Thursday, September 5, 2019

ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर तुमच्याकडे आहेत 'हे' अधिकार!

ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर तुमच्याकडे आहेत 'हे' अधिकार!


नव्या अॅक्टनुसार वाहुतकीचे नियम मोडल्यास दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागते.



महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी
नव्या मोटार व्हेइकल अॅक्टला लागू केल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं महागात पडू शकतं. नव्या अॅक्टनुसार वाहुतकीचे नियम मोडल्यास दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागते. नव्या कायद्यानुसार पोलिस याची अंमलबजावणी करत आहेत. नियम मोडणाऱ्यांकडून मोठी पावती फाडली जात आहे.

वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आपली जबाबदारी आहे. मात्र नियमांचा वापर करून पोलिस तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत. त्यांना कोणत्याही प्रकारे तुमच्याशी गैरवर्तन करता येणार नाही. याशिवाय तुम्हाला वाहन धारक म्हणून असलेल्या अधिकारांची माहिती असायला हवी.



वाहतुक निरीक्षक तुम्हाला थांबवू शकतात. जसे तुमच्यासाठी काही नियम आहेत तसेच त्यांच्यासाठीही नियम आहेत. ते नियम वाहतुक निरीक्षकांनी पाळणं गरजेचं असतं. प्रत्येक वाहतूक पोलीस त्यांच्या गणवेशात असणं बंधनकारक आहे. त्यावर त्यांचा बक्कल नंबर आणि नाव असायलाच हवं. या गोष्टी नसतील तर तुम्ही त्यांच्या ओळखपत्राची मागणी करून शकता. त्यांनी ओळखपत्र दाखवण्यास नकार दिल्यास तुमच्या गाडीची कागदपत्रं त्यांना देऊ नका.

तुम्हाला एखादा नियम मोडल्याबद्दल दंड झाल्यास त्याची पावती घ्या. वाहतूक पोलिसांकडे पावती बूक किंवा ई- पावती नसेल तर दंड वसूल करता येणार नाही.


वाहतूक पोलीस अडवतात तेव्हा गाडी रस्त्याच्या एका बाजूला नीट लावा. त्यानंतर गाडीचे कागदपत्रं दाखवा. तुमची कागदपत्रं पोलिसांकडं द्यायची नाहीत. यावेळी त्यांना सहकार्य करा तसेच त्यांनीसुद्धा तुमच्याशी योग्य पद्धतीनं संवाद साधला पाहिजे.


अनेकदा गाडी थांबवल्यानंतर वाहतूक पोलीस वाहनाची किल्ली काढून घेतात. त्यांना अशाप्रकारे किल्ली काढून घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही वाद न घालता त्यांच्याशी बोललं पाहिजे.

गाडी चुकीच्या ठिकाणी थांबवली असेल आणि तुम्ही गाडीत बसला असाल तर वाहतुक पोलिसांना गाडी उचलता येत नाही. नो पार्किंगमध्ये गाडी असेल आणि तुम्ही गाडीत नसाल तर वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात.


वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं तर 24 तासांच्या आत न्यायालयात हजर करणं बंधनकारक आहे. तुम्हाला वाहतूक पोलिस त्रास देत असतील तर पोलिसांत तक्रार करू शकता.

वाहतूक पोलीस तुमच्याशी गैरवर्तन करत असतील तर त्याची लेखी तक्रार करता येते. याची तक्रार जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिस अधिक्षकांकडे करता येते.

पावती भरल्याचा अर्थ हा नाही की तुम्ही वाहतूक पोलीसांच्या चुकीच्या वर्तनाविरुद्ध तक्रार करू शकत नाही. पावती फाडली तरी तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला अपमानास्पद वागणूक दिल्यास त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवू शकता. हाच अधिकार वाहतूक पोलिसांनादेखील आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...