सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने राहुं गावात शांतता ठेऊ न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करू-भोकर शांतता कमेटी
भोकर :(एजास कुरेशी )
अयोध्येतील रामजन्मभूमी, बाबरी मशिद प्रकरणी लवकरच न्यायायलायकडून निकाल दिला जाणार आहे. हा निकाल कोणत्याही बाजूने लागू शकतो त्यामुळे निकालानंतर अती उत्साही होवून जल्लोषात फटाके फोडणे, डिजे लावणे, मिरवणूक काढणे, किंवा निकालाबाबत निषेध करणे या बाबी अयोग्य आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांनी शांतता राखावी तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोशल मीडियावर निकालासंबंधी कोणत्याही पोस्ट अथवा चर्चा करू नये, अथवा एखादी पोस्ट त्या प्रकारची आढळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भोकर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थता अबाधित राहण्यासाठी घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत न्यायालयालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचे स्वागत करण्याचे ठरले आहे.
आज दि,8 नोव्हेंबर रोजी सकाळी तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठीस तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री, मुदिराज, जेष्ठ पोलिस निरीक्षक विकास पाटील, पंचायत समीतीचे सभापती राठोड, माजी नगराध्यक्ष विनोद पा. चिंचाळकर, माजी नगराध्यक्ष सोमेवाड, माजी उपनगराध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील, पत्रकार उत्तम बाबळे, शिवाजी पाटील किन्हाळकर, सुभाष पा.किन्हाळकर, हमीदखान पठाण, बाबूभाई, तामसेकर, व्यंकट माने, मिर्झा ताहेरबेग, बाबाखान पठाण, मौलाना मोबिन ईनामदार,तोफिक इनामदार,संतोष मारकवर, माळेबाई, नरतावारबाई, गणपत पीठेवाड, संतोष मारकवार, यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती. सर्वांनी प्रशाषणास सहकार्य करण्याचे व तालुक्यात शांतता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अनावश्यक लिखान करून वाद निर्माण करणाऱ्या टवाळखोरांवरही पोलिसांची करडी नजर राहणार असून,शोषल मीडियावरील व्हाट्सऑप,फेसबुक, यासारख्या अनेक ऑप वर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व अशी पोष्ट लाईक आणि शेर करणाऱ्यारही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असल्याची माहिती आज दिली आहे, त्यामुळे सर्वांनी मंदिर मस्जिद बाबद लिखाण करणे टाळून प्रशाषणास सहकार्य करावे असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे. तर पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी म्हटले आहे की, शहरात विनापरवाना बॅनर बाजी करणे, सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणे, मिरवणूक काढणे, मोठा जमाव जमवणे, अश्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कार्यवाही टाळण्यासाठी सर्वांनी शासनाला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
भोकर :(एजास कुरेशी )
अयोध्येतील रामजन्मभूमी, बाबरी मशिद प्रकरणी लवकरच न्यायायलायकडून निकाल दिला जाणार आहे. हा निकाल कोणत्याही बाजूने लागू शकतो त्यामुळे निकालानंतर अती उत्साही होवून जल्लोषात फटाके फोडणे, डिजे लावणे, मिरवणूक काढणे, किंवा निकालाबाबत निषेध करणे या बाबी अयोग्य आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांनी शांतता राखावी तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोशल मीडियावर निकालासंबंधी कोणत्याही पोस्ट अथवा चर्चा करू नये, अथवा एखादी पोस्ट त्या प्रकारची आढळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भोकर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थता अबाधित राहण्यासाठी घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत न्यायालयालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचे स्वागत करण्याचे ठरले आहे.
आज दि,8 नोव्हेंबर रोजी सकाळी तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठीस तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री, मुदिराज, जेष्ठ पोलिस निरीक्षक विकास पाटील, पंचायत समीतीचे सभापती राठोड, माजी नगराध्यक्ष विनोद पा. चिंचाळकर, माजी नगराध्यक्ष सोमेवाड, माजी उपनगराध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील, पत्रकार उत्तम बाबळे, शिवाजी पाटील किन्हाळकर, सुभाष पा.किन्हाळकर, हमीदखान पठाण, बाबूभाई, तामसेकर, व्यंकट माने, मिर्झा ताहेरबेग, बाबाखान पठाण, मौलाना मोबिन ईनामदार,तोफिक इनामदार,संतोष मारकवर, माळेबाई, नरतावारबाई, गणपत पीठेवाड, संतोष मारकवार, यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती. सर्वांनी प्रशाषणास सहकार्य करण्याचे व तालुक्यात शांतता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अनावश्यक लिखान करून वाद निर्माण करणाऱ्या टवाळखोरांवरही पोलिसांची करडी नजर राहणार असून,शोषल मीडियावरील व्हाट्सऑप,फेसबुक, यासारख्या अनेक ऑप वर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व अशी पोष्ट लाईक आणि शेर करणाऱ्यारही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असल्याची माहिती आज दिली आहे, त्यामुळे सर्वांनी मंदिर मस्जिद बाबद लिखाण करणे टाळून प्रशाषणास सहकार्य करावे असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे. तर पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी म्हटले आहे की, शहरात विनापरवाना बॅनर बाजी करणे, सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणे, मिरवणूक काढणे, मोठा जमाव जमवणे, अश्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कार्यवाही टाळण्यासाठी सर्वांनी शासनाला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.


No comments:
Post a Comment