Tuesday, March 31, 2020

नागरिकांनी सढळ हस्ते अन्न धान्य द्यावे व -- जिल्हाधिकारी डॉ विपीन

नागरिकांनी सढळ हस्ते अन्न धान्य द्यावे  व -- जिल्हाधिकारी डॉ विपीन




नांदेड --कोरोना साथ रोग नियंत्रण आणताना अन्न धान्य कमी पडू नये या करिता नांदेड शहरात अन्नधान्य संकलन करणारे सहा  केंद्रे स्थापन करण्यात आली असून नागरिकांनी त्या ठिकाणी अन्नधान्य आणून द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन यांनी केले आहे.
    शहरातील पूर्णा रोड वरील नरवाडे मंगल कार्यालय, पाटीदार मंगल कार्यालय दत्त नगर, हनुमान मंगल कार्यालय विजय नगर, फत्तेसिंह मंगल कार्यालय अबचल नगर, व  देगलूर नाका परिसरातील हैदरबाग फंक्शन हॉल व आर्य वैश्य मंगल कार्यालय कॅन्सर हॉस्पिटल जवळ सिडको  येथे अन्न धान्य गोळा केले जाणार आहे. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
     दानशूर नागरिकांनी सढळ हस्ते अन्नदान करावे व गरजू पर्यंत ते पोहचवण्या करिता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन ही डॉ विपीन यांनी केले आहे.
    लॉक डाऊन कालावधीत हे धान्य गरजू व्यक्तींना वाटप केले जाणार आहे त्या मुळे राष्ट्रीय कार्य म्हणून नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहनही डॉ विपीन यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...