"भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी लहानपणी हरवलेले भाऊच - असदुद्दीन ओवेसी
बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क
अमरावती - भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकाच परिवारातील आहेत. लहानपणी ते हरवलेले भाऊ होते आणि आता एकमेकांना भेटले आहेत. प्रत्येक ठिकाणी क्लब करून ते निवडणुका लढवत असून, यांच्या क्लबचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत, अशी घणाघाती टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अमरावतीत येथे केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयाेजित सभेत ते बाेलत हाेते. अमरावतीच्या निवडणुकीत आमची लढत अपक्ष उमेदवारासोबत आहे, असेही ते म्हणाले.
अकॅडिमक हायस्कूलच्या मैदानात सोमवारी दुपारी ३ वाजता झालेल्या सभेत ओवेसी म्हणाले, अमरावतीत मागील दहा वर्षांपासून निवडून दिलेल्या खासदाराने अपेक्षित विकासात्मक कामे केली नाहीत, गरिबांना मदत होईल अशा प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे त्यांना मत देऊ नका, विचार करून मत द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये घोषणा केली होती की, प्रत्येक वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देणार. प्रत्यक्षात तसे झाले नाही. मात्र, मोदी स्वत:ची नोकरी वाचवण्यासाठी दोन समुदायांच्या नावावर राजकारण करत आहेत. जीएसटी, नोटबंदीमुळे सर्वाधिक नुकसान गरिबांचे झाले आहे. एकंदरीत मागील पाच वर्षांत नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी झाले आहेत, असा आराेपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मात्र, त्यांना कर्ज माफ करण्यासाठी अडचणी येत आहेत. दुसरीकडे जेट एअरवेजसारख्या कंपनीला १५०० कोटी रुपये देतात. उद्धव ठाकरे म्हणाले हाेते, 'चौकीदार चोर है,' आता मोदींसमोर त्यांची 'भीगी बिल्ली'सारखी अवस्था झाली आहे. सिंचन घोटाळा उघड झाल्यानंतर राज्य सरकार अजित पवारांना अटक करण्याची भाषा करत होत
बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क
अमरावती - भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकाच परिवारातील आहेत. लहानपणी ते हरवलेले भाऊ होते आणि आता एकमेकांना भेटले आहेत. प्रत्येक ठिकाणी क्लब करून ते निवडणुका लढवत असून, यांच्या क्लबचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत, अशी घणाघाती टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अमरावतीत येथे केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयाेजित सभेत ते बाेलत हाेते. अमरावतीच्या निवडणुकीत आमची लढत अपक्ष उमेदवारासोबत आहे, असेही ते म्हणाले.
अकॅडिमक हायस्कूलच्या मैदानात सोमवारी दुपारी ३ वाजता झालेल्या सभेत ओवेसी म्हणाले, अमरावतीत मागील दहा वर्षांपासून निवडून दिलेल्या खासदाराने अपेक्षित विकासात्मक कामे केली नाहीत, गरिबांना मदत होईल अशा प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे त्यांना मत देऊ नका, विचार करून मत द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये घोषणा केली होती की, प्रत्येक वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देणार. प्रत्यक्षात तसे झाले नाही. मात्र, मोदी स्वत:ची नोकरी वाचवण्यासाठी दोन समुदायांच्या नावावर राजकारण करत आहेत. जीएसटी, नोटबंदीमुळे सर्वाधिक नुकसान गरिबांचे झाले आहे. एकंदरीत मागील पाच वर्षांत नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी झाले आहेत, असा आराेपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मात्र, त्यांना कर्ज माफ करण्यासाठी अडचणी येत आहेत. दुसरीकडे जेट एअरवेजसारख्या कंपनीला १५०० कोटी रुपये देतात. उद्धव ठाकरे म्हणाले हाेते, 'चौकीदार चोर है,' आता मोदींसमोर त्यांची 'भीगी बिल्ली'सारखी अवस्था झाली आहे. सिंचन घोटाळा उघड झाल्यानंतर राज्य सरकार अजित पवारांना अटक करण्याची भाषा करत होत

No comments:
Post a Comment