Monday, November 26, 2018

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मारल्या इसापूर धरणात उड्या सर्वच कार्यकर्ते आंदोलन करून सुखरूप बाहेर पडले.

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मारल्या इसापूर धरणात उड्या
सर्वच कार्यकर्ते आंदोलन करून सुखरूप बाहेर पडले.


नांदेड (एजास कुरेशी) तीन दिवसाच्या नंतर आज अखेर सकाळी गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाला चकमा देत प्रहारचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद भाऊ कुदळे यांच्या मार्गद्शनाखाली कार्यकर्त्यांनी दि.२५ सकाळच्या रामप्रहरी जय जवान जय किसानचा नारा देत इसापूर धरणात उड्या घेऊन आंदोलन पूर्ण केले आहे.

इसापूर धरणावर प्रहारचे कार्यकर्ते उड्या मारण्यासाठी येणार असल्याचे समजताच हजारो पोलिसांचा बंदोबस्त लावून त्यांना २ किमी आकडेच अडविण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवस प्रश्नाच्या निगराणीत राहून थंडीमुळे गाढ झोपलेल्याना चकमा देऊन गनिमी काव्याने अखेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी इसापूर धरणात उड्या मारल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उड्या मारणारे सर्वच प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन पूर्ण करून सुखरूप बाहेर पडल्यामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या प्रशासनाने सुटकेचे निश्वास सोडला आहे. या आंदोलनात महागाव येथील: उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे, रियाज पारेख, महागाव तालुका प्रमुख पवन धरणकर, शहर प्रमुख रानू कुरेशी, शेखर माहूरे, सागर डोंगरे, अक्षय भालेराव, अभिजीत कांबळे, निलेश खंदारे, ढाणकी प्रमुख माजिद शेख, नांदेड़ जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख, नांदेड उपजिल्हाप्रमुख बालाजी बालपेलवाड, हिमायतनगर तालुका प्रमुख गजानन ठाकरे, हदगाव तालुका प्रमुख अनिल पाटिल कदम, कार्याध्यक्ष बालू पाटिल शिरपुले, युवाध्यक्ष गणेश कदम, सुभाष देशमुख हदगाव, यांच्यासह अनेक प्रहार कार्यकर्तै या शेतकरी हितार्थ अंदोलनात सहभागी झाले होते. यानंतर प्रहार संघटना नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी कोणत्या पद्धतीचे आंदोलन करते हे येणार्या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यानंतर तरी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे अधिकारी धरणातील पाणी नदीमध्ये सोडतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...