Wednesday, February 27, 2019

पाकिस्तानवरील भारतांकडुन झालेल्या हल्ल्याचा बिलोलीत आनंदोत्सव

पाकिस्तानवरील भारतांकडुन झालेल्या हल्ल्याचा बिलोलीत आनंदोत्सव




 बिलोली( ए.जी.कुरेशी )
दि.१४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान धार्जीण्या दहशतवाद्यांनी सी.आर.पी.एफ. च्या भारतीय जवानांवर आत्मघातकी हल्ला केला. तेव्हापासूनच संपूर्ण भारतीयांच्या मणात पाकिस्तान विरोधात आक्रोष खदखदत असताना दि.२६ च्या पहाटे भारतीय वायू सेनेच्या जवानांनी पाकिस्तान मधील दहशतवाद्याच्या स्थळांवर हवाई हल्ला करून मोठे तडाकेबाज प्रतिउत्तर दिले.या हल्याची बातमी समजताच बिलोली शहरात अगदी सकाळ पासून शहरात जणू  दिपावलीच साजरी करण्यात आली.सायंकाळी ६ च्या दरम्यान शहरातील बहुसंख्य नागरिक एका ठिकाणी जमून फटाके फोडीत पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणेने शहर दणानून सोडले.
यावेळी प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते साईनाथ आरगुलवार जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,डॉ. भिमराव अंकोशकर, आनंद पा.बिराजदार,शांतेश्वर पाटील,उमाकांत गोपछडे,वलियोद्दिन फारुखी,राष्ट्रवादीचे मुन्ना पोवाडे,दिलीप उत्तरवाड,शंकर मावलगे,डाँ.दत्ताञय बेटमोगरेकर,नागनाथ पा.माचनुरकर,प्रशांत पांचाळ,गोविंद गुडमलवार,गंगाधर पा.नरवाडे,आबाराव संगनोड,शंकरराव काळे,प्रकाश साखरे,साईनाथ खंडेराय यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...