Wednesday, November 6, 2019

इ.१० वी व इ.१२ वी बोर्डाची परीक्षा शुल्क माफ करा :- संदीप पवार निवघेकर

इ.१० वी व इ.१२ वी बोर्डाची परीक्षा शुल्क माफ करा :- संदीप पवार निवघेकर




नांदेड प्रतिनिधी:-एजास कुरेशी
कधी नव्हे एवढी अतिवृष्टी सर्वत्र झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची शंभर टक्के नासाडी झाली आहे महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांवर आस्मानी व सुलतानी संकट कोसळले आहे.या ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे
या वर्षी निसर्गाने शेतकऱ्यावर मोठा आघात केल्याने झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा खचून गेला आहे. शेतातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, हळद ही सर्वच पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उघड्यावर पडला आहे
त्यामुळेच शिक्षण विभागाने राज्यातील इ.१० वी व इ.१२ वी बोर्डाचे परीक्षा शुल्क माफ करावे .या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदवीधर संघाचे मुदखेड तालूकाध्यक्ष .प्रा.संदिप पवार निवघेकर यांच्याकडून नायब तहसिलदार नागमवार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालूका अध्यक्ष मा.शिवानंद शिप्परकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...