भाजपाच्या सगळ्या अडचणी मी समजून घेणार नाही :–उद्धव ठाकरे
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी,मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याप्रमाणेचं होईल असे स्पष्ट संकेत दिले.
मुंबई:-विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा मिळवत सत्ता स्थापनेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपा-शिवसेना युतीला चांगलाच फटका बसला आहे. मतमोजणीत दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्यामुळे, राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याप्रमाणे होईल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत सर्व मतदारांचे आभार मानले. “लोकसभेआधी शिवसेना आणि भाजपा यांच्यात ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र विधानसभेच्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मला विनंती केल्यामुळे मी त्यांची अडचण समजून घेतली. मात्र प्रत्येकवेळी मी सगळ्या अडचणी समजून घेणार नाही, मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. याचसोबत सत्तास्थापनेची आपल्याला कोणतीही घाई नसून सर्व पर्याय खुले असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे.
यंदाच्या मतमोजणीमध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसला आहे. अनेक महत्वाच्या जागांवर निष्ठावंत उमेदवारांना तिकीटं नाकारल्यामुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या आहेत. तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी गेल्या हंगामापेक्षा चांगली कामगिरी करत सत्ताधारी पक्षापुढे चांगंल आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेदरम्यान मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी,मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याप्रमाणेचं होईल असे स्पष्ट संकेत दिले.
मुंबई:-विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा मिळवत सत्ता स्थापनेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपा-शिवसेना युतीला चांगलाच फटका बसला आहे. मतमोजणीत दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्यामुळे, राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याप्रमाणे होईल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत सर्व मतदारांचे आभार मानले. “लोकसभेआधी शिवसेना आणि भाजपा यांच्यात ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र विधानसभेच्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मला विनंती केल्यामुळे मी त्यांची अडचण समजून घेतली. मात्र प्रत्येकवेळी मी सगळ्या अडचणी समजून घेणार नाही, मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. याचसोबत सत्तास्थापनेची आपल्याला कोणतीही घाई नसून सर्व पर्याय खुले असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे.
यंदाच्या मतमोजणीमध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसला आहे. अनेक महत्वाच्या जागांवर निष्ठावंत उमेदवारांना तिकीटं नाकारल्यामुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या आहेत. तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी गेल्या हंगामापेक्षा चांगली कामगिरी करत सत्ताधारी पक्षापुढे चांगंल आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेदरम्यान मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

No comments:
Post a Comment