Monday, July 22, 2019

कांडली ग्रामस्थांनाचा तिबार पेरणीसाठी त्वरित अर्थसहाय्य करा मागणी साठी सर्व मुलाबाळासह तहसील कार्यालयावर मोर्चा

कांडली ग्रामस्थांनाचा तिबार पेरणीसाठी त्वरित अर्थसहाय्य करा मागणी साठी सर्व मुलाबाळासह तहसील कार्यालयावर मोर्चा 







 भोकर (एजास कुरेशी)
-- तालुक्यातील कांडली येथील पडलेल्या प्रखर उन्हामूळे शेतकऱ्यांना तिबार पेरणीची वेळ आली . पहिल्याच पेरणीला बँकेकडून मिळालेले कर्ज, सावकारांच्या दारातून व्याजाने आणलेले कर्ज, त्यातून घेतलेले बी-बियाणे सर्व वाया गेल्याने आता तिबार पेरणी साठी मायबाप सरकारने सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व जनावरांसाठी छावण्या उभारून चारा-पाण्याची व्यवस्था करावी या मागण्यासाठी गावातील मुलाबाळांसह महिला पुरुषांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चाने संबंध भोकर शहरवासीयांचे लक्ष खेचून घेतले.
  तालुक्यात गेल्या दिड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तीही आता  वाया गेली असल्याने भविष्यात जीवनाचा गाडा कसा चालवावा ? मुलाबाळांचे शिक्षण, लेकिबाळीचे  लग्न व सावकाराचे कर्ज कसे फेडणार? या विवंचनेने कांडली येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
 त्यामुळे नाईलाजाने त्यांनी गावातील सर्व मुलाबाळासह तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तिबार पेरणी साठी त्वरित अर्थसहाय्य करा, जनावरांसाठी चारा छावण्या उभारून चारा-पाण्याची व्यवस्था करा, सन २०१७-१८ मधील पिक विमा मंजूर करा, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा आदी मागण्यासाठी भव्य मोर्चा काढला.
 हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार एल.ए. हिरे, पत्रकार  बालाजी नार्लेवाड, शाहीर गाडेकर यासह अनेक जणांनी  मार्गदर्शन करून अत्यंत बिकट परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने त्वरित मदत करावी व त्यांना आत्महत्येपासून परावर्तित करून जीवन जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन केले.




  तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी सर्व शेतकऱ्यांना आपल्या केबिनमध्ये बसवून त्यांच्या सर्व मागण्यांची आस्थावाईक पणे चौकशी करून शेतकऱ्यांसोबत हितगुज साधले व माझ्याकडून शक्‍यहोणार्‍या सर्व मागण्या मी पूर्ण करणार. ज्या वरिष्ठ स्तरावरून पूर्ण होणार आहेत त्या त्वरित पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन  शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या मोर्चाचे समापन केले.
  यावेळी सरपंच प्रतिनिधी हरी दूमलवाड, उपसरपंच दिलीपराव सूर्यवंशी, नारायण पाटील गणेश पाटील, हनमनलू बडगर, प्रताप पाटील, मारोतराव राठोड, रामदास राठोड, माधव करेवाड आदी सह शेकडो ग्रामस्थ, महिला व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...