बाबी अयोग्य आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांनी शांतता राखावी तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोशल मीडियावर निकालासंबंधी कोणत्याही पोस्ट अथवा चर्चा करू नये, अथवा एखादी पोस्ट त्या प्रकारची आढळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भोकर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थता अबाधित राहण्यासाठी घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत न्यायालयालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचे स्वागत करण्याचे ठरले आहे.



आज दि,8 नोव्हेंबर रोजी सकाळी तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठीस तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री, मुदिराज, जेष्ठ पोलिस निरीक्षक विकास पाटील, पंचायत समीतीचे सभापती राठोड, माजी नगराध्यक्ष विनोद पा. चिंचाळकर, माजी नगराध्यक्ष सोमेवाड, माजी उपनगराध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील, पत्रकार उत्तम बाबळे, शिवाजी पाटील किन्हाळकर, सुभाष पा.किन्हाळकर, हमीदखान पठाण, बाबूभाई, तामसेकर, व्यंकट माने, मिर्झा ताहेरबेग, बाबाखान पठाण, मौलाना मोबिन ईनामदार,तोफिक इनामदार,संतोष मारकवर, माळेबाई, नरतावारबाई, गणपत पीठेवाड, संतोष मारकवार, यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती. सर्वांनी प्रशाषणास सहकार्य करण्याचे व तालुक्यात शांतता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अनावश्यक लिखान करून वाद निर्माण करणाऱ्या टवाळखोरांवरही पोलिसांची करडी नजर राहणार असून,शोषल मीडियावरील व्हाट्सऑप,फेसबुक, यासारख्या अनेक ऑप वर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व अशी पोष्ट लाईक आणि शेर करणाऱ्यारही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असल्याची माहिती आज दिली आहे, त्यामुळे सर्वांनी मंदिर मस्जिद बाबद लिखाण करणे टाळून प्रशाषणास सहकार्य करावे असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे. तर पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी म्हटले आहे की, शहरात विनापरवाना बॅनर बाजी करणे, सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणे, मिरवणूक काढणे, मोठा जमाव जमवणे, अश्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कार्यवाही टाळण्यासाठी सर्वांनी शासनाला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

व्हाट्सअपच्या ग्रुप ऑडमिनला नोटीस

व्हाट्सअपच्या ग्रुप ऑडमिनला नोटीस






नांदेड:- एजास कुरेशी
आगामी काळात सण व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, यांची प्रमुख उपस्थिती होती
 आगामी कालावधीत बाबरी, अयोध्या राम मंदिराच्या निकालाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहवी या अनुषंगाने विविध व्हाट्सअप ग्रुपच्या एडमिनला पोलिसांनी नोटीस बजावत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ क्लिप,जातीत तेड निर्माण करणारे मजकूर, प्रसार होऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत पोलीस प्रशासनाने कलम 149 सीआरपीसी प्रमाणे या नोटीस बजावल्या आहेत त्याचवेळी ग्रुप ॲडमिन ने सेटिंग बदलून ग्रुपमध्ये ॲडमिन मेसेज करू शकेल अशी व्यवस्था करावी अशी सूचना केली आहे त्याच वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

Wednesday, November 6, 2019

इ.१० वी व इ.१२ वी बोर्डाची परीक्षा शुल्क माफ करा :- संदीप पवार निवघेकर

इ.१० वी व इ.१२ वी बोर्डाची परीक्षा शुल्क माफ करा :- संदीप पवार निवघेकर




नांदेड प्रतिनिधी:-एजास कुरेशी
कधी नव्हे एवढी अतिवृष्टी सर्वत्र झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची शंभर टक्के नासाडी झाली आहे महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांवर आस्मानी व सुलतानी संकट कोसळले आहे.या ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे
या वर्षी निसर्गाने शेतकऱ्यावर मोठा आघात केल्याने झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा खचून गेला आहे. शेतातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, हळद ही सर्वच पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उघड्यावर पडला आहे
त्यामुळेच शिक्षण विभागाने राज्यातील इ.१० वी व इ.१२ वी बोर्डाचे परीक्षा शुल्क माफ करावे .या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदवीधर संघाचे मुदखेड तालूकाध्यक्ष .प्रा.संदिप पवार निवघेकर यांच्याकडून नायब तहसिलदार नागमवार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालूका अध्यक्ष मा.शिवानंद शिप्परकर उपस्थित होते.

नांदेड येथील तरुण कामगाराने एकतर्फी प्रेमात घेतला गळफास एकाच कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेच्या एकतर्फी प्रेमात होता,

नांदेड येथील तरुण कामगाराने एकतर्फी प्रेमात घेतला गळफास
एकाच कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेच्या एकतर्फी प्रेमात होता,





विशेष प्रतिनिधी:-
 वाळूज एमआयडीसी येथील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सत्यपाल सावते (31) असे या कामगाराचे नाव होते. पांडुरंग हाउसिंग सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या घरातच सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. तसेच प्राथमिक तपासात त्याच्या आत्महत्येचे कारण देखील पोलिसांना सापडले आहे.

विविहेतेच्या एकतर्फी प्रेमात होता सत्यपाल
सत्यपाल सावते आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडला होता. ती महिला विवाहित होती, तसेच सत्यपालचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. आपली प्रेम कहाणी अपुरीच राहणार या नैराश्यात तो होता. त्याच नैराश्यात सत्यपालने टोकाचे पाउल उचलले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना सत्यपालच्या खिशातून एक सुसाइड नोट देखील सापडले आहे. त्यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येचे कारण लिहिले आहे.

दोन मुलांचा बाप होता सत्यपाल, पत्नी माहेरी असताना टोकाचे पाउल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यपाल विवाहित होता. तसेच त्याला आपल्या पत्नीकडून दोन मुले देखील आहेत. सत्यपालची पत्नी आपल्या मुलांसोबत दिवाळी सुट्यांच्या निमित्ताने मूळ गावी नांदेडला गेली होती. याच दरम्यान एकटे असताना सत्यपालने गळफास घेतला. प्राथमिक तपासानुसार, त्याने रविवारी रात्रीच आत्महत्या केली होती. तर सोमवारी रात्री उशीरा हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

नांदेड : काळजी करु नका विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय माहीत आहे : उद्धव ठाकरे

नांदेड : काळजी करु नका विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय माहीत आहे : उद्धव ठाकरे








नांदेड : ‘काळजी करु नका मला विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय हे माहीत आहे’, असं वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. अवकाळी पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल आहे.

शेतकऱ्यांनी रडायचं नाही तर लढायचं अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडच्या लोहा तालुक्यातील जाणापुरी इथून उद्धव ठाकरेंच्या नुकसान पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरेही होते हेक्टरी 25 हजाराच्या मदतीची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी पीकविमा आणि नुकसानभरपाई केंद्र उभारण्याचे आदेश उद्धव यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.


 "काळजी करु नका मला विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय माहीत आहे" उद्धव ठाकरेंचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद



ख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी असून, प्रति हेक्टर 25 हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेचं तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई मदत केंद्र उभारणार आहे. तसे आदेशही शिवसैनिकांना देण्यात आले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 17 जुलैला शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांविरोधात धडक मोर्चा काढला होता. वांद्र्यातील बीकेसी मैदानावर हा मोर्चा धडकला होता. यावेळी त्यांनी ज्यातील खासगी विमा कंपन्यांना 15 दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावाच लागेल, असा इशारा   राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला होता.



 सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला काय करावं लागेल? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने कशी असेल सत्ता?

Monday, November 4, 2019

अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना शासन आर्थिक मदत करणार- खासदार प्रताप पाटील चिखलीकर

अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना शासन आर्थिक मदत करणार- खासदार प्रताप पाटील चिखलीकर.




भोकर प्रतिनिधी:- एजास कुरेशी
कधी नव्हे एवढी अतिवृष्टी सर्वत्र झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची शंभर टक्के नासाडी झाली आहे. तेंव्हा सर्व शेतकर्‍यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत त्वरित मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असा आत्मविश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तालुक्यातील हाळदा येथे अतिवृष्टी बाधित पिकांची बांधावर जाऊन पाहणी करताना शेतकऱ्यांना दिला.



त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, उपजिल्हाधिकारी पवन चांडक, तहसीलदार भरत सूर्यवंशी, कृषी अधिकारी विठ्ठल गीते आदींची उपस्थिती होती.
   पुढे बोलताना शेतकऱ्यांना ते म्हणाले की या वर्षी निसर्गाने शेतकऱ्यावर मोठा आघात केल्याने झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा खचून गेला आहे. शेतातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, हळद ही सर्वच पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उघड्यावर पडला आहे. परंतु शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. सर्व शेतकऱ्यांना येत्या दोन-तीन दिवसात आर्थिक मदत मिळणार आहे.
  माननीय मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटींची तातडीची मदत शेतकऱ्यासाठी जाहीर केली आहे. ते कमी पडली तर अजून केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वाढून मदत देणार आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी खचून न जाता येणाऱ्या संकटाला धैर्याने तोंड द्यावे. आमचे सरकार आपल्या पाठीमागे खंबीरपणे मदतीसाठी तयार आहे असे अभिवचन दिले.



   शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा काढलेल्या विम्याचीची झेरॉक्स प्रत व पिक नुकसानीचा अर्ज गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना द्यावा. त्यासाठी कोणत्याही कार्यालयात खेटे मारू नये. सर्व कर्मचारी आपल्या गावात येऊन आपले पीक नुकसानीच्या अर्ज स्वीकारतील. असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले व संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना केल्या.
   यावेळी भोकर चे गटविकास अधिकारी रामोड, कृषी सहाय्यक, मंडळाधिकारी, तलाठी यांच्यासह गणपतराव पिटेवाड दिलीप सोनटकके संतोष मारकवार बाळासाहेब साखळकर गणेशराव कापसे  गावातील शेतकरी दत्तराव आक्कलवाड, साईनाथ याटेवाड, बालाजी नार्लेवाड, बाबुराव नागमोड, सुरेश भोसले, श्याम खांडरे, चंद्रकांत नागमोड, संतोष बोईनवाड, संदीप किसवे, आनंद हेमके, गोविंद पन्नसवाड, बालाजी परेवार, पुंडलिक खांडरे, गंगाधर आक्कलवाड, सोपान सुकलवाड, शिवाजी भोसले, आदीसह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Sunday, November 3, 2019

*दिवाळी सुट्टीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग*

दिवाळी सुट्टीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग





 भोकर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांत दिवाळीच्या सुट्टीत,दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जादाचे तासिका वर्ग घेऊन निकाल वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत..

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रित केले असून गुणवत्तेत सुधारणा झाली पाहिजे यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन ते राबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक बालकास दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे  असा त्यांचा मानस आहे.

भोकर तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हाती घेतलेले, एक मूल एक वृक्ष, वाचनासाठी एक तास, सशक्त बालक अभियान, असे विविध उपक्रम येथील गट शिक्षणाधिकारी डॉ . डी एस मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून  शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे .

दरम्यान दिवाळी सुट्टीचा सदुपयोग व्हावा, यातून जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी आणि सोबतच निकालाचे प्रमाण वाढावे म्हणून जादा तासिका घेउन शिक्षकाकडून अध्यापन केले जात आहे. जिल्हा परिषद हायस्कूल मातुळ येथे  दिनांक 1 नोव्हेंबर 2019 पासून अध्यापन कार्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमास विद्यार्थ्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असून पालक गावकरी आदीसह सर्वस्तरातून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात बदलाचे वारे वाहत असल्याने शिक्षण प्रेमी नागरिकाकडून शिक्षण विभागाचे कौतुक होत आहे..

Thursday, October 24, 2019

कोण कोण विजयी झाले ! पहा राज्यातील विजयी उमेदवारांची यादी

कोण कोण विजयी झाले !  पहा राज्यातील विजयी उमेदवारांची यादी


मुंबई : गेल्या विधानसभा निवडणूकीत चौफेर उधळलेल्या भाजपाचा वारु राज्यातील या विधानसभा निवडणूकीत रोखला असल्याचे स्पष्ट झाले लगाम घातला महायुतीची घोडदौड १५८ जागांच्या आसपासही गेली नाही. मात्र राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. या निवडणूकीत निष्ठावंतांची नाराजी आणि बंडखोरीचा परिणाम शिवसेना आणि भाजपाच्या निकालावर दिसून येत आहे.आतापर्यंत हाती आलेल्या विजयी उमेदवारांची यादी आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

विजयी उमेदवारांची यादी



मुंबई

कुलाबा – राहुल नार्वेकर, भाजप
धारावी – वर्षा गायकवाड काँग्रेस
भायखळा – यामिनी जाधव, शिवसेना
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप
माहिम – सदा सरवणकर, शिवसेना,
मुंबादेवी -अमिन पटेल, काँग्रेस
वडाळा – कालिदास कोळंबकर, काँग्रेस
वरळी – आदित्य ठाकरे, शिवसेना
शिवडी – अजय चौधरी, शिवसेना
सायन कोळीवाडा – कॅ. आर. तमिल सेल्वन, भाजप
अंधेरी पश्चिम – अमित साटम, भाजप
अंधेरी पूर्व – रमेश लटके, शिवसेना
अणुशक्तीनगर – नवाब मलिक, राष्ट्रवादी
कलिना – संजय पोतनीस, शिवसेना
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर, भाजप
कुर्ला – मंगेश कुडाळकर, शिवसेना
गोरेगाव – विद्या ठाकूर, भाजप
घाटकोपर पश्चिम – राम कदम, भाजप
घाटकोपर पूर्व – पराग शाह, भाजप
चांदिवली – दिलीप लांडे, शिवसेना
चारकोप – योगेश सागर, भाजप
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर, शिवसेना
जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर
दहिसर – मनिषा चौधरी, भाजप
दिंडोशी – सुनील प्रभू, शिवसेना
बोरीवली – सुनील राणे, भाजप
भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर, शिवसेना
मागाठणे – प्रकाश सुर्वे, शिवसेना
मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी, सपा
मालाड पश्चिम – अस्लम शेख, काँग्रेस
मुलुंड – मिहीर कोटेचा, भाजप
वर्सोवा – डॉ. भारती लव्हेकर, भाजप
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, भाजप
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, काँग्रेस
विक्रोळी – सुनील राऊत, शिवसेना
विले पार्ले – पराग अळवणी, भाजप

पालघर

डहाणू – विनोद निकोले, सीपीआय
विक्रमगड – सुनील भुसारा, काँग्रेस
पालघर – श्रीनिवास वनगा, शिवसेना
बोईसर -राजेश पाटील, बविआ
नालासोपारा – क्षितीज ठाकूर, बविआ
वसई – हितेंद्र ठाकूर, बविआ

ठाणे

भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे, शिवसेना
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, भाजप
भिवंडी पूर्व – रईस शेख, सपा
शहापूर – दौलत दरोडा, राष्ट्रवादी
मुरबाड – किसन कथोरे, भाजप
अंबरनाथ – डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना
उल्हासनगर – कुमार आयलानी, भाजप
कल्याण पूर्व – गणपत गायकवाड, भाजप
कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर, शिवसेना
कल्याण ग्रामीण – प्रमोद पाटील, मनसे
डोंबिवली – रवींद्र चव्हाण, भाजप
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
मीरा-भाईंदर – गीता जैन, अपक्ष
ओवळा-माजिवडा – प्रताप सरनाईक, शिवसेना
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना
ठाणे – संजय केळकर, भाजप
ऐरोली – गणेश नाईक, भाजप
बेलापूर – मंदा म्हात्रे, भाजप

सिंधुदुर्ग

सावंतवाडी – दीपक केसरकर, शिवसेना
कुडाळ-मालवण – वैभव नाईक, शिवसेना
कणकवली-देवगड – नितेश राणे, भाजप

रत्नागिरी

राजापूर – राजन साळवी, शिवसेना
रत्नागिरी – उदय सामंत, शिवसेना
चिपळूण – शेखर निकम, राष्ट्रवादी
गुहागर – भास्कर जाधव
दापोली – योगेश कदम, शिवसेना

रायगड

महाड – भरत गोगावले, शिवसेना
श्रीवर्धन – अदिती तटकरे, राष्ट्रवादी
अलिबाग – महेंद्र दळवी, शिवसेना
पेण – रवीशेठ पाटील, भाजप
उरण – महेश बाल्दी, अपक्ष
कर्जत – महेंद्र थोरवे, शिवसेना
पनवेल – प्रशांत ठाकूर

पुणे

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी
इंदापूर – दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
कसबा – मुक्ता टिळक, भाजप
कोथरुड – चंद्रकांत पाटील, भाजप
खडकवासला – भिमराव तापकीर, भाजप
खेड-आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
चिंचवड – लक्ष्मण जगताप, भाजप
जुन्नर – अतुल बेनके, राष्ट्रवादी
दौंड – राहुल कुल, भाजप
पर्वती – माधुरी मिसाळ, भाजप
पिंपरी – अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी
पुणे छावणी – सुनील कांबळे, भाजप
पुरंदर – संजय जगताप, काँग्रेस
बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी
भोर – संग्राम थोपटे, काँग्रेस
भोसरी – महेश लांडगे, भाजप
मावळ – सुनील शेळके, राष्ट्रवादी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे, राष्ट्रवादी
शिरुर – अशोक पवार, राष्ट्रवादी
शिवाजीनगर – सिध्दार्थ शिरोळे, भाजप
हडपसर – चेतन तुपे, राष्ट्रवादी

कोल्हापूर

इचलकरंजी – प्रकाश आवाडे, अपक्ष
करवीर – पी. एन. पाटील, काँग्रेस
कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव, काँग्रेस
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील, काँग्रेस
चंदगड – राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी
राधानगरी – प्रकाश आबिटकर, शिवसेना
शिरोळ – राजेंद्र पाटील, अपक्ष
हातकणंगले – राजू आवळे, काँग्रेस
शाहूवाडी – विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

सांगली

इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी
खानापूर – अनिल बाबर, शिवसेना
तासगांव-कवठे महांकाळ – सुमन पाटील, राष्ट्रवादी
पलुस-कडेगाव – विश्वजीत कदम, काँग्रेस
मिरज – डॉ.सुरेश खाडे, भाजप
शिराळा – मानसिंग नाईक, राष्ट्रवादी
सांगली – सुधीर गाडगीळ, भाजप
जत – विक्रमसिंह सावंत, काँग्रेस

सातारा

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
कोरेगाव – महेश शिंदे, शिवसेना
पाटण – शंभूराजे देसाई, शिवसेना
फलटण – दीपक चव्हाण, राष्ट्रवादी
माण – जयकुमार गोरे, भाजप
वाई – मकरंद जाधव, राष्ट्रवादी
सातारा – शिवेंद्रराजे भोसले, भाजप

सोलापूर

अक्कलकोट – सचिन शेट्टी
करमाळा – संजय शिंदे अपक्ष
पंढरपूर – भारत भालके, राष्ट्रवादी
बार्शी – राजेंद्र राऊत, अपक्ष
माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी
माळशिरस -राम सातपुते, भाजप
मोहोळ – यशवंत माने, राष्ट्रवादी
सांगोला – शाहजी बापू पाटील, शिवसेना
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, भाजप
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, भाजप
सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे

अहमदनगर

अकोले – डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी
अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी
कर्जत-जामखेड – रोहित पवार, राष्ट्रवादी
कोपरगाव – आशुतोष काळे, राष्ट्रवादी
नेवासा – शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्ष
राहुरी विधानसभा – प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, भाजप
शेवगाव – मोनिका राजाळे, भाजप
श्रीगोंदा – बबनराव पाचपुते, भाजप
श्रीरामपूर – लहू कानडे, काँग्रेस
संगमनेर – बाळासाहेब थोरात, काँग्रेस
पारनेर – निलेश लंके, राष्ट्रवादी

नाशिक

इगतपुरी – हिरामन खोसकर, काँग्रेस
कळवण – नितीन पवार, राष्ट्रवादी; कॉ. जिवा गावित, सीपीआय
चांदवड – राहुल अहेर, भाजप
दिंडोरी – नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी
देवळाली – सरोज अहिरे, राष्ट्रवादी
नांदगाव – सुहास कांदे, शिवसेना
नाशिक पश्चिम – सीमा हिरे, भाजप
नाशिक पूर्व – राहुल ढिकळे, भाजप
नाशिक मध्य – देवयानी फरांदे, भाजप
निफाड – दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी
बागलाण – दिलीप बोरसे, भाजप
मालेगाव बाह्य – दादा भुसे, शिवसेना
मालेगाव मध्य – मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, एमआयएम
येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी
सिन्नर – माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

धुळे

साक्री – मंजुळा गावित, अपक्ष
धुळे ग्रामीण – कुणाल पाटील, काँग्रेस
धुळे शहर – शाह फारुक अन्वर, एमआयएम
शिंदखेडा – जयकुमार रावल, भाजप
शिरपूर – काशिराम पवार, भाजप

नंदुरबार

अक्कलकुवा – केसी पाडवी काँग्रेस
शहादा – राजेश पाडवी, भाजप
नंदुरबार – विजयकुमार गावित, भाजप
नवापूर – शिरीषकुमार नाईक, काँग्रेस

जळगाव

अमळनेर – अनिल पाटील, राष्ट्रवादी
एरंडोल – चिमणराव पाटील, शिवसेना
चाळीसगाव – मंगेश चव्हाण, भाजप
चोपडा – लताबाई सोनावणे, शिवसेना
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, शिवसेना
जळगाव शहर – सुरेश भोळे, भाजप
जामनेर – गिरीश महाजन, भाजप
पाचोरा – किशोर पाटील, शिवसेना
भुसावळ – संजय सावकारे, भाजप
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील, अपक्ष
रावेर – मधुकरराव चौधरी, काँग्रेस

बुलडाणा

खामगाव – आकाश फुंडकर, भाजप
चिखली – श्वेता महाले, भाजप
जळगाव जामोद – संजय कुटे, भाजप
बुलडाणा – संजय गायकवाड, शिवसेना
मलकापूर – राजेश एकाडे, काँग्रेस
मेहकर – संजय रायमुलकर, शिवसेना
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

अकोला

अकोट – प्रकाश भारसाकळे, भाजप
अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा, भाजप
अकोला पूर्व – रणधीर सावरकर, भाजप
बाळापूर – संग्राम गावंडे, राष्ट्रवादी
मूर्तिजापूर – हरीश पिंपळे, भाजप

वाशिम

कारंजा – राजेंद्र पाटनी, भाजप
रिसोड – अमित झनक, काँग्रेस
वाशिम – लखन मलिक, भाजप

अमरावती

अचलपूर – बच्चू कडू, प्रहार
अमरावती – सुलभा खोडके, काँग्रेस
तिवसा – यशोमती ठाकूर, काँग्रेस
दर्यापूर – बळवंत वानखडे, काँग्रेस
धामणगाव रेल्वे – प्रताप अडसड, भाजप
बडनेरा – रवी राणा, अपक्ष
मेळघाट – राजकुमार पटेल, प्रहार
मोर्शी – देवेंद्र भुयार- स्वाभिमानी पक्ष

वर्धा

आर्वी – दादाराव केचे, भाजप
देवळी – रणजीत कांबळे, काँग्रेस
हिंगणघाट -समीर कुनावार, भाजप
वर्धा – डॉ. पंकज भोयर, भाजप

नागपूर

काटोल – अनिल देशमुख, राष्ट्रवादी
सावनेर – सुनील केदार, काँग्रेस
हिंगणा – समीर मेघे, भाजप
उमरेड – राजू पारवे, काँग्रेस
नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण – मोहन मते, भाजप
नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे, भाजप
नागपूर मध्य – विकास कुंभारे, भाजप
नागपूर पश्चिम – विकास ठाकरे, काँग्रेस
नागपूर उत्तर – नितीन राऊत, काँग्रेस
कामठी – सुरेश भोयर, काँग्रेस
रामटेक – आशिष जैस्वाल, अपक्ष

भंडारा

तुमसर – राजू कारेमोरे, राष्ट्रवादी
भंडारा – अरविंद भलाधरे, भाजप
साकोली – नाना पटोले, काँग्रेस

गोंदिया

अर्जुनी-मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी
तिरोरा – विजय रहांगडले, भाजप
गोंदिया – गोपालदार अग्रवाल, भाजप
आमगाव – सहसराम कोरोटे, काँग्रेस

गडचिरोली

आरमोरी – कृष्ण गजबे, भाजप
गडचिरोली – देवराव होली, भाजप
अहेरी – धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

चंद्रपूर

चंद्रपूर – किशोर जोर्गेवार, अपक्ष
चिमूर – बंटी भांदडिया, भाजप
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजप
ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार, काँग्रेस
राजुरा – सुभाष धोटे, काँग्रेस
वरोरा – प्रतिभा धानोरकर, काँग्रेस

यवतमाळ
वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, भाजप
राळेगाव – अशोक उईके, भाजप
यवतमाळ – मदन येरावार, भाजप
दिग्रस – संजय राठोड, शिवसेना
आर्णी – संदीप धुर्वे, भाजप
पुसद – इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी
उमरखेड – नामदेव सासणे, भाजप



औरंगाबाद
औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट, शिवसेना
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, भाजप
औरंगाबाद मध्य – प्रदीप जयस्वाल, शिवसेना
कन्नड – उदयसिंह राजपूत, शिवसेना
गंगापूर – प्रशांत बंब, भाजप
पैठण – संदीपान भुमरे, शिवसेना
फुलंब्री – हरीभाऊ बागडे, भाजप
वैजापूर – रमेश बोरनारे, शिवसेना
सिल्लोड – अब्दुल सत्तार, शिवसेना

हिंगोली

वसमत – चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी
कळमनुरी – संतोष बांगर, शिवसेना
हिंगोली – नाजी मुटकुळे, भाजप

परभणी

जिंतूर – मेघना बोर्डिकर, भाजप
परभणी – डॉ. राहुल पाटील, शिवसेना
गंगाखेड – रत्नाकर गुट्टे, रासप
पाथरी – सुरेश वरपुडकर, काँग्रेस

जालना

परतूर – बबनराव लोणीकर, भाजप
घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी
जालना – कैलास गोरंट्याल, काँग्रेस
बदनापूर – नारायण कुचे, भाजप
भोकरदन – संतोष दानवे, भाजप

उस्मानाबाद

उमरगा – ज्ञानराज चौगुले, शिवसेना
तुळजापूर – राणा जगजीतसिंह पाटील, भाजप
उस्मानाबाद – कैलास पाटील, शिवसेना
परांडा – तानाजी सावंत, शिवसेना

नांदेड

किनवट – भिमराव केराम, भाजप
देगलूर – रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर, शिवसेना
नांदेड दक्षिण – मोहनराव हंबर्डे, काँग्रेस
नायगाव – राजेश पवार, भाजप
भोकर – अशोक चव्हाण, काँग्रेस
मुखेड – डॉ. तुषार राठोड, भाजप
लोहा – शामसुंदर शिंदे, शेकाप
हदगाव – माधवराव पवार, काँग्रेस

लातूर

अहमदपूर – बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी
उदगीर – संजय बनसोडे, राष्ट्रवादी
औसा – अभिमन्यू पवार, भाजप
निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, भाजप
लातूर ग्रामीण – धीरज देशमुख, काँग्रेस
लातूर शहर – अमित देशमुख, काँग्रेस

बीड

गेवराई – लक्ष्मण पवार, भाजप
परळी – धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
माजलगाव – प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी
केज – नमिता मुंदडा, भाजप
बीड – संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी
आष्टी – बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी

भाजपाच्या सगळ्या अडचणी मी समजून घेणार नाही :–उद्धव ठाकरे

भाजपाच्या सगळ्या अडचणी मी समजून घेणार नाही :–उद्धव ठाकरे




शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी,मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याप्रमाणेचं होईल असे स्पष्ट संकेत दिले.


मुंबई:-विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा मिळवत सत्ता स्थापनेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपा-शिवसेना युतीला चांगलाच फटका बसला आहे. मतमोजणीत दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्यामुळे, राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याप्रमाणे होईल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत सर्व मतदारांचे आभार मानले. “लोकसभेआधी शिवसेना आणि भाजपा यांच्यात ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र विधानसभेच्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मला विनंती केल्यामुळे मी त्यांची अडचण समजून घेतली. मात्र प्रत्येकवेळी मी सगळ्या अडचणी समजून घेणार नाही, मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. याचसोबत सत्तास्थापनेची आपल्याला कोणतीही घाई नसून सर्व पर्याय खुले असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे.

यंदाच्या मतमोजणीमध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसला आहे. अनेक महत्वाच्या जागांवर निष्ठावंत उमेदवारांना तिकीटं नाकारल्यामुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या आहेत. तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी गेल्या हंगामापेक्षा चांगली कामगिरी करत सत्ताधारी पक्षापुढे चांगंल आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेदरम्यान मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

19 आयारामांचा पराभव, शिवसेनेचे 11 तर भाजपचे 8 उमेदवार पराभूत

19 आयारामांचा पराभव, शिवसेनेचे 11 तर भाजपचे 8 उमेदवार पराभूत



बेधडक महाराष्ट्रविशेष:-
शिवसनेतील पराभूत आयाराम
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या दिलीप सोपल यांचा पराभव झाला आहे. अपक्ष लढणाऱ्या राजेंद्र राऊत यांनी सोपल यांचा पराभव केला आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या भाऊसाहेब कांबळे यांचा श्रीरामपूर मतदारसंघात पराभव झाला आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या शेखर गोरे यांचा माण-खटाव मतदारसंघातून पराभव झाला आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांचा करमाळा मतदारसंघात पराभव झाला आहे.

शिवसेनेत आलेल्या विजय पाटील यांचा वसई मतदारसंघात पराभव झाला आहे.

शिवसेनेत आलेल्या संजय कोकाटे यांचा माढा मतदारसंघात पराभव झाला आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या दिलीप माने यांचा सोलापूर मध्य मतदारसंघात पराभव झाला आहे.

शिवसेनेत आलेल्या नागनाथ क्षीरसागर यांचा मोहोळ मतदारसंघात पराभव झाला आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या निर्मला गावित यांचा इगतपुरी मतदारसंघात पराभव झाला आहे.

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. परंतु त्यांचा पराभव झाला आहे.

👉 भाजपमधील पराभूत आयाराम

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव पिचड यांचा अकोले मतदारसंघात पराभव झाला आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघात पराभव झाला आहे.

काँग्रेसमदून भाजपमध्ये आलेल्या गोपालदास अग्रवाल यांच्या गोंदिया मतदारसंघात पराभव झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांचा बारामती मतदारसंघात पराभव झाला आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर मतदारसंघातून पराभव झाला आहे.

भाजपमध्ये आलेल्या रमेश आडसकर यांचा माजलगावमधून पराभव झाला आहे.

भाजपच्या भरत गावित यांचा नवापूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उदयनराजे भोसले यांच्या पराभव झाला आहे.

फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांचा पराभव, पवारांचा दणका! कोण आहेत ते मंत्री..?

फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांचा पराभव, पवारांचा दणका!
कोण आहेत ते मंत्री..?




महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी
  विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा युतीचंच सरकार येणार असलं तरी युतीला दणका बसल्याचं दिसत आहे. यावेळी युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला होता. पण हा आकडा आता 150 ते 160 वर पोहचला आहे. 2014 मध्ये युतीला 189 जागा मिळाल्या होत्या. आता तेवढ्या जागा मिळणंही कठीण दिसत आहे. दुसरीकडे फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला आहे.कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार विजयी झाले. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या रोहित पवार यांनी भाजपचे मंत्री राम शिंदेंचा पराभव केला.*

राम शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये जलसंवर्धन मंत्री होते. याशिवाय राज्यात सर्वात मोठी आणि लक्षवेधी ठरलेल्या लढतीत पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पराभूत केलं. पंकजा मुंडे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्रीपद होते. त्यांना 20 हजार मतांनी पराभूत व्हावं लागलं.

भाजपला अपेक्षित असं यश निवडणुकीत मिळालं नाही. भाजप नेते आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या सुनिल शेळकेंनी विजय मिळवला. दुसरीकडे शिवसेना नेते विजय शिवतारे यांना काँग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव केला.पुरंदरमध्ये राष्ट्रवादीने विशेषत अजित पवार यांनी ताकद लावली होती.जालन्यात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकरांचा पराभव झाला आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या गोरंट्याल यांनी विजय मिळवला.दुपारपर्यंतचे कल हाती आले त्यामध्ये भाजपचे 99 उमेदवार आघाडीवर होते तर सेनेचे 59 उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने 99 जागांवर आघाडी घेतली होती. 2014 च्या तुलनेत भाजपला यावेळी 20 पेक्षा जास्त जागांचा फटका बसला आहे.

भोकर मधुन बापूसाहेब गोरठेकर यांचा पराभव करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ९७४४५ मतांनी विजयी

 भोकर मधुन बापूसाहेब गोरठेकर यांचा पराभव करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ९७४४५ मतांनी  विजयी




भोकर(एजास कुरेशी)
: भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखेर  ९७४४५ मताची लीड मिळाली आहे. एकूण मतदान दोन लाख सहा हजार मतदान झाले आहे. सर्व मतांची मोजणी झाली असून अशोक चव्हाण यांचा विजय झाला आहे. भाजपाचे बापूसाहेब गोरठेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झालं आहे.





  भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी बाजी मारत भाजपला धक्का दिला आहे. अशोक चव्हाण सुरवाती पासूनच आघाडीवर होते. अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे बापूसाहेब गोरठेकर होते. राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देऊन अशोक चव्हाण यांच्याविरोधात मोठे आव्हान उभे केले होते. परंतू अशोक चव्हाणांनी भाजपला धोबीपछाड दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी पूर्ण झाली असून भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे.
अखेर भाजपला धक्का बसला आणि काँग्रेसने आपला गुलाल उधळला.

भोकर विधानसभा क्षेत्र
एकूण ७ उमेदवार निवडून रिंगणात होते याना मिळालेली मते खालील प्रमाणे
१) अशोक चव्हाण(काँग्रेस)-१,४०,५५९
२)रत्नाकर शामराव तारू(भारिप)- १२४०
३)बापूसाहेब गोरठेकर(भाजप)- ४३,११४
४)नामदेव आयलवाड(वंचित आघाडी)-१७,८१३
५)भगवान भिमराव कदम(संभाजी ब्रिगेड)-२,०६९
६)पापाराव चव्हाण(अपक्ष)-९५६
७)बालाप्रसाद लिंगमपल्ले(अपक्ष)-३३४
नोटा--१२९७
९७,४४५ मताधिक्याने अशोक चव्हाण विजयी





अशोक चव्हाण च्या बाजूने निकाल येताच शेकडो युवक कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन रस्त्यावर आले युवकांनीं पूर्ण भोकर शहरामध्ये फटाके लावून बँड लावून रैली काढली काँग्रेस व अशोक चव्हाण यांच्या घोषणा केल्या



Tuesday, October 15, 2019

भोकर वॉर्ड क्र.१९ चे युवा नेते देवाभाऊ हटकर व विलास भाऊ हाटकर यांनी शेकडो कार्यकर्त्यां सोबत केला काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

भोकर वॉर्ड क्र.१९ चे युवा नेते देवाभाऊ हटकर व विलास भाऊ हाटकर यांनी शेकडो कार्यकर्त्यां सोबत केला काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश





भोकर प्रतिनिधी:-
 भोकर  येथील युवा कार्यकर्ते व बापूसाहेब गोरठेकर गटाचे युवा नेते यांनी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवा भाऊ हटकर व विलास भाऊ हटकर यांनी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यां सोबत काँग्रेस पक्षात बिनशर्त जाहीर प्रवेश केला आहे.




भोकर 85 विधानसभा मतदारसंघातील  काँग्रेस पक्षाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हान यांच्या उपस्थितीत हा प्रवेश मेळावा घेण्यात आला असून या प्रवेशा मूळे दुसऱ्या पक्षाला खूप मोठा हादरा बसला आहे कारण देवा हटकर व विलास हटकर  हे युवा पिढी चे लोकप्रिय कार्यकर्ते असून भोकर नगर परिषदेत निवडणूकित  फक्त १७ मतांनी त्यांचा पराजय झाला होता तरी पण ते खचून न जाता जनतेचे प्रश्न सोडवित राहिले  वार्डाचे प्रश असो का शहराचे त्यांनी इमानदारी ने ते प्रश्न सोडविले आहे  तसेच या जाहीर प्रवेशा मुळे काँग्रेस पक्षाचे हात बळकट झाले आहे  अशी चर्चा  भोकर शहरात सध्या आहे.
 देवा हटकर व विलास हटकर यांच्या सोबत  हजारोच्या संख्येने युवा कार्यकर्ते चा जाहीर प्रवेश झाला आहे

या प्रवेश मेळाव्यात भोकर विधानसभा मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, भोकर शहराध्यक्ष खाजु इनामदार, नगर उपाध्यक्ष प्रतिनिधी इसुफ भाई,हमीद पठाण, शफी इनामदार, सुभाश पवार  या सोबत काँग्रेस पक्षाचे  सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते..

Saturday, October 12, 2019

नांदेड :-आचारसंहिता भंग. १२ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आयोगाची नोटीस

नांदेड :-आचारसंहिता भंग. १२ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आयोगाची नोटीस ..!




नांदेड :-प्रतिनिधी
  निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून, सर्व विभागप्रमुखांनी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश करण्यात आले आहे

  निवडणूक आयोगाच्या सर्टिफिकेशन व मॉनिटरिंग कमिटीने
फेसबुक आणि ट्विटरवरही नियम लागू
फेसबुक आणि ट्विटरवरही हा नियम लागू करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत केंब्रिज एनालिटिका घोटाळा झाल्यानंतर निवडणुकांदरम्यान सोशल मीडियाची भूमिका खूप महत्त्वाची ठरली आहे. त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. नांदेड एमसीएमसी चे प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, उमेदवाराला प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. उमेदवाराने परवानगी न घेता कोणत्याही माध्यमातून प्रचार केल्यास त्यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो.

 निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीने नांदेड मधील१२ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. ज्या मेसेजसाठी अ‍ॅडमिनला नोटीस पाठवली आहे ते मेसेज अ‍ॅडमिनने पाठवले नव्हते. ते मेसेज त्यांच्या ग्रुपमध्ये पोस्ट करण्यात आले होते. दरम्यान निवडणूक आयोगाने मुंबईतील ४ फेसबुक पेजेसला देखील नोटीस जारी केली आहे. या सर्व ग्रुप्सवर आयोगाच्या परवानगी शिवाय उमेदवारांचा प्रचार करण्याचा आरोप आहे

आत्तापर्यंत १२०० तक्रारी आल्या आहेत
राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून cVigil अ‍ॅपवर आत्तापर्यत १२०० तक्रारी आल्या आहेत. सध्या नांदेडमध्ये पाठविलेल्या या नोटिसींमध्ये या १२ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आपल्या ग्रुपवरील सर्व प्रकारचा निवडणूक प्रचार बंद करणे तसेच एका आठवड्यात आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे

राजकीय पक्षांनी प्रचाराच्या विविध माध्यमांचा वापर करण्यापूर्वी ते प्रमाणित करून घ्यावे. प्रचारावर होणाऱ्या सर्व खर्चाचे विवरण सादर करावे. शेड्यूल, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅंकांमध्ये निवडणूक काळात आयोगाने दिलेल्या आदेशानुसारच आर्थिक व्यवहार होतील. १० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराची माहिती महाव्यवस्थापक, प्राप्तिकर विभागाकडे नोंदवावी. मात्र, सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आदेश करण्यात आले आहे 


Thursday, October 10, 2019

नांदेडात नदीच्या पाण्यात पडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेडात नदीच्या पाण्यात पडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू.




नांदेड:-(प्रतिनिधी)
शेतातील कामे आटोपून नदीच्या काठावरून घराकडे येत असलेल्या दोन बालकांचा नदीच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील बामणी येथे घडली. तालुक्यातील बामणी येथील गजानन सोनाजी कदम (वय 16) व दीपक दत्तरामजी मुंगल (वय 15) हे दोघे दुपारी 12 वाजेच्या सुमारास नदी पलीकडील शेतात गेले. दिवसभर शेतातील कामे करून सायंकाळी परतत असताना नदीच्या काठावरील रस्त्यात गजानन कदम याचा अचानक पाय घसरल्याने तो नदीच्या पाण्यात पडला. तो पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी दीपक मुंगल याने पाण्यात उडी मारली. दरम्यान पाण्याचाअंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावातील पोहणारे काही तरुण साहेबराव कदम, आनंद गाडगे, श्रीधर कदम, सुनील कदम हे तरुण नदीमध्ये उतरले आणि दोन तासाच्या शोधानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती अर्धापूर पोलिसांना देण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून रात्री उशिरा दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कोकरे हे करीत आहेत.

Monday, October 7, 2019

अब्बब...तब्बल 91 पैकी 84 उमेदवारांनी घेतली माघार अत्ता 7 उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात

अब्बब...तब्बल 91 पैकी 84 उमेदवारांनी घेतली माघार अत्ता 7 उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात




 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019

प्रतिनिधी
भोकर:- : भोकर 85 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मतदार संघात 91 पैकी.84 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याने 7  उमेदवार निवडणुक रिंगणात राहिले आहेत.
राज्यातील उच्चांकी नामनिर्देशपत्र दाखल झालेल्या 85- भोकर विधानसभा मतदार संघात माघार घेण्याचाही उच्चांकच झाला असून 91 उमेदवारांपैकी 84 जणांनी माघार घेतल्याने 7 जण प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात

.नामनिर्देशन पत्र मागे घेणाऱ्या उमेदवार यांचे नाव...
1)श्रावण सत्ताजी नरवाडे
 2) शरद हनमंतराव सोळंके
 3) शेख जाकेर शेख महंमद चाऊस
 4) अमरखान सरदार अली खान
 5) मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील
 6) जरीनाबेगम अकबर अली खान
 7) गौतम कामाजी पंडीत
 8) दिगंबर धोंडीबा वाघमारे
 9) कैलास गणपतराव कानिंदे
 10) चांदखान अलीखान
 11) शफी शेख अमीर शे 12)उषाताई आकाश भालेराव
 13) साहेबराव भिवा गजभारे
 14) असलम शेख हमीद शेख
 15) इस्लम बिन सलम चाऊस
 16) शंकर मारोतराव जाधव
 17) विश्वनाथ हिरामण बाबळे
 18) प्रकाश विठ्ठलराव घुन्नर
 19) अब्दुल रईस अहेमद अ. जब्बार
 20)राजू गणपत बिराजदार 21. आदित्य सारंगधरराव पाटील 22) अक्रम रहेमान सय्यद
 24) अन्वर अ. खादर अ. खादर शेख
23) अमजद अली जाकेर खान
25)अब्दुल खुदुस अब्दुल रजाक
26)शशिकांत संभाजी पाटील
 27)लतीफ उल जफर कुरेशी
 28) कार्तिक भुजंगराव शेळके
 29) संदीप विजयराव निखाते
30) अलीमोद्दीन मोहिनोद्दीन स
31) स. मोहमद स. मुनिर 32)फहाद सलीम शेख
 33) रमेश दौलती माने
 34) उत्तम रामा गायकवाड 35) मुशीरखान महंमदखान
36) साजिद खुर्शीद खा  37) स. अहमद अ. खादर
38) अ. मूनाफर अ. खादर
 39) सुभाष खेमा जाधव
40)स. सिराज अली शौकत अली
41)अफसरमिया गफूर शेख
 42) चंद्रप्रकाश तूळशिराम सांगवीकर
 43) लता गौतम कांबळे
 44) राहुल नामदेव काळेवार
45)जमीर सालेम अ. चाऊस
 46) स. फेरोज स. याकूब
 47)नविद युनूस खान
48) म. तौफिक म. युसूफ 49) सलीम म. इकबाल
 50) तन्वीर बेगम म. तौफिक 51) मोहमद शाकेर मोहमद इब्राहिम 52) चंद्रकांत पिराजी गव्हाणे
 53) तुकाराम गणपत बिराजदार
54)प्रल्हाद रामजी इंगोले
 वाकोडे साहेब: 55) अमोल धनराज पवार
56) मीना रमेश माने
 57) इकबाल अहमद फकीर महमद 58) अ. मूहिद अ. माजिद
 59) महमूद रजाक स.
 60) खान अलयार युसूफ खान
 61)अहमद इकबाल अ. अशपाक
 62) वाजीद स. अकबर स.
 63) श्रीराम रावसाहेब वाकदकर
 64) दिक्षामाला धर्मपाल नरवाडे
 65)अशोक जनार्धनराव बुटले
 66) नूरजहाबेगम गफार पठाण
 67) ज्ञानदीप दत्तात्रय भागानगरे
 68) सलाम अहमद सलीम
 69) जुल्फेखान जीलानी सय्यद
 70)फेरोज नाजीर शेख  71)स. गुफरान स. दाऊद
 72) शे. सरफराज अहेमद शेख जमील अहेमद
 73) दीपक विश्वनाथ सरोदे
 74) गजानन दत्तारामजी धुमाळ
 75) शे. नजीर शे. शफीउद्दीन
 76) मोहम्मद सिद्दीख मोहम्मद गौस
77) म. अफसर म. नवाज 78) केसर सुलताना अल्ताभ अहमद
79) राजाराम शंकरराव देशमुख 80) स. तन्वीर स. हमजा
 81) स. युसूफ स. मुर्तुजा
 82) सत्तार अ. अजीज अ.
 83) शे. रईस जणी गुलाम समदानी
 84) शाकीर खान हामजा खान

 अत्ता 7  उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.
या मध्ये
1. अशोकराव शंकरराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस)
2. रत्नाकर पि. शामराव तारु (बहुजन समाज पार्टी)
3. श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर (भारतीय जनता पार्टी)
4. आयलवाड नामदेव नागोराव (वंचित बहुजन आघाडी)
5. भगवान भिमराव कदम (संभाजी ब्रिगेड पार्टी)
6. पापाराव पंडित चव्हाण (अपक्ष)
7. बालाप्रसाद नारायण लिंगमपल्ले (अपक्ष) हे 
 उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.

Sunday, October 6, 2019

भोकरमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या अटकेचा निषेध

भोकरमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या अटकेचा निषेध






 भोकर( प्रतिनिधी)
मुंबई येथे बाळासाहे आंबेडकर यांना महाराष्ट्र पोलिसां कडून अटक झाल्याच्या  निषेधार्थ भोकर येथील वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत आज (दि०६)सायंकाळी पोलीस स्थानक भोकर येथे निवेदन देऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

मुंबई येथील आरे जंगल तोड प्रकरणात विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना अटक केल्याने वंचित आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.

आरे परिसरात मेट्रो कारशेडच्या नावने वृक्षतोड करुन जागा हडपण्याचा डाव आहे अशी टीका  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.  भाजपा, शिवसेना सरकारला इथली जागा हडप करायची आहे. एवढंच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही स्वार्थ यामध्ये आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मुंबईकर या सरकारला आरे वृक्षतोडीवरुन योग्य उत्तर देतील असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करत आरे वृक्षतोडीच्या वादात आता वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. पवई फिल्टरपाडा या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी दुपारी आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, अटकेच्या विरोधात भोकर तालुका भारिप बहुजन महासंघ व  वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानक भोकर येथे निवेदन देऊन तीव्र निषेध  नोंदवला आहे. नेते प्रकाश आंबेडकर यांना तात्काळ पोलिसांच्या अटकेतून सोडले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे देण्यात आला आहे.

यावेळी एल ए हिरे,भीमराव दूधारे,सुभाष तेले, दत्ता डोंगरे,सुनील कांबळे,दशरथ भदरगे,नागोराव शेंडगे,दत्ता डोंगरे,सूमेश फुगले,बाबूराव राठोड,बाळासाहेब टिकेकर, तुकाराम कयीलवाड,आनंदराव एडके, शंकर जिंकलवाड ,राहुल एडके,  पुंजाराम डोकळे, भागाजी जाधव आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday, October 3, 2019

बापूसाहेब गोरठेकर यांचा भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल

बापूसाहेब गोरठेकर  यांचा भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल



भोकर (प्रतिनिधी)
  माजी.आ.बापूसाहेब गोरठेकर यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे गुरूवारी (दि. ३ ऑक्टोंबर २०१९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. भोकर 85 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला आहे यावेळी दिलीपराव देशमुख सोमठाणकर,सुभाष पाटील घंटलवार,शिवाजी,राजेश्वर वंगलवार,किशोर देशमुख, गुलाबराव नाईकभगवान दंडवे,सुभाष पाटील गौड,उत्तम बाबळे,गणपत मुसळे,रामलू गोदेवाड,यासह आदी जण उपस्थित होते.




उमदवारी अर्ज भरल्यानंतर माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी म्हणले आहे की भोकर मतदारसंघातील नागरिकांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. मी त्यांच्या विकासाबद्दलच्या स्वप्नांना तडा जाऊ दिलेला नाही. मतदारसंघातील सर्व नागरिकांचे आशिर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी नक्कीच मोठ्या मताधिक्याने जिंकणार, असा विश्वास गोरठेकर यांनी व्यक्त केला.

Wednesday, October 2, 2019

काँग्रेस चा स्टिकर लावून फिरणाऱ्या बुलेट मोटारसायकल मालकावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

काँग्रेस चा स्टिकर लावून फिरणाऱ्या बुलेट मालकावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल





भोकर ;-प्रतिनिधी
   भोकर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 आदर्श लागू असताना सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोटरसायकलला काँग्रेस पक्षाची निशाणी पंजाचे स्टिकर लावल्याने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शंकर व्यंकटराव पवार रा.निवघा ता.मुदखेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 आदर्श आचारसंहिता लागू असताना राजकीय प्रचारासाठी सार्वजनिक स्थळाचा उपयोग करत दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहाच्या दरम्यान भोकर शहरातील बायपास रोडवरील ओम लोन्स मंगल कार्यालय येथे विनापरवानगी बुलेट मोटरसायकल वर काँग्रेस पक्षाची निशाणी असलेले पंजाचे स्टिकर पाठीमागील बाजूस लावले असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने सदर तक्राराची खात्री करण्याकरिता फिरते पथकाला पथकातील पथक प्रमुख वनपाल बाबुराव नारायण पेरलेवाड, वनपाल सुनील मेटकर, सपोउ मेघराज जेता राठोड,  कॅमेरामॅन देवराव राचेवाड,यांनी गाडीची पाहणी केली असता बुलेट मोटरसायकल क्रमांक एम एच26   4912 वरील प्रकार खरा असल्याचे आढळून आल्या यावरून गाडी मालक शंकर पवार वय 40 वर्ष व्यवसाय शिक्षक राहणार तालुका मुखेड या गाडी मालकाचा सदरील प्रकाराबाबत विचारणा केली असता ते म्हणाले या सभा निवडणुक ट्रेनिंग संबंधाने भोकर येथे आलो असल्याचे सांगितले व काँग्रेस पक्षाच्या स्टिकर  विनापरवानगी लावले असल्याचे निदर्शनास आले यावरून आज दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भा.द.वी.171-एफ 188 134 ए प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉस्टेबल अहेमद खान मोजम खान करीत आहेत

Saturday, September 28, 2019

माने , लोकडे, येरेकार यांची केंद्रीय शिक्षक परिक्षेसाठी निवड .

माने , लोकडे, येरेकार यांची केंद्रीय शिक्षक परिक्षेसाठी निवड .





भोकर / प्रतिनिधी /
 डॉ . बाबासाहेब आंबेडकर संस्थापित तमाम बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी तज्ञप्रचारक निर्माकरन्यासाठी देशातील कांही निवडक उपासकांची निवड करन्यात येते त्यात नांदेड जिल्ह्यातून कुमारस्वामी माने, सुरेश लोकडे, प्रा .आप्पाराव येरेकार यांची निवड करण्यात आली आहे .
दि .२८सप्टेबर ते ८आक्टोबर २०१९या कालावधित चैत्यभूमि दादर मुंबई येथे दहा दिवस यांना श्रामणेर दिक्षा देऊन भगवंताच्या चिवरमध्ये बसवून धम्माचे प्रशिक्षण देण्यात येत आहे .हे शिबीर केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने व भन्ते बुद्धपाल, भन्ते धम्मप्रिर्य यांच्या मार्गदर्शनात  मातृसंस्थेच्या वतीने घेतले जात आहे . माने, लोकडे,येरेकार हे धम्माचे गाढे अभ्यासक असून ते बौद्धांच्या सर्व विधी पार पाडतात , संस्थेचे निष्ठावान म्हणून जिल्हयात परिचित वेगळी ओळख असलेले उच्चविद्या भूषीत उपासक आहेत . हे यशस्वीरित्या केंद्रीय शिक्षक परिक्षा पास होऊन धम्मचळवळीस वाहुन घेत धम्माचा प्रचार करतील म्हणून यांच्या निवडीचे अभिनंदन अॅड .एम.एन. शिंगे, माधव सरपे, प्रभाकर नांदेडकर, बी .एस. सरोदे, प्रा .बी.एम. वाघमारे, प्रा .डॉ . राजपालसिंह चिखलीकर प्रा . सदानंद कांबळे, सा . ना .भालेराव, प्रा .डॉ.पी.जे. थोटे, प्रा . प्रसेनजित चिखलीकर, इंजि.प्रशांत ठमके, जी .पी. मिसाळे आदिनी केले आहे .

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...